* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666519
  • Edition : 21
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 864
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SAMBHAJI, THE YOUNG KING, THE SECOND MARATHA CHHATRAPATI WHO SUCCEEDED THE THRONE AFTER HIS FATHER THE GREAT SHIVAJI MAHARAJ, CONTINUOUSLY FOUGHT THE MUGHALS FOR EIGHT CONSECUTIVE YEARS, BUT DID NOT LET THE MOGHUL ARMY CAPTURE EITHER ANY OF THE MARATHA FORTS OR ANY OF THE SHIPS. HE OFFERED HIMSELF BUT DID NOT BOW DOWN IN FRONT OF THE MUGHAL EMPEROR; HE DIED A HERO`S DEATH AT A VERY YOUNG AGE, WHEN HE WAS JUST 32 YEARS OLD. FOR THE PAST 325 YEARS, SAMBHAJI WAS OFTEN PAINTED IN BLACK. HE HAD A POETIC MIND, HE WAS A VERY INTELLIGENT PERSON, HE WAS CONCERNED ABOUT HIS PEOPLE, HE WAS BRAVE, HE WAS A GREAT THINKER, BUT ALL HIS GOOD QUALITIES WERE OVER-LOOKED; HIS PERSONALITY WAS ALWAYS LOOKED UPON WITH SUSPICION. VISHWAS PATIL, THE MOST GIFTED AUTHOR TODAY, TELLS US MORE ABOUT SAMBHAJI RAJE, AS HE HAS SEEN HIM THROUGH THE REFERENCES IN HISTORY, AS HE HAS FOUND HIM IN THE VERY VALUABLE YET IGNORED DOCUMENTS, AS HE HAS HEARD HIM IN THE HILLY REGIONS OF SAHYADRI MOUNTAIN RANGES, AMONG THE CREEKS OF THE ARABIAN SEA. SAMBHAJI, SON OF SHIVAJI MAHARAJ, A NOVEL PERSONALITY WITH HIS EQUALLY IMPRESSIVE, BREATH-TAKING, SPECTACULAR, STORMY YET VERY TRUE STORY.
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
* सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार २००५ * कवी माधव पुरस्कार २००६ * अक्षरगंध पुरस्कार २००६

No Records Found
No Records Found
Keywords
#YESUBAI #SHIVAJI #PUTALABAI #RAJARAMSAHEB #SOIRABAI #EKOJI #DURGABAI #RANUBAI #HARJIRAJEMAHADIK #AMBIKABAI #GANOJISHIRKE #RAJKUNWAR #MAHADJINIMBALKAR# SAKAVRABAI #PILAJISHIRKE #HIROJIFARJAND #HAMBIRAOMOHITE #BALAJIAAWAJI #KHANDOJIBALLAL #MOROPANTPINGALE #KESOTRIMALPINGALE #NILOPANTPINGALE #KAVIKALASH #PRALHADNIRAJI #ANNAJIDATTO #SOMAJIDATTO #KAZIHAIDER #KONDAJIFARJAND #YESAJIGAMBHIRRAO #YESAJIKANK #KRUSHNAJIKANK #JYOTYAJIKESARKAR #DAULATKHAN #DADJIPRABHUDESHPANDE #AURANGZEB #DILERKHAN #SHAHABUDIKHAN #28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #VISHWASPATIL #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर #विश्वासपाटील
Customer Reviews
  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating StarSuresh Phadnis

    विश्वास पाटील यांची छ्त्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी.मेहता publication.खूप छान कादंबरी,जणू इतिहासच समोर उभा राहतो.आजच वाचून संपली.फितुरी कशी असते याचे जवळचे उदाहरण.

  • Rating StarJyoti Kshirsagar

    विश्वास पाटील यांची *संभाजी*कादंबरी बऱ्याच दिवसापासून घरात होती ती वाचायची होती पण एवढी मोठी साडेआठशे पानांची कादंबरी केव्हा वाचून होईल असे वाटत होते, पण एक दिवस सुरुवात तर करू असे म्हणून ती हातात घेतली आणि वाचतच गेले, विश्वास पाटलांची ती भाषाशैली आण संभाजी राजांविषयी ते वर्णन भारावून गेल्यासारखे वाचन चालू झाले, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राज्यांच्या जाज्वल्य इतिहासाने मन भारावून गेले‌. शिवरायांनंतर सलग नऊ वर्ष औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याविरुद्ध संभाजीराजे कसे लढले, पातशहा औरंगजेबाला कसे झुलवत ठेवले. रामशेज किल्ला घ्यायला औरंगजेबाच्या सैन्याला साडेसहा वर्षे झुंजावे लागले, संभाजी राजांपुढे औरंगजेब अक्षरश: हतबल झालेला होता. किती प्रयत्न केले परंतु शिवाचा हा छावा औरंगजेबाच्या हाती लागत नव्हता. परंतु घात झाला आणि फितुरीने हा छावा औरंगजेबाच्या हाती लागला संभाजी राजे पकडले गेले. पकडल्यानंतर संभाजी राजांची आणि कवी कलश यांची केलेली विटंबना वाचून मन सुन्न झाले. केवळ स्वराज्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी संभाजीराजांनी औरंगजेबाचे हाल सहन करून मृत्यूला कवटाळले. परंतु त्याच्या पुढे झुकले नाही,अवघ्या 32 वर्षाच्या एका छत्रपतीला औरंगजेबाने हाल हाल करून मारले. स्वराज्यासाठी जगावे हे शिवरायांनी शिकवले तर आपल्या मातीसाठी कसे मरावे हे शंभूराजांनी शिकवले. संभाजीराजांबद्दल आदर होताच परंतु वाचनानंतर तो कैकपटीने वाढला. स्वराज्याचे धाकले धनी, दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा.🙏🙏 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more