* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE THEFT OF INDIA: THE EUROPEAN CONQUESTS OF INDIA, 1498-1765
  • Availability : Available
  • Translators : SARITA ATHAWALE
  • ISBN : 9788195970940
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2023
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THE THREE CENTURIES THAT FOLLOWED VASCO DA GAMA`S DISCOVERY OF THE SEA ROUTE FROM EUROPE TO INDIA, EUROPEAN POWERS MADE A BEELINE FOR INDIA`S FABLED RICHES, ITS SPICES, GOLD AND GEMS. THOUGH THEY OSTENSIBLY CAME FOR TRADE AND COMMERCE, AND THE THRILL OF DISCOVERING A NEW LAND, THE LINES BETWEEN EXPLORATION AND EXPLOITATION SOON BLURRED. THE THEFT OF INDIA DOCUMENTS THE INTENSE RIVALRY FOR SPOILS THAT PLAYED OUT BETWEEN THE BRITISH, THE FRENCH, THE DUTCH AND THE PORTUGUESE, AND THE IMPACT THIS HAD ON THE INDIANS. ROY MOXHAM`S WORK, THOUGH, IS NO DRY STUDY OF TEXTUAL MATERIALS. HE SUPPLEMENTS THESE ACCOUNTS WITH AN EXHAUSTIVE STUDY OF ACADEMIC WORKS ON THE SUBJECT. THE RESULT IS AN UNFLATTERING PICTURE OF THE `CIVILIZED` WEST AS IT SYSTEMATICALLY STRIPS INDIA OF ITS RICHES. THE THEFT OF INDIA IS A NUANCED, IMPORTANT AND HIGHLY READABLE ADDITION TO THE STUDY OF IMPERIALISM AND ITS DEHUMANIZING EFFECTS ON THE COLONIZED.
’वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #असा लुटला भारत #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #THE THEFT OF INDIA #ROY MOXHAM #SARITA ATHAWALE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more