* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOKARNICHI PHULE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664928
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK HIGHLIGHTS 5 KNOWN FIGURES AND INCLUDES REVIEWS ON 3 TOPICS : 3 PERSONS OF THE 5 MENTIONED ABOVE ARE NOT VERY WELL KNOWN BUT THE QUALITIES THEY POSSESS ARE VERY EXCLUSIVE. THEY CAN BE COMPARED ONLY TO THE MEDICINAL PLANT FOUND IN FORESTS. THESE MEDICINAL PLANTS ARE NEITHER EASILY AVAILABLE NOR MUCH INFORMATION ABOUT THEM IS AT HAND. THEY ARE FOUND MOSTLY BY SHEER COINCIDENCE. BUT THOSE WHO ARE LUCKY ENOUGH TO FIND THEM ARE BLESSED BY THEIR QUALITIES. IN THE SAME WAY KHANDEKAR HAS BEEN INDEBTED BY SUCH CHARACTERS IN HIS REAL LIFE. KHANDEKAR SAYS "INDEED I AM VERY LUCKY TO HAVE THESE PERSONS IN MY LIFE. I AM TEMPTED TO SAY SO.` THE OTHER TWO SKETCHES ARE THAT OF WELL KNOWN CONTEMPORARY LITTERATEUR. THE REVIEWS INCLUDE THAT OF DRAMAS BY KOLHOTKAR, USHA PRABHA (STORIES BY SHRI MANJREKAR) AND MARATHI CHITRAKATHA. THESE ARE DETAILED LITERARY REVIEWS. WE ARE SURE THAT KHANDEKARS FAN CLUB WILL ENTHUSIASTICALLY WELCOME THIS COLLECTION.
श्री. वि. स. खांडेकरांच्या या पुस्तकात पाच व्यक्तिरेखा आणि तीन रसग्रहणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच व्यक्तींपैकी तीन जगाला तशा अज्ञात असल्या, तरी गुणांच्या दृष्टीने त्या मुळीच उपेक्षणीय नाहीत. या व्यक्तींची तुलना रानावनांत आढळणाNया झाडपाल्यांच्या औषधांशीच करता येईल. ही औषधे तशीR सहज उपलब्ध नसतात. त्यांच्याविषयी पुरेशी माहितीही हाताशी नसते; पण योगायोगाने ज्यांना ती लाभतात, त्यांना त्यांचे गुण अचूक पटल्याशिवाय राहत नाहीत. खांडेकरांच्या मनात या व्यक्तींविषयी केवळ कृतज्ञतेचीच भावना आहे. खांडेकरांच्याच शब्दात सांगायचे, तर `...ही माणसे मला भेटली, हे आपले मोठे भाग्य, असे म्हणण्याचा मोह मला अनिवार होतो.` उरलेली ना. सी. फडके आणि ग. त्र्यं. माडखोलकर या दोघां समकालीन साहित्यकारांची मनोज्ञ व्यक्तिचित्रे आहेत. पुस्तकाच्या उरलेल्या अध्र्या भागात `कोल्हटकरांची नाटके`, `उष:प्रभा ` (श्री. मांजरेकर यांचा कथासंग्रह) आणि `मराठी चित्रकथा ` ही तीन वाङ्मयीन आणि विस्तृत अशी गुणग्राहक रसग्रहणे समाविष्ट केली आहेत. श्री. खांडेकरांचे वाचक या संग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील अशी खात्री आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #गोकर्णीची फुले
Customer Reviews
  • Rating StarSushil Kale

    पुरुषाला माहेर असते का?तीन-चार वर्षापूर्वी या प्रशनाचे उत्तर देण्याऐवजी मी तो नुसता हसलो असतो. `बायकांना मिशा असतात का ? या वात्रट प्रश्नापेक्षा त्याची किंमत मी अधिक मानली नसती.पण आज? आज मला खरोखरच वाटते -पुरुषालाही माहेर असते.स्त्री कितीही प्रौढ झाल तरी तिला मधूनमधून जशी आपल्या माहेराची आठवण होते ,तश्या पुरुषालाही त्याच्या माहेरच्या मधुर स्मृती कधी हुरहुर लावीत असतात.या दोघांच्या माहेरात एक फरक आहे मात्र ! स्त्रीच्या माहेराच्या साऱ्या गॉड आठवणी बालपणाभोवती पिंगा घालीत असतात.उलट पुरुषाच्या माहेरच्या कल्पना त्याच्या ऐन तारुण्यातल्या काळाभोवती गुंगत राहतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    भावपूर्ण व्यक्तिचित्रांचा संग्रह... कै. वि. स. खांडेकर यांचे नाव माहीत नसलेला मराठी माणूस विरळाच! प्रस्तुत ‘गोकर्णीची फुले’ हा त्यांनी रेखाटलेल्या काही व्यक्तिचित्रांचा संग्रह. मी काही म्हटले याचे कारण, या पुस्तकात ५ व्यक्तिचित्रे असून ३ रसग्रहणात्म लेख आहेत. गोकर्णीची फुले ही कोठेतरी कोपऱ्यात फुलतात. त्यांना ना रस, ना गंध पण त्यांना रंग मात्र विविध असतात. चित्रविचित्र मयुरांनी उभारलेले पिसारे एकमेकांत मिसळून जावेत तसं ह्या गोकर्णीच्या फुलाचं रूप असतं. त्यांचा पांढारा, निळा, जांभळा असा संमिश्र रंग फार आकर्षक असतो. अशा प्रकारच्या सामान्य व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटल्या. अशा गोकर्णीच्या फुलासारख्या व्यक्तींची चित्रे खांडेकरांनी या संग्रहात रेखाटली आहेत. या संग्रहात तीन सामान्य व्यक्तींची चित्रे वाचकाला वाचावयास मिळतील. अप्पा नाबर हे त्यातील पहिले व्यक्तिचित्र. शिरोडे हे खांडेकरांचे माहेर. आप्पा नाबर म्हणजे दुसरे तुकारामबुवाच. त्यांचे सर्व जीवन इतरांच्या करीता ते जगले. आप्पांना संतान नव्हते, पण शिरोड्यातील सर्व मुलांवर त्यांनी अपत्यवत प्रेम केले. खांडेकरांनाही त्यांच्यामुळे दिशा गवसली. शिक्षण व सामाजिक कार्यास त्यांनी वाहून घेतले होते. सामान्यातील असामान्यत्व. खांडेकरांनी बरोबर टिपले आहे. उत्कट भावना हा आप्पा नाबरांच्या आयुष्याचा आत्मा होता. आज आप्पा ह्या जगात नाहीत म्हणून लेखकाने खंत व्यक्त केली आहे. दुसरे व्यक्तिचित्र आहे सावंतवाडीच्या पंगु बाळकृष्ण कुडाळकरांचे. शरीराने पंगु पण हसत खेळत मृत्यूशी झुंज देणारे. अशिक्षित पण विलक्षण साहित्यप्रेमी. मनाने निकोप, लढाऊ वृत्तीचे, आशावादी व समाजाशी समरस होणारे हे व्यक्तिमत्त्व खांडेकरांच्या सदैव स्मृतीत राहणारे. तिसरे व्यक्तिचित्र आहे स्वत:च्या सावत्र आईचे. खांडेकर हे आपल्या काकांच्या मांडीवर दत्तक गेलेले होते. त्यांच्या ह्या दत्तक (सावत्र) आईने त्यांच्यावर अथांग वात्सल्याने प्रेम केले. अशी ही तीन गोकर्णीची फुले. ह्या संग्रहात सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके व टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची व्यक्तिचित्रे येतात. त्यांचे स्वरूप थोडेसे प्रासंगिक आहे. १९४० साली फडके रत्नागिरी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा हा परिचयपर लेख लिहिला आहे. मानेची विशिष्ट हालचाल व त्यातून व्यक्त होणारा अभिमान लेखकाने सुरेख टिपला आहे. कलेसाठी कला ह्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उगमसुद्धा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्विातच दिसून येतो. प्रा. फडके हे आधुनिक मराठी कादंबरीचे ‘जादूगार’च होते. जनसामान्यांत विलक्षण लोकप्रियता लाभलेले ते ललितलेखक होते असा गौरव खांडेकरांनी केला आहे. सुप्रसिद्ध टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची आपली ओळख व मैत्री कशी झाली हे खांडेकरांनी सांगितले आहे. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांचा परामर्ष घेऊन ते मानवी मनाचा शोध घेण्यात कसे चतुर होते हे विशद केले आहे. चिकित्सकपणा व निर्भय वृत्ती ही त्यांची खास वैशिष्ट्ये. त्यांचा उल्लेख ‘टीकाकार’ कादंबरीकार असा केला जातो तो किती योग्य आहे हे खांडेकरांनी सांगितले आहे. हे दोन्ही लेख खास परिचयात्मक स्वरुपाचे वाटतात. तर अशी ही ५ व्यक्तिचित्रे या संग्रहात येतात. रसग्रहणात्मक लेख यातील ३ लेख रसग्रहणात्मक स्वरूपाचे आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना खांडेकर गुरुस्थानीच मानीत. कोल्हटकांच्या सर्व नाटकांचा परामर्ष ह्या ४० पानांच्या प्रदीर्घ लेखात खांडेकरांनी घेतला आहे. कल्पनारम्य सामाजिक नाटके हे त्यांचे खास वैशिष्ट्य. इतर नाटककारांच्या नाटकांशी खांडेकरांनी केलेली तुलना मोठी मार्मिक आहे. मधूनच काही आठवणींचा समावेशही केलेला आहे. त्यांचे भाषाप्रभुत्व, संगीताचा व्यासंग, विषयांची नवविधता याविषयी चर्चा करून त्यांची काही नाटके यशस्वी का होऊ शकली नाहीत यावर खांडेकरांनी अचूक बोट ठेवले आहे. सामाजिक सुधारणेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. आगरकरांच्या विचारांचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झालेला दिसतो. त्यांची नाटके स्वतंत्र व सौंदर्यवादी आहेत. ‘मराठी नाटकांत सुधारणा घडवून आणणाऱ्या प्रत्येक प्रतिभासंपन्न नाटककाराने सादर अध्ययन करावे इतकी त्यांची नाटके नि:संशय योग्यतेची होती.’ असा गौरवपर उल्लेख करून त्यांनी ही लेखमाला संपविली आहे. उष:प्रभा व मराठी चित्रकथा समकालीन गुणवान कथालेखक श्री. मांजरेकर यांच्या ‘उष:प्रभा’ ह्या एकुलत्या एक कथासंग्रहाचे रसग्रहण ‘उष:प्रभा’ ह्या लेखात केले आहे. ‘नवे कुत्रे’, ‘सौंदर्य’ व ‘चिंतेचे चुंबन’ ह्या कथांचा खास उल्लेख करावयास हवा. मानवी मनाचा लपंडाव, त्यांची आंदोलने, दुबळी भावविश्वता व प्रीतीवरही मात करणारा त्यांचा अहंकार– हे मांजरेकरांचे आवडते कथाविषय होते. अतिरंजित कारुण्याकडे त्यांची विशेष ओढ होती. त्यांच्या बहुतेक कथा शोकात्म आहेत. ह्या गुणवान लेखकाला प्रकाशकांनी व वाचकांनी योग्य प्रोत्साहन न दिल्यामुळे त्यांचे कथालेखन थांबले याबद्दल खांडेकरांनी खंत व्यक्त केली आहे. ह्या पुस्तकातील शेवटचा लेख ‘मराठी चित्रकथा’ ह्या केवळ चित्रकथांचा आढावा घेणारा लेख वाटतो. काही काळ मराठी चित्रपटांनी निश्चित गाजवला. पण आता गल्लाभरू व हिंदी चित्रपटांचे अंधानुकरण होऊ लागल्यामुळे मराठी चित्रकथांच्या भविष्याबद्दल खांडेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. तर असा हा संग्रह. खरं म्हणजे हा संग्रह १९४४ साली प्रसिद्ध झाला होता. तो कोल्हापूरच्या मोघे प्रकाशनाने त्याचा कुठेही उल्लेख करू नये. हे खरोखरच अजब वाटते. रसग्रहणात्मक लेखांऐवजी आणखी २।३ व्यक्तिचित्रांचा समावेश करून उत्कृष्ट व्यक्तिरेखांचा संग्रह प्रसिद्ध करणे अधिक उचित झाले असते. -डॉ. गं. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more