* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOKARNICHI PHULE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664928
  • Edition : 7
  • Publishing Year : JULY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS BOOK HIGHLIGHTS 5 KNOWN FIGURES AND INCLUDES REVIEWS ON 3 TOPICS : 3 PERSONS OF THE 5 MENTIONED ABOVE ARE NOT VERY WELL KNOWN BUT THE QUALITIES THEY POSSESS ARE VERY EXCLUSIVE. THEY CAN BE COMPARED ONLY TO THE MEDICINAL PLANT FOUND IN FORESTS. THESE MEDICINAL PLANTS ARE NEITHER EASILY AVAILABLE NOR MUCH INFORMATION ABOUT THEM IS AT HAND. THEY ARE FOUND MOSTLY BY SHEER COINCIDENCE. BUT THOSE WHO ARE LUCKY ENOUGH TO FIND THEM ARE BLESSED BY THEIR QUALITIES. IN THE SAME WAY KHANDEKAR HAS BEEN INDEBTED BY SUCH CHARACTERS IN HIS REAL LIFE. KHANDEKAR SAYS "INDEED I AM VERY LUCKY TO HAVE THESE PERSONS IN MY LIFE. I AM TEMPTED TO SAY SO.` THE OTHER TWO SKETCHES ARE THAT OF WELL KNOWN CONTEMPORARY LITTERATEUR. THE REVIEWS INCLUDE THAT OF DRAMAS BY KOLHOTKAR, USHA PRABHA (STORIES BY SHRI MANJREKAR) AND MARATHI CHITRAKATHA. THESE ARE DETAILED LITERARY REVIEWS. WE ARE SURE THAT KHANDEKARS FAN CLUB WILL ENTHUSIASTICALLY WELCOME THIS COLLECTION.
श्री. वि. स. खांडेकरांच्या या पुस्तकात पाच व्यक्तिरेखा आणि तीन रसग्रहणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाच व्यक्तींपैकी तीन जगाला तशा अज्ञात असल्या, तरी गुणांच्या दृष्टीने त्या मुळीच उपेक्षणीय नाहीत. या व्यक्तींची तुलना रानावनांत आढळणाNया झाडपाल्यांच्या औषधांशीच करता येईल. ही औषधे तशीR सहज उपलब्ध नसतात. त्यांच्याविषयी पुरेशी माहितीही हाताशी नसते; पण योगायोगाने ज्यांना ती लाभतात, त्यांना त्यांचे गुण अचूक पटल्याशिवाय राहत नाहीत. खांडेकरांच्या मनात या व्यक्तींविषयी केवळ कृतज्ञतेचीच भावना आहे. खांडेकरांच्याच शब्दात सांगायचे, तर `...ही माणसे मला भेटली, हे आपले मोठे भाग्य, असे म्हणण्याचा मोह मला अनिवार होतो.` उरलेली ना. सी. फडके आणि ग. त्र्यं. माडखोलकर या दोघां समकालीन साहित्यकारांची मनोज्ञ व्यक्तिचित्रे आहेत. पुस्तकाच्या उरलेल्या अध्र्या भागात `कोल्हटकरांची नाटके`, `उष:प्रभा ` (श्री. मांजरेकर यांचा कथासंग्रह) आणि `मराठी चित्रकथा ` ही तीन वाङ्मयीन आणि विस्तृत अशी गुणग्राहक रसग्रहणे समाविष्ट केली आहेत. श्री. खांडेकरांचे वाचक या संग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील अशी खात्री आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #गोकर्णीची फुले
Customer Reviews
  • Rating StarSushil Kale

    पुरुषाला माहेर असते का?तीन-चार वर्षापूर्वी या प्रशनाचे उत्तर देण्याऐवजी मी तो नुसता हसलो असतो. `बायकांना मिशा असतात का ? या वात्रट प्रश्नापेक्षा त्याची किंमत मी अधिक मानली नसती.पण आज? आज मला खरोखरच वाटते -पुरुषालाही माहेर असते.स्त्री कितीही प्रौढ झाल तरी तिला मधूनमधून जशी आपल्या माहेराची आठवण होते ,तश्या पुरुषालाही त्याच्या माहेरच्या मधुर स्मृती कधी हुरहुर लावीत असतात.या दोघांच्या माहेरात एक फरक आहे मात्र ! स्त्रीच्या माहेराच्या साऱ्या गॉड आठवणी बालपणाभोवती पिंगा घालीत असतात.उलट पुरुषाच्या माहेरच्या कल्पना त्याच्या ऐन तारुण्यातल्या काळाभोवती गुंगत राहतात. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    भावपूर्ण व्यक्तिचित्रांचा संग्रह... कै. वि. स. खांडेकर यांचे नाव माहीत नसलेला मराठी माणूस विरळाच! प्रस्तुत ‘गोकर्णीची फुले’ हा त्यांनी रेखाटलेल्या काही व्यक्तिचित्रांचा संग्रह. मी काही म्हटले याचे कारण, या पुस्तकात ५ व्यक्तिचित्रे असून ३ रसग्रहणात्म लेख आहेत. गोकर्णीची फुले ही कोठेतरी कोपऱ्यात फुलतात. त्यांना ना रस, ना गंध पण त्यांना रंग मात्र विविध असतात. चित्रविचित्र मयुरांनी उभारलेले पिसारे एकमेकांत मिसळून जावेत तसं ह्या गोकर्णीच्या फुलाचं रूप असतं. त्यांचा पांढारा, निळा, जांभळा असा संमिश्र रंग फार आकर्षक असतो. अशा प्रकारच्या सामान्य व्यक्ती त्यांना आयुष्यात भेटल्या. अशा गोकर्णीच्या फुलासारख्या व्यक्तींची चित्रे खांडेकरांनी या संग्रहात रेखाटली आहेत. या संग्रहात तीन सामान्य व्यक्तींची चित्रे वाचकाला वाचावयास मिळतील. अप्पा नाबर हे त्यातील पहिले व्यक्तिचित्र. शिरोडे हे खांडेकरांचे माहेर. आप्पा नाबर म्हणजे दुसरे तुकारामबुवाच. त्यांचे सर्व जीवन इतरांच्या करीता ते जगले. आप्पांना संतान नव्हते, पण शिरोड्यातील सर्व मुलांवर त्यांनी अपत्यवत प्रेम केले. खांडेकरांनाही त्यांच्यामुळे दिशा गवसली. शिक्षण व सामाजिक कार्यास त्यांनी वाहून घेतले होते. सामान्यातील असामान्यत्व. खांडेकरांनी बरोबर टिपले आहे. उत्कट भावना हा आप्पा नाबरांच्या आयुष्याचा आत्मा होता. आज आप्पा ह्या जगात नाहीत म्हणून लेखकाने खंत व्यक्त केली आहे. दुसरे व्यक्तिचित्र आहे सावंतवाडीच्या पंगु बाळकृष्ण कुडाळकरांचे. शरीराने पंगु पण हसत खेळत मृत्यूशी झुंज देणारे. अशिक्षित पण विलक्षण साहित्यप्रेमी. मनाने निकोप, लढाऊ वृत्तीचे, आशावादी व समाजाशी समरस होणारे हे व्यक्तिमत्त्व खांडेकरांच्या सदैव स्मृतीत राहणारे. तिसरे व्यक्तिचित्र आहे स्वत:च्या सावत्र आईचे. खांडेकर हे आपल्या काकांच्या मांडीवर दत्तक गेलेले होते. त्यांच्या ह्या दत्तक (सावत्र) आईने त्यांच्यावर अथांग वात्सल्याने प्रेम केले. अशी ही तीन गोकर्णीची फुले. ह्या संग्रहात सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके व टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची व्यक्तिचित्रे येतात. त्यांचे स्वरूप थोडेसे प्रासंगिक आहे. १९४० साली फडके रत्नागिरी येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तेव्हा हा परिचयपर लेख लिहिला आहे. मानेची विशिष्ट हालचाल व त्यातून व्यक्त होणारा अभिमान लेखकाने सुरेख टिपला आहे. कलेसाठी कला ह्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उगमसुद्धा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्विातच दिसून येतो. प्रा. फडके हे आधुनिक मराठी कादंबरीचे ‘जादूगार’च होते. जनसामान्यांत विलक्षण लोकप्रियता लाभलेले ते ललितलेखक होते असा गौरव खांडेकरांनी केला आहे. सुप्रसिद्ध टीकाकार ग. त्र्यं. माडखोलकर यांची आपली ओळख व मैत्री कशी झाली हे खांडेकरांनी सांगितले आहे. त्यांच्या सर्व कादंबऱ्यांचा परामर्ष घेऊन ते मानवी मनाचा शोध घेण्यात कसे चतुर होते हे विशद केले आहे. चिकित्सकपणा व निर्भय वृत्ती ही त्यांची खास वैशिष्ट्ये. त्यांचा उल्लेख ‘टीकाकार’ कादंबरीकार असा केला जातो तो किती योग्य आहे हे खांडेकरांनी सांगितले आहे. हे दोन्ही लेख खास परिचयात्मक स्वरुपाचे वाटतात. तर अशी ही ५ व्यक्तिचित्रे या संग्रहात येतात. रसग्रहणात्मक लेख यातील ३ लेख रसग्रहणात्मक स्वरूपाचे आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना खांडेकर गुरुस्थानीच मानीत. कोल्हटकांच्या सर्व नाटकांचा परामर्ष ह्या ४० पानांच्या प्रदीर्घ लेखात खांडेकरांनी घेतला आहे. कल्पनारम्य सामाजिक नाटके हे त्यांचे खास वैशिष्ट्य. इतर नाटककारांच्या नाटकांशी खांडेकरांनी केलेली तुलना मोठी मार्मिक आहे. मधूनच काही आठवणींचा समावेशही केलेला आहे. त्यांचे भाषाप्रभुत्व, संगीताचा व्यासंग, विषयांची नवविधता याविषयी चर्चा करून त्यांची काही नाटके यशस्वी का होऊ शकली नाहीत यावर खांडेकरांनी अचूक बोट ठेवले आहे. सामाजिक सुधारणेकडे त्यांचे अधिक लक्ष होते. आगरकरांच्या विचारांचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम झालेला दिसतो. त्यांची नाटके स्वतंत्र व सौंदर्यवादी आहेत. ‘मराठी नाटकांत सुधारणा घडवून आणणाऱ्या प्रत्येक प्रतिभासंपन्न नाटककाराने सादर अध्ययन करावे इतकी त्यांची नाटके नि:संशय योग्यतेची होती.’ असा गौरवपर उल्लेख करून त्यांनी ही लेखमाला संपविली आहे. उष:प्रभा व मराठी चित्रकथा समकालीन गुणवान कथालेखक श्री. मांजरेकर यांच्या ‘उष:प्रभा’ ह्या एकुलत्या एक कथासंग्रहाचे रसग्रहण ‘उष:प्रभा’ ह्या लेखात केले आहे. ‘नवे कुत्रे’, ‘सौंदर्य’ व ‘चिंतेचे चुंबन’ ह्या कथांचा खास उल्लेख करावयास हवा. मानवी मनाचा लपंडाव, त्यांची आंदोलने, दुबळी भावविश्वता व प्रीतीवरही मात करणारा त्यांचा अहंकार– हे मांजरेकरांचे आवडते कथाविषय होते. अतिरंजित कारुण्याकडे त्यांची विशेष ओढ होती. त्यांच्या बहुतेक कथा शोकात्म आहेत. ह्या गुणवान लेखकाला प्रकाशकांनी व वाचकांनी योग्य प्रोत्साहन न दिल्यामुळे त्यांचे कथालेखन थांबले याबद्दल खांडेकरांनी खंत व्यक्त केली आहे. ह्या पुस्तकातील शेवटचा लेख ‘मराठी चित्रकथा’ ह्या केवळ चित्रकथांचा आढावा घेणारा लेख वाटतो. काही काळ मराठी चित्रपटांनी निश्चित गाजवला. पण आता गल्लाभरू व हिंदी चित्रपटांचे अंधानुकरण होऊ लागल्यामुळे मराठी चित्रकथांच्या भविष्याबद्दल खांडेकरांनी चिंता व्यक्त केली आहे. तर असा हा संग्रह. खरं म्हणजे हा संग्रह १९४४ साली प्रसिद्ध झाला होता. तो कोल्हापूरच्या मोघे प्रकाशनाने त्याचा कुठेही उल्लेख करू नये. हे खरोखरच अजब वाटते. रसग्रहणात्मक लेखांऐवजी आणखी २।३ व्यक्तिचित्रांचा समावेश करून उत्कृष्ट व्यक्तिरेखांचा संग्रह प्रसिद्ध करणे अधिक उचित झाले असते. -डॉ. गं. वि. नेर्लेकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more