ARUN MANDE

About Author

Birth Date : 14/10/1944
Death Date : 28/07/2025


DR. ARUN VINAYAK MANDE WAS A RESIDENT OF AHMEDNAGAR AND A DOCTOR BY PROFESSION. DR. ARUN MANDE WON ALL INDIA AKASHVANI PLAYWRITING AWARD IN 1989-90 FOR NABHONATYA -PRADUSHAN AND IN 1995-96 FOR NABHONATYA- GUNASUTRA.TOTAL 40 BOOKS WRITTEN BY HIM ARE PUBLISHED.

डॉ.अरुण विनायक मांडे हे अहमदनगर येथे स्थायिक असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. अरुण मांडे यांना प्रदूषण या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९८९-९० व गुणसूत्र या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९९५-९६ मिऴाला आहे. एकांकिका लेखनासाठी नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार १९९२-९३ मिळाला आहे. विज्ञान गमती व विज्ञान जमती या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार १९९४-९५, अमाणूस या विज्ञानकथा संग्रहाला स्व. मामा कडलक साहित्य पुरस्कार १९९८, पुणे विद्यापीठ चिपळूणकर विज्ञान पुरस्कार, आपट्याचं पान या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील पुरस्कार २००८, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी पुरस्कार २००८, अहमदनगर जिल्हा वाचनालय पुरस्कार २००९, पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार २००९, डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे व श्रीमती ऋतबाई हिवाळे पुरस्कार २००८-०९, अनघा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे कादंबरी पुरस्कार २०१०. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा म.ना. गोगटे पुरस्कृत गो.रा. परांजपे वार्षिक ग्रंथकार पुरस्कार २०१०. वर्तमानपत्रात आरोग्यविषयक स्तंभलेखन. कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशी मिळून एकंदर ४० पुस्तके प्रकाशित.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VIDNYAN GAMATI Rating Star
Add To Cart INR 120
VIDNYAN JAMATI Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more