ARUN MANDE

About Author

Birth Date : 14/10/1944
Death Date : 28/07/2025


DR. ARUN VINAYAK MANDE WAS A RESIDENT OF AHMEDNAGAR AND A DOCTOR BY PROFESSION. DR. ARUN MANDE WON ALL INDIA AKASHVANI PLAYWRITING AWARD IN 1989-90 FOR NABHONATYA -PRADUSHAN AND IN 1995-96 FOR NABHONATYA- GUNASUTRA.TOTAL 40 BOOKS WRITTEN BY HIM ARE PUBLISHED.

डॉ.अरुण विनायक मांडे हे अहमदनगर येथे स्थायिक असून ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. अरुण मांडे यांना प्रदूषण या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९८९-९० व गुणसूत्र या नभोनाट्यासाठी अखिल भारतीय आकाशवाणी नाट्यलेखन पुरस्कार १९९५-९६ मिऴाला आहे. एकांकिका लेखनासाठी नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार १९९२-९३ मिळाला आहे. विज्ञान गमती व विज्ञान जमती या पुस्तकांसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार १९९४-९५, अमाणूस या विज्ञानकथा संग्रहाला स्व. मामा कडलक साहित्य पुरस्कार १९९८, पुणे विद्यापीठ चिपळूणकर विज्ञान पुरस्कार, आपट्याचं पान या कादंबरीला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील पुरस्कार २००८, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचा कवी अनंत फंदी पुरस्कार २००८, अहमदनगर जिल्हा वाचनालय पुरस्कार २००९, पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचा सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार २००९, डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे व श्रीमती ऋतबाई हिवाळे पुरस्कार २००८-०९, अनघा प्रकाशन, ठाणे यांच्यातर्फे कादंबरी पुरस्कार २०१०. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा म.ना. गोगटे पुरस्कृत गो.रा. परांजपे वार्षिक ग्रंथकार पुरस्कार २०१०. वर्तमानपत्रात आरोग्यविषयक स्तंभलेखन. कथासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद अशी मिळून एकंदर ४० पुस्तके प्रकाशित.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VIDNYAN GAMATI Rating Star
Add To Cart INR 120
VIDNYAN JAMATI Rating Star
Add To Cart INR 120

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more