* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: J.R.D. TATA LETTERS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184984583
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 560
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CONTAINED IN THESE PAGES IS THE CORRESPONDENCE OF A MAN WHO FOR THE MAJOR PART OF HIS LIFE WAS AT THE HELM OF AFFAIRS OF THE HOUSE OF TATA, ONE OF THE LARGEST INDUSTRIAL GROUPS IN INDIA, AND HAS LEFT AN INDELIBLE IMPRESSION ON THE COUNTRY`S ECONOMIC & SOCIAL LIFE. J.R.D. TATA WAS A PROLIFIC LETTER-WRITER, AND THIS FIRST-TIME COMPILATION OF SOME THREE HUNDRED OF HIS LETTERS REVEALS VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY, HIS RELATIONSHIPS WITH PEOPLE, THE PROJECTS HE WAS INVOLVED IN, HIS VIEWS ON ISSUES, HIS KINDNESS, FORTHRIGHTNESS AND SENSE OF HUMOUR, HIS CONCERNS AS A CITIZEN, THE VALUES HE LIVED BY, AND HIS PERSONAL INTERESTS. THE RANGE AND DEPTH OF HIS INTERESTS AND CONCERNS ARE REFLECTED IN THE HUGE CROSS-SECTION OF PEOPLE THESE LETTERS ARE ADDRESSED TO: FAMILY MEMBERS, HIS COLLEAGUES IN TATA, BUSINESS ASSOCIATES, MINISTERS AND BUREAUCRATS, FRIENDS IN INDIA AND ABROAD, AS WELL AS OTHERS WHO WERE NOT KNOWN TO HIM. J.R.D. TATA’S LETTERS BRING TO LIFE THE ACHIEVEMENTS OF A TWENTIETH CENTURY LEGEND.
सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #J.R.DTATAYANCHIPATRE #J.R.D.TATALETTERS #जेआरडीटाटायांचीपत्रं #LITERATURETRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #EDITORARVINDMAMBRO "
Customer Reviews
  • Rating StarChowkidar Devdutt Kamat

    सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एा विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात. भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-3-2015

    भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. तेव्हा त्यांनी माझी काळजी व्हावी किंवा माझ्या सोबत रहावं. अशी अपेक्षा मी कशी ठेवू शकतो? ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.