* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: J.R.D. TATA LETTERS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184984583
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 560
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
CONTAINED IN THESE PAGES IS THE CORRESPONDENCE OF A MAN WHO FOR THE MAJOR PART OF HIS LIFE WAS AT THE HELM OF AFFAIRS OF THE HOUSE OF TATA, ONE OF THE LARGEST INDUSTRIAL GROUPS IN INDIA, AND HAS LEFT AN INDELIBLE IMPRESSION ON THE COUNTRY`S ECONOMIC & SOCIAL LIFE. J.R.D. TATA WAS A PROLIFIC LETTER-WRITER, AND THIS FIRST-TIME COMPILATION OF SOME THREE HUNDRED OF HIS LETTERS REVEALS VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY, HIS RELATIONSHIPS WITH PEOPLE, THE PROJECTS HE WAS INVOLVED IN, HIS VIEWS ON ISSUES, HIS KINDNESS, FORTHRIGHTNESS AND SENSE OF HUMOUR, HIS CONCERNS AS A CITIZEN, THE VALUES HE LIVED BY, AND HIS PERSONAL INTERESTS. THE RANGE AND DEPTH OF HIS INTERESTS AND CONCERNS ARE REFLECTED IN THE HUGE CROSS-SECTION OF PEOPLE THESE LETTERS ARE ADDRESSED TO: FAMILY MEMBERS, HIS COLLEAGUES IN TATA, BUSINESS ASSOCIATES, MINISTERS AND BUREAUCRATS, FRIENDS IN INDIA AND ABROAD, AS WELL AS OTHERS WHO WERE NOT KNOWN TO HIM. J.R.D. TATA’S LETTERS BRING TO LIFE THE ACHIEVEMENTS OF A TWENTIETH CENTURY LEGEND.
सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #J.R.DTATAYANCHIPATRE #J.R.D.TATALETTERS #जेआरडीटाटायांचीपत्रं #LITERATURETRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #EDITORARVINDMAMBRO "
Customer Reviews
  • Rating StarChowkidar Devdutt Kamat

    सध्याच्या वेगवान जगात ‘ई-मेल्स’, ‘सेलफोन्स’ अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे; पण एकेकाळी मुख्यत्वे ‘पत्रं’ या माध्यमातून संपर्क साधला जात असे. पत्रांतून कामांच्या तपशिलांखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे. शिवाय ही ‘पत्रं’ त्या एा विशिष्ट कालखंडाचा दस्तऐवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत. ‘पत्रं’ हा कायमस्वरूपी माहितीस्रोत असतो. या पुस्तकातली सुमारे ३०० पत्रं इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत. ‘जे.आर.डी. टाटा’ या विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली ही विविध विषयांना स्पर्श करणारी ‘पत्रं’ तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांचं दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एका महान, बहुआयामी व्यक्तित्वाचं अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात. भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 8-3-2015

    भारताच्या घडणीत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळात टाटा उद्योग समूहाचे स्थान कोणालाही नाकारता येणार नाही. जमशेटजी टाटांपासून रतन टाटांपर्यंत प्रत्येकाने आपल्या औद्योगिक साम्राज्य वाढीबरोबर भारताच्या नवनिर्माणाचा विचार केला होता. भारतरत्न जे आर. डी. टाटा हे पहिलेच उद्योगपती आहेत, की ज्यांना भारत सरकारने भारताच्या औद्योगिक प्रगती व हवाई सेवेबद्दल भारतरत्न ही उपाधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला. जे. आर. डी. टाटा यांची ही पत्रे पाच भागात विभागली आहेत. व्यक्तिगत, स्वातंत्र्याच्या दिशेने आणि नंतर विमानसेवा. लोकांना सांभाळताना शहर देश त्यापलीकडे सुप्रसिद्ध व्यक्ती आणि मित्र. ही पत्रे जे. आर. डी. टाटांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या चाळीस हजार पत्रांतून रुसी लाला या त्यांच्या सहकाऱ्याने निवडली. यातील ३०० पत्रे या पुस्तकात आहेत. दोराबजी टाटा यांनी विद्यार्थीदशेत आपल्या मुलावर पत्रातून जो संस्कार केला. त्यामुळेच हा उद्योगपती भारतरत्न झाला. जे. आर. डी. टाटांनी आपल्या वडिलांनी उत्तर दिले आहे. मी व्यवसायात प्रवेश केल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असमाधानी असणार नाही, कारण मी उद्योगपतीचे गुण दाखवून देईन. पुढे आणि पुढे तुम्हाला माझा अतिशय अभिमान वाटेल. जे. आर. डी. टाटांनी आत्मविश्वासानी दिलेल्या उत्तरातच त्यांच्या व्यावसायिक यशस्वितेचे रहस्य अहो. जे. आर. डी. टाटा यांना जमशेदपूरच्या कारखान्यात साधा मेकॅनिक म्हणून वडिलांनी लावले. ब्रिटिश ऑफिसर त्याचे मार्गदर्शक होते. जे. आर. डी. टाटांनी फ्रेंच सैन्यात काम करून सैनिकी शिस्तही लावून घेतली होती. जे. आर. डी. टाटा झोरास्ट्रीयन असूनही अंधविश्वासी नव्हते, ते म्हणतात, माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे पण मानवनिर्मित बाबींवर अथवा सगळ्या अवडंबरांवर आणि धर्मगुरूंनी शोधून काढलेल्या विधी संस्कारावर नाही. जे. आर. डी. टाटांनी असंख्य मित्रांना पत्रे लिहिली. या मित्रांमध्ये पारशी, इंग्रज आणि पत्रकार अधिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना रस होता. डॉ. गज्जर यांना कुत्र्यांच्या त्रासापायी त्यांना पत्र लिहावे लागले. तुमच्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मला शांततेची गरज आहे. मी स्वत: श्वानप्रेमी आहे. हे पत्र अत्यंत मिश्किल भाषेत लिहिले आहे. जे. आर. डी. टाटा अनेक हॉटेलमध्ये राहत. हॉटेल मालकांनाही सूचना लिखित स्वरूपात पाठवत. दूरध्वनी सेवा याबद्दल त्यांची तक्रार असायची. ते सुमंत मूळगावकर यांना लिहितात, की आपल्या कारखान्यातील स्वच्छतागृह किमान दर्जाच्या खूप खालच्या स्तरावर आहे. गाड्या खरेदी करतानाही जेथे गाडी खरेदी केली त्यांनाही ते सल्ला देत. पडदे कसे लावावेत. लॅक्मेचे क्रीम कसे असावे या संबंधात ते सूचना करीत होते. जे. आर. डी. टाटांना चित्रकलेची अत्यंत आवड होती. ते त्याचे उत्कृष्ट रसग्रहण पिलू पोचखानवाला यांना लिहिलेल्या पत्रात करतात. पाँडेचरीच्या ऑरोविलमध्ये राहताना डॉ. करणसिंगांना ते सूचना करतात. सर अरविंदो आणि माताजी यांचे विश्वस्त परदेशी अगर कायदाविषयक शिक्षण नसणारे असू नयेत. जे. आर. डी. टाटा आपल्या बंगल्यात होम वर्कशॉप चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत. टाटा कंपनीतून फार कमी पगार घेत. त्यांनी आपल्या होमवर्कशॉपमधून विक्री केलेली आहे. ज्यांना व्यायामाची आवड होती, पी. सी. सेन यांना वेटलिफ्टिंगबाबत काही मंत्र देतात. हा व्यायाम प्रकार पाठदुखीचा होऊ नये अशाच पद्धतीने करावा. पंडित जवाहरलाल नेहरूंना १९४७ मध्ये पत्र लिहिताना त्यांनी पंडितजींच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना लिहिले, ‘‘स्वातंत्र्याची धगधगती मशाल सदैव उत्तुंग धरणारी व्यक्ती भारताच्या प्रथम पंतप्रधानपदी विराजमान होत आहे, याचा मला आनंद आहे.’’ महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी ही जागतिक शोकांतिका मानली. गांधीजींचे जीवन शांतता, सहिष्णुता व सलोख्यासाठी होते हे नमूद केले. जे. आर. डी. टाटा आपल्या उद्योग समूहात कामगार मालक संबंधाबाबत अधिक माणुसकी दाखवत. त्यांनी आपल्या युनियन विषयक पत्रात लिहिले आहे. प्रत्येक कर्मचारी सदस्याने माणुसकीच्या नात्यानं वागायला शिकल्याखेरीज आपण कधीही सुयोग्य वातावरण निर्मिती घडवू शकणार नाही. व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याची तसदी घेतली पाहिजे. ‘आपण जर बहुसंख्य कर्मचारी आणि कामगारांमध्ये विश्वास निर्माण केला असता, की व्यवस्थापन पगाराशी संबंधित वाटाघाटीऐवजी, त्यांच्या व्यक्तिगत बाबी सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने हाताळणे व त्यांच्या प्रश्नाबाबत मनापासून रस दाखविला तर व्यवस्थापन विरोधी भावना त्यांच्यात निर्माण होणार नाही. टाटा उद्योग समूह विकसित होण्यास कर्मचाऱ्यांचा वाटा ते नाकारत नसत. सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वहस्ताक्षरात जे. आर. डी. टाटा पत्र लिहून त्यांनी टाटा समूहाच्या केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत. या पुस्तकात अशी बरीच पत्रे आहेत, की ज्यात त्यांनी अधिकाऱ्यापासून चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांच्या निरोपांना शुभेच्छा दिल्या आहेत. जे. आर. डी. टाटा यांचे सर्वात मोठे दु:ख त्यांना मुरारजीभाई देसाई यांनी दिलेली वागणूक खूप दुखवून गेली. मुरारजीभाई देसाई यांनी त्यांच्या हवाईसेवेची कदर केली आणि हेही कबूल केलं, की तुम्ही कॉर्पोरेशनची जबाबदारी केल्यानंतर तरुण खांद्यावर सोपवाल असं मला वाटलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हवाई सेवेबद्दल त्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे, तुम्ही एअर इंडियाचे केवळ अध्यक्षच नव्हता तर त्यांचे संस्थापक व संगोपनकर्ताही होता. आम्हाला तुमच्या हवाईसेवेचा अभिमान आहे. तुमच्यामुळेच एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेऊन सर्वोच्च स्थान पटकावलं. ही पत्रं दाखवतात की भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा हे होते. जे. आर. डी. टाटांनी कृष्णमाचारी, जयप्रकाश नारायण, बीजू पटनाईक, राजगोपालचारी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या जीवनमूल्यांचा परिचय होतो. त्यांनी महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेप्रमाणे जगणे पसंत केले. जे. आर. डी. टाटांनी या देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर खूप विचार केला होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, टेलिफोन डायरेक्टरना लिहिलेल्या पत्रात आपली मुंबईबद्दलची आस्था व्यक्त केली आहे. जे. आर. डी. टाटा यांनी लिहिलेल्या पत्रातून एका उद्योगपतीचा आब, मोहकता, सखोलता व आपुलकी व्यक्त होते. आपले हृदय, आपली विचारधारा, औद्योगिक दृष्टी त्यांनी व्यक्त केली आहे. आपण असं म्हणू भारताच्या अर्थकारणात जे घडलं - त्यांनी आभाळाला स्पर्श केला आणि त्याच्या गालावर स्मित फुलले त्यांनी दोन्ही बाहू पसरले आणि त्यात अवघे विश्व सामावले माणूस आणि संस्था यातून जे भव्य दिव्य घडलं, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे.... प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगपतींनी जे. आर. डी. टाटा आणि भारतातल्या असंख्य उद्योगपतींची चरित्रे व पत्रव्यवहार आपल्या ग्रंथालयात ठेवलाच पाहिजे. नकळत मागचा वारसा आपल्याला समजत जातो. वयाच्या ३४ व्या वर्षी टाटा समूहाचा हा नेता ५२ वर्षे काम करीत होता. वयाच्या ८९ व्या वर्षी टाटांनी जगाचा निरोप घेतला. जगाचा निरोप घेतानाही त्यांच्या डोळ्यात चमक होती. हा माणूस शेवटचा श्वास घेताना म्हणाला, परमेश्वराला या देशातील ८० कोटी जनतेची काळजी व्हायची आहे. तेव्हा त्यांनी माझी काळजी व्हावी किंवा माझ्या सोबत रहावं. अशी अपेक्षा मी कशी ठेवू शकतो? ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more