* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANDA RUPAYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984606
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER TRAVERSING FIVE DIVERSE FLOWS…THE FORESTS RESOUNDING WITH THE GLORIOUS HISTORY OF THE MARATHAS… THE MYSTERIOUS AND DEEP MOONSHINE OF CINEMA… THE EXQUISITE WORD-SCULPTURES… THE RICH TRADITION OF MARATHI THEATRE AND BREATH-TAKING TAMASHA…AND DELIGHTFUL MUSIC RECITALS…A NOVELIST PRESENTS THIS FRESHLY-MINTED SOVEREIGN – ‘BANDA RUPAYA’
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने...चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे...साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी...संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने जडवलेलाअस्सल छापाचा हा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating StarAbhijeet Jambhale

    पानिपत ,महानायक संभाजी, चंद्रमुखी, पांगिरा अशा महान कादंबरी लिहिणाऱ्या विश्वास पाटलांचे आणखीन एक आगळेवेगळे पुस्तक म्हणजे बंदा रुपया ...... या पुस्तकाचं वर्णन कसं करावं......म्हणजे एखाद्या खवय्याला अतिशय भूक लागली असताना त्याच्यासमोर सर्व प्रकारच्या ्वादिष्ट पदार्थांच्या पंचपक्वान्नाचे ताट आणून दिल्यास त्या पामराचे जसे मन तृप्त होईल तसे हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला वाटेल......या पुस्तकाचे एका शब्दात वर्णन करायाचे म्हणजे हे एक कॉकटेल आहे.यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान ,साहित्य, संगीत, कला, चित्रपट अशा सर्व क्षेत्रातील खजिन्याचा तुम्हाला वाचावयास मिळणार म्हणून मी या पुस्तकाला कॉकटेल म्हणतोय.विश्वास पाटील नावाच मराठी साहित्यातील एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांनी अरसिकांना सुद्धा वाचनाचे रसिक व्हायला भाग पाडले.एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च असतो पण विश्वासरावांच्या बाबतीत सरस्वतीची इतकी कृपा आहे की प्रशासकीय सेवेत अधिकारी आणि साहित्य क्षेत्रात साहित्यिक या दोन्ही क्षेत्रात ते सर्वोच्च आहेत. बंदा रुपया मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी या पिता-पुत्रांच्या शौर्याचे चे वर्णन केलेले वाचताना, स्वराज्याचा चा इतिहास वाचताना जणू या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात आपण इतिहासातून जाऊन फिरून येत आहोत असाच भास होतो.छत्रपतींचा पराक्रम वाचताना आपण त्या लढाईत सामील आहोत असा अनुभव येतो. विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते .पुस्तकामध्ये कोल्हापूरच्या लावणी, तमाशा, पोवाडे यांचे वर्णन वाचताना पानिपत लिहिणारा लेखक हाच का ?असा प्रश्न पडतो .प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्याने लेखकाचे अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांशी संबंध संपर्क आहेत आणि त्यांच्याबरोबरचे किस्से अनुभव, चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या बरोबरचे किस्से वाचण्यासारखे आहेत .पुस्तकामध्ये मृत्यूच्या छायेतील महापुरूष हे प्रकरण खूप उत्कंठा वर्धक आहे जगातील अनेक महापुरुषांच्या मृत्युसमयी घडलेली अनेक रहस्य घटना वाचताना खूप उत्कंठा वाढते विश्वासरावाणी महानायक कादंबरी लिहिताना त्यांनी सुभाषबाबू ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सखोल अभ्यास करून कादंबरी लिहिली ब्रह्मदेशात जाऊन तिथे अभ्यास करताना तेथील वर्णन, इतिहासातील घटना, अनुभव हे वाचल्यावर असं वाटतंय कि त्यांनी महानायक लिहिले नाही विश्वास रावांनी महानायक कादंबरी जगली आहे मराठी साहित्यातील एक शापित गंधर्व चारुता सागर या लेखकाचीओळख या पुस्तकात लेखकाने केले आहे.चारुता सागर या मराठी साहित्यकांची लेखणीत अशी जादूआहे की बंदा रुपया वाचल्यानंतर तुम्ही चारुता सागर वाचल्याशिवाय राहणार नाही. चीनचे प्रवास वर्णन त्यांनी असे केले आहे की आपल्याला जणू एका जागी बसून चीनमध्ये फिरून आल्याचा भास होतो चीनचा इतिहास, तेथील राजकारण, तिथली संस्कृती, अशा अनेक गोष्टीचा तपशीलवार वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. लावणी तमाशा यावर दोन प्रकरणे या पुस्तकात लेखकाने खर्ची घातली आहे कीर्तनाने हा देश सुधारला नाही. आणि तमाशाने हा देश बिघडलेला नाही असे का आपल्याला हे वाचल्यावर समजते.लावणी तमाशा यामधली रसिकता काय आहे, त्यांच्यातील कलावंताची कलेशी असलेली निष्ठा ,कलावंतांचे हालाखीचे जीवन आपल्याला वाचावयास मिळते महाराष्ट्रातील रत्ने संगीतकार वसंत पवार ,राम कदम गायिका सुमन कल्याणपूरकर ,सुलोचना चव्हाण, गीतकार जगदीश खेबुडकर या महान रत्नांची नव्याने खरी ओळख आपल्याला वाचावयास मिळते वसंत पवार या संगीतकाराचे उच्च कोटीची प्रतिभा कलावंत माणूस मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी संगीतातील अनेक नजारे बहाल केले पण त्यांच्या पदरी आयुष्यभर दारिद्र्य आले नाट्यक्षेत्रात मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर इतर नाट्य कलावंतांचे नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचे वर्णन विस्तृतपणे वाचावयास मिळते महाराष्ट्राच्या इतिहासात दोन कवी होऊन गेले एक कविराज भूषण आणि दुसरे कवी कलश दोघेही अमरत्वाचा पोहोचले पहिले भूषण ज्यांनी आपल्या शब्द फुलाचा झेला शिवरायावर उधळून टाकला आणि अमर झाले आणि दुसरे कवी कलश स्वतःच्या रक्तामासाच्या फुलाची शंभूराजा भोवती कुरवंडी ओवाळून अजरामर ठरले .या कवी कलश संभाजी राजें बरोबर शेवटपर्यंत साथ देणाऱ्या कवीची करून कहाणी वाचताना मन खिन्न होतं पुस्तकाचा शेवट पानिपताच्या ओल्या जखमा या प्रकरणाने केला आहे."पानिपत ",पानिपत म्हणजे मराठी साहित्यातील एक असं सोनेरी पान आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि म्हणल्यावर ज्याचा ऊर भरून येतो आणि पानिपतचे युद्ध पाठवल्यावर ज्याच्या काळजात चर्र होतं तो मराठी ........वयाच्या 25 व्या वर्षी पानिपत लिहावयास घेतले आणि वयाच्या 28 व्या वर्षे पूर्ण केली खरंच विश्वास रवानी पानिपतला जो न्याय दिला त्याबद्दल त्यांना खरंच मानाचा मुजरा ....नोकरी नवीन ,नवीन लग्न झालेला असताना त्याने पानिपत लिहायला हातात घेतले शुक्रवारी संध्याकाळी ते कामावरून आले नंतर खोलीमध्ये पानिपत लिहायला बसलेत की ते सोमवारी सकाळी अकरा वाजता बाहेर येत .यावरून त्यांनी किती आत्मीयतेने याच लिखाण केला असेल .पानिपत लिहिताना एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे .रात्री अकरापर्यंत लिखाण करायचे परत सकाळी चारला उठून लिहायचे . यामुळे सततच्या अति परिश्रमामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.त्याचवेळी त्यांच्या नवख्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये त्यांचा हात पकडून डोळ्यात पाणी आणून, ऐतिहासिक थाटामध्ये घोगऱ्या आवाजामध्ये विश्वास रावांना म्हणाल्या "इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशोब जरूर मांडवा परंतु पानिपत लिहीत असताना माझे पानिपत होऊ देऊ नका"....खरंच हा प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो एखाद्या गोष्टीबद्दल डेडिकेशन काय असतं ते समजतं बंदा रुपया म्हणजे तुम्हाला कोल्हापूर, पुणे ,मुंबई ,ब्रह्मदेश इंग्लंड, चीन, जपान अशी जगाची सफर करून आणते तसेच साहित्य ,कला ,संगीत ,चित्रपट, नाटक ,इतिहास भूगोल या सगळ्यांची अनुभूती तुम्हाला त्या पुस्तकातून मिळते म्हणून हे कॉकटेलच आहे.विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते हे पुस्तक वाचून तुम्ही तृप्तीचा ढेकर नक्की देणार याची खात्री नक्की देतो . 🙏 .....................................✍अभिजीत सर्जेराव जांभळे ...Read more

  • Rating StarKiran Borkar Vachan Veda

    हे आत्मचरित्र नाही ... हे प्रवासवर्णन ही नाही ...की ह्यात कथाही नाहीत ....ही आहे विश्वास पाटील यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरी .त्यांना आलेले अनुभव ....त्यांना भेटलेली माणसे.... हे सर्व यात आपण अनुभवतो . महानायक लिहिताना त्यांनी केलेला ब्रह्मदशातील प्रवास नेताजींच्या आठवणी डोळ्यासमोर उभे राहतात . फिल्मसिटीत संचालक असताना आलेले अनुभव ही वाचनीय आहेत .मराठी नाटक आणि तमाशातील आठवणी ते आपल्याला फडात घेऊन जातात..झाडाझडती आणि संभाजीच्या मागे किती मेहनत आहे ते लक्षात येते .एकूणच या मुशाफिरीतून घडलेला हा बंदा रुपया आहे . ...Read more

  • Rating StarPratap More

    खूप सुंदर पुस्तक आहे.

  • Rating StarAvinash Pimparkar

    एक वेगळं लेखन एक वेगळा अनुभव वाचतोय...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more