* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANDA RUPAYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984606
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER TRAVERSING FIVE DIVERSE FLOWS…THE FORESTS RESOUNDING WITH THE GLORIOUS HISTORY OF THE MARATHAS… THE MYSTERIOUS AND DEEP MOONSHINE OF CINEMA… THE EXQUISITE WORD-SCULPTURES… THE RICH TRADITION OF MARATHI THEATRE AND BREATH-TAKING TAMASHA…AND DELIGHTFUL MUSIC RECITALS…A NOVELIST PRESENTS THIS FRESHLY-MINTED SOVEREIGN – ‘BANDA RUPAYA’
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने...चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे...साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी...संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने जडवलेलाअस्सल छापाचा हा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating StarAbhijeet Jambhale

    पानिपत ,महानायक संभाजी, चंद्रमुखी, पांगिरा अशा महान कादंबरी लिहिणाऱ्या विश्वास पाटलांचे आणखीन एक आगळेवेगळे पुस्तक म्हणजे बंदा रुपया ...... या पुस्तकाचं वर्णन कसं करावं......म्हणजे एखाद्या खवय्याला अतिशय भूक लागली असताना त्याच्यासमोर सर्व प्रकारच्या ्वादिष्ट पदार्थांच्या पंचपक्वान्नाचे ताट आणून दिल्यास त्या पामराचे जसे मन तृप्त होईल तसे हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला वाटेल......या पुस्तकाचे एका शब्दात वर्णन करायाचे म्हणजे हे एक कॉकटेल आहे.यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान ,साहित्य, संगीत, कला, चित्रपट अशा सर्व क्षेत्रातील खजिन्याचा तुम्हाला वाचावयास मिळणार म्हणून मी या पुस्तकाला कॉकटेल म्हणतोय.विश्वास पाटील नावाच मराठी साहित्यातील एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांनी अरसिकांना सुद्धा वाचनाचे रसिक व्हायला भाग पाडले.एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च असतो पण विश्वासरावांच्या बाबतीत सरस्वतीची इतकी कृपा आहे की प्रशासकीय सेवेत अधिकारी आणि साहित्य क्षेत्रात साहित्यिक या दोन्ही क्षेत्रात ते सर्वोच्च आहेत. बंदा रुपया मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी या पिता-पुत्रांच्या शौर्याचे चे वर्णन केलेले वाचताना, स्वराज्याचा चा इतिहास वाचताना जणू या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात आपण इतिहासातून जाऊन फिरून येत आहोत असाच भास होतो.छत्रपतींचा पराक्रम वाचताना आपण त्या लढाईत सामील आहोत असा अनुभव येतो. विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते .पुस्तकामध्ये कोल्हापूरच्या लावणी, तमाशा, पोवाडे यांचे वर्णन वाचताना पानिपत लिहिणारा लेखक हाच का ?असा प्रश्न पडतो .प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्याने लेखकाचे अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांशी संबंध संपर्क आहेत आणि त्यांच्याबरोबरचे किस्से अनुभव, चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या बरोबरचे किस्से वाचण्यासारखे आहेत .पुस्तकामध्ये मृत्यूच्या छायेतील महापुरूष हे प्रकरण खूप उत्कंठा वर्धक आहे जगातील अनेक महापुरुषांच्या मृत्युसमयी घडलेली अनेक रहस्य घटना वाचताना खूप उत्कंठा वाढते विश्वासरावाणी महानायक कादंबरी लिहिताना त्यांनी सुभाषबाबू ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सखोल अभ्यास करून कादंबरी लिहिली ब्रह्मदेशात जाऊन तिथे अभ्यास करताना तेथील वर्णन, इतिहासातील घटना, अनुभव हे वाचल्यावर असं वाटतंय कि त्यांनी महानायक लिहिले नाही विश्वास रावांनी महानायक कादंबरी जगली आहे मराठी साहित्यातील एक शापित गंधर्व चारुता सागर या लेखकाचीओळख या पुस्तकात लेखकाने केले आहे.चारुता सागर या मराठी साहित्यकांची लेखणीत अशी जादूआहे की बंदा रुपया वाचल्यानंतर तुम्ही चारुता सागर वाचल्याशिवाय राहणार नाही. चीनचे प्रवास वर्णन त्यांनी असे केले आहे की आपल्याला जणू एका जागी बसून चीनमध्ये फिरून आल्याचा भास होतो चीनचा इतिहास, तेथील राजकारण, तिथली संस्कृती, अशा अनेक गोष्टीचा तपशीलवार वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. लावणी तमाशा यावर दोन प्रकरणे या पुस्तकात लेखकाने खर्ची घातली आहे कीर्तनाने हा देश सुधारला नाही. आणि तमाशाने हा देश बिघडलेला नाही असे का आपल्याला हे वाचल्यावर समजते.लावणी तमाशा यामधली रसिकता काय आहे, त्यांच्यातील कलावंताची कलेशी असलेली निष्ठा ,कलावंतांचे हालाखीचे जीवन आपल्याला वाचावयास मिळते महाराष्ट्रातील रत्ने संगीतकार वसंत पवार ,राम कदम गायिका सुमन कल्याणपूरकर ,सुलोचना चव्हाण, गीतकार जगदीश खेबुडकर या महान रत्नांची नव्याने खरी ओळख आपल्याला वाचावयास मिळते वसंत पवार या संगीतकाराचे उच्च कोटीची प्रतिभा कलावंत माणूस मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी संगीतातील अनेक नजारे बहाल केले पण त्यांच्या पदरी आयुष्यभर दारिद्र्य आले नाट्यक्षेत्रात मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर इतर नाट्य कलावंतांचे नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचे वर्णन विस्तृतपणे वाचावयास मिळते महाराष्ट्राच्या इतिहासात दोन कवी होऊन गेले एक कविराज भूषण आणि दुसरे कवी कलश दोघेही अमरत्वाचा पोहोचले पहिले भूषण ज्यांनी आपल्या शब्द फुलाचा झेला शिवरायावर उधळून टाकला आणि अमर झाले आणि दुसरे कवी कलश स्वतःच्या रक्तामासाच्या फुलाची शंभूराजा भोवती कुरवंडी ओवाळून अजरामर ठरले .या कवी कलश संभाजी राजें बरोबर शेवटपर्यंत साथ देणाऱ्या कवीची करून कहाणी वाचताना मन खिन्न होतं पुस्तकाचा शेवट पानिपताच्या ओल्या जखमा या प्रकरणाने केला आहे."पानिपत ",पानिपत म्हणजे मराठी साहित्यातील एक असं सोनेरी पान आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि म्हणल्यावर ज्याचा ऊर भरून येतो आणि पानिपतचे युद्ध पाठवल्यावर ज्याच्या काळजात चर्र होतं तो मराठी ........वयाच्या 25 व्या वर्षी पानिपत लिहावयास घेतले आणि वयाच्या 28 व्या वर्षे पूर्ण केली खरंच विश्वास रवानी पानिपतला जो न्याय दिला त्याबद्दल त्यांना खरंच मानाचा मुजरा ....नोकरी नवीन ,नवीन लग्न झालेला असताना त्याने पानिपत लिहायला हातात घेतले शुक्रवारी संध्याकाळी ते कामावरून आले नंतर खोलीमध्ये पानिपत लिहायला बसलेत की ते सोमवारी सकाळी अकरा वाजता बाहेर येत .यावरून त्यांनी किती आत्मीयतेने याच लिखाण केला असेल .पानिपत लिहिताना एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे .रात्री अकरापर्यंत लिखाण करायचे परत सकाळी चारला उठून लिहायचे . यामुळे सततच्या अति परिश्रमामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.त्याचवेळी त्यांच्या नवख्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये त्यांचा हात पकडून डोळ्यात पाणी आणून, ऐतिहासिक थाटामध्ये घोगऱ्या आवाजामध्ये विश्वास रावांना म्हणाल्या "इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशोब जरूर मांडवा परंतु पानिपत लिहीत असताना माझे पानिपत होऊ देऊ नका"....खरंच हा प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो एखाद्या गोष्टीबद्दल डेडिकेशन काय असतं ते समजतं बंदा रुपया म्हणजे तुम्हाला कोल्हापूर, पुणे ,मुंबई ,ब्रह्मदेश इंग्लंड, चीन, जपान अशी जगाची सफर करून आणते तसेच साहित्य ,कला ,संगीत ,चित्रपट, नाटक ,इतिहास भूगोल या सगळ्यांची अनुभूती तुम्हाला त्या पुस्तकातून मिळते म्हणून हे कॉकटेलच आहे.विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते हे पुस्तक वाचून तुम्ही तृप्तीचा ढेकर नक्की देणार याची खात्री नक्की देतो . 🙏 .....................................✍अभिजीत सर्जेराव जांभळे ...Read more

  • Rating StarKiran Borkar Vachan Veda

    हे आत्मचरित्र नाही ... हे प्रवासवर्णन ही नाही ...की ह्यात कथाही नाहीत ....ही आहे विश्वास पाटील यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरी .त्यांना आलेले अनुभव ....त्यांना भेटलेली माणसे.... हे सर्व यात आपण अनुभवतो . महानायक लिहिताना त्यांनी केलेला ब्रह्मदशातील प्रवास नेताजींच्या आठवणी डोळ्यासमोर उभे राहतात . फिल्मसिटीत संचालक असताना आलेले अनुभव ही वाचनीय आहेत .मराठी नाटक आणि तमाशातील आठवणी ते आपल्याला फडात घेऊन जातात..झाडाझडती आणि संभाजीच्या मागे किती मेहनत आहे ते लक्षात येते .एकूणच या मुशाफिरीतून घडलेला हा बंदा रुपया आहे . ...Read more

  • Rating StarPratap More

    खूप सुंदर पुस्तक आहे.

  • Rating StarAvinash Pimparkar

    एक वेगळं लेखन एक वेगळा अनुभव वाचतोय...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more