* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BANDA RUPAYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984606
  • Edition : 3
  • Publishing Year : APRIL 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AFTER TRAVERSING FIVE DIVERSE FLOWS THE FORESTS RESOUNDING WITH THE GLORIOUS HISTORY OF THE MARATHAS THE MYSTERIOUS AND DEEP MOONSHINE OF CINEMA THE EXQUISITE WORD-SCULPTURES THE RICH TRADITION OF MARATHI THEATRE AND BREATH-TAKING TAMASHA…AND DELIGHTFUL MUSIC RECITALS…A NOVELIST PRESENTS THIS FRESHLY-MINTED SOVEREIGN BANDA RUPAYA
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने...चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे...साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी...संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने जडवलेलाअस्सल छापाचा हा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर
Customer Reviews
  • Rating StarAbhijeet Jambhale

    पानिपत ,महानायक संभाजी, चंद्रमुखी, पांगिरा अशा महान कादंबरी लिहिणाऱ्या विश्वास पाटलांचे आणखीन एक आगळेवेगळे पुस्तक म्हणजे बंदा रुपया ...... या पुस्तकाचं वर्णन कसं करावं......म्हणजे एखाद्या खवय्याला अतिशय भूक लागली असताना त्याच्यासमोर सर्व प्रकारच्या ्वादिष्ट पदार्थांच्या पंचपक्वान्नाचे ताट आणून दिल्यास त्या पामराचे जसे मन तृप्त होईल तसे हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला वाटेल......या पुस्तकाचे एका शब्दात वर्णन करायाचे म्हणजे हे एक कॉकटेल आहे.यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान ,साहित्य, संगीत, कला, चित्रपट अशा सर्व क्षेत्रातील खजिन्याचा तुम्हाला वाचावयास मिळणार म्हणून मी या पुस्तकाला कॉकटेल म्हणतोय.विश्वास पाटील नावाच मराठी साहित्यातील एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांनी अरसिकांना सुद्धा वाचनाचे रसिक व्हायला भाग पाडले.एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च असतो पण विश्वासरावांच्या बाबतीत सरस्वतीची इतकी कृपा आहे की प्रशासकीय सेवेत अधिकारी आणि साहित्य क्षेत्रात साहित्यिक या दोन्ही क्षेत्रात ते सर्वोच्च आहेत. बंदा रुपया मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी या पिता-पुत्रांच्या शौर्याचे चे वर्णन केलेले वाचताना, स्वराज्याचा चा इतिहास वाचताना जणू या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात आपण इतिहासातून जाऊन फिरून येत आहोत असाच भास होतो.छत्रपतींचा पराक्रम वाचताना आपण त्या लढाईत सामील आहोत असा अनुभव येतो. विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते .पुस्तकामध्ये कोल्हापूरच्या लावणी, तमाशा, पोवाडे यांचे वर्णन वाचताना पानिपत लिहिणारा लेखक हाच का ?असा प्रश्न पडतो .प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्याने लेखकाचे अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांशी संबंध संपर्क आहेत आणि त्यांच्याबरोबरचे किस्से अनुभव, चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या बरोबरचे किस्से वाचण्यासारखे आहेत .पुस्तकामध्ये मृत्यूच्या छायेतील महापुरूष हे प्रकरण खूप उत्कंठा वर्धक आहे जगातील अनेक महापुरुषांच्या मृत्युसमयी घडलेली अनेक रहस्य घटना वाचताना खूप उत्कंठा वाढते विश्वासरावाणी महानायक कादंबरी लिहिताना त्यांनी सुभाषबाबू ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सखोल अभ्यास करून कादंबरी लिहिली ब्रह्मदेशात जाऊन तिथे अभ्यास करताना तेथील वर्णन, इतिहासातील घटना, अनुभव हे वाचल्यावर असं वाटतंय कि त्यांनी महानायक लिहिले नाही विश्वास रावांनी महानायक कादंबरी जगली आहे मराठी साहित्यातील एक शापित गंधर्व चारुता सागर या लेखकाचीओळख या पुस्तकात लेखकाने केले आहे.चारुता सागर या मराठी साहित्यकांची लेखणीत अशी जादूआहे की बंदा रुपया वाचल्यानंतर तुम्ही चारुता सागर वाचल्याशिवाय राहणार नाही. चीनचे प्रवास वर्णन त्यांनी असे केले आहे की आपल्याला जणू एका जागी बसून चीनमध्ये फिरून आल्याचा भास होतो चीनचा इतिहास, तेथील राजकारण, तिथली संस्कृती, अशा अनेक गोष्टीचा तपशीलवार वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. लावणी तमाशा यावर दोन प्रकरणे या पुस्तकात लेखकाने खर्ची घातली आहे कीर्तनाने हा देश सुधारला नाही. आणि तमाशाने हा देश बिघडलेला नाही असे का आपल्याला हे वाचल्यावर समजते.लावणी तमाशा यामधली रसिकता काय आहे, त्यांच्यातील कलावंताची कलेशी असलेली निष्ठा ,कलावंतांचे हालाखीचे जीवन आपल्याला वाचावयास मिळते महाराष्ट्रातील रत्ने संगीतकार वसंत पवार ,राम कदम गायिका सुमन कल्याणपूरकर ,सुलोचना चव्हाण, गीतकार जगदीश खेबुडकर या महान रत्नांची नव्याने खरी ओळख आपल्याला वाचावयास मिळते वसंत पवार या संगीतकाराचे उच्च कोटीची प्रतिभा कलावंत माणूस मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी संगीतातील अनेक नजारे बहाल केले पण त्यांच्या पदरी आयुष्यभर दारिद्र्य आले नाट्यक्षेत्रात मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर इतर नाट्य कलावंतांचे नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचे वर्णन विस्तृतपणे वाचावयास मिळते महाराष्ट्राच्या इतिहासात दोन कवी होऊन गेले एक कविराज भूषण आणि दुसरे कवी कलश दोघेही अमरत्वाचा पोहोचले पहिले भूषण ज्यांनी आपल्या शब्द फुलाचा झेला शिवरायावर उधळून टाकला आणि अमर झाले आणि दुसरे कवी कलश स्वतःच्या रक्तामासाच्या फुलाची शंभूराजा भोवती कुरवंडी ओवाळून अजरामर ठरले .या कवी कलश संभाजी राजें बरोबर शेवटपर्यंत साथ देणाऱ्या कवीची करून कहाणी वाचताना मन खिन्न होतं पुस्तकाचा शेवट पानिपताच्या ओल्या जखमा या प्रकरणाने केला आहे."पानिपत ",पानिपत म्हणजे मराठी साहित्यातील एक असं सोनेरी पान आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि म्हणल्यावर ज्याचा ऊर भरून येतो आणि पानिपतचे युद्ध पाठवल्यावर ज्याच्या काळजात चर्र होतं तो मराठी ........वयाच्या 25 व्या वर्षी पानिपत लिहावयास घेतले आणि वयाच्या 28 व्या वर्षे पूर्ण केली खरंच विश्वास रवानी पानिपतला जो न्याय दिला त्याबद्दल त्यांना खरंच मानाचा मुजरा ....नोकरी नवीन ,नवीन लग्न झालेला असताना त्याने पानिपत लिहायला हातात घेतले शुक्रवारी संध्याकाळी ते कामावरून आले नंतर खोलीमध्ये पानिपत लिहायला बसलेत की ते सोमवारी सकाळी अकरा वाजता बाहेर येत .यावरून त्यांनी किती आत्मीयतेने याच लिखाण केला असेल .पानिपत लिहिताना एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे .रात्री अकरापर्यंत लिखाण करायचे परत सकाळी चारला उठून लिहायचे . यामुळे सततच्या अति परिश्रमामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.त्याचवेळी त्यांच्या नवख्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये त्यांचा हात पकडून डोळ्यात पाणी आणून, ऐतिहासिक थाटामध्ये घोगऱ्या आवाजामध्ये विश्वास रावांना म्हणाल्या "इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशोब जरूर मांडवा परंतु पानिपत लिहीत असताना माझे पानिपत होऊ देऊ नका"....खरंच हा प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो एखाद्या गोष्टीबद्दल डेडिकेशन काय असतं ते समजतं बंदा रुपया म्हणजे तुम्हाला कोल्हापूर, पुणे ,मुंबई ,ब्रह्मदेश इंग्लंड, चीन, जपान अशी जगाची सफर करून आणते तसेच साहित्य ,कला ,संगीत ,चित्रपट, नाटक ,इतिहास भूगोल या सगळ्यांची अनुभूती तुम्हाला त्या पुस्तकातून मिळते म्हणून हे कॉकटेलच आहे.विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते हे पुस्तक वाचून तुम्ही तृप्तीचा ढेकर नक्की देणार याची खात्री नक्की देतो . 🙏 .....................................✍अभिजीत सर्जेराव जांभळे ...Read more

  • Rating StarKiran Borkar Vachan Veda

    हे आत्मचरित्र नाही ... हे प्रवासवर्णन ही नाही ...की ह्यात कथाही नाहीत ....ही आहे विश्वास पाटील यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरी .त्यांना आलेले अनुभव ....त्यांना भेटलेली माणसे.... हे सर्व यात आपण अनुभवतो . महानायक लिहिताना त्यांनी केलेला ब्रह्मदशातील प्रवास नेताजींच्या आठवणी डोळ्यासमोर उभे राहतात . फिल्मसिटीत संचालक असताना आलेले अनुभव ही वाचनीय आहेत .मराठी नाटक आणि तमाशातील आठवणी ते आपल्याला फडात घेऊन जातात..झाडाझडती आणि संभाजीच्या मागे किती मेहनत आहे ते लक्षात येते .एकूणच या मुशाफिरीतून घडलेला हा बंदा रुपया आहे . ...Read more

  • Rating StarPratap More

    खूप सुंदर पुस्तक आहे.

  • Rating StarAvinash Pimparkar

    एक वेगळं लेखन एक वेगळा अनुभव वाचतोय...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more