* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHADOWS IN CAGES
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668681
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 238
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE STORIES ARE TOTALLY DIFFERENT THAN WHAT WE READ USUALLY. THESE ARE THE STORIES OF MOTHERS AND THEIR OFFSPRINGS, WHICH ARE IMPRISONED. THESE ARE THE STORIES OF THEIR ANGUISH AND THEIR AGONIES. THE AUTHOR HAS PERSONALLY VISITED MANY OF THE JAILS IN INDIA. HE HAS INTERVIEWED THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN. THE INTERVIEWS WITH THE JAIL OFFICERS, SOCIAL WORKERS AND THE ADVOCATES ARE ALSO VERY THRILLING. THIS BOOK BRINGS THE CLEAR PICTURE OF THE JAIL WITH ITS CONDITIONS, ITS INSECURITY, THE EFFORTS OF THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN, THEIR HAPPINESS, THEIR SORROWS, THEIR DREAMS, EVERYTHING THAT A NORMAL HUMAN MIND FEELS. THE AUTHOR TOUCHES HIS WRITING WITH A MILD HUMOUR IN BETWEEN, WITH A GENUINE CONCERN FOR THEM. THIS JOURNEY TO THE DEEP CORES OF THE PRISON WILL SURELY BRING TEARS IN OUR EYES AND SOFT FEELINGS IN THE CORE OF OUR HEART.
तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TURUNGATILSAVLYA #SHADOWSINCAGES #तुरुंगातीलसावल्या #LITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #RUZBEHBHARUCHA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) APRIL 2007

    कोवळ्या ‘सावल्या’चे अंतरंग… सामान्यत: ‘कैदी स्त्री’ म्हटली की, आपल्या डोळ्यांपुढं उभी राहते ती एखादी ‘दुष्ट प्रवृत्तीची स्त्री’! अनेकांना वाटते की, अशा स्त्रियांची जागा ही तुरूंगातच असायला हवी. त्यांच्याविषयी विचार करण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? विनाारण वृथा वेळ तरी का रखडायचा? मात्र, या कैदेत असलेल्या स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या बळी ठरलेल्या असतात. ‘तुरूंगातील सावल्या’ हे रुझबेह भरुचा यांच्या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘मराठी अनुवादित’ पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तर नक्कीच प्रत्येकाला आपणही त्यांच्यासाठी काही करावं... अशी इच्छा होईल. वाचकाला अंर्तबाह्य हेलावून टाकणाऱ्या अशा संवेदनाक्षम शैलीत त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. तुरुंगातील कैदी माता आणि त्यांच्या येथे केले आहे. ‘माता’ व ‘मूल’ यांना नेहमीच प्रेम, करूणेचे प्रतीक मानलं गेलं आहे. माता आपल्या बाळासाठी कितीही मोठा त्याग करू शकते. तिला सदैव आपले बाळ आपल्या जवळचं असावे, असे वाटते. कारण तो तिच्या हाडा-मांसाचा अंश असते. त्याच्यापासून दुरावा ती कधीही ही सहन करू शकत नाही. तिच्या जगण्याचा उद्देशच मुळातच तिचं ते ‘अस्तित्व’ असतं. मात्र, ही अवस्था कैदी मातांच्या अंगावर बेतते, तेव्हा तिच्या मनावर किती मोठा घाला पडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा! कायद्याने पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला आपल्या मातेबरोबर तुरूंगात राहण्याचा अधिकार आहे. या दरम्यान ते सतत आईभोवती राहते. मात्र, पाच वर्षांनंतर त्याला अचानक दूर ठेवण्यात येते. ‘पाच वर्षे सतत सावलीसारखे असणारे ते मूल अचानक एक दिवस तिला सोडून जाणार...’ या विचाराने तिच्या मनाची काय अवस्था होते? त्याचे अत्यंत हृदय हेलवणारे वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. कैदी मातांच्या या मन:स्थितीचे अनुभव टिपण्यासाठी त्यांनी अनेक तुरूंगांना भेटी दिल्या. नियतीच्या हातातलं बाहुलं बनून राहिलेल्या या मुलांचा सांभाळ करणाऱ्या उत्तम दर्जाच्या, विश्वसनीय अशा संस्था आपल्याकडे फारशा उपलब्ध नाहीत. या मुलांच्या ‘आर्त हका’ अजून कोणाच्या कानांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. कदाचित त्या खूप क्षीण आहेत, म्हणून त्या कुणाला ऐकूही येत नाहीत, असे लेखकाने येथे दाखवून दिले आहे. रूझबेह भरूचा यांनी येरवडा (महाराष्ट्र), तिहार (दिल्ली), गुरगाव-जेल (हरियाणा), श्रीनगर (सेंट्रल जेल) (जम्मू व काश्मीर) आदी तुरूंगाना भेटी दिल्या. समाजाच्या नजरेपासून दूर असलेल्या या वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्णन त्यांनी केलेले हे वर्णन त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. ज्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत, अशांनाही जागं करून कार्यप्रवृत्त करण्याची ताकद या पुस्तकात आहे. महिलांच्या समस्या तर यात आहेतच, शिवाय अनेक ठिकाणी पंखा, स्वच्छता, स्वच्छतागृहे, तरूंगातील गर्दी या समस्याही त्यांनी येथे स्पष्ट केल्या आहेत. अशा परिस्थितीत राहिल्यानं कैदी सुधारण्याऐवजी त्यांची मने रागानं, संतापानं आणि तिरस्कारानं व्यापली असतील. त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन अधिकच नकारात्मक बनणार आहे. कदाचित हे कैदी पूर्वीपेक्षाही अधिक निर्ढावलेले होऊन बाहेर पडतील, अशी लेखकाला भीती वाटते आणि ते खरेही आहे. तसेच लहान-लहान बालकांच्या मनावर आपल्या आईला कोंडून ठेवल्याने काय परिणाम होत असेल, याचेही वर्णन यात केले आहे. कारण अशा मुलांना वकिलांची व न्यायाधीशांची नावे, कोर्टच्या तारखा व तपशील अगदी तोंडपाठ असतो. या गोष्टी त्यांच्या गप्पातून दिसतात; त्याही पुढे जाऊन, कोर्टात हजेरी लावणे हेही त्यांना माहीत असते. आपल्या आईने केलेला गुन्हा ते रंगवून सांगतात. याबाबतीत ‘इंडिया व्हिजन फाउंडेशन’ या सारख्या संस्था तुरूंगात आईबरोबर राहणाऱ्या मुलांसाठी चांगल्या तऱ्हेनं काम पाहात आहे. यासारख्या इतर संस्थांनाही या कामी मदतीची अपेक्षा आहे. मातेच्या उदरात बाळाचा जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी त्याला आईच्या प्रेमाची व वात्सल्याची गरज असते. या कोवळ्या जीवांना आई नावाच्या सावलीचा आधार हवा आहे. किंबहुना तो त्याचा मूलभूत हक्क आहे. त्या मातेला तुरूंगवासाची शिक्षा झाली तरी त्या मुलाची वाढकोणत्याही परिस्थितीत खुंटता कामा नये. लहान मुलालाही एक माणूस म्हणून ‘मुल्य’ आहे. घटनेने दिलेले अधिकार त्याला मिळायला हवेत. त्याची आई जेलमध्ये आहे हे त्याचं दुर्भाग्य; हे लक्षात घेऊन ते अधिकार त्या मुलाला मिळाले पाहिजेत, हाच लेखकाचा या लिखाणाचा मागचा हेतू येथे स्पष्ट दिसून येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more