* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHADOWS IN CAGES
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668681
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 238
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE STORIES ARE TOTALLY DIFFERENT THAN WHAT WE READ USUALLY. THESE ARE THE STORIES OF MOTHERS AND THEIR OFFSPRINGS, WHICH ARE IMPRISONED. THESE ARE THE STORIES OF THEIR ANGUISH AND THEIR AGONIES. THE AUTHOR HAS PERSONALLY VISITED MANY OF THE JAILS IN INDIA. HE HAS INTERVIEWED THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN. THE INTERVIEWS WITH THE JAIL OFFICERS, SOCIAL WORKERS AND THE ADVOCATES ARE ALSO VERY THRILLING. THIS BOOK BRINGS THE CLEAR PICTURE OF THE JAIL WITH ITS CONDITIONS, ITS INSECURITY, THE EFFORTS OF THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN, THEIR HAPPINESS, THEIR SORROWS, THEIR DREAMS, EVERYTHING THAT A NORMAL HUMAN MIND FEELS. THE AUTHOR TOUCHES HIS WRITING WITH A MILD HUMOUR IN BETWEEN, WITH A GENUINE CONCERN FOR THEM. THIS JOURNEY TO THE DEEP CORES OF THE PRISON WILL SURELY BRING TEARS IN OUR EYES AND SOFT FEELINGS IN THE CORE OF OUR HEART.
तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TURUNGATILSAVLYA #SHADOWSINCAGES #तुरुंगातीलसावल्या #LITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #RUZBEHBHARUCHA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) APRIL 2007

    कोवळ्या ‘सावल्या’चे अंतरंग… सामान्यत: ‘कैदी स्त्री’ म्हटली की, आपल्या डोळ्यांपुढं उभी राहते ती एखादी ‘दुष्ट प्रवृत्तीची स्त्री’! अनेकांना वाटते की, अशा स्त्रियांची जागा ही तुरूंगातच असायला हवी. त्यांच्याविषयी विचार करण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? विनाारण वृथा वेळ तरी का रखडायचा? मात्र, या कैदेत असलेल्या स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या बळी ठरलेल्या असतात. ‘तुरूंगातील सावल्या’ हे रुझबेह भरुचा यांच्या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘मराठी अनुवादित’ पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तर नक्कीच प्रत्येकाला आपणही त्यांच्यासाठी काही करावं... अशी इच्छा होईल. वाचकाला अंर्तबाह्य हेलावून टाकणाऱ्या अशा संवेदनाक्षम शैलीत त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. तुरुंगातील कैदी माता आणि त्यांच्या येथे केले आहे. ‘माता’ व ‘मूल’ यांना नेहमीच प्रेम, करूणेचे प्रतीक मानलं गेलं आहे. माता आपल्या बाळासाठी कितीही मोठा त्याग करू शकते. तिला सदैव आपले बाळ आपल्या जवळचं असावे, असे वाटते. कारण तो तिच्या हाडा-मांसाचा अंश असते. त्याच्यापासून दुरावा ती कधीही ही सहन करू शकत नाही. तिच्या जगण्याचा उद्देशच मुळातच तिचं ते ‘अस्तित्व’ असतं. मात्र, ही अवस्था कैदी मातांच्या अंगावर बेतते, तेव्हा तिच्या मनावर किती मोठा घाला पडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा! कायद्याने पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला आपल्या मातेबरोबर तुरूंगात राहण्याचा अधिकार आहे. या दरम्यान ते सतत आईभोवती राहते. मात्र, पाच वर्षांनंतर त्याला अचानक दूर ठेवण्यात येते. ‘पाच वर्षे सतत सावलीसारखे असणारे ते मूल अचानक एक दिवस तिला सोडून जाणार...’ या विचाराने तिच्या मनाची काय अवस्था होते? त्याचे अत्यंत हृदय हेलवणारे वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. कैदी मातांच्या या मन:स्थितीचे अनुभव टिपण्यासाठी त्यांनी अनेक तुरूंगांना भेटी दिल्या. नियतीच्या हातातलं बाहुलं बनून राहिलेल्या या मुलांचा सांभाळ करणाऱ्या उत्तम दर्जाच्या, विश्वसनीय अशा संस्था आपल्याकडे फारशा उपलब्ध नाहीत. या मुलांच्या ‘आर्त हका’ अजून कोणाच्या कानांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. कदाचित त्या खूप क्षीण आहेत, म्हणून त्या कुणाला ऐकूही येत नाहीत, असे लेखकाने येथे दाखवून दिले आहे. रूझबेह भरूचा यांनी येरवडा (महाराष्ट्र), तिहार (दिल्ली), गुरगाव-जेल (हरियाणा), श्रीनगर (सेंट्रल जेल) (जम्मू व काश्मीर) आदी तुरूंगाना भेटी दिल्या. समाजाच्या नजरेपासून दूर असलेल्या या वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्णन त्यांनी केलेले हे वर्णन त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. ज्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत, अशांनाही जागं करून कार्यप्रवृत्त करण्याची ताकद या पुस्तकात आहे. महिलांच्या समस्या तर यात आहेतच, शिवाय अनेक ठिकाणी पंखा, स्वच्छता, स्वच्छतागृहे, तरूंगातील गर्दी या समस्याही त्यांनी येथे स्पष्ट केल्या आहेत. अशा परिस्थितीत राहिल्यानं कैदी सुधारण्याऐवजी त्यांची मने रागानं, संतापानं आणि तिरस्कारानं व्यापली असतील. त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन अधिकच नकारात्मक बनणार आहे. कदाचित हे कैदी पूर्वीपेक्षाही अधिक निर्ढावलेले होऊन बाहेर पडतील, अशी लेखकाला भीती वाटते आणि ते खरेही आहे. तसेच लहान-लहान बालकांच्या मनावर आपल्या आईला कोंडून ठेवल्याने काय परिणाम होत असेल, याचेही वर्णन यात केले आहे. कारण अशा मुलांना वकिलांची व न्यायाधीशांची नावे, कोर्टच्या तारखा व तपशील अगदी तोंडपाठ असतो. या गोष्टी त्यांच्या गप्पातून दिसतात; त्याही पुढे जाऊन, कोर्टात हजेरी लावणे हेही त्यांना माहीत असते. आपल्या आईने केलेला गुन्हा ते रंगवून सांगतात. याबाबतीत ‘इंडिया व्हिजन फाउंडेशन’ या सारख्या संस्था तुरूंगात आईबरोबर राहणाऱ्या मुलांसाठी चांगल्या तऱ्हेनं काम पाहात आहे. यासारख्या इतर संस्थांनाही या कामी मदतीची अपेक्षा आहे. मातेच्या उदरात बाळाचा जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी त्याला आईच्या प्रेमाची व वात्सल्याची गरज असते. या कोवळ्या जीवांना आई नावाच्या सावलीचा आधार हवा आहे. किंबहुना तो त्याचा मूलभूत हक्क आहे. त्या मातेला तुरूंगवासाची शिक्षा झाली तरी त्या मुलाची वाढकोणत्याही परिस्थितीत खुंटता कामा नये. लहान मुलालाही एक माणूस म्हणून ‘मुल्य’ आहे. घटनेने दिलेले अधिकार त्याला मिळायला हवेत. त्याची आई जेलमध्ये आहे हे त्याचं दुर्भाग्य; हे लक्षात घेऊन ते अधिकार त्या मुलाला मिळाले पाहिजेत, हाच लेखकाचा या लिखाणाचा मागचा हेतू येथे स्पष्ट दिसून येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.