* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHADOWS IN CAGES
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177668681
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 238
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE STORIES ARE TOTALLY DIFFERENT THAN WHAT WE READ USUALLY. THESE ARE THE STORIES OF MOTHERS AND THEIR OFFSPRINGS, WHICH ARE IMPRISONED. THESE ARE THE STORIES OF THEIR ANGUISH AND THEIR AGONIES. THE AUTHOR HAS PERSONALLY VISITED MANY OF THE JAILS IN INDIA. HE HAS INTERVIEWED THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN. THE INTERVIEWS WITH THE JAIL OFFICERS, SOCIAL WORKERS AND THE ADVOCATES ARE ALSO VERY THRILLING. THIS BOOK BRINGS THE CLEAR PICTURE OF THE JAIL WITH ITS CONDITIONS, ITS INSECURITY, THE EFFORTS OF THE LADY PRISONERS AND THEIR CHILDREN, THEIR HAPPINESS, THEIR SORROWS, THEIR DREAMS, EVERYTHING THAT A NORMAL HUMAN MIND FEELS. THE AUTHOR TOUCHES HIS WRITING WITH A MILD HUMOUR IN BETWEEN, WITH A GENUINE CONCERN FOR THEM. THIS JOURNEY TO THE DEEP CORES OF THE PRISON WILL SURELY BRING TEARS IN OUR EYES AND SOFT FEELINGS IN THE CORE OF OUR HEART.
तुरुंगातील कैदी स्त्रिया आणि जीवंतपणीच नरकयातना भोगणारी त्यांची मुलं यांच्या कल्पनातील आयुष्याचं अक्षरश: चित्र... भारतीय तुरुंगात राहणाऱ्या आया व त्यांच्या मुलांना ज्या व्यथांचा व वेदनेचा सामना करावा लागतो त्याची ही कहाणी आहे. लेखकाने देशभरातील असंख्य तुरुंगांना व्यक्तिश: भेट देऊन तिथे जीवन कंठणाऱ्या अनेक कैदी स्त्रिया व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. तुरुंगातील कैद्यांच्या मुलाखतीप्रमाणेच तिथे प्रत्यक्ष काम करणारे समाजसेवक, तुरुंगाधिकारी आणि वकील यांच्या मुलाखतीही रोमांचकारी आहेत. तुरुंगातील परिस्थिती, असुरक्षितता, कैदी स्त्रियांची व मुलांची धडपड, आनंद, आशा आणि स्वप्ने याचे चित्रण या पुस्तकात आढळते. पुस्तक वाचताना एका वेगळ्या भावनिक कल्लोळाचा अनुभव वाचकाला येईल. आपल्या हळुवार, नाजूक व क्वचित नर्म विनोदाची झालर असलेल्या शौलीत लेखक वाचकाला या एका प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जातो. पुस्तक वाचून ठेवताना वाचकांच्या हृदयात कळ आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TURUNGATILSAVLYA #SHADOWSINCAGES #तुरुंगातीलसावल्या #LITERATURE #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #RUZBEHBHARUCHA "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) APRIL 2007

    कोवळ्या ‘सावल्या’चे अंतरंग… सामान्यत: ‘कैदी स्त्री’ म्हटली की, आपल्या डोळ्यांपुढं उभी राहते ती एखादी ‘दुष्ट प्रवृत्तीची स्त्री’! अनेकांना वाटते की, अशा स्त्रियांची जागा ही तुरूंगातच असायला हवी. त्यांच्याविषयी विचार करण्याचे कष्ट तरी का घ्यायचे? विनाारण वृथा वेळ तरी का रखडायचा? मात्र, या कैदेत असलेल्या स्त्रिया अनेकदा परिस्थितीच्या बळी ठरलेल्या असतात. ‘तुरूंगातील सावल्या’ हे रुझबेह भरुचा यांच्या मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे ‘मराठी अनुवादित’ पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून तर नक्कीच प्रत्येकाला आपणही त्यांच्यासाठी काही करावं... अशी इच्छा होईल. वाचकाला अंर्तबाह्य हेलावून टाकणाऱ्या अशा संवेदनाक्षम शैलीत त्यांनी या पुस्तकाची मांडणी केली आहे. तुरुंगातील कैदी माता आणि त्यांच्या येथे केले आहे. ‘माता’ व ‘मूल’ यांना नेहमीच प्रेम, करूणेचे प्रतीक मानलं गेलं आहे. माता आपल्या बाळासाठी कितीही मोठा त्याग करू शकते. तिला सदैव आपले बाळ आपल्या जवळचं असावे, असे वाटते. कारण तो तिच्या हाडा-मांसाचा अंश असते. त्याच्यापासून दुरावा ती कधीही ही सहन करू शकत नाही. तिच्या जगण्याचा उद्देशच मुळातच तिचं ते ‘अस्तित्व’ असतं. मात्र, ही अवस्था कैदी मातांच्या अंगावर बेतते, तेव्हा तिच्या मनावर किती मोठा घाला पडत असेल, याचा विचार न केलेलाच बरा! कायद्याने पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला आपल्या मातेबरोबर तुरूंगात राहण्याचा अधिकार आहे. या दरम्यान ते सतत आईभोवती राहते. मात्र, पाच वर्षांनंतर त्याला अचानक दूर ठेवण्यात येते. ‘पाच वर्षे सतत सावलीसारखे असणारे ते मूल अचानक एक दिवस तिला सोडून जाणार...’ या विचाराने तिच्या मनाची काय अवस्था होते? त्याचे अत्यंत हृदय हेलवणारे वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. कैदी मातांच्या या मन:स्थितीचे अनुभव टिपण्यासाठी त्यांनी अनेक तुरूंगांना भेटी दिल्या. नियतीच्या हातातलं बाहुलं बनून राहिलेल्या या मुलांचा सांभाळ करणाऱ्या उत्तम दर्जाच्या, विश्वसनीय अशा संस्था आपल्याकडे फारशा उपलब्ध नाहीत. या मुलांच्या ‘आर्त हका’ अजून कोणाच्या कानांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. कदाचित त्या खूप क्षीण आहेत, म्हणून त्या कुणाला ऐकूही येत नाहीत, असे लेखकाने येथे दाखवून दिले आहे. रूझबेह भरूचा यांनी येरवडा (महाराष्ट्र), तिहार (दिल्ली), गुरगाव-जेल (हरियाणा), श्रीनगर (सेंट्रल जेल) (जम्मू व काश्मीर) आदी तुरूंगाना भेटी दिल्या. समाजाच्या नजरेपासून दूर असलेल्या या वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्गाचे त्यांनी केलेले हे वर्णन त्यांनी केलेले हे वर्णन त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. ज्यांच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत, अशांनाही जागं करून कार्यप्रवृत्त करण्याची ताकद या पुस्तकात आहे. महिलांच्या समस्या तर यात आहेतच, शिवाय अनेक ठिकाणी पंखा, स्वच्छता, स्वच्छतागृहे, तरूंगातील गर्दी या समस्याही त्यांनी येथे स्पष्ट केल्या आहेत. अशा परिस्थितीत राहिल्यानं कैदी सुधारण्याऐवजी त्यांची मने रागानं, संतापानं आणि तिरस्कारानं व्यापली असतील. त्यांच्यात सुधारणा होण्याऐवजी त्यांचा दृष्टिकोन अधिकच नकारात्मक बनणार आहे. कदाचित हे कैदी पूर्वीपेक्षाही अधिक निर्ढावलेले होऊन बाहेर पडतील, अशी लेखकाला भीती वाटते आणि ते खरेही आहे. तसेच लहान-लहान बालकांच्या मनावर आपल्या आईला कोंडून ठेवल्याने काय परिणाम होत असेल, याचेही वर्णन यात केले आहे. कारण अशा मुलांना वकिलांची व न्यायाधीशांची नावे, कोर्टच्या तारखा व तपशील अगदी तोंडपाठ असतो. या गोष्टी त्यांच्या गप्पातून दिसतात; त्याही पुढे जाऊन, कोर्टात हजेरी लावणे हेही त्यांना माहीत असते. आपल्या आईने केलेला गुन्हा ते रंगवून सांगतात. याबाबतीत ‘इंडिया व्हिजन फाउंडेशन’ या सारख्या संस्था तुरूंगात आईबरोबर राहणाऱ्या मुलांसाठी चांगल्या तऱ्हेनं काम पाहात आहे. यासारख्या इतर संस्थांनाही या कामी मदतीची अपेक्षा आहे. मातेच्या उदरात बाळाचा जन्म झाल्यापासून प्रत्येक क्षणी त्याला आईच्या प्रेमाची व वात्सल्याची गरज असते. या कोवळ्या जीवांना आई नावाच्या सावलीचा आधार हवा आहे. किंबहुना तो त्याचा मूलभूत हक्क आहे. त्या मातेला तुरूंगवासाची शिक्षा झाली तरी त्या मुलाची वाढकोणत्याही परिस्थितीत खुंटता कामा नये. लहान मुलालाही एक माणूस म्हणून ‘मुल्य’ आहे. घटनेने दिलेले अधिकार त्याला मिळायला हवेत. त्याची आई जेलमध्ये आहे हे त्याचं दुर्भाग्य; हे लक्षात घेऊन ते अधिकार त्या मुलाला मिळाले पाहिजेत, हाच लेखकाचा या लिखाणाचा मागचा हेतू येथे स्पष्ट दिसून येतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more