* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353171537
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 1956
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUROSHOTTAM SHREEPAT KALE (VAPU KALE’S FATHER), HAS WRITTEN THIS BOOK SOMEWHERE IN THE 1940-50S. HE WAS AN ARTIST BY NATURE. HE WOULD COLOUR THE DRAPES REQUIRED DURING DRAMAS, LOOK AFTER THE UPSTAGE, OFFSTAGE AND COSTUMES. HE WORKED WITH KESHAVRAO BHOSALE’S LALITKALADARSHA DRAMA COMPANY. THOUGH AN ARTIST, HE HAD EQUAL COMMAND OVER WORDS AND WRITING. PUSHREE, AS HE WAS FONDLY KNOWN AS, HAS ALSO PORTRAYED AN APT WORD-PICTURE OF MANY ARTISTS. HE HAD AN IMMENSE STORE OF STORIES AND MEMORIES OF THESE EMINENT PERSONALITIES. HIS INNOVATIVE STYLE HAS MADE THE CONTENT READABLE AND INTERESTING. IT ALSO ALLOWS US TO TAKE A ROUND THROUGH THE PAST OF DRAMA AND THEATER.
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूÂणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LALITKALECHA SAHWASAT# PS KALE# BABURAO PENDHARKAR#BHALCHANDRA PENDHARKAR# #RAMKRUSHNABUVA VAZE# ANNA KIRLOSKAR# KESHVRAO SHITUT# NARAYANRAO RAJHANS (BALGANDHARVA)# LALITKALADARSH NATAK MANDALI# GANDHARVA NATAK MANDALI #ललितकलेच्या सहवासात# पु श्री काळे-#ललितकलादर्श नाटक मंडळी#गंधर्व नाटक मंडळी# केशवराव भोसले#बापूराव पेंढारकर# नारायणराव राजहंस (बालगंधर्व)# रामकृष्णबुवा वझे#अण्णा किर्लाेस्कर# केशवराव शितूत#भालचंद्र पेंढारकर# मानापमान# सौभद्र#राक्षसी महत्त्वाकांक्षा#सत्तेचे गुलाम#वधूपरीक्षा#श्री#शारदा# ऑपेरा हाउस...
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 12-04-2019

    ‘ललितकलादर्श’ इतिहासाचा धांडोळा... पुरुषोत्तम श्रीपती काळे (पु.श्री. काळे) हे उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून ओळखले जातात. नेपथ्यकार म्हणून त्यांच्या नावावर ४२ नाटके, २१ चित्रपट आणि असंख्य लॅण्डस्केप जमा आहेत. ‘ललितकलादर्श मंडळी’ या नाट्यसंस्थेसाठी आणि राकमल चित्रमंदिर या चित्रपट संस्थेसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले होते. याच पुश्रींनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान असलेल्या ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेच्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे. ‘ललितकलादर्श मंडळी’ची स्थापना हुबळी येथे १ जानेवारी १९०८ मध्ये झाली. सुरुवातीच्या मालकवर्गात गणेश विनायक वीरकर, मारुतीराव पवार-गोंधळी, बाळकृष्णपंत मादुसकर, कृष्णराव पवार, दत्तोपंत निईकर, केशव विष्णू बेडेकर, दत्तोपंत भोसले आणि केशवराव भोसले ही आठ मंडळी होती. सुरुवातीची अडीच-तीन वर्षे कंपनीने हुबळी, बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागात दौरे केले. १९१० मध्ये कंपनीतील समान भागीदारीची योजना संपुष्टात येऊन फक्त केशवराव आणि दत्तोपंत भोसले हे दोघेच कंपनीचे मालक राहिले. ललितकलादर्शने सुरुवातीला सौभद्र, रामराज्यवियोग, मृच्छकटिक, शारदा, गोपीचंद, मुद्रिका आणि अक्षविपाक अशी सात नाटके सादर केली होती. १९१४ मध्ये जमखिंडीकर मंडळी संस्थेत काम करणाऱ्या व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर या अभिनेत्यांना केशवरावांनी ललितकलादर्शमध्ये बोलाविले आणि ‘शारदा’ नाटकातील नटीची भूमिका करून पेंढारकर यांनी ललितकलादर्शमध्ये कारकीर्दीस केलेली सुरुवात ‘ललितकलादर्श’च्या ‘शहाशिवाजी’ या नाटकासाठी पुश्रींनी दोन मोठे प्लॅटसीन आणि दोन कव्हरचे पडदे रंगविण्याचे केलेले काम, नावाप्रमाणे एक आदर्श कंपनी होण्यासाठी केशवराव भोसले यांनी केलेले प्रयत्न, नाट्यसंस्थेत नेपथ्य, गायन, अभिनय तसेच उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांनी घेतलेली मेहनत, संस्थेने सादर केलेली ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘शहाशिवाजी’, ‘शिक्का कट्यार’, ‘वधुपरीक्षा’ आदी नाटके, ललितकलादर्शमध्ये कोणी नवा पाहुणा आला की त्याच्या नावापुढे लागणारी ‘मामा’ ही उपाधी, कंपनीतील वातावरण, ‘ललितकलादर्श मंडळी’चे संस्थापक आणि एक मालक केशवराव भोसले, भोसले यांच्यानंतर ‘ललितकलादर्श’चे उत्तराधिकारी बापूराव पेंढारकर आणि बापूरावांनंतर ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर आदींच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला आहे. महात्मा गांधी यांनी १९२१ मध्ये एक कोटी रुपयांचा लोकमान्य टिळक स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मुंबईतून ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला होता. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात गाजलेल्या या संयुक्त मानापमानचा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत बालीवाला थिएटर येथे झाला. नाटकात केशवराव भोसले हे ‘धैर्यधर’ तर बालगंधर्व ‘भामिनी’ झाले होते. रात्री साडेसात वाजता सुरू झालेला नाटकाचा प्रयोग रात्री अडीच वाजता संपला, अशी आठवणही काळे सांगतात. केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ललितकलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला मिळालेला प्रचंड यश आणि त्यानंतर ‘तुरुंगाच्या दारात’ला मिळालेले अपयशही ते मांडतात. पुस्तकातील परिशिष्टांमध्ये ललितकलादर्शमधील नटवर्ग आणि अन्य कलावंत, व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबला वादक, रंगमंच व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबलावादक, रंगमंच व्यवस्थापक, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलाकार, रंगपट आणि कपडेपट सांभाळणारी मंडळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुस्तकात केशवराव भोसले, वीर वामनराव जोशी, व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर, भा.वि. वरेरकर, नानासाहेब फाटक, कृष्णाजी प्रभाकर, खाडिलकर, काही नाटकातील देखावे यांची छायाचित्रे आहेत. नाट्य, चित्रपट, चित्रकला या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अनेक दिग्गज मंडळी पुश्रींच्या सहवासात आली. त्यांचे गुण-दोषही काळे यांनी परखडपणे मांडले आहेत. ‘‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेचा इतिहास, आठवणी आणि किस्से आणि पर्यायाने मराठी रंगभूमीचा एक काळ या पुस्तकात उलगडला आहे. मूळ पुस्तक १९५६ साली प्रकाशित झाले होते. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आल्यामुळे हा नाट्येतिहास वाचण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. – शेखर जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more