* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUROSHOTTAM SHREEPAT KALE (VAPU KALE’S FATHER), HAS WRITTEN THIS BOOK SOMEWHERE IN THE 1940-50S. HE WAS AN ARTIST BY NATURE. HE WOULD COLOUR THE DRAPES REQUIRED DURING DRAMAS, LOOK AFTER THE UPSTAGE, OFFSTAGE AND COSTUMES. HE WORKED WITH KESHAVRAO BHOSALE’S LALITKALADARSHA DRAMA COMPANY. THOUGH AN ARTIST, HE HAD EQUAL COMMAND OVER WORDS AND WRITING. PUSHREE, AS HE WAS FONDLY KNOWN AS, HAS ALSO PORTRAYED AN APT WORD-PICTURE OF MANY ARTISTS. HE HAD AN IMMENSE STORE OF STORIES AND MEMORIES OF THESE EMINENT PERSONALITIES. HIS INNOVATIVE STYLE HAS MADE THE CONTENT READABLE AND INTERESTING. IT ALSO ALLOWS US TO TAKE A ROUND THROUGH THE PAST OF DRAMA AND THEATER.
‘ललितकलेच्या सहवात’ हे पुस्तक पुरुषोत्तम श्रीपत काळे (‘वपुं’चे वडील) यांनी विसाव्या दशकाच्या पूर्वार्धात (४०-५० दशकात) लिहिले आहे. ते स्वत: चित्रकार होते. केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीत ते पडदे रंगविणे, नैपथ्यरचना अशी कामे करीत. चित्रकार असूनही शब्दांवर आणि एवूÂणच लेखनकलेवर त्यांची हुकमत होती, हे पानोपानी जाणवते. सुमारे ऐंशी वर्षांहून अगोदरच्या काळात मराठी भाषेवर संस्कृतचा प्रभाव होता. शब्दोच्चार आणि लेखनही अनुनासिक होते. अशा काळात लिहिलेले असूनही त्यांची शब्दरचना लालित्यपूर्ण आहेच, शिवाय आशयघन आणि वास्तवदर्शी आहे. हा ‘ललितकलादर्श’चा छोटेखानी इतिहासच म्हणता येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#LALITKALECHA SAHWASAT# PS KALE# BABURAO PENDHARKAR#BHALCHANDRA PENDHARKAR# #RAMKRUSHNABUVA VAZE# ANNA KIRLOSKAR# KESHVRAO SHITUT# NARAYANRAO RAJHANS (BALGANDHARVA)# LALITKALADARSH NATAK MANDALI# GANDHARVA NATAK MANDALI #ललितकलेच्या सहवासात# पु श्री काळे-#ललितकलादर्श नाटक मंडळी#गंधर्व नाटक मंडळी# केशवराव भोसले#बापूराव पेंढारकर# नारायणराव राजहंस (बालगंधर्व)# रामकृष्णबुवा वझे#अण्णा किर्लाेस्कर# केशवराव शितूत#भालचंद्र पेंढारकर# मानापमान# सौभद्र#राक्षसी महत्त्वाकांक्षा#सत्तेचे गुलाम#वधूपरीक्षा#श्री#शारदा# ऑपेरा हाउस...
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 12-04-2019

    ‘ललितकलादर्श’ इतिहासाचा धांडोळा... पुरुषोत्तम श्रीपती काळे (पु.श्री. काळे) हे उत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून ओळखले जातात. नेपथ्यकार म्हणून त्यांच्या नावावर ४२ नाटके, २१ चित्रपट आणि असंख्य लॅण्डस्केप जमा आहेत. ‘ललितकलादर्श मंडळी’ या नाट्यसंस्थेसाठी आणि राकमल चित्रमंदिर या चित्रपट संस्थेसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले होते. याच पुश्रींनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाचे योगदान असलेल्या ‘ललितकलादर्श’ या नाट्यसंस्थेच्या इतिहासाचा धांडोळा या पुस्तकात घेतला आहे. ‘ललितकलादर्श मंडळी’ची स्थापना हुबळी येथे १ जानेवारी १९०८ मध्ये झाली. सुरुवातीच्या मालकवर्गात गणेश विनायक वीरकर, मारुतीराव पवार-गोंधळी, बाळकृष्णपंत मादुसकर, कृष्णराव पवार, दत्तोपंत निईकर, केशव विष्णू बेडेकर, दत्तोपंत भोसले आणि केशवराव भोसले ही आठ मंडळी होती. सुरुवातीची अडीच-तीन वर्षे कंपनीने हुबळी, बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर या भागात दौरे केले. १९१० मध्ये कंपनीतील समान भागीदारीची योजना संपुष्टात येऊन फक्त केशवराव आणि दत्तोपंत भोसले हे दोघेच कंपनीचे मालक राहिले. ललितकलादर्शने सुरुवातीला सौभद्र, रामराज्यवियोग, मृच्छकटिक, शारदा, गोपीचंद, मुद्रिका आणि अक्षविपाक अशी सात नाटके सादर केली होती. १९१४ मध्ये जमखिंडीकर मंडळी संस्थेत काम करणाऱ्या व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर या अभिनेत्यांना केशवरावांनी ललितकलादर्शमध्ये बोलाविले आणि ‘शारदा’ नाटकातील नटीची भूमिका करून पेंढारकर यांनी ललितकलादर्शमध्ये कारकीर्दीस केलेली सुरुवात ‘ललितकलादर्श’च्या ‘शहाशिवाजी’ या नाटकासाठी पुश्रींनी दोन मोठे प्लॅटसीन आणि दोन कव्हरचे पडदे रंगविण्याचे केलेले काम, नावाप्रमाणे एक आदर्श कंपनी होण्यासाठी केशवराव भोसले यांनी केलेले प्रयत्न, नाट्यसंस्थेत नेपथ्य, गायन, अभिनय तसेच उत्तमोत्तम नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांनी घेतलेली मेहनत, संस्थेने सादर केलेली ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘शहाशिवाजी’, ‘शिक्का कट्यार’, ‘वधुपरीक्षा’ आदी नाटके, ललितकलादर्शमध्ये कोणी नवा पाहुणा आला की त्याच्या नावापुढे लागणारी ‘मामा’ ही उपाधी, कंपनीतील वातावरण, ‘ललितकलादर्श मंडळी’चे संस्थापक आणि एक मालक केशवराव भोसले, भोसले यांच्यानंतर ‘ललितकलादर्श’चे उत्तराधिकारी बापूराव पेंढारकर आणि बापूरावांनंतर ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर आदींच्या आठवणींना काळे यांनी उजाळा दिला आहे. महात्मा गांधी यांनी १९२१ मध्ये एक कोटी रुपयांचा लोकमान्य टिळक स्वराज्य फंड जमा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मुंबईतून ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन ‘मानापमान’ या नाटकाचा संयुक्त प्रयोग सादर केला होता. मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात गाजलेल्या या संयुक्त मानापमानचा प्रयोग ८ जुलै १९२१ रोजी मुंबईत बालीवाला थिएटर येथे झाला. नाटकात केशवराव भोसले हे ‘धैर्यधर’ तर बालगंधर्व ‘भामिनी’ झाले होते. रात्री साडेसात वाजता सुरू झालेला नाटकाचा प्रयोग रात्री अडीच वाजता संपला, अशी आठवणही काळे सांगतात. केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ललितकलादर्शच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाला मिळालेला प्रचंड यश आणि त्यानंतर ‘तुरुंगाच्या दारात’ला मिळालेले अपयशही ते मांडतात. पुस्तकातील परिशिष्टांमध्ये ललितकलादर्शमधील नटवर्ग आणि अन्य कलावंत, व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबला वादक, रंगमंच व्यवस्थापक, संवादिनीवादक, तबलावादक, रंगमंच व्यवस्थापक, चित्रकार, लेखक, दिग्दर्शक, संगीत कलाकार, रंगपट आणि कपडेपट सांभाळणारी मंडळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुस्तकात केशवराव भोसले, वीर वामनराव जोशी, व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर, भा.वि. वरेरकर, नानासाहेब फाटक, कृष्णाजी प्रभाकर, खाडिलकर, काही नाटकातील देखावे यांची छायाचित्रे आहेत. नाट्य, चित्रपट, चित्रकला या क्षेत्रात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली अनेक दिग्गज मंडळी पुश्रींच्या सहवासात आली. त्यांचे गुण-दोषही काळे यांनी परखडपणे मांडले आहेत. ‘‘ललितकलादर्श’ या नाट्य संस्थेचा इतिहास, आठवणी आणि किस्से आणि पर्यायाने मराठी रंगभूमीचा एक काळ या पुस्तकात उलगडला आहे. मूळ पुस्तक १९५६ साली प्रकाशित झाले होते. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आल्यामुळे हा नाट्येतिहास वाचण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. – शेखर जोशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more