* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIMITTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662993
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 1989
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE ALL HAVE A GIFT OF THINKING AND EXPRESSING, FEW OF US HAVE THE CAPACITY OF PUTTING THOUGHTS INTO WORDS, BUT THE CAPABILITY TO EXPRESS CORRECTLY AND EFFECTIVELY IS POSSESSED RARELY; VA PU IS ONE OF SUCH RARE PEOPLE. HE IS THE MOST FAMOUS, LOVED AND SOUGHTAFTER WRITER IN THE HISTORY OF MARATHI LITERATURE. A WRITER ALWAYS HAS A STORE OF EXPERIENCES WITHIN HIM, EAGER TO COME OUT; AWAITING A VENT. NOT ALL OF THEM ARE PUT INTO WORDS. YET, MANY OF THESE EXPERIENCES MEET US AS STORIES OR DRAMAS OR POETRY OR NOVEL; SOME OR THE OTHER FORM OF LITERATURE. SOMETIMES, SOME EXPERIENCES REFUSE TO APPEAR IN THE RECOGNIZED FORMS; BUT THE URGE TO APPEAR COMPELS THEM TO COME OUT IN SOME AESTHETIC FORM, INNOVATIVE IN PRESENTATION, UNIQUE IN STYLE, EXCLUSIVE IN NATURE. THE WORK INCLUDED UNDER THIS TITLE "NIMITTA` WHICH MEANS STIMULUS COMES UNDER THE ABOVE MENTIONED CRITERIA. THEY ALL BEAR THE SALIENT FEATURES OF VA PU`S WRITINGS. THEY HAVE CERTAINLY ADDED TO THE TREASURE OF MARATHI LITERATURE HIGHLIGHTING HIM AS A PROMINENT AUTHOR.
आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-06-1991

    लघुकथेचे स्वरूप आलेले लेख… ‘‘साहित्याकडे मी सहलीसारखंच पाह्यलं... तरी सहल हेच जसं आपलं जीवन होऊ शकत नाही, तसंच साहित्याचं आणि माझं झालं आहे,’’ असे व. पु. काळे यांनी लिहिले आहे. त्यावरून या लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट होतो. अशा तऱ्हने जीवनाला हसतमुखाने सामोरे जाऊन जमेल तसे लेखन केल्याने त्याच्या लेखनात निर्मल प्रसन्नता, निरागस वृत्ती आणि निकोप आशावाद यांचा प्रत्यय येतो. वरील अवतरण प्रस्तुत लेखकाच्या ‘साहित्याचे माझ्या जीवनातील स्थान’ या ‘निमित्त’ या लेखसंग्रहातील लेखातून उद्धृत केले आहे. ‘निमित्त’ या संग्रहात आत्मकथनात्मक लेख, ललितलेख आणि समकालीन समाजातील समस्यांचे हलके- फुलके विवरण करणारे लेख मिळून एकूण पंचवीस लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. मार्मिक आणि भावमधुर लेखकाचा पिंड मूलत: कथाकाराचा असल्यामुळे सर्व लेखांना लघुकथेचे स्वरूप प्राप्त होते. ते लघुकथेसारख्या आकृतिबंधापासून साकार होतात. नर्म विनोदयुक्त लेखनशैली हा या लेखांचा विशेष होय. ही लेखनशैली अंशत: मार्मिक आणि मोठ्या प्रमाणात भावमधुर झाली आहे. जीवन हे दोष शोधून काढण्यासाठी, निराशेने कुढत राहण्यासाठी नसून प्राप्त परिस्थितीतील दु:खातून आनंदाचे क्षण वेचून, निराग्रही वृत्ती जोपासून जास्तीत जास्त सुखा-समाधानाने जगण्यासाठी आहे, असा सुस्पष्ट ठसा या पुस्तकाच्या वाचनाने मनावर उमटतो. नर्म विनोद सोडून लेखकाचे तंत्र कोटीबाज, दिलखुलास विनोदाकडे झुकले की त्याच्याकडून ‘मी आणि सौ. च्या मैत्रिणी’सारखा लेख लिहिला जातो. हा लेख एक लघुकथाच आहे असे म्हटल्यास फारसे वावगे होणार नाही. ‘तो धुंद क्षण’, ‘रंग पुसू नका’, ‘वाईकर’, ‘इंद्रधनुष्य सूर्याचे, रंग चतुरंगचे’, ‘शादी किसीकी भी हो’ हे या संग्रहातील आणखी काही लघुकथा म्हणून वाचल्यास अधिक वेधक वाटतील असे लेख. आत्मकथनात्मक लेखातील ‘तो काळ सुखाचा’ आणि ‘माझे वाचक, माझे टीकाकार’ या लेखांचा प्राधान्याने निर्देश करावा लागेल. लेखक आपल्या शैशवावस्थेतील मुंबई-पुण्याच्या शालेय जीवनातील अनेकविध स्मृती असीम मन:पूर्वकतेने सांगतो, त्यामुळे तो लेख हृद्य झाला आहे. ‘माझे वाचक, माझे टिकाकार’ हासुद्धा या संग्रहातील एक महत्त्वपूर्ण लेख आहे. या लेखाला अधिक मूल्यवान मानण्याचे कारण असे की, येथे लेखक आपल्या लेखनाच्या प्रारंभकालापासून आपले वाचक आणि टीकाकार कोण होते ते बऱ्याच विस्ताराने निवेदन करतो. अनेक नामवंत साहित्यिकांनी त्याला कसे प्रात्याहित केले ते सांगून लेखकाने त्याचे वडील त्याच्या पहिल्यावहिल्या कथा वाचून एखादा शब्द बदलायला सांगत ती घटना कथन केली आहे. त्यांची ही चिकित्सक दृष्टी पुढे लेखकालाही प्राप्त झाली. तसेच, जाणकार समिक्षकांकडून त्याच्या कथालेखनावर केली गेलेली टिका लेखकाने निरभ्र मनाने आणि खिलाडू वृत्तीने स्वीकारली. चुकीची टीका करणाऱ्या समिक्षकांचाही त्याला कधी संताप आला नाही. उलट विलक्षण चातुर्याने त्यांची टीका कशी गैरलागू होती ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘मोहनराव गेले’ या लेखातील कारुण्य हृदय हलविणारे आहे. मानवाशी चाललेला नियतीचा जीवघेणा खेळ लेखक सांप्रतच्या सामाजिक चौकटीच्या अनुबंधात निवेदन करतो. या लेखातील उपरोधाची धार विशेष लक्षणीय आहे. याउलट ‘पाकसिद्धी’ हा लेख एका वेगळ्या विनोदाचा मसाला सादर करतो. हा विनोद फार वरच्या दर्जाचा आहे असे मात्र नव्हे. टीकात्मक लेखन वर म्हटल्याप्रमाणे प्रचलित समाजरचनेतील समस्यांवर लेखकाने हलकी-फुलकी टीका केली आहे. ‘वृद्धाश्रम... सोय की संकट?’ हा लेख पाहा. परदेशातील ‘अ‍ॅथॉरिटी’ना देखील वृद्धाश्रम हे संकट वाटते हे सत्य लेखक येथे सिद्ध करुन दाखवतो. वृद्ध माणसे कौटुंबिक स्वास्थ्यासाठी घरातच हवीहवीशी वाटावयास हवीत. खरोखर, वृद्ध स्त्री-पुरुष हवेहवेसे वाटतील का? ‘जिचकार हे सांगते तर?’ या लेखात लेखक लोकल गाड्यांत स्त्रियांची मंगळसूत्रे खेचून नेणाऱ्या समाजवंâटकांवर अनिवार्य, सात्त्विक संतापानं लिहितो. ‘कुंकू ते हळदीकुंकू’मध्ये लेखक जुन्या जमान्यातील उत्कृष्ट मराठी चित्रपटांची थोरवी आपल्या खास विनोदी पद्धतीने कथन करतो, तर ‘म्युझिकसाठी’मध्ये संगीता जोशींच्या कवितांवर ‘मजेदार’ समिक्षा लिहितो. या लेखकाचे काही लेख स्पष्टपणे निरसतेकडेही झुकलेले आढळतात. ‘प्रिय सादिक - कोहळे’, ‘टुडे.... व्हाय?’ आणि ‘हा देश कुणाचा?’ या लेखात लेखक समाजावर टीकास्त्र उगारतो. समाजातील खोटेनाटेपणा, खोडसाळपणा यांवर त्याने टीका केली आहे. ती बव्हंशी सरळसोपटपणे व्यक्त झाल्याने कलात्मक वाटत नाही. तथापि, हे थोडेसे लेख सोडल्यास प्रस्तुत लेखकाचे बहुसंख्य लेख लघुकथेच्या तंत्रातून साकार झाल्यामुळे प्राय: रोचक बनले आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more