* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353173562
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ACHARYA ATRE WAS WELL KNOWN FOR HIS VARIOUS ACHIEVEMENTS AND ENDEAVOURS AND TRUELY A VERSETILE VISIONARY WHOSE PASSION FOR MAHARASHTRA IS REVEALED THROUGH HIS CONTRIBUTION TO THE SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT. IT IS UNANIMOUSLY BELIEVED THAT SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT IS HIS CROWNING GLORY AND IS A UNIC EXAMPLE OF A LITERARY WRITER FIGHTING FROM THE FRONT WITH HIS ``PEN AND HIS ORATORY`` FOR THE FOUNDATION OF A UNIFIED STATE. DURING THE SAMYUKTA MAHARASHTRA MOVEMENT HE TRAVELLED WHOLE OF MAHARASHTRA AND WAS A ``MAN ON HIS HEALS`` THAT IS WHY LATE HOUNARABLE PRESIDENT SARVAPALLI RADHAKRISHNAN OFFERED HIS CONDOLENCES BY SAYING ``ACHARYA ATRE WAS NOT ONLY WRITER BUT FIGHTER TOO.`` HOWEVER, EVEN EARLIER HE WAS A FREQUENT VISITOR TO ALL PLACES IN MAHARASHTRA. A STUDY OF HIS LIFE AND WORKS REVEALS AN AMAZING JOURNEY IN THE FAR AND WIDE STRETICH OF PRESENT MAHARASHTRA, BESIDES HIS BIRTH PLACE SASWAD (NEAR PUNE), HIS CULTURAL KARMABHUMY PUNE AND HIS MEDIA AND POLITICAL STRIDES FROM MUMBAI. THIS HELPED UNIFYING THE CITIES AND THE CULTURES OF THE URBAN AND THE RURALS. HE WAS THE MOST FAVOURED ORATOR AND CHIEF GUEST FOR EVERY FUNCTION AND EVERY EVENT, IN THE PUBLIC LIFE OF THE PEOPLE, WHO INVITED HIM FROM FAR OF PLACES AND BEING EXTREMELY SOCIAL AND LOVER OF PEOPLE HE WOULD ATTEND MANY PLACES AND THUS HE TRAVELLED TO THE VARIOUS PARTS OF MAHARASTRA. HE THUS KNEW THE PECULARITIES AND PRACTICES OF ALL AS MUCH AS HE WAS SUCCESSFUL IN LIVING HIS CHARISMA AND HIS THOUGHTS TO INSPIRE THE MILLIONS. HE BECAME A PART OF EVERY INDIVIDUAL`S DREAM. THE BOOK CAPTURES THIS JOURNEY AND PROVIDES AN INSIGHT IN THE MAKING OF THE VISIONARY AND HIS INDELIBLE IMPRINT ON THE MASSES.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, कऱ्हाड, रत्नागिरी, वाई इ. शहरांशी-गावांशी, तसेच बेळगाव, गोवा, इंदूर इ. महाराष्ट्रेतर ठिकाणांशी आचार्य अत्रे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला. त्यातून राजकीय, ऐतिहासिक, साहित्यिक संचित घडत गेले. त्या संचिताचं आणि अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचं समग्र दर्शन घडविणारं पुस्तक आहे ‘आचार्य अत्रे : बारा गावचं पाणी.’ १९४६मध्ये बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी झिजवलेली लेखणी, गोव्यातील काही ठिकाणी घेतलेल्या सभा, कोल्हापूरशी आणि वि. स. खांडेकरांशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, बाबा कदम आणि शिवाजी सावंतांना त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, रत्नागिरीच्या साहित्य संमेलनापासून सुरू झालेला अत्रे-फडके वाद इ. अनेक महत्त्वपूर्ण घटनांनी, व्यक्तींनी गजबजलेलं हे पुस्तक आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आचार्यअत्रेबारागावचेपाणी #अ‍ॅडबाबूरावकानडे #कोल्हापूरनव्हेकलापूर #सातारामराठ्यांचीगादी #वाईदक्षिणकाशी #गोदातीरआणितरंगनाशिक # मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #ACHARYAATREBARAGAVCHEPANI #ADVBABURAOKANADE #KOLHAPURNAVHEKALAPUR #SATARAMARATHYANCHIGADI #VAIDAKHSHINKASHI #GODATIRANITARANGNASHIK #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 23-02-2020

    आचार्य अत्रे आणि विविध गावं यांच्या नात्याचा वेध... आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व. साहित्य, नाटक, चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व, राजकारण, शिक्षण, समाजकारण आदी विविध पैलूंद्वारे त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. महाराष्ट्राच ‘सांस्कृतिक राजदूत’ अशीच त्यांची ओळख होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन, व्याख्यानं, चित्रीकरण, नाटकांचे दौरे आदी कारणांमुळे पायाला भिंगरी लावल्यासारखा त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. इतकंच काय; पण देश-परदेशांतही ते अनेकदा गेले. या निमित्त त्यांचा विविध शहरांशी-गावांशी संबंध आला. त्यातून त्यांचे अनेक ठिकाणांशी ऋणानुबंध जुळले. नेमक्या या नात्यांचा वेध अ‍ॅड बाबुराव कानडे यांनी ‘आचार्य अत्रे - बारा गावचं पाणी’ या पुस्तकांद्वारे घेतला आहे. बेळगाव, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, कऱ्हाड, सातारा, वाई, तुळजापूर, पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली आदी शहरांशी आचार्य अत्रे यांचे नातेसंबंध यात उलगडून दाखवण्यात आले आहेत. ‘बेळगाव - महाराष्ट्राचे हृदय’ या लेखात बेळगावविषयी वाटणारी आत्मियता आणि जिव्हाळा आहे. सन १९४६ मध्ये तिथं झालेल्या साहित्य संमेलनाद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं रणशिंग अत्रे यांनी फुंकलं. ‘बेळगाव महाराष्ट्राचे हृदय आहे आणि मुंबई मस्तक आहे,’ असं म्हणत एखाद्या शूर शिलेदारासारखं लेखणी आणि वाणीद्वारे आचार्य अत्रे यांनी केलेल्या रोमहर्षक लढ्याचं वर्णन यात आहे. महाराष्ट्राच्या मर्मबंधातली ठेव म्हणून गोव्याला ओळखलं जातं. गोव्यावर अत्रे यांचं नि:स्सीम प्रेम होतं. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्रे यांनी उडी घेतली. त्यासाठी त्यांची लेखणी ‘नवयुग’मधून आग ओकत होती. त्यांच्या वाणीला धार चढली होती. गोव्यासंबंधीच्या त्यांच्या भाषणांचा आणि लेखांचा एक मोठा ग्रंथ होईल, एवढं त्यांचं योगदान आहे. या साऱ्या बाबी गोव्यावरच्या लेखात आहेत. पुण्याविषयी अत्रे यांना मोठी आत्मीयता होती. नगरसेवकपदापासून ते लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका अत्रे पुण्यात लढले. भांबुर्डाचं शिवाजीनगर तर रे मार्केटचे महात्मा फुले मार्केट असं नामकरण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. लोकसभेची निवडणूक पुण्यात ते हरले. त्याचवेळी विधनसभेची निवडणूक ते मुंबईतून जिंकले. त्यावेळी ‘आईने मारले; पण मावशीने तारले’ असे उद्गार त्यांनी काढले होते. पुण्याविषयी अशा अनेक आठवणी ‘पुणे- माझी आई - सांस्कृतिक कर्मभूमी’ या लेखात जागवल्या आहेत. आचार्य अत्रे यांचं कोल्हापूरशी नातं चित्रपटांमुळे आणखी दृढ झालं. ‘ब्रह्मचारी’, ‘वसंतसेना’, ‘महात्मा फुले’ या चित्रपटांसंदर्भातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसंच बाबुराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबा कदम, शिवाजी सावंत आदींविषयीच्या आठवणींनाही उजाळा ‘कोल्हापूर नव्हे कलापूर’ या लेखात देण्यात आला आहे. सासवडमध्ये अत्रे यांचं बालपण गेलं. त्यावेळच्या अनेक आठवणी, गंमतीजमती आहेत. उनाडक्या, चेष्टा, चकाट्या, नकला यांना ऊत आला होता. त्यावर ‘शक्ती आणि भक्तीचा संगम - सासवड जन्मभूमी’ या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘मी लहानसहान मंडळींशी मैत्री करत नसतो. खंडाळ्यांच्या डोंगर आणि मुंबईचा सागर हीच माझी खरी मित्रमंडळी,’ असं आचार्य अत्रे म्हणत. त्यामुळंच खंडाळा इथला राजमाची बंगला हे त्यांचं एक आवडतं ठिकाण होतं. इथं रंगलेल्या मैफली, नवोदित साहित्यकांचा मेळा, मान्यवरांच्या गाठीभेटी यामुळं हा बंगला अत्रे यांच्या जीवनात उत्साहाचा झरा होता. एका बंगल्याविषयीच्या आठवणी खूप रंजक झाल्या आहेत. आचार्य अत्रे यांचे अभ्यासक अशी अ‍ॅड. कानडे यांची ओळख आहे. खरं तर आचार्य अत्रे यांना ते आपलं दैवतच मानतात. त्याच अनुषंगानं त्यांनी हा लेखनप्रपंच केला आहे. अत्रे यांचा अनेक गावांशी - शहरांशी ऋणानुबंध जुळला. तिथल्या आठवणींना कानडे यांनी एका धाग्यात गुंफलं आहे, हा अतिशय स्तुत्य प्रयोग आहे. खरं तर ही गावंच आचार्य अत्रे यांच्या आठवणी सांगत आहेत, असा भास आपल्याला होतो, इतकं प्रत्ययकारी लेखन कानडे यांनी केलं आहे. मात्र, हे करत असताना आचार्य अत्रे यांच्याशी ज्यांचे वादविवाद झाले, त्यांनाही कानडे यांनी झोडपून काढलं आहे. अत्रे यांच्या नजरेतून त्यांनी पाहिलं असल्यामुळं हे झालं असावं, असं वाटतं. मात्र, त्यांनी हे टाळायला हवं होतं, असं वाटतं. अत्रे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी तर हे पुस्तक वाचावंच, शिवाय ज्यांना महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ, संयुक्त महाराष्ट्र यांविषयी यांविषयी आत्मियता आहे, त्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून निश्चित होते, एवढं नक्की! – सु. ल. खुटवड ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more