V. S. KHANDEKAR

About Author

Birth Date : 11/01/1901
Death Date : 02/09/1976


IN THE FIELD OF MARATHI LITERATURE V.S. THE NAME KHANDEKAR IS PRONOUNCED WITH RESPECT. KHANDEKAR, WHO STARTED WRITING WITH HUMOROUS LITERATURE, LATER GAINED POPULARITY AS A GREAT THINKER AND CRITIC. HE WROTE EXTENSIVELY IN MANY LITERARY GENRES SUCH AS STORIES, NOVELS, POETRY, PLAYS, ESSAYS, SCREENPLAYS, REVIEWS, JOKES, PORTRAITS, TRANSLATIONS.

मराठी साहित्यक्षेत्रात वि.स. खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते. विनोदी साहित्याने लेखनप्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली. कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा, विनोद, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. साहित्यक्षेत्रातील काही मोजक्या अजरामर कलाकृतींमध्ये त्यांच्या ययाति आणि अमृतवेल या कादंबऱ्याची गणना होते. अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या साहित्यकृती भारतातील अनेक भाषांत अनुवादित झाल्या आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६८ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. १९७०मध्ये त्यांना साहित्य अकादमीने महत्तर सदस्यत्व (फेलोशिप) बहाल केले. सन १९७६ साली सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना लाभला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी बहाल केली.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 120 total
AAJCHI SWAPNE Rating Star
Add To Cart INR 120
AASTIK Rating Star
Add To Cart INR 130
ABHISHEK Rating Star
Add To Cart INR 230
ABOLI Rating Star
Add To Cart INR 120
ADNYATACHYA MAHADWARAT Rating Star
Add To Cart INR 150
AGNINRUTYA Rating Star
Add To Cart INR 100
AJUN YETO VAS PHULANA Rating Star
Add To Cart INR 150
AMRUTVEL Rating Star
Add To Cart INR 230
ANTARICHA DIWA Rating Star
Add To Cart INR 620
ASHRU Rating Star
Add To Cart INR 340
ASHRU ANI HASYA Rating Star
Add To Cart INR 200
ASTHI Rating Star
Add To Cart INR 80
12345678910

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more