V. S. KHANDEKAR

About Author

Birth Date : 11/01/1901
Death Date : 02/09/1976


IN THE FIELD OF MARATHI LITERATURE V.S. THE NAME KHANDEKAR IS PRONOUNCED WITH RESPECT. KHANDEKAR, WHO STARTED WRITING WITH HUMOROUS LITERATURE, LATER GAINED POPULARITY AS A GREAT THINKER AND CRITIC. HE WROTE EXTENSIVELY IN MANY LITERARY GENRES SUCH AS STORIES, NOVELS, POETRY, PLAYS, ESSAYS, SCREENPLAYS, REVIEWS, JOKES, PORTRAITS, TRANSLATIONS.

मराठी साहित्यक्षेत्रात वि.स. खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते. विनोदी साहित्याने लेखनप्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली. कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा, विनोद, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. साहित्यक्षेत्रातील काही मोजक्या अजरामर कलाकृतींमध्ये त्यांच्या ययाति आणि अमृतवेल या कादंबऱ्याची गणना होते. अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या साहित्यकृती भारतातील अनेक भाषांत अनुवादित झाल्या आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६८ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. १९७०मध्ये त्यांना साहित्य अकादमीने महत्तर सदस्यत्व (फेलोशिप) बहाल केले. सन १९७६ साली सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना लाभला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी बहाल केली.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 120 total
AAJCHI SWAPNE Rating Star
Add To Cart INR 120
AASTIK Rating Star
Add To Cart INR 130
ABHISHEK Rating Star
Add To Cart INR 230
ABOLI Rating Star
Add To Cart INR 120
ADNYATACHYA MAHADWARAT Rating Star
Add To Cart INR 150
AGNINRUTYA Rating Star
Add To Cart INR 100
AJUN YETO VAS PHULANA Rating Star
Add To Cart INR 95
AMRUTVEL Rating Star
Add To Cart INR 230
ANTARICHA DIWA Rating Star
Add To Cart INR 620
ASHRU Rating Star
Add To Cart INR 340
ASHRU ANI HASYA Rating Star
Add To Cart INR 200
ASTHI Rating Star
Add To Cart INR 80
12345678910

Shop by

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more