V. S. KHANDEKAR

About Author

Birth Date : 11/01/1901
Death Date : 02/09/1976


IN THE FIELD OF MARATHI LITERATURE V.S. THE NAME KHANDEKAR IS PRONOUNCED WITH RESPECT. KHANDEKAR, WHO STARTED WRITING WITH HUMOROUS LITERATURE, LATER GAINED POPULARITY AS A GREAT THINKER AND CRITIC. HE WROTE EXTENSIVELY IN MANY LITERARY GENRES SUCH AS STORIES, NOVELS, POETRY, PLAYS, ESSAYS, SCREENPLAYS, REVIEWS, JOKES, PORTRAITS, TRANSLATIONS.

मराठी साहित्यक्षेत्रात वि.स. खांडेकर हे नाव आदराने उच्चारले जाते. विनोदी साहित्याने लेखनप्रारंभ करणाऱ्या खांडेकरांना कालांतराने थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळाली. कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध, पटकथा, समीक्षा, विनोद, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. साहित्यक्षेत्रातील काही मोजक्या अजरामर कलाकृतींमध्ये त्यांच्या ययाति आणि अमृतवेल या कादंबऱ्याची गणना होते. अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या साहित्यकृती भारतातील अनेक भाषांत अनुवादित झाल्या आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६८ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. १९७०मध्ये त्यांना साहित्य अकादमीने महत्तर सदस्यत्व (फेलोशिप) बहाल केले. सन १९७६ साली सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार खांडेकरांना लाभला. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी बहाल केली.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 120 total
AAJCHI SWAPNE Rating Star
Add To Cart INR 120
AASTIK Rating Star
Add To Cart INR 130
ABHISHEK Rating Star
Add To Cart INR 230
ABOLI Rating Star
Add To Cart INR 120
ADNYATACHYA MAHADWARAT Rating Star
Add To Cart INR 150
AGNINRUTYA Rating Star
Add To Cart INR 100
AJUN YETO VAS PHULANA Rating Star
Add To Cart INR 150
AMRUTVEL Rating Star
Add To Cart INR 230
ANTARICHA DIWA Rating Star
Add To Cart INR 620
ASHRU Rating Star
Add To Cart INR 340
ASHRU ANI HASYA Rating Star
Add To Cart INR 200
ASTHI Rating Star
Add To Cart INR 80
12345678910

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more