* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE MAN FROM PAKISTAN
  • Availability : Available
  • Translators : SHEKAR JOSHI
  • ISBN : 9788184985566
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE MAN FROM PAKISTAN BY DOUGLAS FRANTZ AND CATHERINE COLLINS IS A SHOCKING AND INTRIGUING TALE ABOUT INTERNATIONAL LEVELS. THE NOVEL IS AN INTENSE AND FAST - MOVING STORY TOLD THROUGH THE EYES OF AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS. THE SECOND NUCLEAR AGE HAS BEGUN AND THERE IS FEAR ALL AROUND. NOT SINCE THE END OF THE COLD WAR HAS THERE BEEN SUCH FEAR ABOUT A POSSIBLE NUCLEAR DISASTER. THIS TIME IT`S WORSE AS THE EFFECTS COULD NOW BE LARGER AND MORE DEVASTATING. SHOULD SUCH AN ACT HAPPEN, IT IS POSSIBLE THAT THE MASTERMIND BEHIND IT IS THE FORMIDABLE ABDUL QADEER KHAN. ABDUL QADEER KHAN IS THE PAKISTANI MAKER OF THE POWERFUL ISLAMIC BOMB. HE HAS MASTERMINDED A VAST NUMBER OF UNDERGROUND ENTERPRISES THAT HAVE LED TO THE SELLING OF NUCLEAR SECRETS TO COUNTRIES LIKE LIBYA, IRAN AND NORTH KOREA. KHAN`S ORGANISATION MAY BE A LOOSE - KNIT ONE, BUT ITS THREAT REMAINS. IT STILL HAS THE CAPABILITY TO SELL WEAPON BLUEPRINTS, PARTS AND CONTAINS THE KNOW - HOW TO BRING TOGETHER THE PARTS INTO A DO - IT - YOURSELF BOMB KIT. IN SUCH A SITUATION, ONE WOULD EXPECT THE AMERICAN AUTHORITIES TO TAKE ACTION AND HALT ALL SUCH OPERATIONS, BUT TO EVERYONE`S SURPRISE THEY CHOOSE TO LIE LOW AND WATCH KHAN`S ACTIONS. AS THEY AWAIT KHAN`S EVERY NEXT STEP, ONE BY ONE HE PROVES ALL PROBABLE INTERNATIONAL SAFEGUARDS TO BE DEFUNCT. HE PROVES TO THE WORLD THAT NONE OF THEM MATTER AND ARE COMPLETELY DYSFUNCTIONAL. THE SUSPICION WAS ON KHAN RIGHT FROM THE BEGINNING AND AMERICAN AND EUROPEAN OFFICIALS ULTIMATELY DO CATCH HOLD OF HIM, BUT UNFORTUNATELY THE NUCLEAR GENIE IS OUT AND IS NOW OF GREAT DANGER. THE MAN FROM PAKISTAN IS AVAILABLE IN PAPERBACK. THE BOOK WAS PUBLISHED IN 2008 BY TWELVE.
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशामध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एका माणूस कसा वागतो, कोणत्या थराला जाऊ शकतो; याबाबत ध्योक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही द्यात असूनही अमिरेकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #DOUGLASFRANTZ #CATHERINECOLLINS #SHEKARJOSHI #THEMANFROMPAKISTAN #तोएकपाकिस्तानी #
Customer Reviews
  • Rating Starकिरण माने

    NakKi vacha barech mahiti purna pustak aahe.

  • Rating StarKiran Borkar

    पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्मितीचा जनक अब्दुल करीम खान ( ए. क्यू. खान ) याची ही सत्यकथा . खान हा पक्का भारतद्वेष्टा आणि त्या द्वेषापायी त्याने अणुबॉम्बच्या निर्मितीत हात घातला .इतकेच नव्हे त्याने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा काळाबाजार सुरू कला .त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी इराण, लिबिया, उत्तर कोरिया अश्या देशांना आपले तंत्रज्ञान विकले होते . पाकिस्तानच्या अणूक्षेत्रातील त्याचा उदय आणि अस्त याची रसभरीत ही कहाणी आहे . ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-03-2015

    पाकिस्तानच्या अणुबाँब जनकाची सुरस कहाणी… ‘द मॅन फ्रॉम पाकिस्तान’ हे पाकिस्तानच्या अणुबाँबचे तथाकथित जनक डॉ. ए. क्यू. खान यांच्या एकूण कारकिर्दीचा आढावा घेणारे असे पुस्तक. पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचा ध्यास घेतलेला हा मणूस पाकिस्तानच्या अणुक्षेत्रातील त्याचा उदय आणि एकूण कामगिरी यांची रसभरित कहाणी, लेखक डग्लस फ्रान्झ आणि पत्रकार पत्नी कॅथरिन कॉलिन्स यांनी या पुस्तकाद्वारे सादर केली आहे. ‘तो एक पाकिस्तानी’ हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद शेखर जोशी यांनी केला आहे. मूळ पुस्तकाइतकाच त्याचा अनुवादही माहितीपूर्ण आणि मनोरंजक करण्याचा लेखकाचा प्रयत्न जागोजागी दिसून येतो. २० व्या शतकाच्या प्रारंभी अल्बर्ट आईनस्टाईनने अणूमधे लपलेल्या शक्तीचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात याचा वापर अणुबाँबच्या निर्मितीत करण्यात आला. या अणुबाँबच्या स्फोटामध्ये जपानमधील हिरोशिमा-नागासाकी ही शहरे क्षणार्धात जळून खाक झाली. हा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. या हादऱ्यानंतर सगळे जग हादरून गेले. बऱ्याच राष्ट्रांनी एकत्र येऊन अण्वस्त्रबंदीसाठी आवाज उठवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन अशा प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येऊन ‘आय ए ई ए’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. सदर आयोग मार्शल प्लॅन म्हणून परिचित असलेल्या योजनेच्या धर्तीवर एक योजना तयार करून शांततापूर्ण अणुकार्यक्रम राबविण्यास प्रोत्साहन देईल असे जाहीर करून या प्रस्तावाचे ‘शांततेसाठी अणु’ असे नामकरणही केले. एकीकडे ‘आय ए ई ए’ आकार घेत असतानाच दुसरीकडे अमेरिकेने इराण, इस्त्रायल, भारत, पाकिस्तान यासारख्या अनेक देशांना अणुभट्ट्या सवलतीच्या दरात विकायला सुरुवात केली. अमेरिकेचा या क्षेत्रातील प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रशियानेही स्वत:ची मित्र राष्ट्रे असलेल्या देशांना अणुतंत्रज्ञानाची खिरापत वाटायला सुरू केली. या सर्वांची अतिशय मनोरंजक माहिती या पुस्तकातून मिळते. थोडक्यात काय तर लहानमोठी सर्वच राष्ट्रे अण्वस्त्रनिर्मितीबाबत छुपेछुपे प्रयत्न करू लागली. शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रम आणि त्याचा अण्वस्त्रनिर्मितीसाठी व्हावयाचा संभाव्य वापर यातील तथाकथित सीमारेषा म्हणजे एक मृगजळ असल्याचे हळूहळू सिद्ध होऊ लागले आहे. या अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तानी शास्त्रज्ञ व या कादंबरीचा नायक अब्दुल करीम खान अण्वस्त्र चळवळीत सक्रिय होत आपली पावलं उमटवित होता. खानचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी भारतातील भोपाळ संस्थानात झाला. खानचे वडील अब्दूल गफूर खान ‘मुस्लीम लीग’ या राजकीय पक्षासाठी कार्य करीत असत. मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी आणि हिंदूंचा द्वेष हे गुण खानने आपल्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळवले होते. पुढे जरी खानने आपल्या आयुष्यातील दहा वर्षे युरोपात घालवली असली तरीही बालपणापासून झालेल्या मुस्लीम संस्कारांच्या पगड्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही सुमारे दशकभर त्या देशाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. किमान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उद्योग, शाळा आणि आर्थिक संस्था या सुविधांचीही तिथे कमतरता होती. त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती झपाट्याने होत होती. त्याची असूया वाटणारे खान सारखे बरेच पाकिस्तानी होते. अब्दूल खान या पाकिस्तानी शास्त्रज्ञानाने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंथज्ञानाचा काळाबाजार करावयास सुरुवात केली. त्याच्या कारवायासंबंधी बारीक सारीक बारकावे लेखकाने सुसंगत रीतीने मांडले आहेत. सुमार दर्जाचे तंत्रज्ञान अवगत असलेला हा शास्त्रज्ञ आपली राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो. द्वितीय अणुयुगाचा एक महत्त्वाचा भागीदार कसा बनतो, पाकिस्तानसारख्या एका सर्वस्वी कमकुवत देशाला अण्वस्त्रसज्ज देशांच्या पंक्तीत कसा नेऊन ठेवतो आणि जगातील अत्यंत अस्थिर देशांना आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान बिनदिक्कत कसे विकतो या सर्वाची कहाणी सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये खानच्या कारवायांचा उदय आणि ऱ्हास याची कारणे जाणून घेऊन वाचकापर्यंत पोहोचविण्याचे काम लेखकाने केले आहे. तांत्रिक बाजू बरोबरच पुस्तकाची ललित बाजूसुद्धा व्यवस्थित हाताळली असल्यामुळे वाचकाची उत्सुकता व कुतूहल जागे ठेवण्यात लेखकाला यश मिळाले आहे. एका वेगळ्याच विषयावरचे माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more