* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHOOT TO KILL
  • Availability : Available
  • Translators : DEODATT KETKAR
  • ISBN : 9788184980707
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SCOTT GRAHAM WAS A FORMIDABLE SAS SOLDIER. HE WAS DECORATED FOR HIS HEROISM IN NORTHERN IRELAND AND THE FALKLANDS, AND HE FOUGHT GUM BATTLES IN WHICH MORE THAN A DOZEN IRA TERRORISTS WERE KILLED. MAIREAD FARRELL WAS PETITE, YOUNG, DARKLY BEAUTIFUL AND SHE PLANTED BOMBS FOR THE IRA. TOGETHER SHARED A DEADLY AND TERRIBLE SECRET. FOR YEARS THEY LOVED ONE ANOTHER WITH A RELENTLESS PASSION, AGAINST ALL THE TABOOS OF BOTH THEIR ARMIES. THEIR CLANDESTINE LOVE AFFAIR REACHED ITS CRESCENDO WITH THE SHOOTING OF THREE UNARMED IRA TERRORISTS ON THE ROCK OF GIBRALTAR, ONE OF THE MOST CONTROVERSIAL INCIDENTS IN THE HISTORY OF THE SAS. SHOOT TO KILL IS SCOTT GRAHAM`S TRUE STORY OF THIS EXTRAORDINARY ROMANCE, AND OF THE KILLINGS THAT SHOCKED THE WORLD.
संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.` - न्यूज ऑफ द वर्ल्ड स्कॉट ग्रहम एक कसलेला `एसएएस` (स्पेशल एअर सर्व्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. `आयआरए` बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही `आयआरए` साठी बॉंब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत अनेक वर्षं ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. `आयआरए`च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. `एसएएस`च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - `शूट टू किल.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHOOTTOKILL #DEODATTAKETKAR #SCOTTGRAHAM
Customer Reviews
  • Rating StarPrasad Raut

    ७-८ वर्षांपूर्वी शूट टू किल वाचलं होतं..... काय माहित नाही.... पण तेव्हापासून स्कॉट ग्राहम आणि मायरीड फेरेलची लव्हस्टोरी ही माझी ऑल टाईम फेव्हरेट लव्हस्टोरी झाली..... कर्तव्य, जबाबदारी या दोन भावना माझ्यासाठी प्रेमापेक्षाही मोठ्या असल्याने असेल काचीत..... पण हिर-रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, रोमियो ज्युलिएट एक नंबरचे चुतीये वाटतात..... कोणी स्वतःच्या डोक्यात कुदळ घालून घेतोय तर कोणीतरी येडझव्यासारखं वाळवंटात भटकत राहतंय.... ही अशी चुतियागिरी अंगावरच नाही येत..... तर किळस येते त्यांची..... असो. तर आयरीश स्वातंत्र्ययोद्धा मायरीड फेरेल आणि ब्रिटनच्या एसएएस युनिटचा कमांडो स्कॉट ग्राहम यांची ही लव्हस्टोरी. दोघांच्या संघटना एकमेकांच्या हाडवैरी.... अशात या दोघांमध्ये प्रेम होतं.... फुलतं..... बहारतं...... मायरीडची IRA संघटना एका ठिकाणी बॉम्बस्फोट करायची जबाबदारी तिच्यावर देते.... आणि स्कॉटच्या खऱ्या रूपाबद्दल अनभिज्ञ असलेली मायरीड ही गोष्ट जेव्हा त्याला सांगते तेव्हा देशाचा एक सैनिक जे करेल तेच स्कॉट करतो..... मायरीड पकडली जाते.... दहा वर्ष तुरुंगवास भोगते.... त्यात भयानक हालअपेष्टा भोगते.... अठराव्या वर्षी तुरुंगात गेलेली अल्लड, संवेदनशील मायरीड अठ्ठाविसाव्या वर्षी बाहेर येते तेव्हा पूर्णपणे बदलून गेलेली असते..... बदलेलं नसतं ते तिचं स्कॉटवर असलेलं नितांत प्रेम..... त्यानंतर स्कॉट अनेकदा तिला तिथून बाहेर काढून अमेरिका किंवा युरोपमध्ये न्यायचा प्रयत्न करतो.... पण नियतीला ते मान्य नसतं.... कारण सटवाईने मायरीड आणि स्कॉटचं भविष्य आधीच लिहिलेलं असतं..... आणि तेच होतं..... रॉक ऑफ जिब्राल्टरमध्ये दोन दहशतवाद्यांची ओळख पटवायला स्कॉटला नेलं जातं... आणि तिथे तो ओळख कन्फर्म करताच त्याच्याच युनिटचे लोक त्या दोन दहशतवाद्याना गोळ्या घालून ठार मारतात.... त्यातली एक मायरीड होती..... मला ही स्टोरी आजही आवडते.... आणि पुढेही कायम माझी फेव्हरेट लव्हस्टोरी असेल.... कारण दोघांनीही आपलं प्रेम आपल्या कर्तव्याआड येऊ दिलं नाही..... IRA ची स्वातंत्र्ययोद्धा म्हणून मायरीड आपलं कर्तव्य करत होती आणि ब्रिटनचा SAS कमांडो आपलं कर्तव्य बजावत राहिला..... त्यांचं प्रेम त्यांच्या कर्तव्याच्या आड आलं नाही.... किंबहुना त्यांनी येऊ दिलं नाही..... ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 27-07-2010

    व्यासंग वाढवणाऱ्या साहित्यकृती… स्कॉट ग्रॅहॅम लिखित ‘शूट टू किल’ ही डॉ. देवदत्त केतकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी मारेकऱ्यांदरम्यान फुलणाऱ्या जगावेगळ्या प्रेमाची कहाणी आहे. स्कॉट ग्रॅहॅम एक कसलेल्या ’एसएएस’ (स्पेशल एअर सव्र्हिस) सैनिक होता. उत्तर आय्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळाले होते. ’आयआरए’ बरोबरच्या चकमकीत त्याने अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. मायरीड फॅरेल ही ‘आयआरए’ साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांतसुंदर तरुणी या दोघांचे जीवघेणे आणि भयानक असे गुपित असते. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत ते अनेक वर्षे एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहतात. ‘आयआरए’ च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि स्कॉट आणि मायरिडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. ’एसएएस’ च्या इतिहासातला तो एक वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचे आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचे चित्तथरारक सत्यकथन ‘शूट टू किल’ मधून घडते. हा अनुवाद आपल्याला वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more