* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHOOT TO KILL
  • Availability : Available
  • Translators : DEODATT KETKAR
  • ISBN : 9788184980707
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 140
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SCOTT GRAHAM WAS A FORMIDABLE SAS SOLDIER. HE WAS DECORATED FOR HIS HEROISM IN NORTHERN IRELAND AND THE FALKLANDS, AND HE FOUGHT GUM BATTLES IN WHICH MORE THAN A DOZEN IRA TERRORISTS WERE KILLED. MAIREAD FARRELL WAS PETITE, YOUNG, DARKLY BEAUTIFUL AND SHE PLANTED BOMBS FOR THE IRA. TOGETHER SHARED A DEADLY AND TERRIBLE SECRET. FOR YEARS THEY LOVED ONE ANOTHER WITH A RELENTLESS PASSION, AGAINST ALL THE TABOOS OF BOTH THEIR ARMIES. THEIR CLANDESTINE LOVE AFFAIR REACHED ITS CRESCENDO WITH THE SHOOTING OF THREE UNARMED IRA TERRORISTS ON THE ROCK OF GIBRALTAR, ONE OF THE MOST CONTROVERSIAL INCIDENTS IN THE HISTORY OF THE SAS. SHOOT TO KILL IS SCOTT GRAHAM`S TRUE STORY OF THIS EXTRAORDINARY ROMANCE, AND OF THE KILLINGS THAT SHOCKED THE WORLD.
संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.` - न्यूज ऑफ द वर्ल्ड स्कॉट ग्रहम एक कसलेला `एसएएस` (स्पेशल एअर सर्व्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. `आयआरए` बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही `आयआरए` साठी बॉंब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत अनेक वर्षं ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. `आयआरए`च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. `एसएएस`च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - `शूट टू किल.`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHOOTTOKILL #DEODATTAKETKAR #SCOTTGRAHAM
Customer Reviews
  • Rating StarPrasad Raut

    ७-८ वर्षांपूर्वी शूट टू किल वाचलं होतं..... काय माहित नाही.... पण तेव्हापासून स्कॉट ग्राहम आणि मायरीड फेरेलची लव्हस्टोरी ही माझी ऑल टाईम फेव्हरेट लव्हस्टोरी झाली..... कर्तव्य, जबाबदारी या दोन भावना माझ्यासाठी प्रेमापेक्षाही मोठ्या असल्याने असेल काचीत..... पण हिर-रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, रोमियो ज्युलिएट एक नंबरचे चुतीये वाटतात..... कोणी स्वतःच्या डोक्यात कुदळ घालून घेतोय तर कोणीतरी येडझव्यासारखं वाळवंटात भटकत राहतंय.... ही अशी चुतियागिरी अंगावरच नाही येत..... तर किळस येते त्यांची..... असो. तर आयरीश स्वातंत्र्ययोद्धा मायरीड फेरेल आणि ब्रिटनच्या एसएएस युनिटचा कमांडो स्कॉट ग्राहम यांची ही लव्हस्टोरी. दोघांच्या संघटना एकमेकांच्या हाडवैरी.... अशात या दोघांमध्ये प्रेम होतं.... फुलतं..... बहारतं...... मायरीडची IRA संघटना एका ठिकाणी बॉम्बस्फोट करायची जबाबदारी तिच्यावर देते.... आणि स्कॉटच्या खऱ्या रूपाबद्दल अनभिज्ञ असलेली मायरीड ही गोष्ट जेव्हा त्याला सांगते तेव्हा देशाचा एक सैनिक जे करेल तेच स्कॉट करतो..... मायरीड पकडली जाते.... दहा वर्ष तुरुंगवास भोगते.... त्यात भयानक हालअपेष्टा भोगते.... अठराव्या वर्षी तुरुंगात गेलेली अल्लड, संवेदनशील मायरीड अठ्ठाविसाव्या वर्षी बाहेर येते तेव्हा पूर्णपणे बदलून गेलेली असते..... बदलेलं नसतं ते तिचं स्कॉटवर असलेलं नितांत प्रेम..... त्यानंतर स्कॉट अनेकदा तिला तिथून बाहेर काढून अमेरिका किंवा युरोपमध्ये न्यायचा प्रयत्न करतो.... पण नियतीला ते मान्य नसतं.... कारण सटवाईने मायरीड आणि स्कॉटचं भविष्य आधीच लिहिलेलं असतं..... आणि तेच होतं..... रॉक ऑफ जिब्राल्टरमध्ये दोन दहशतवाद्यांची ओळख पटवायला स्कॉटला नेलं जातं... आणि तिथे तो ओळख कन्फर्म करताच त्याच्याच युनिटचे लोक त्या दोन दहशतवाद्याना गोळ्या घालून ठार मारतात.... त्यातली एक मायरीड होती..... मला ही स्टोरी आजही आवडते.... आणि पुढेही कायम माझी फेव्हरेट लव्हस्टोरी असेल.... कारण दोघांनीही आपलं प्रेम आपल्या कर्तव्याआड येऊ दिलं नाही..... IRA ची स्वातंत्र्ययोद्धा म्हणून मायरीड आपलं कर्तव्य करत होती आणि ब्रिटनचा SAS कमांडो आपलं कर्तव्य बजावत राहिला..... त्यांचं प्रेम त्यांच्या कर्तव्याच्या आड आलं नाही.... किंबहुना त्यांनी येऊ दिलं नाही..... ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 27-07-2010

    व्यासंग वाढवणाऱ्या साहित्यकृती… स्कॉट ग्रॅहॅम लिखित ‘शूट टू किल’ ही डॉ. देवदत्त केतकर यांनी अनुवाद केलेली कादंबरी मारेकऱ्यांदरम्यान फुलणाऱ्या जगावेगळ्या प्रेमाची कहाणी आहे. स्कॉट ग्रॅहॅम एक कसलेल्या ’एसएएस’ (स्पेशल एअर सव्र्हिस) सैनिक होता. उत्तर आय्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळाले होते. ’आयआरए’ बरोबरच्या चकमकीत त्याने अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. मायरीड फॅरेल ही ‘आयआरए’ साठी बाँब पेरणारी एक लहानखुरी पण नितांतसुंदर तरुणी या दोघांचे जीवघेणे आणि भयानक असे गुपित असते. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत ते अनेक वर्षे एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहतात. ‘आयआरए’ च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि स्कॉट आणि मायरिडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. ’एसएएस’ च्या इतिहासातला तो एक वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रॅहॅमच्या असाधारण प्रेमाचे आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचे चित्तथरारक सत्यकथन ‘शूट टू किल’ मधून घडते. हा अनुवाद आपल्याला वेगळ्या विश्वाची सफर घडवतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
हेमंत कान्हे, अमरावती.

जी.बी.देशमुख ह्यांच्याद्वारे लिखित `दुर्दम्य` हे पुस्तक सत्य घटनांवर प्रस्तुत केलं गेलं असून, मनोगत तसेच संपूर्ण पुस्तक वाचतांना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. लेखकाच्या लेखनक्षमते विषयी लिहावं तेवढं कमीच आहे. लेखकासह्या साहित्य कृतीकरीता मनापासून सॅल्युट. ...Read more

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more