* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NEVER ASK FOR A PARDON
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9788184989915
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PANDURANG KHANKHOJE REALIZED EARLY THAT LIFE UNDER THE BRITISH YOKE WAS NOT FOR HIM. THE THEN RULERS OF INDIA WERE EQUALLY QUICK TO GRASP THE FACT THAT THE YOUNG MAN SPELT TROUBLE FOR THE AUTHORITIES, AND CAST A DRAGNET FOR HIM WHICH COMPELLED KHANKHOJE TO FLEE ABROAD. THE ANGRY YOUNG MAN TRAINED IN THE MAKING OF EXPLOSIVES AND IN WARFARE, AND ROAMED THE GLOBE LOOKING FOR LIKE-MINDED PEOPLE WHO EQUALLED HIM IN THEIR DESIRE TO END BRITISH DOMINANCE. HE BECAME A FOUNDER - MEMBER OF THE RADICAL GHADAR PARTY IN AMERICA WHICH WORKED UNRELENTINGLY TOWARDS GATHERING FOLLOWERS SYMPATHETIC TO ITS CAUSE. KHANKHOJE’S COMMITMENT TOOK HIM TO SEVERAL COUNTRIES—JAPAN, AMERICA, PERSIA, GERMANY AND RUSSIA—ALWAYS ON THE RUN, BEFORE HE FOUND SAFETY IN MEXICO, A COUNTRY THAT STRUCK HIM AS BEING ODDLY LIKE HIS OWN. HERE, THE REVOLUTIONARY MARRIED, HAD A FAMILY AND TURNED HIS ENERGIES TO AGRICULTURE, GOING ON TO BECOME AN INTERNATIONAL AUTHORITY ON HIGH-YIELDING FOOD CROPS, ESPECIALLY A NEW VARIETY OF CORN. BUT ALL THE WHILE, HIS HEART WAS SET ON RETURNING TO HIS HOMELAND. IT WAS FORTY YEARS BEFORE HE WAS ABLE TO RETURN TO HIS COUNTRY, BUT HE DID SEE INDIA AGAIN, AND HE SAW HER GAIN HER FREEDOM BEFORE HE DIED. IN I SHALL NEVER ASK FOR PARDON, KHANKHOJE’S DAUGHTER, SAVITRI SAWHNEY, DIPS INTO HIS DIARIES TO RESURRECT THE VOICE OF A HITHERTO SILENT HERO OF INDIA’S STRUGGLE FOR FREEDOM.
ब्रिटिशांच्या जोखडाखालचे आयुष्य; हे आपले आयुष्य नव्हे, याची जाणीव पांडुरंग खानखोजेंना लवकरच झाली. अर्थात त्यावेळचे भारताचे शासनकर्तेही तितकेच सावध होते. हा तरुण आपल्याला त्रासदायक ठरणार, आपल्या एकहाती, अनिर्बंध सत्तेला विरोध करणार, हे त्यांच्या लक्षात आले होते. स्वत:मधील दाहक क्षात्रतेजाचा शोध घेतच खानखोजेंनी देश सोडला आणि नजरे समोरचे स्वतंत्रमातृभूमीचे स्वप्न क्षणभरही नजरेआड होऊ न देता, हा स्वाभिमानी राष्ट्रभक्त देशोदेशी, खंडा-खंडांतून हिंडला. स्फोटके बनविणे आणि युद्धशास्त्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर, अन्यब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न पाहणा आपल्यासारख्याच सहकार्यांच्या शोधात खानखोजे जगभर हिंडले. अमेरिकेमध्ये त्यांनी अभिनव अशा ’गदरपार्टी’ची स्थापना केली. त्यातल्या बऱ्याच सभासदांनानंतर ब्रिटिशांनी फासावर चढविले. परंतु मनमात्र सदासर्वकाळ मातृभूमीकडे ओढ घेत होते. काहीही करून खानखोजेंना भारतात परत यायचेच होते. ही गोष्ट घडायला तब्बल चाळीस वर्षांचा कालावधी जावा लागला खरा; परंतु ते भारतात परत आलेच!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKADHIHIMAFIMAGNARNAHI #ISHALLNEVERASKFORPARDON #मीकधीहीमाफीमागणारनाही #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #SAVITRISAWHNEY "
Customer Reviews
  • Rating StarLoksatta Chaturang 17th Sept.2017

    भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी त्यात अनेक व्यक्ती, अनेक गट, अनेक चळवळी, घटना अशा आहेत ज्याच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. अनेक जणांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. आि त्यामुळे त्यातल्या ब-याच जणांची नावेही कुणाला माहित नाहीत. अर्थात याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असा नाही. पडद्याआड राहिलेल्या अशाच एका चळवळीवर आणि स्वातंत्र्यसैनिकावर ‘मी कधीही माफी मागणार नाही’ या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन’ या सावित्री साव्हनी यांच्या पुस्तकाचा अवंती महाजन यांनी केलेला हा अनुवाद आहे. शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात ‘गदर पार्टी’बद्दल वाचल्याचे आठवते. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात ‘कामा गाटा मारू’ या जहाजाबद्दलही काही एक उल्लेख होता. मात्र, त्यामागचा इतिहास ख-या अर्थाने उलगडला गेला आहे तो या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र आहे. पुस्तकाच्या मूळ लेखिका सावित्री यांचे ते वडील. मात्र खानखोजे यांचे सगळे आयुष्यच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहिलेले असल्याने त्यांच्या या लढ्याचा इतिहासच त्यांचे चरित्र बनून आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे आला आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या एका तरुण मुलाची ही कथा आहे. क्रांती हाच त्याचा ध्यास होता. वध्र्याजवळच्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा. घरातल्या परंपरागत, जुन्या चालीरीतीत वाढलेला हा मुलगा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा साक्षीदार बनतो आणि त्याचे निधर्मी विचारसणीच्या, ‘मानवता हीच सगळ्यात श्रेष्ठ’ असे मानणा-या व्यक्तीत रूपांतर होते, त्याचीसुद्धा ही कथा आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या खानखोजेंनी लहानपणी केलेल्या काही उपद्व्यांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. घरच्यांचा त्यांच्या कामाला विरोध होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवायचे तर लष्करी शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी परदेशात जावे लागले तरी चालेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि १९०६ साली एक दिवस बोटीत बसून त्यांनी जपान गाठले. तिथून काही दिवसांनी ते अमेरिकेला पोहोचले. जिथे जाऊ तिथे समानधर्मी लोक (मग ते कुठल्याही देशाचे असोत!) शोधायची त्यांची धडपड चालू होती. या काळात उदरनिर्वाहासाठी शेतात काम, रुग्णालयात साफसफाई इथपासून अनेक कामे त्यांनी केली. यादरम्यान सॅनफ्रान्सिस्कोच्या लष्करी अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे ओरेगॉनमधून शेतकी पदवीही घेतली. स्वातंत्र्योत्तर भारताला शेतीसंंबंधी नवी दृष्टी देण्यासाठी आपल्या या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले होते. याचदरम्यान, पंडित काशीराम, बिशनदास कोचर, लाला हररदयाळ, सोहनसिंग अशा काही जणांशी त्यांची मैत्री जमली. डॉ. सन यत् सेन, लेनिन यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी झाल्या. अमेरिकेत भारतीयांसाठी काम करणा-या ज्या अनेक छोट्या संस्था होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून ‘गदर पार्टी’ सुरू झाली. तिच्या ‘प्रहारक’ विभागाचे खानखोजे हे प्रमुख होते. इतरांना लष्करी प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. भारताबाहेर राहून भारतासाठी चळवळ करणारी ‘गदर’ ही पहिलीच संस्था होती. भारतात यादवी युद्ध सुरू करून ब्रिटिश सरकारला रंजीस आणण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार निरनिराळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते भारतात जायला निघाले. स्वतः खानखोजेंनी जर्मनी, अमेरिका, पर्शिया, अफगाणिस्तान अशा मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यावर जिवावरचे काही प्रसंगही ओढवले. परंतु त्यांची ही योजना सफल झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संपर्काचा अभाव, खोली नसलेल्या योजना आणि तर्वâशुद्धतेच्या अभावाची विचारसरणी! विखुरलेल्या स्वरूपात काम करून अशा मोठ्या मोहिमेत यश मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरी या चळवळीतील प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रचंड धडपडीनंतरही यश न आल्याने असेल, पण खानखोजेंचा चळवळीतील सन १९२४ च्या सुमारास संपला. त्यानंतर त्यांनी मेक्सिकोत राहून शेती केली. मक्याच्या नवीन जातींवर संशोधन केले. मोफत शेतकी शाळा काढल्या. नंतर ते भारतात स्थानिक झाले. पण ना त्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे स्वप्न साकार झाले. ना देशाला शेतीत स्वयंपूर्ण बनवायचे! त्यादृष्टीने त्यांची शोकांतिकाच झाली असे म्हणावे लागेल. या पुस्तकाने एका अप्रकाशित, दुर्लक्षित कामावर, त्या कालखंडावर प्रकाश टाकला आहे. इतक्या जुन्या कालखंडाची तपशिलात माहिती जमवणे हे तसे जिकिरीचेच काम. ते सावित्री साव्हनी यांनी चिकाटीने पार पाडले आहे. खानखोजे हे मध्यमवर्गीय, साध्या कुटुंबातून आलेले. परंतु किरकोळ व्यक्तिमत्त्वाच्या या माणसाने आयुष्यभर एका ध्यासापोटी जे काम केले, प्रचंड कष्ट उपसले, अफाट भ्रमंती केली, ते वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. हा सगळाच प्रवास रोमहर्षक आहे. पण पुस्तकात तो तितकासा उतरलेला नाही. घटना, नावे, ठिकाणे, कालखंड या सगळ्यांची जंत्री लांबलचक झाली आहे. नावे द्यायला हवीत ते खरे असले तरी संख्येमुळे ती लक्षात राहात नाहीत. त्यांचे संदर्भ लागणे कठीण होते. गर्दीमुळे मुख्य क्रांतिकारकांची व्यक्तिमत्त्वेही डोळ्यांसमोर उभी राहत नाहीत. खुद्द खानखोजेंच्या बाबतीतही हे झाले आहे. नेरिझजवळची त्यांची सुटका लेनिन यांच्या प्रभावामुळे त्यांचे ‘लेनिनित’ होणे असे उल्लेखनीय प्रसंग फार थोडे आहेत. अर्थात असे असले तरीही हे एका मोठ्या आणि दुर्लक्षित कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. हे पुस्तक म्हणजे पांडुरंग खानखोजे या व्यक्तीचे चरित्र असले तरी तो गदर पार्टीचा आणि बहुतेकांना अज्ञात असलेला भारताचा इतिहास आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 19-6-2016

    स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील ‘गदर’ चळवळीतीची कथा आणि या चळवळीतील क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे हे चरित्र आहे. ब्रिटिशांचा रोष ओढवून घेतल्यामुळे १९०६मध्ये खानखोजे यांनी भारत सोडला. गदर चळवळीची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जपान, अमेरिका,पर्शिया, रशिया असा प्रदिर्घ प्रवास केला. १९१४मध्ये त्यांना मेक्सिकोने आश्रय दिला. तिथे ते शेतीशास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आले. स्वातंत्र्यानंतर भारताचे शेतीधोरण आखण्याच्या समितीत त्यांना स्थान मिळाले. १९५५मध्ये ते कायमचे भारतात परतले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more