* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NEVER ASK FOR A PARDON
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9788184989915
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PANDURANG KHANKHOJE REALIZED EARLY THAT LIFE UNDER THE BRITISH YOKE WAS NOT FOR HIM. THE THEN RULERS OF INDIA WERE EQUALLY QUICK TO GRASP THE FACT THAT THE YOUNG MAN SPELT TROUBLE FOR THE AUTHORITIES, AND CAST A DRAGNET FOR HIM WHICH COMPELLED KHANKHOJE TO FLEE ABROAD. THE ANGRY YOUNG MAN TRAINED IN THE MAKING OF EXPLOSIVES AND IN WARFARE, AND ROAMED THE GLOBE LOOKING FOR LIKE-MINDED PEOPLE WHO EQUALLED HIM IN THEIR DESIRE TO END BRITISH DOMINANCE. HE BECAME A FOUNDER - MEMBER OF THE RADICAL GHADAR PARTY IN AMERICA WHICH WORKED UNRELENTINGLY TOWARDS GATHERING FOLLOWERS SYMPATHETIC TO ITS CAUSE. KHANKHOJE’S COMMITMENT TOOK HIM TO SEVERAL COUNTRIES—JAPAN, AMERICA, PERSIA, GERMANY AND RUSSIA—ALWAYS ON THE RUN, BEFORE HE FOUND SAFETY IN MEXICO, A COUNTRY THAT STRUCK HIM AS BEING ODDLY LIKE HIS OWN. HERE, THE REVOLUTIONARY MARRIED, HAD A FAMILY AND TURNED HIS ENERGIES TO AGRICULTURE, GOING ON TO BECOME AN INTERNATIONAL AUTHORITY ON HIGH-YIELDING FOOD CROPS, ESPECIALLY A NEW VARIETY OF CORN. BUT ALL THE WHILE, HIS HEART WAS SET ON RETURNING TO HIS HOMELAND. IT WAS FORTY YEARS BEFORE HE WAS ABLE TO RETURN TO HIS COUNTRY, BUT HE DID SEE INDIA AGAIN, AND HE SAW HER GAIN HER FREEDOM BEFORE HE DIED. IN I SHALL NEVER ASK FOR PARDON, KHANKHOJE’S DAUGHTER, SAVITRI SAWHNEY, DIPS INTO HIS DIARIES TO RESURRECT THE VOICE OF A HITHERTO SILENT HERO OF INDIA’S STRUGGLE FOR FREEDOM.
ब्रिटिशांच्या जोखडाखालचे आयुष्य; हे आपले आयुष्य नव्हे, याची जाणीव पांडुरंग खानखोजेंना लवकरच झाली. अर्थात त्यावेळचे भारताचे शासनकर्तेही तितकेच सावध होते. हा तरुण आपल्याला त्रासदायक ठरणार, आपल्या एकहाती, अनिर्बंध सत्तेला विरोध करणार, हे त्यांच्या लक्षात आले होते. स्वत:मधील दाहक क्षात्रतेजाचा शोध घेतच खानखोजेंनी देश सोडला आणि नजरे समोरचे स्वतंत्रमातृभूमीचे स्वप्न क्षणभरही नजरेआड होऊ न देता, हा स्वाभिमानी राष्ट्रभक्त देशोदेशी, खंडा-खंडांतून हिंडला. स्फोटके बनविणे आणि युद्धशास्त्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर, अन्यब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न पाहणा आपल्यासारख्याच सहकार्यांच्या शोधात खानखोजे जगभर हिंडले. अमेरिकेमध्ये त्यांनी अभिनव अशा ’गदरपार्टी’ची स्थापना केली. त्यातल्या बऱ्याच सभासदांनानंतर ब्रिटिशांनी फासावर चढविले. परंतु मनमात्र सदासर्वकाळ मातृभूमीकडे ओढ घेत होते. काहीही करून खानखोजेंना भारतात परत यायचेच होते. ही गोष्ट घडायला तब्बल चाळीस वर्षांचा कालावधी जावा लागला खरा; परंतु ते भारतात परत आलेच!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKADHIHIMAFIMAGNARNAHI #ISHALLNEVERASKFORPARDON #मीकधीहीमाफीमागणारनाही #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #SAVITRISAWHNEY "
Customer Reviews
  • Rating StarLoksatta Chaturang 17th Sept.2017

    भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी त्यात अनेक व्यक्ती, अनेक गट, अनेक चळवळी, घटना अशा आहेत ज्याच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. अनेक जणांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. आि त्यामुळे त्यातल्या ब-याच जणांची नावेही कुणाला माहित नाहीत. अर्थात याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असा नाही. पडद्याआड राहिलेल्या अशाच एका चळवळीवर आणि स्वातंत्र्यसैनिकावर ‘मी कधीही माफी मागणार नाही’ या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन’ या सावित्री साव्हनी यांच्या पुस्तकाचा अवंती महाजन यांनी केलेला हा अनुवाद आहे. शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात ‘गदर पार्टी’बद्दल वाचल्याचे आठवते. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात ‘कामा गाटा मारू’ या जहाजाबद्दलही काही एक उल्लेख होता. मात्र, त्यामागचा इतिहास ख-या अर्थाने उलगडला गेला आहे तो या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र आहे. पुस्तकाच्या मूळ लेखिका सावित्री यांचे ते वडील. मात्र खानखोजे यांचे सगळे आयुष्यच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहिलेले असल्याने त्यांच्या या लढ्याचा इतिहासच त्यांचे चरित्र बनून आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे आला आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या एका तरुण मुलाची ही कथा आहे. क्रांती हाच त्याचा ध्यास होता. वध्र्याजवळच्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा. घरातल्या परंपरागत, जुन्या चालीरीतीत वाढलेला हा मुलगा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा साक्षीदार बनतो आणि त्याचे निधर्मी विचारसणीच्या, ‘मानवता हीच सगळ्यात श्रेष्ठ’ असे मानणा-या व्यक्तीत रूपांतर होते, त्याचीसुद्धा ही कथा आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या खानखोजेंनी लहानपणी केलेल्या काही उपद्व्यांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. घरच्यांचा त्यांच्या कामाला विरोध होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवायचे तर लष्करी शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी परदेशात जावे लागले तरी चालेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि १९०६ साली एक दिवस बोटीत बसून त्यांनी जपान गाठले. तिथून काही दिवसांनी ते अमेरिकेला पोहोचले. जिथे जाऊ तिथे समानधर्मी लोक (मग ते कुठल्याही देशाचे असोत!) शोधायची त्यांची धडपड चालू होती. या काळात उदरनिर्वाहासाठी शेतात काम, रुग्णालयात साफसफाई इथपासून अनेक कामे त्यांनी केली. यादरम्यान सॅनफ्रान्सिस्कोच्या लष्करी अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे ओरेगॉनमधून शेतकी पदवीही घेतली. स्वातंत्र्योत्तर भारताला शेतीसंंबंधी नवी दृष्टी देण्यासाठी आपल्या या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले होते. याचदरम्यान, पंडित काशीराम, बिशनदास कोचर, लाला हररदयाळ, सोहनसिंग अशा काही जणांशी त्यांची मैत्री जमली. डॉ. सन यत् सेन, लेनिन यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी झाल्या. अमेरिकेत भारतीयांसाठी काम करणा-या ज्या अनेक छोट्या संस्था होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून ‘गदर पार्टी’ सुरू झाली. तिच्या ‘प्रहारक’ विभागाचे खानखोजे हे प्रमुख होते. इतरांना लष्करी प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. भारताबाहेर राहून भारतासाठी चळवळ करणारी ‘गदर’ ही पहिलीच संस्था होती. भारतात यादवी युद्ध सुरू करून ब्रिटिश सरकारला रंजीस आणण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार निरनिराळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते भारतात जायला निघाले. स्वतः खानखोजेंनी जर्मनी, अमेरिका, पर्शिया, अफगाणिस्तान अशा मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यावर जिवावरचे काही प्रसंगही ओढवले. परंतु त्यांची ही योजना सफल झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संपर्काचा अभाव, खोली नसलेल्या योजना आणि तर्वâशुद्धतेच्या अभावाची विचारसरणी! विखुरलेल्या स्वरूपात काम करून अशा मोठ्या मोहिमेत यश मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरी या चळवळीतील प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रचंड धडपडीनंतरही यश न आल्याने असेल, पण खानखोजेंचा चळवळीतील सन १९२४ च्या सुमारास संपला. त्यानंतर त्यांनी मेक्सिकोत राहून शेती केली. मक्याच्या नवीन जातींवर संशोधन केले. मोफत शेतकी शाळा काढल्या. नंतर ते भारतात स्थानिक झाले. पण ना त्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे स्वप्न साकार झाले. ना देशाला शेतीत स्वयंपूर्ण बनवायचे! त्यादृष्टीने त्यांची शोकांतिकाच झाली असे म्हणावे लागेल. या पुस्तकाने एका अप्रकाशित, दुर्लक्षित कामावर, त्या कालखंडावर प्रकाश टाकला आहे. इतक्या जुन्या कालखंडाची तपशिलात माहिती जमवणे हे तसे जिकिरीचेच काम. ते सावित्री साव्हनी यांनी चिकाटीने पार पाडले आहे. खानखोजे हे मध्यमवर्गीय, साध्या कुटुंबातून आलेले. परंतु किरकोळ व्यक्तिमत्त्वाच्या या माणसाने आयुष्यभर एका ध्यासापोटी जे काम केले, प्रचंड कष्ट उपसले, अफाट भ्रमंती केली, ते वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. हा सगळाच प्रवास रोमहर्षक आहे. पण पुस्तकात तो तितकासा उतरलेला नाही. घटना, नावे, ठिकाणे, कालखंड या सगळ्यांची जंत्री लांबलचक झाली आहे. नावे द्यायला हवीत ते खरे असले तरी संख्येमुळे ती लक्षात राहात नाहीत. त्यांचे संदर्भ लागणे कठीण होते. गर्दीमुळे मुख्य क्रांतिकारकांची व्यक्तिमत्त्वेही डोळ्यांसमोर उभी राहत नाहीत. खुद्द खानखोजेंच्या बाबतीतही हे झाले आहे. नेरिझजवळची त्यांची सुटका लेनिन यांच्या प्रभावामुळे त्यांचे ‘लेनिनित’ होणे असे उल्लेखनीय प्रसंग फार थोडे आहेत. अर्थात असे असले तरीही हे एका मोठ्या आणि दुर्लक्षित कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. हे पुस्तक म्हणजे पांडुरंग खानखोजे या व्यक्तीचे चरित्र असले तरी तो गदर पार्टीचा आणि बहुतेकांना अज्ञात असलेला भारताचा इतिहास आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 19-6-2016

    स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील ‘गदर’ चळवळीतीची कथा आणि या चळवळीतील क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे हे चरित्र आहे. ब्रिटिशांचा रोष ओढवून घेतल्यामुळे १९०६मध्ये खानखोजे यांनी भारत सोडला. गदर चळवळीची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जपान, अमेरिका,पर्शिया, रशिया असा प्रदिर्घ प्रवास केला. १९१४मध्ये त्यांना मेक्सिकोने आश्रय दिला. तिथे ते शेतीशास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आले. स्वातंत्र्यानंतर भारताचे शेतीधोरण आखण्याच्या समितीत त्यांना स्थान मिळाले. १९५५मध्ये ते कायमचे भारतात परतले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more