* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I SHALL NEVER ASK FOR A PARDON
  • Availability : Available
  • Translators : AVANTI MAHAJAN
  • ISBN : 9788184989915
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 332
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PANDURANG KHANKHOJE REALIZED EARLY THAT LIFE UNDER THE BRITISH YOKE WAS NOT FOR HIM. THE THEN RULERS OF INDIA WERE EQUALLY QUICK TO GRASP THE FACT THAT THE YOUNG MAN SPELT TROUBLE FOR THE AUTHORITIES, AND CAST A DRAGNET FOR HIM WHICH COMPELLED KHANKHOJE TO FLEE ABROAD. THE ANGRY YOUNG MAN TRAINED IN THE MAKING OF EXPLOSIVES AND IN WARFARE, AND ROAMED THE GLOBE LOOKING FOR LIKE-MINDED PEOPLE WHO EQUALLED HIM IN THEIR DESIRE TO END BRITISH DOMINANCE. HE BECAME A FOUNDER - MEMBER OF THE RADICAL GHADAR PARTY IN AMERICA WHICH WORKED UNRELENTINGLY TOWARDS GATHERING FOLLOWERS SYMPATHETIC TO ITS CAUSE. KHANKHOJE’S COMMITMENT TOOK HIM TO SEVERAL COUNTRIES—JAPAN, AMERICA, PERSIA, GERMANY AND RUSSIA—ALWAYS ON THE RUN, BEFORE HE FOUND SAFETY IN MEXICO, A COUNTRY THAT STRUCK HIM AS BEING ODDLY LIKE HIS OWN. HERE, THE REVOLUTIONARY MARRIED, HAD A FAMILY AND TURNED HIS ENERGIES TO AGRICULTURE, GOING ON TO BECOME AN INTERNATIONAL AUTHORITY ON HIGH-YIELDING FOOD CROPS, ESPECIALLY A NEW VARIETY OF CORN. BUT ALL THE WHILE, HIS HEART WAS SET ON RETURNING TO HIS HOMELAND. IT WAS FORTY YEARS BEFORE HE WAS ABLE TO RETURN TO HIS COUNTRY, BUT HE DID SEE INDIA AGAIN, AND HE SAW HER GAIN HER FREEDOM BEFORE HE DIED. IN I SHALL NEVER ASK FOR PARDON, KHANKHOJE’S DAUGHTER, SAVITRI SAWHNEY, DIPS INTO HIS DIARIES TO RESURRECT THE VOICE OF A HITHERTO SILENT HERO OF INDIA’S STRUGGLE FOR FREEDOM.
ब्रिटिशांच्या जोखडाखालचे आयुष्य; हे आपले आयुष्य नव्हे, याची जाणीव पांडुरंग खानखोजेंना लवकरच झाली. अर्थात त्यावेळचे भारताचे शासनकर्तेही तितकेच सावध होते. हा तरुण आपल्याला त्रासदायक ठरणार, आपल्या एकहाती, अनिर्बंध सत्तेला विरोध करणार, हे त्यांच्या लक्षात आले होते. स्वत:मधील दाहक क्षात्रतेजाचा शोध घेतच खानखोजेंनी देश सोडला आणि नजरे समोरचे स्वतंत्रमातृभूमीचे स्वप्न क्षणभरही नजरेआड होऊ न देता, हा स्वाभिमानी राष्ट्रभक्त देशोदेशी, खंडा-खंडांतून हिंडला. स्फोटके बनविणे आणि युद्धशास्त्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर, अन्यब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न पाहणा आपल्यासारख्याच सहकार्यांच्या शोधात खानखोजे जगभर हिंडले. अमेरिकेमध्ये त्यांनी अभिनव अशा ’गदरपार्टी’ची स्थापना केली. त्यातल्या बऱ्याच सभासदांनानंतर ब्रिटिशांनी फासावर चढविले. परंतु मनमात्र सदासर्वकाळ मातृभूमीकडे ओढ घेत होते. काहीही करून खानखोजेंना भारतात परत यायचेच होते. ही गोष्ट घडायला तब्बल चाळीस वर्षांचा कालावधी जावा लागला खरा; परंतु ते भारतात परत आलेच!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MIKADHIHIMAFIMAGNARNAHI #ISHALLNEVERASKFORPARDON #मीकधीहीमाफीमागणारनाही #BIOGRAPHY&TRUESTORIES #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AVANTIMAHAJAN #SAVITRISAWHNEY "
Customer Reviews
  • Rating StarLoksatta Chaturang 17th Sept.2017

    भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आपल्याला माहीत असला तरी त्यात अनेक व्यक्ती, अनेक गट, अनेक चळवळी, घटना अशा आहेत ज्याच्यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. अनेक जणांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना त्यात फारसे यश मिळाले नाही. आि त्यामुळे त्यातल्या ब-याच जणांची नावेही कुणाला माहित नाहीत. अर्थात याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी होते असा नाही. पडद्याआड राहिलेल्या अशाच एका चळवळीवर आणि स्वातंत्र्यसैनिकावर ‘मी कधीही माफी मागणार नाही’ या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘आय शॅल नेव्हर आस्क फॉर पार्डन’ या सावित्री साव्हनी यांच्या पुस्तकाचा अवंती महाजन यांनी केलेला हा अनुवाद आहे. शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात ‘गदर पार्टी’बद्दल वाचल्याचे आठवते. पहिल्या महायुद्धाच्या इतिहासात ‘कामा गाटा मारू’ या जहाजाबद्दलही काही एक उल्लेख होता. मात्र, त्यामागचा इतिहास ख-या अर्थाने उलगडला गेला आहे तो या पुस्तकात. हे पुस्तक म्हणजे खरे तर क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र आहे. पुस्तकाच्या मूळ लेखिका सावित्री यांचे ते वडील. मात्र खानखोजे यांचे सगळे आयुष्यच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहिलेले असल्याने त्यांच्या या लढ्याचा इतिहासच त्यांचे चरित्र बनून आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे आला आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेल्या एका तरुण मुलाची ही कथा आहे. क्रांती हाच त्याचा ध्यास होता. वध्र्याजवळच्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा. घरातल्या परंपरागत, जुन्या चालीरीतीत वाढलेला हा मुलगा पुढे अनेक आंतरराष्ट्रीय घटनांचा साक्षीदार बनतो आणि त्याचे निधर्मी विचारसणीच्या, ‘मानवता हीच सगळ्यात श्रेष्ठ’ असे मानणा-या व्यक्तीत रूपांतर होते, त्याचीसुद्धा ही कथा आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या खानखोजेंनी लहानपणी केलेल्या काही उपद्व्यांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. घरच्यांचा त्यांच्या कामाला विरोध होता. त्यावेळी स्वातंत्र्य मिळवायचे तर लष्करी शिक्षण घेतले पाहिजे, त्यासाठी परदेशात जावे लागले तरी चालेल असे त्यांच्या मनाने घेतले आणि १९०६ साली एक दिवस बोटीत बसून त्यांनी जपान गाठले. तिथून काही दिवसांनी ते अमेरिकेला पोहोचले. जिथे जाऊ तिथे समानधर्मी लोक (मग ते कुठल्याही देशाचे असोत!) शोधायची त्यांची धडपड चालू होती. या काळात उदरनिर्वाहासाठी शेतात काम, रुग्णालयात साफसफाई इथपासून अनेक कामे त्यांनी केली. यादरम्यान सॅनफ्रान्सिस्कोच्या लष्करी अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. पुढे ओरेगॉनमधून शेतकी पदवीही घेतली. स्वातंत्र्योत्तर भारताला शेतीसंंबंधी नवी दृष्टी देण्यासाठी आपल्या या शिक्षणाचा उपयोग होईल म्हणून त्यांनी हे शिक्षण घेतले होते. याचदरम्यान, पंडित काशीराम, बिशनदास कोचर, लाला हररदयाळ, सोहनसिंग अशा काही जणांशी त्यांची मैत्री जमली. डॉ. सन यत् सेन, लेनिन यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटी झाल्या. अमेरिकेत भारतीयांसाठी काम करणा-या ज्या अनेक छोट्या संस्था होत्या त्यांच्या एकत्रीकरणातून ‘गदर पार्टी’ सुरू झाली. तिच्या ‘प्रहारक’ विभागाचे खानखोजे हे प्रमुख होते. इतरांना लष्करी प्रशिक्षण देणे हे त्यांचे मुख्य काम. भारताबाहेर राहून भारतासाठी चळवळ करणारी ‘गदर’ ही पहिलीच संस्था होती. भारतात यादवी युद्ध सुरू करून ब्रिटिश सरकारला रंजीस आणण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार निरनिराळ्या ठिकाणांहून कार्यकर्ते भारतात जायला निघाले. स्वतः खानखोजेंनी जर्मनी, अमेरिका, पर्शिया, अफगाणिस्तान अशा मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यावर जिवावरचे काही प्रसंगही ओढवले. परंतु त्यांची ही योजना सफल झाली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे संपर्काचा अभाव, खोली नसलेल्या योजना आणि तर्वâशुद्धतेच्या अभावाची विचारसरणी! विखुरलेल्या स्वरूपात काम करून अशा मोठ्या मोहिमेत यश मिळणे शक्यच नव्हते. असे असले तरी या चळवळीतील प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. प्रचंड धडपडीनंतरही यश न आल्याने असेल, पण खानखोजेंचा चळवळीतील सन १९२४ च्या सुमारास संपला. त्यानंतर त्यांनी मेक्सिकोत राहून शेती केली. मक्याच्या नवीन जातींवर संशोधन केले. मोफत शेतकी शाळा काढल्या. नंतर ते भारतात स्थानिक झाले. पण ना त्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे स्वप्न साकार झाले. ना देशाला शेतीत स्वयंपूर्ण बनवायचे! त्यादृष्टीने त्यांची शोकांतिकाच झाली असे म्हणावे लागेल. या पुस्तकाने एका अप्रकाशित, दुर्लक्षित कामावर, त्या कालखंडावर प्रकाश टाकला आहे. इतक्या जुन्या कालखंडाची तपशिलात माहिती जमवणे हे तसे जिकिरीचेच काम. ते सावित्री साव्हनी यांनी चिकाटीने पार पाडले आहे. खानखोजे हे मध्यमवर्गीय, साध्या कुटुंबातून आलेले. परंतु किरकोळ व्यक्तिमत्त्वाच्या या माणसाने आयुष्यभर एका ध्यासापोटी जे काम केले, प्रचंड कष्ट उपसले, अफाट भ्रमंती केली, ते वाचून आश्चर्यचकित व्हायला होते. हा सगळाच प्रवास रोमहर्षक आहे. पण पुस्तकात तो तितकासा उतरलेला नाही. घटना, नावे, ठिकाणे, कालखंड या सगळ्यांची जंत्री लांबलचक झाली आहे. नावे द्यायला हवीत ते खरे असले तरी संख्येमुळे ती लक्षात राहात नाहीत. त्यांचे संदर्भ लागणे कठीण होते. गर्दीमुळे मुख्य क्रांतिकारकांची व्यक्तिमत्त्वेही डोळ्यांसमोर उभी राहत नाहीत. खुद्द खानखोजेंच्या बाबतीतही हे झाले आहे. नेरिझजवळची त्यांची सुटका लेनिन यांच्या प्रभावामुळे त्यांचे ‘लेनिनित’ होणे असे उल्लेखनीय प्रसंग फार थोडे आहेत. अर्थात असे असले तरीही हे एका मोठ्या आणि दुर्लक्षित कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व नाकारून चालणार नाही. हे पुस्तक म्हणजे पांडुरंग खानखोजे या व्यक्तीचे चरित्र असले तरी तो गदर पार्टीचा आणि बहुतेकांना अज्ञात असलेला भारताचा इतिहास आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 19-6-2016

    स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील ‘गदर’ चळवळीतीची कथा आणि या चळवळीतील क्रांतिकारक पांडुरंग खानखोजे यांचे हे चरित्र आहे. ब्रिटिशांचा रोष ओढवून घेतल्यामुळे १९०६मध्ये खानखोजे यांनी भारत सोडला. गदर चळवळीची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. जपान, अमेरिका,पर्शिया, रशिया असा प्रदिर्घ प्रवास केला. १९१४मध्ये त्यांना मेक्सिकोने आश्रय दिला. तिथे ते शेतीशास्त्रज्ञ म्हणून नावारुपाला आले. स्वातंत्र्यानंतर भारताचे शेतीधोरण आखण्याच्या समितीत त्यांना स्थान मिळाले. १९५५मध्ये ते कायमचे भारतात परतले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more