ANNA POLITKOVSKAYA

About Author

Birth Date : 30/08/1958
Death Date : 07/10/2006


ANNA STEPANOVNA POLITKOVSKAYA WAS A RUSSIAN JOURNALIST AND HUMAN RIGHTS ACTIVIST, WHO REPORTED ON POLITICAL EVENTS IN RUSSIA, IN PARTICULAR, THE SECOND CHECHEN WAR. IT WAS HER REPORTING FROM CHECHNYA THAT MADE POLITKOVSKAYAS NATIONAL AND INTERNATIONAL REPUTATION.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जन्मलेली अ‍ॅना मॉस्को शहरात लहानाची मोठी झाली. तिचं मूळ नाव होतं अ‍ॅना स्टेपानोवना माझेप्पा. मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीतून तिने १९८०मध्ये पत्रकारितेतील पदवी मिळवली. तिचा पती अलेक्झांडर पोलितकोवस्क्या क्झग्लायड या कार्यक्रमाचा वृत्तसंपादक होता. वेरा आणि लिया ही त्यांची दोन अपत्यं. पत्रकारितेतील तिचं योगदान आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांनी दखल घेण्याइतक वैशिष्ट्यपूर्ण होतं. नोवाया गॅझेटा या स्वतंत्र आणि १९९१नंतरच्या काळातील रशियन राजवटीवर कठोर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांची ती विशेष वृत्त वार्ताहर होती. नोवाया गॅझेटा मधून प्रचलित राजवटीविरुद्ध आणि मानवी हक्कांच्या पुरस्कारांसाठी तिने सातत्याने केलेल्या स्तंभलेखनातून निर्माण झालेल्या तिच्या बऱ्याच पुस्तकांना पुरस्कार मिळाले; पण तिच्या निर्भीड लेखनामुळे तिच्यावर विषप्रयोगासारखे जिवावरचे प्रसंगही गुदरले. तिचा मृत्यूही अज्ञात मारेकऱ्यांनी केलेल्या गोळीबारात झाला. लब्धप्रतिष्ठीत रशियन लोक आणि अध्यक्ष पुतिन यांच्या हडेलहप्पी धोरणांचे आणि फसलेल्या प्रशासनाचे बुरखे टराटरा फाडणारं ए रशियन डायरी हे पुस्तक तिच्या ग्रंथसंपदेतील मानाचा तुरा आहे. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल सह पत्रकारिता आणि मानवी हक्कांचा पुरस्कार यासाठी अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या पोलितकोवस्क्याची ए रशियन डायरी आजतागायत रशियात प्रकाशित झालेली नाही.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
A RUSSIAN DIARY Rating Star
Add To Cart INR 560

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more