* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TAKE ME HOME
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184986303
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 380
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
  • Available in Combos :RASHMI BANSAL COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF INSPIRING ENTREPRENEURS WHO NEVER LEFT THEIR HOMETOWNS TO GET FOREIGN EDUCATION OR DECIDED TO WORK A FEW YEARS ABROAD. THEY ARE YOUNG AND INNOVATIVE AND HAVE BUILT EMPIRES FROM THEIR HOMELAND. RASHMI BANSAL DESCRIBES THE LIVES OF SUCH ENTERPRISING TALENT WITH HER BOOK, TITLED TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS. SHE BELIEVES THAT THESE SONS OF THE SOIL HAVE NEVER ABANDONED THEIR OWN HOMES FOR THE GREENER PASTURES AND HAVE RUN GLOBAL TRIUMPHS THROUGH THEIR OWN WORLD. TAKE ME HOME: THE INSPIRING STORIES OF 20 ENTREPRENEURS FROM SMALL-TOWN INDIA WITH BIG-TIME DREAMS IS THE STORY OF A NEW GENERATION OF MOGULS WHO BRING HOPE TO THEIR COMMUNITIES, WRITTEN IN SIMPLE AND RELATABLE VERSE. THEIR STORIES INSPIRE PEOPLE TO DREAM BIGGER WITHOUT LAMENTING THEIR LOCATION OR BACKGROUND.
किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं... चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला... दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली... या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता — हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा... ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा...!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SWAPNANCHEINDRADHANU #TAKE ME HOME #सुनीति काणे #SUNITI KANE #RASHMIBANSAL #स्वप्नांचे इंद्रधनू #FOLLOW EVERY RAINBOW #रश्मी बन्सल
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 13-04-2015

    मुलांना स्वातंत्र्य द्या!... मुलांनी ठराविक क्षेत्रातच करिअर करावे, अमक्या क्षेत्रात करू नये, असे सांगून आपल्या मुलातील नावीन्यता आणि उत्साह कमी करू नका. याउलट मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा, असा सल्ला प्रसिद्ध लेखक रश्मी बन्सल यंनी दिला. ही मुलाखत प्रसिद्ध लेखिका अपर्णा वेलणकर यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेहता पब्लिकेशनच्यावतीने बन्सल यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी बन्सल म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीत मोठी शक्ती आहे, वेगळेपण आहे. पण, ते जाणायला हवे आणि ती शक्ती योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि मिंत्रासारख्या कंपन्या या बन्सल ग्रुपच्या आहेत. मी सुद्धा बन्सल असली तरी मीही वेगळा व्यवसाय करण्याच्या हेतूनेच कार्यरत झाले. नोकरीचा पर्याय मी स्वीकारला नाही आणि लिखाणाच्या आवडीतून साहित्याच्या क्षेत्रात आले, असे त्या म्हणाल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मी एमबीए करत असतानाच तेथे एक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली. आयआयएमचे विद्यार्थी भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवतात. असे नाही तर २० ते २५ टक्के विद्यार्थी स्वतःचा उद्योग, व्यवसाय करीत आहेत. या सर्वांवर प्रकाश टाकणारे ते पुस्तक होते. त्याला मिळालेले यश मला लिखाणाकडे अधिक ओढ लावणारे ठरले. माझे पुस्तक वाचून अनेक प्रतिक्रिया मला येतात. मी पुस्तक वाचले आणि नोकरीचा राजीनामा दिला, असा मेल करणारेही माझे वाचक आहेत. आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून आपण निर्णय घ्यायला हवा. पालकांनी आपल्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. जबरदस्ती किंवा इमोशनल ब्लॅकमेल करणे हिताचे नाही. पालकांनी त्यांचे करिअर केले तो काळ आणि आताचा काळ यात कमालीचा फरक आहे. आता करिअरचे मार्ग, विविध प्रकारच्या संधी हे लक्षणीयरित्या बदलले आहे. त्याचा विचार करून मुलांना प्रोत्साहन द्या, तो नक्की काय करू इच्छित आहे. ते जाणून घ्या, असे बन्सल म्हणाल्या. मी निवडलेले करिअर आई-वडिलांना मनापासून आवडले नाही. पण, २० वर्षांनी वडिलांना जाणीव झाली की मी जो मार्ग निवडला तो योग्य होता. त्यांनी विस्तृत मेलद्वारे त्यांच्या भावना मला कळविल्या. पण, त्याला फार उशीर झाला, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 14-04-2015

    गोष्टीरूपातील विचार अधिक परिणामकारक : ज्या व्यक्तींनी व्यवसायात उत्तुंग यश मिळविले त्यांच्याकडे बघून गोष्टी लिहिल्या. त्यासाठी विविध भागातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची निवड केली. फक्त विचार देण्यापेक्षा ते विचार गोष्टीच्या रूपातून दिले तर ते अिक परिणामकारक ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व उद्योजिका रश्मी बन्सल यांनी केले. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यांनी लिहिलेल्या ‘टेक मी होम’ या पुस्तकाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. रश्मी बन्सल म्हणाल्या, ‘‘उच्च शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायात नक्कीच होतो. प्रत्येक माणसात एक शक्ती आहे. ती त्याला ओळखता आली पाहिजे. अनेकांना नोकरी करण्याची इच्छा असते. मात्र त्यातील काही विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो. अशा तरुणांसाठी व्यवसायाला प्रेरणा देणारे पुस्तक लिहिले.’’ मेहता पब्लिशिंग हाऊसच्या मनीषा देवकर यांनी प्रस्ताविक केले. ...Read more

  • Rating Starpramodgokhale

    This is book nicely translated, i appreciate author, bringing this book in Marathi. Book is inspiring and translation is thrilling. I am retired blue collar worker technician worked in India and abroad. I feel it is to my heart.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more