* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A YEAR BY THE SEA
  • Availability : Available
  • Translators : ARUNDHATI CHITALE
  • ISBN : 9789387789036
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"LIFE IS A WORK IN PROGRESS, AS EVER-CHANGING AS A SANDY SHORELINE ALONG THE BEACH. DURING THE YEARS JOAN ANDERSON WAS A LOVING WIFE AND SUPPORTIVE MOTHER, SHE HAD SLOWLY AND UNCONSCIOUSLY REPLACED HER OWN DREAMS WITH THE NEEDS OF HER FAMILY. WITH HER SONS GROWN, HOWEVER, SHE REALIZED THAT THE FAMILY NO LONGER CENTERED ON THE HOME SHE PROVIDED, AND HER RELATIONSHIP WITH HER HUSBAND HAD BECOME STAGNANT. LIKE MANY WOMEN IN HER SITUATION, JOAN REALIZED THAT SHE HAD NEGLECTED TO NURTURE HERSELF AND, WORSE, TO ENVISION FULFILLING GOALS FOR HER FUTURE. AS HER HUSBAND RECEIVED A WONDERFUL JOB OPPORTUNITY OUT-OF-STATE, IT SEEMED THAT THE BEST PART OF HER OWN LIFE WAS FINISHED. SHOCKING BOTH OF THEM, SHE REFUSED TO FOLLOW HIM TO HIS NEW JOB AND DECIDED TO RETREAT TO A FAMILY COTTAGE ON CAPE COD. AT FIRST CASTING ABOUT FOR DIRECTION, JOAN SOON BEGAN TO TAKE PLEASURE IN HER SURROUNDINGS AND CALL ON RESOURCES SHE DIDN`T REALIZE SHE HAD. OVER THE COURSE OF A YEAR, SHE GRADUALLY DISCOVERED THAT HER LIFE AS AN ""UNFINISHED WOMAN"" WAS FULL OF POSSIBILITIES. OUT OF THAT MAGICAL, DIFFICULT, TRANSFORMATIVE YEAR CAME A YEAR BY THE SEA, A RECORD OF HER EXPERIENCES AND A TREASURY OF WISDOM FOR READERS. "
‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#निरोप समारंभ#भविष्य# केप कॉर्ड# समुद्र# अनुभव# लेखिका# एकटेपणा# सील# बोट# जोश# लग्न# सहजीवन# जलोपचार# कोळी# खिसमस# जोआन अँडरसन# धुकं# मानसोपचारतज्ज्ञ# मैत्री# ओहोटी# प्रवाह# नीतिमत्ता# क्लॅम्प्स#JOAN ANDERSON# CAPE COD# SEAL# SEA# JOSH# CLAMDIGGER# WATER-THERAPY# BOAT #LOW# TIDE #CRISTMAS# COTTAGE# MARRIAGE# HUSBAND# GUILTY# FISHERMAN# THANKSGIVING# FOGG# DAUGHTER# WRITER# LONELINESS# SANTA CLAUS# FISH-MARKET# CLAMS# CLAMMING#
Customer Reviews
  • Rating StarBhagyashree Abhyankar

    हे पुस्तक *A year by the sea* या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या विलक्षण आत्मकथनात जोआन अँडरसनला एकांतवासात गवसलेला आनंद आणि आत्मज्ञान विषयीचे अनुभव कथन आहे व त्यानंतर जोआन च्या मनात निर्माण झालेली सागरी विश्वाची प्रचंड ओढ अन त्यतून झालेली *स्वत्वाची* जाणीव याचे चित्रण आहे.आत्मकथन समाजासमोर आणतांना ते कधीच अतिरंजित नसतं तर सत्य आणि व्यावहारीकतेचे भान ठेवून मांडलं जातं वैवाहिक जीवनाचा नवा पैलू उलगडणारी ही कथा आपल्याला गुंतवून ठेवते. आयुष्य म्हणजे सतत विकसित होणारी एक प्रक्रिया, आयुष्यात कधी दर्शनीय तर कधी सुप्त असा सतत बदल होत असतो. *समुद्राकाठचे एक वर्ष* या कथेत एका मध्यमवयीन स्त्रीने आयुष्यातील तोचतोपणा कसा घालवला आणि ती पुन्हा एकदा प्रवाही आणि उत्साही कशी झाली हे सांगितले आहे. फक्त कुटुंब आणि कौटुंबिक गरजा याव्यतिरिक्त स्वतःतील स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेला हा अत्यंत धाडसी आणि विचारी प्रयत्न आहे. जोआन अँडरसन ही साधारण पन्नाशीच्या घरातील लग्नाला वीस वर्ष झालेली गृहिणी, इथे गृहिणी हा शब्द अत्यंत चपखल बसतो कारण घर, संसार, मुलं ,नवरा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना ती स्वतःला हरवून बसलेली आहे. आपल्याला अस्तित्वच नाही काय ही भावना तिला अस्वस्थ करते आणि यातून सुटण्यासाठी म्हणून ती आपल्या गावातल्या छोट्या घरात एकटीने जायचं ठरवते. सप्टेंबर ते सप्टेंबर असे बारा महिने तिला नवीन आयुष्याची ओळख करून देतात या एका वर्षात लेखिका स्वतःच्या आयुष्यात असाधारण अविस्मरणीय बदल घडवून आणते. स्वतःतील सुप्त गुणांची तिला जाणीव होते आणि पूर्ण स्त्रीच्या दृष्टीने तिने केलेली धडपड नकळत वाचकाला ही आदर्श वाटू लागते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही वेळ नेहमीच येत असते. कुटुंबातील सदस्यांच्या सुखात सुख मानणाऱ्या स्त्रीला मनात कुठेतरी एक सल असतो अन हा सल यशाकडे किंवा पूर्णत्वाकडे नेणाऱ्या आनंदात आडकाठी ठरत असतो. वीस वर्षाच्या वैवाहिक वाटचाली नंतर परस्परांमधील नातं थोडसं ताणल्यासारखं वाटल्यामुळे,दांपत्यजीवन कायदेशीर रित्या वेगळं न करता काही काळ वेगळे राहण्याचा निर्णय जोआन घेते .केपकॉर्ड नावाच्या आपल्या जुन्या गावी येऊन, जुन्या घरात राहून स्वतःच्या स्मृतीमध्ये रमते, निसर्गासह अनेक अनुभवातून तिचा स्वत्वाचा प्रवास पूर्ण होतो. हे पुस्तक वाचताना कोणत्याही स्त्रीला ही कथा आपलीच आहे असं वाटतं,हेच या पुस्तकाचे यश.... स्वानुभवाबरोबरच लेखिकेने अनेक मान्यवर व्यक्तींचे विचार मांडून स्वतःच्या लेखनाची उंची वाढवली आहे. माणसाच्या मनात अनेक कोडी असतात ,अनेक अनुत्तरीत प्रश्न ज्यांची उत्तरे कधीच मिळणार नसतात अशा प्रश्नांत अडकून माणूस शांतता हरवून बसतो. एका वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला लेखिकेचा स्वतःचा शोध हा बरोबर 12 महिन्याने संपतो. अत्यंत प्रॅक्टिकल सहचर आणि मोठे होऊन स्वतःच्या विश्वात रमलेली मुले यांच्यापासून दूर होऊन सागराच्या विशालतेकडे बघितल्यावर आपल्या अडचणी आपणच मोठ्या करतो ही जाणीव तिला होते.सागराची भरती- ओहोटी तिला आयुष्याचं गमक शिकवुन जातात,स्वतः मोकळं व्हायचं ठरवते. छोट्याशा गावात तिचं स्त्री असणं आणि अनोळखीपण ती त्या लोकांमध्ये मिसळून दूर करते, स्वतःहून ती मुक्त जगाकडे झेपावते. निर्जन समुद्रकिनारी सुद्धा ती समाधान शोधते मनात पतीच्या आणि मुलांच्या आठवणीही जपते, भूतकाळातील मिळवलेले आनंद आणि त्या आनंदासाठी केलेली तडजोड या दोन्ही गोष्टी आता तिच्या नवीन आयुष्यात नसतात. कारण हे आयुष्य तिचं एकटीचं, तिने स्वतः स्वतःच्या आनंदाचा शोध घेण्यासाठी निवडलेलं असतं. या प्रवासात तिचे सहकर्मचारी, मैत्रीण, निसर्ग तिला खूप काही शिकवून जातात, जगावं कसं हे सांगतात त्यामुळे अनिश्चित भविष्य काळापासून ती सहज दूर होते. अशा या वर्षभराच्या *ब्रेक* मध्ये तिला अनेक अनुभव येतात स्वतःच्या अस्तित्वाची नव्याने जाणे होताना आपल्या वैवाहिक जीवनाकडेही ती तटस्थपणे बघू शकते. कौटुंबिक एकत्रीकरणात ती रमते पण स्वतःचं अस्तित्व राखून....... कुटुंबालाही तिच्यातील वेगळेपणाची जाणीव होते आणि या वर्षभराच्या ब्रेकने आपण काय हरवलंय आणि काय नवीन मिळवलंय याचा गांभीर्याने केलेला विचार तिला यांत्रिक होणारं नातं नव्या दमाने सुरू करण्याची स्फूर्ती देऊन जातो. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने रेखाटलेली *स्त्री*. नातेसंबंध जपताना स्वतःला विसरणं हेच स्त्रीत्वाचं लक्षण अशी शिकवण घेत मोठी होणारी स्त्री ही खरोखरीच स्वतःचं अस्तित्व विसरून जाते.बरेचदा तिनं स्वतःवर घालून घेतलेली बंधनं ही तिच्या अस्तित्वाभोवती तिनं स्वतः घातलेलं कटघर असतं आणि या कटघरातच आपण कसे सुखी आहोत हे दाखवण्यात तिचं पूर्ण आयुष्य खर्ची पडतं, भावनाहीन अस्तित्व हे खरोखरीच त्रासदायक असत आणि आयुष्य जगण्यासाठी बदल आवश्यक असतात. आपल्याला काय हवाय हे एकदा समजलं की समाधानाच्या परिभाषा बदलत जातात .कारण समाधानी वृत्ती ही मानसिकता असते जी स्वकर्तृत्वाच्या निर्णयाने बदलूही शकते आणि एकदा बदलत्या रूपा नुसार वागता आलं की हवे तिथे हवे ते बदल सहज घडून येतात. बरेचदा भूतकाळ हा यासाठी उत्तम शिक्षक ठरतो. आयुष्याचे रंग काहीही न समजता एकमेकात मिसळले तर स्वातंत्र्य ,भावना,अपेक्षा, सुखदुःख सारं काही समोर येईल तसं स्वीकाराव लागतं मात्र हेच जर समजून-उमजून केलं तर जीवनाचं सुंदर चित्र तयार होतं. पुस्तक वाचताना हा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. स्त्रीच्या आयुष्याचे किंबहुना मनाचे अनेक पदर या पुस्तकाच्या वाचनाने उलगडत जातात आणि विचार प्रगल्भ करीत जातात. प्रत्येक स्त्रीने स्वतःचे गुण ओळखून *स्वत्व* शोधायला हवं, स्वतःला ओळखायला हवं. ही जरी एका स्त्रीची कहाणी असली तरी स्त्री असो वा पुरूष आयुष्याशी तडजोड करीत जगत असतो. ही तडजोड दोन्हीकडून समजून घेणं अपरिहार्य आहे.मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं अस्तित्व फारसं विचारात घेतलं जात नाही.सहजीवन जगताना परस्परांचा आदर करणे थोडक्यात *स्पेस* देणे आवश्यक असतं हेच खरं........ ...Read more

  • Rating StarANIL KAVANEKAR

    समुद्राकाठचे एक वर्ष हे आपले अनुवादित पुस्तक वाचले. आवडले. समुद्रकाठी वसलेल्या निसर्गसंपन्न खेड्यातील जीवनात लेखिकेच्या मनाची कवाडे खुली होतात आणि जीवनाकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन लाभतो हा विचार खूप महत्वाचा वाटतो.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more