* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A YEAR BY THE SEA
  • Availability : Available
  • Translators : ARUNDHATI CHITALE
  • ISBN : 9789387789036
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"LIFE IS A WORK IN PROGRESS, AS EVER-CHANGING AS A SANDY SHORELINE ALONG THE BEACH. DURING THE YEARS JOAN ANDERSON WAS A LOVING WIFE AND SUPPORTIVE MOTHER, SHE HAD SLOWLY AND UNCONSCIOUSLY REPLACED HER OWN DREAMS WITH THE NEEDS OF HER FAMILY. WITH HER SONS GROWN, HOWEVER, SHE REALIZED THAT THE FAMILY NO LONGER CENTERED ON THE HOME SHE PROVIDED, AND HER RELATIONSHIP WITH HER HUSBAND HAD BECOME STAGNANT. LIKE MANY WOMEN IN HER SITUATION, JOAN REALIZED THAT SHE HAD NEGLECTED TO NURTURE HERSELF AND, WORSE, TO ENVISION FULFILLING GOALS FOR HER FUTURE. AS HER HUSBAND RECEIVED A WONDERFUL JOB OPPORTUNITY OUT-OF-STATE, IT SEEMED THAT THE BEST PART OF HER OWN LIFE WAS FINISHED. SHOCKING BOTH OF THEM, SHE REFUSED TO FOLLOW HIM TO HIS NEW JOB AND DECIDED TO RETREAT TO A FAMILY COTTAGE ON CAPE COD. AT FIRST CASTING ABOUT FOR DIRECTION, JOAN SOON BEGAN TO TAKE PLEASURE IN HER SURROUNDINGS AND CALL ON RESOURCES SHE DIDN`T REALIZE SHE HAD. OVER THE COURSE OF A YEAR, SHE GRADUALLY DISCOVERED THAT HER LIFE AS AN ""UNFINISHED WOMAN"" WAS FULL OF POSSIBILITIES. OUT OF THAT MAGICAL, DIFFICULT, TRANSFORMATIVE YEAR CAME A YEAR BY THE SEA, A RECORD OF HER EXPERIENCES AND A TREASURY OF WISDOM FOR READERS. "
‘अ इयर बाय द सी’ ही कथा आहे लेखिका जोआन आणि तिचा पती यांच्या नात्याची. विरत चाललेलं पती-पत्नीमधील नातं एका अशा वळणावर येतं की, जिथं या नात्याची सांगता होऊ शकेल. त्या वेळी लेखिका जोआन निर्णय घेते तो घटस्फोट न घेता वेगळं राहण्याचा. थोडक्यात, या नात्यात एक ‘ब्रेक’ घेण्याचं ती ठरवते. नवरा नोकरीच्या निमित्तानं वेगळ्या शहरात जाऊन स्थायिक होतो. त्या वेळी जोआन मात्र केपकॉर्ड या आपल्या मूळ गावी राहायला येते. जुन्या आठवणी मनात उजळत असतानाच तिची तिथल्या कोळ्यांशी मैत्री होते. समुद्रकाठी वसलेलं हे गाव निसर्गसौंदर्यानं नटलेलं असतं. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं ती आपली लेखिका म्हणून असणारी प्रतिष्ठा विसरून ‘क्लॅम्प्स’ पकडण्याचे काम करू लागते. ‘जोआन एरिकसन’ नावाची एक मैत्रीणही तिला याच दरम्यान भेटते. त्या ठिकाणी तिला आपले वेगळं विश्व तयार झालं आहे आणि ते आपलं हक्काचं आहे, असं वाटू लागतं. ती या विश्वात आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधू लागते. आपल्या दबलेल्या इच्छा- पुन्हा एकवार बालपण जगण्याची तिची ऊर्मी- उफाळून येते. याच दरम्यान ती आपल्या वैवाहिक जीवनाकडे तटस्थपणे बघू लागते. पती-पत्नीच्या नात्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन तिला मिळतो. या वर्षभराच्या ‘ब्रेक’मध्ये तिला अनेक अनुभव येतात. हळूहळू पती-पत्नी दोघांनाही आपण काय हरवलं आहे किंवा आपल्याला नव्यानं काय गवसलं आहे, याचा गांभीर्यानं विचार करू लागतात. एका निर्मनुष्य बेटावर एक रात्र घालवून आपल्या ‘एकटेपणा’तली मजा उपभोगताना तिला आपल्या नवऱ्याविषयी असणाऱ्या भावना समजतात. पती-पत्नीचे काही काळानं गुळगुळीत, यांत्रिक होणारं नातं एखादा ‘ब्रेक’ घेऊन नव्या दमानं सुरू करण्यात असणारी मजा ही कथा सांगते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#निरोप समारंभ#भविष्य# केप कॉर्ड# समुद्र# अनुभव# लेखिका# एकटेपणा# सील# बोट# जोश# लग्न# सहजीवन# जलोपचार# कोळी# खिसमस# जोआन अँडरसन# धुकं# मानसोपचारतज्ज्ञ# मैत्री# ओहोटी# प्रवाह# नीतिमत्ता# क्लॅम्प्स#JOAN ANDERSON# CAPE COD# SEAL# SEA# JOSH# CLAMDIGGER# WATER-THERAPY# BOAT #LOW# TIDE #CRISTMAS# COTTAGE# MARRIAGE# HUSBAND# GUILTY# FISHERMAN# THANKSGIVING# FOGG# DAUGHTER# WRITER# LONELINESS# SANTA CLAUS# FISH-MARKET# CLAMS# CLAMMING#
Customer Reviews
  • Rating StarBhagyashree Abhyankar

    हे पुस्तक *A year by the sea* या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. या विलक्षण आत्मकथनात जोआन अँडरसनला एकांतवासात गवसलेला आनंद आणि आत्मज्ञान विषयीचे अनुभव कथन आहे व त्यानंतर जोआन च्या मनात निर्माण झालेली सागरी विश्वाची प्रचंड ओढ अन त्यतून झालेली *स्वत्वाची* जाणीव याचे चित्रण आहे.आत्मकथन समाजासमोर आणतांना ते कधीच अतिरंजित नसतं तर सत्य आणि व्यावहारीकतेचे भान ठेवून मांडलं जातं वैवाहिक जीवनाचा नवा पैलू उलगडणारी ही कथा आपल्याला गुंतवून ठेवते. आयुष्य म्हणजे सतत विकसित होणारी एक प्रक्रिया, आयुष्यात कधी दर्शनीय तर कधी सुप्त असा सतत बदल होत असतो. *समुद्राकाठचे एक वर्ष* या कथेत एका मध्यमवयीन स्त्रीने आयुष्यातील तोचतोपणा कसा घालवला आणि ती पुन्हा एकदा प्रवाही आणि उत्साही कशी झाली हे सांगितले आहे. फक्त कुटुंब आणि कौटुंबिक गरजा याव्यतिरिक्त स्वतःतील स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेला हा अत्यंत धाडसी आणि विचारी प्रयत्न आहे. जोआन अँडरसन ही साधारण पन्नाशीच्या घरातील लग्नाला वीस वर्ष झालेली गृहिणी, इथे गृहिणी हा शब्द अत्यंत चपखल बसतो कारण घर, संसार, मुलं ,नवरा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना ती स्वतःला हरवून बसलेली आहे. आपल्याला अस्तित्वच नाही काय ही भावना तिला अस्वस्थ करते आणि यातून सुटण्यासाठी म्हणून ती आपल्या गावातल्या छोट्या घरात एकटीने जायचं ठरवते. सप्टेंबर ते सप्टेंबर असे बारा महिने तिला नवीन आयुष्याची ओळख करून देतात या एका वर्षात लेखिका स्वतःच्या आयुष्यात असाधारण अविस्मरणीय बदल घडवून आणते. स्वतःतील सुप्त गुणांची तिला जाणीव होते आणि पूर्ण स्त्रीच्या दृष्टीने तिने केलेली धडपड नकळत वाचकाला ही आदर्श वाटू लागते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही वेळ नेहमीच येत असते. कुटुंबातील सदस्यांच्या सुखात सुख मानणाऱ्या स्त्रीला मनात कुठेतरी एक सल असतो अन हा सल यशाकडे किंवा पूर्णत्वाकडे नेणाऱ्या आनंदात आडकाठी ठरत असतो. वीस वर्षाच्या वैवाहिक वाटचाली नंतर परस्परांमधील नातं थोडसं ताणल्यासारखं वाटल्यामुळे,दांपत्यजीवन कायदेशीर रित्या वेगळं न करता काही काळ वेगळे राहण्याचा निर्णय जोआन घेते .केपकॉर्ड नावाच्या आपल्या जुन्या गावी येऊन, जुन्या घरात राहून स्वतःच्या स्मृतीमध्ये रमते, निसर्गासह अनेक अनुभवातून तिचा स्वत्वाचा प्रवास पूर्ण होतो. हे पुस्तक वाचताना कोणत्याही स्त्रीला ही कथा आपलीच आहे असं वाटतं,हेच या पुस्तकाचे यश.... स्वानुभवाबरोबरच लेखिकेने अनेक मान्यवर व्यक्तींचे विचार मांडून स्वतःच्या लेखनाची उंची वाढवली आहे. माणसाच्या मनात अनेक कोडी असतात ,अनेक अनुत्तरीत प्रश्न ज्यांची उत्तरे कधीच मिळणार नसतात अशा प्रश्नांत अडकून माणूस शांतता हरवून बसतो. एका वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला लेखिकेचा स्वतःचा शोध हा बरोबर 12 महिन्याने संपतो. अत्यंत प्रॅक्टिकल सहचर आणि मोठे होऊन स्वतःच्या विश्वात रमलेली मुले यांच्यापासून दूर होऊन सागराच्या विशालतेकडे बघितल्यावर आपल्या अडचणी आपणच मोठ्या करतो ही जाणीव तिला होते.सागराची भरती- ओहोटी तिला आयुष्याचं गमक शिकवुन जातात,स्वतः मोकळं व्हायचं ठरवते. छोट्याशा गावात तिचं स्त्री असणं आणि अनोळखीपण ती त्या लोकांमध्ये मिसळून दूर करते, स्वतःहून ती मुक्त जगाकडे झेपावते. निर्जन समुद्रकिनारी सुद्धा ती समाधान शोधते मनात पतीच्या आणि मुलांच्या आठवणीही जपते, भूतकाळातील मिळवलेले आनंद आणि त्या आनंदासाठी केलेली तडजोड या दोन्ही गोष्टी आता तिच्या नवीन आयुष्यात नसतात. कारण हे आयुष्य तिचं एकटीचं, तिने स्वतः स्वतःच्या आनंदाचा शोध घेण्यासाठी निवडलेलं असतं. या प्रवासात तिचे सहकर्मचारी, मैत्रीण, निसर्ग तिला खूप काही शिकवून जातात, जगावं कसं हे सांगतात त्यामुळे अनिश्चित भविष्य काळापासून ती सहज दूर होते. अशा या वर्षभराच्या *ब्रेक* मध्ये तिला अनेक अनुभव येतात स्वतःच्या अस्तित्वाची नव्याने जाणे होताना आपल्या वैवाहिक जीवनाकडेही ती तटस्थपणे बघू शकते. कौटुंबिक एकत्रीकरणात ती रमते पण स्वतःचं अस्तित्व राखून....... कुटुंबालाही तिच्यातील वेगळेपणाची जाणीव होते आणि या वर्षभराच्या ब्रेकने आपण काय हरवलंय आणि काय नवीन मिळवलंय याचा गांभीर्याने केलेला विचार तिला यांत्रिक होणारं नातं नव्या दमाने सुरू करण्याची स्फूर्ती देऊन जातो. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने रेखाटलेली *स्त्री*. नातेसंबंध जपताना स्वतःला विसरणं हेच स्त्रीत्वाचं लक्षण अशी शिकवण घेत मोठी होणारी स्त्री ही खरोखरीच स्वतःचं अस्तित्व विसरून जाते.बरेचदा तिनं स्वतःवर घालून घेतलेली बंधनं ही तिच्या अस्तित्वाभोवती तिनं स्वतः घातलेलं कटघर असतं आणि या कटघरातच आपण कसे सुखी आहोत हे दाखवण्यात तिचं पूर्ण आयुष्य खर्ची पडतं, भावनाहीन अस्तित्व हे खरोखरीच त्रासदायक असत आणि आयुष्य जगण्यासाठी बदल आवश्यक असतात. आपल्याला काय हवाय हे एकदा समजलं की समाधानाच्या परिभाषा बदलत जातात .कारण समाधानी वृत्ती ही मानसिकता असते जी स्वकर्तृत्वाच्या निर्णयाने बदलूही शकते आणि एकदा बदलत्या रूपा नुसार वागता आलं की हवे तिथे हवे ते बदल सहज घडून येतात. बरेचदा भूतकाळ हा यासाठी उत्तम शिक्षक ठरतो. आयुष्याचे रंग काहीही न समजता एकमेकात मिसळले तर स्वातंत्र्य ,भावना,अपेक्षा, सुखदुःख सारं काही समोर येईल तसं स्वीकाराव लागतं मात्र हेच जर समजून-उमजून केलं तर जीवनाचं सुंदर चित्र तयार होतं. पुस्तक वाचताना हा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही. स्त्रीच्या आयुष्याचे किंबहुना मनाचे अनेक पदर या पुस्तकाच्या वाचनाने उलगडत जातात आणि विचार प्रगल्भ करीत जातात. प्रत्येक स्त्रीने स्वतःचे गुण ओळखून *स्वत्व* शोधायला हवं, स्वतःला ओळखायला हवं. ही जरी एका स्त्रीची कहाणी असली तरी स्त्री असो वा पुरूष आयुष्याशी तडजोड करीत जगत असतो. ही तडजोड दोन्हीकडून समजून घेणं अपरिहार्य आहे.मात्र पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं अस्तित्व फारसं विचारात घेतलं जात नाही.सहजीवन जगताना परस्परांचा आदर करणे थोडक्यात *स्पेस* देणे आवश्यक असतं हेच खरं........ ...Read more

  • Rating StarANIL KAVANEKAR

    समुद्राकाठचे एक वर्ष हे आपले अनुवादित पुस्तक वाचले. आवडले. समुद्रकाठी वसलेल्या निसर्गसंपन्न खेड्यातील जीवनात लेखिकेच्या मनाची कवाडे खुली होतात आणि जीवनाकडे तटस्थपणे पाहण्याचा दृष्टिकोन लाभतो हा विचार खूप महत्वाचा वाटतो.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more