* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663631
  • Edition : 13
  • Publishing Year : JUNE 1984
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`CHEERS!` THE GLASSES CLINK ON EACH OTHER. OF COURSE, THAT IS NOT THE ONLY TIME FOR `CHEERS`. VAPU`S `CHEERS` TOUCHES EVERY SOUL AND PRODUCES THE RHYTHMIC CLINKING, RESULTING INTO CHEERING UP OF THE HEARTS TOGETHER, SPREADING HAPPINESS. VAPU, A PATRON OF HAPPINESS, A COLLECTOR OF HUMAN BEINGS, A FAN OF UNIQUE CHARACTERS; HELPING US TO MEET ALL THESE EXCLUSIVE AND EXQUISITE PEOPLE THROUGH HIS WORD-PORTRAITS, IN `CHEERS!` ANNA ADVISES VAPU, `DON`T EVER DISCARD THE OLD. WHILE PRACTISING IT, YOU WILL COME ACROSS NEW. THE FIRST LETTER THAT WE WRITE IS AT THE AGE OF THREE. THEREAFTER, WE KEEP ON WRITING TILL OUR LAST BREATH.` SOMEWHERE SOME NOBLE BHAUSAHEB IMPLANTS THE SEED OF CONFIDENCE, DEEP DOWN. WE COME ACROSS MANY SUCH `GLASSES`, TRANSPARENT IN THEIR ATTITUDE AND CLEAR IN THEIR MIND. THEY REMAIN FULL FOREVER. THEY REFRESH OUR MINDS WHILE CHEERING US UP. INTRODUCTION OF PERSONALITIES SHOULD ALWAYS CHEER UP PEOPLE. SOME GET THE OPPORTUNITY TO BE IN THE COMPANY OF SUCH NOBLE PEOPLE. VAPU HAD BEEN ONE OF THEM. HIS GREATNESS LIES IN HIS READING SKILLS WHICH HE FURTHER PEN-PORTRAYED FOR HIS READERS. THAT IS HOW WE READERS ARE TOUCHED WITH HIS `CHEERS!` IT IS INTOXICATING BUT NOT INTIMIDATING; IT IS ALCOHOLIC BUT NOT SEDUCING. THERE ARE GLASSES, BUT THEY ARE NOT EMPTY. THERE ARE COLOURS, BUT THEY DO NOT SPOIL THE BEAUTY. CHEERS!
‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात. एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो. असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले. चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत. चिअर्स !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणूसवेड्या माणसाने जमवलेली रंगतदार मैफल चिअर्स... चिअर्स म्हणून मैफलीला आरंभ केला की तिचा रंग मदहोश होता जातो. विख्यात कथाकथनकार व. पु. काळे अशा मैफली रंगवण्यात मातबर आहेत. मैफल रंगवायला माणसेही जबरदस्त लागतात. वैचित्र्यपूर्ण आयुष्य जगलेली, जीवनातल नाट्यपूर्ण चढ-उतार बघितलेली, खूप काही भोगलेली. सोसलेली. एरवीही माणसे आपल्या अनुभवाचे भांडार आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ठेवून त्याची हळुवारपणे जपणूक करीत असतात. परंतु एखाद्या मैफलीत, दोन-चार पेग अंगांगात रिचल्यावर, थोडी फार बंधनमुक्त होतात आणि आपल्या त्या अद्भूतरम्य जंगी खजिन्यातल्या काही चित्रांची चुणूक दाखवण्याएवढी मोकळी होतात. असे मोकळे झाल्यावर मग मैफलीला बहार येते. अज्ञातावरचे आवरण दूर होते आणि मानवी मनाच्या गहन गूढतेचे अलौकिक दर्शन घडते. व.पु. काळे अशा या लौकिकातील अलौकिकाचे दर्शन घेण्यात रमतात आणि असे काहीतरी दिव्य भव्य समोर आल्यावर नतमस्तक होतात. आपल्या त्या अनुभवात ते मग आपल्या वाचकांनाही कधी कधी सामील करून घेतात. `चिअर्स` असे म्हणून, अनुभवाचा चषक उंचावून ते आपल्याला अशाच एका मैफलीत मनःपूर्वक सामील करून घेत आहेत. रसिकराज रामभूय्या दाते, जिंदादिल शायर– भाऊसाहेब पाटणकर, जाज्ज्वल्य हिंदुत्व निष्ठा जपणारे पु.भा.भावे अण्णा, शोधून न सापडणाऱ्या आणि मागून न मिळणाऱ्या आयुष्याचा जमेल तसा डाव मांडणारे गीतकार सुधीर मोघे, झोपेचा वेळ सोडला तर अखंड पुस्तक विक्रीचे व्रत चालवणारे आयडियलचे कांताशेठ नेरूरकर, तुम्हाला गाफील ठेवून तुमचा नेमका मूड कुशलतेने टिपणारे छायाचित्रकार राजदत्त, संगीतकारांच्या हुबेहुब नकला करणारे नकलाकार वि.र. गोडे, कुटुंबाच्या गरजा संपल्या की कर्तापुरुष कुटुंबाचं देणं लागत नाही; त्यानं चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं तरच तो मोठा होईल, असे सांगणारे आणि त्याप्रमाणे वागणारे डॉ. श्रीखंडे, आपल्या हातचलाखीने बघता बघता हातातला रुपाया गायब करून चकित करणारे जादूगार अशोक अशा माणसांना `चिअ र्स` म्हणून मैफलीत आणून वपुंनी या मैफलीचा थाट खुलविला आहे. इतरही माणसांना वपुंनी या मैफलीत सामील करून घेतले आहे. त्यात इंदूरचे ज्योतिषी अण्णा पुराणिक आहेत. या पुराणिकांनी बॅ. महमद अली जीना यांनाही आपल्या ज्योतिषशास्त्राच्या बळावर काबीज केले. मोरारजीभार्इंनी मुख्यमंत्री असताना सचिवालयातील कार्यालयात बोलावले तेव्हा ``माफ करा. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत देशाच्या भवितव्याचा विचार करायचा, स्वतःचा नव्हे.`` असे त्यांना सुनावण्याएवढा परखडपणाही अण्णा दाखवतात आणि `अपॉइंटमेंट शिवाय मला कुठल्याही दिवशी सकाळी चहाच्या वेळी भेटू शकता` असा कायमचा पास मिळवून ठेवतात. `हे अण्णा मैफलीच्या बादशहांचे बादशहा असतात. वेळ, काळ, रात्र, दिवस, वय, वर्ष कशाचाही हिशेब नसतो. वपुंच्या इंदौरच्या ट्रिपा अण्णांमुळे संस्मरणीय होतात आणि इंदौरच्या स्वागताच्या एकूणच खानदानीपणाच्या गोष्टी सांगण्यात मशगुल होतात. वपुंची कुंडली ते मागतात. वपु त्यांना सांगतात, ``अण्णा, तसा खूप गोष्टींचा कंटाळा आलाय. नोकरी, दौरे, लेखन, कथाकथन सगळी पळापळ फुकट आहे. सगळं चांगलं असून वैयर्थाची भावना छळत राहते. केव्हातरी हे सगळं थांबायला हवं. एकदम वेगळा, चिरंतन प्रवासाचा ट्रॅक हवाय.`` त्यावर अण्णा सांगतात– ``तुमचा कर्केचा गुरू आहे. रास तूळ आहे. वैराग्याचा सूर कायमच राहणार. काहीही करायचं नाही. काहीही सोडायचं नाही. जुनं सगळं करता करताच नवं सापडेल. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी आपण प्रथमच श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच की नाही?`` `चित्रलेखा` नाट्यसंस्थेचे अध्वर्यू मोहन वाघ हे उत्तम छायाचित्रकारही आहेत. वपुंनी मोहन वाघ आणि पंजा नामक मासिक चालवणारा खराखुरा वाघ यांच्यातील सामना घडवून आणला आहे. या खऱ्याखुऱ्या वाघाला वाघीण नावाच्या नव्या मासिकासाठी मुखपृष्ठावर टाकण्याकरिता चित्र हवे आहे. संपूर्ण विवस्त्र अवस्थेतील चित्र वाटायला हवे आणि ते काढायला आपले सोज्ज्वळ मोहन वाघ तयार होत नाहीत. वाघांच्या रानटी दुनियेत वाघ मादीने कपडे घालणे हीच अश्लीलता समजली जाते. त्यामुळे डोक्यावरून पदर घेतलेला, हातात तबक असलेला नटीचा फोटो बघून हा पंजा मासिकाचा संपादक गर्जना करीत ओरडतो, ``तुम्ही सभ्य आहात असं समजत होतो. पण तुमच्याजवळ एवढा घाणेरडा फोटो?`` आणि तो सरळ मोहन वाघांवर उडी घेतो. अर्थात दोन वाघांची ही सगळी मुलाखत स्वप्नात होते असे दाखवून व.पु. काळे वाचकांना (आणि मोहन वाघांनाही) वाचवतात– हे अलाहिदा! नाहीतर मोहन वाघांना `ऑल दि बेस्ट` किंवा `रणांगण` सादर करण्याची संधी कशी लाभली असती? जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरचा या पुस्तकातला लेख सर्वात जास्त लांबीचा आहे. त्यात अनेक शेरही उद्धृत केले आहेत. दुर्लक्षिले जेव्हा आम्ही साहित्यिकांना या अशा मैफलीही जागजागी रंगल्या जेव्हा अशा जेव्हा कुठे कीर्ती प्रियाही हासूनी आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे.`` असा भाऊसाहेबांचा अनुभव. वपुंना ते समानधर्मी वाटावेत यात नवल काय? `चिअर्स` मधील सर्वात वाचनीय लेख कुठला असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मिळेल– `निगुडकर.` तुम्हाला प्रश्न पडेल हे काय प्रकरण आहे? हे नाव तर काही आमच्या परिचयाचे नाही. मग या व्यक्तीवरचा लेख सर्वात वाचनीय असे का म्हणताय?... निगुडकर म्हणजे वपुंच्या सौभाग्यवती. आता कोणीही पुरुष आपल्या बायकोवर लिहितो तेव्हा तो मजकूर वाचनीय असणारच! तर वपु कधीकाळी म्हणे घरोघर जाऊन साड्या विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यात या `निगुडकर` ची गाठ पडली. ती म्हणे रोज एक साडी ठेवून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी हिचा रंग पसंत नाही, म्हणून दुसरी साडी बदलून घ्यायची. असा हा सिलसिला दीर्घकाळ चालू राहिला. वपुंनाही तिच्या घरी राजरोस रोजरोज जायला निमित्त मिळत राहिले. तिचे भाऊ डोळ्यांत तेल घालून पहारा करीत असतानाही वपुंनी हा किल्ला सर केला. ``निगुडकर वस्तादच. लग्न होईतो निगुडकरांच्या नावानं एकाही साडीसाठी आम्हाला पावती फाडता आली नाही``, वपु कबुली देतात. निगुडकर म्हणे, ``मी यांच्या केसावर भाळले.`` वपु म्हणत, ``मी हिच्या गाण्यावर भाळलो.`` कालांतराने वपुंचे केस गेले; निगुडकरचे गाणेही गेले. अशा खूप गमती-जमती या लेखात आहेत. वपु स्वतःच्या फिरक्या घेत त्या सर्व सांगतात. वपुंना-निगुडकरला सून येते; नातवंडांची चाहूल लागते. सव्वीस वर्षांच्या सहवासाने एकमेकांचे स्वभाव सही न् सही समजले आहेत. असे कोणालाही वाटते. पण निगुडकर बोलून जाते, ``तुमच्या काळ्यांच्या घरात टिकणं ही एक अवघड गोष्ट आहे.`` सव्वीस वर्षे काळ्यांच्या या घरात राहूनही `तुमचं काळ्यांचं घर` ही भाषा उरतेच. `चिअर्स`ची झिंग थोडीफार उतरायलाही अशी काही निरीक्षणे उपयोगी ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more