* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`CHEERS!` THE GLASSES CLINK ON EACH OTHER. OF COURSE, THAT IS NOT THE ONLY TIME FOR `CHEERS`. VAPU`S `CHEERS` TOUCHES EVERY SOUL AND PRODUCES THE RHYTHMIC CLINKING, RESULTING INTO CHEERING UP OF THE HEARTS TOGETHER, SPREADING HAPPINESS. VAPU, A PATRON OF HAPPINESS, A COLLECTOR OF HUMAN BEINGS, A FAN OF UNIQUE CHARACTERS; HELPING US TO MEET ALL THESE EXCLUSIVE AND EXQUISITE PEOPLE THROUGH HIS WORD-PORTRAITS, IN `CHEERS!` ANNA ADVISES VAPU, `DON`T EVER DISCARD THE OLD. WHILE PRACTISING IT, YOU WILL COME ACROSS NEW. THE FIRST LETTER THAT WE WRITE IS AT THE AGE OF THREE. THEREAFTER, WE KEEP ON WRITING TILL OUR LAST BREATH.` SOMEWHERE SOME NOBLE BHAUSAHEB IMPLANTS THE SEED OF CONFIDENCE, DEEP DOWN. WE COME ACROSS MANY SUCH `GLASSES`, TRANSPARENT IN THEIR ATTITUDE AND CLEAR IN THEIR MIND. THEY REMAIN FULL FOREVER. THEY REFRESH OUR MINDS WHILE CHEERING US UP. INTRODUCTION OF PERSONALITIES SHOULD ALWAYS CHEER UP PEOPLE. SOME GET THE OPPORTUNITY TO BE IN THE COMPANY OF SUCH NOBLE PEOPLE. VAPU HAD BEEN ONE OF THEM. HIS GREATNESS LIES IN HIS READING SKILLS WHICH HE FURTHER PEN-PORTRAYED FOR HIS READERS. THAT IS HOW WE READERS ARE TOUCHED WITH HIS `CHEERS!` IT IS INTOXICATING BUT NOT INTIMIDATING; IT IS ALCOHOLIC BUT NOT SEDUCING. THERE ARE GLASSES, BUT THEY ARE NOT EMPTY. THERE ARE COLOURS, BUT THEY DO NOT SPOIL THE BEAUTY. CHEERS!
‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात. एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो. असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले. चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत. चिअर्स !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    माणूसवेड्या माणसाने जमवलेली रंगतदार मैफल चिअर्स... चिअर्स म्हणून मैफलीला आरंभ केला की तिचा रंग मदहोश होता जातो. विख्यात कथाकथनकार व. पु. काळे अशा मैफली रंगवण्यात मातबर आहेत. मैफल रंगवायला माणसेही जबरदस्त लागतात. वैचित्र्यपूर्ण आयुष्य जगलेली, जीवनातल नाट्यपूर्ण चढ-उतार बघितलेली, खूप काही भोगलेली. सोसलेली. एरवीही माणसे आपल्या अनुभवाचे भांडार आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ठेवून त्याची हळुवारपणे जपणूक करीत असतात. परंतु एखाद्या मैफलीत, दोन-चार पेग अंगांगात रिचल्यावर, थोडी फार बंधनमुक्त होतात आणि आपल्या त्या अद्भूतरम्य जंगी खजिन्यातल्या काही चित्रांची चुणूक दाखवण्याएवढी मोकळी होतात. असे मोकळे झाल्यावर मग मैफलीला बहार येते. अज्ञातावरचे आवरण दूर होते आणि मानवी मनाच्या गहन गूढतेचे अलौकिक दर्शन घडते. व.पु. काळे अशा या लौकिकातील अलौकिकाचे दर्शन घेण्यात रमतात आणि असे काहीतरी दिव्य भव्य समोर आल्यावर नतमस्तक होतात. आपल्या त्या अनुभवात ते मग आपल्या वाचकांनाही कधी कधी सामील करून घेतात. `चिअर्स` असे म्हणून, अनुभवाचा चषक उंचावून ते आपल्याला अशाच एका मैफलीत मनःपूर्वक सामील करून घेत आहेत. रसिकराज रामभूय्या दाते, जिंदादिल शायर– भाऊसाहेब पाटणकर, जाज्ज्वल्य हिंदुत्व निष्ठा जपणारे पु.भा.भावे अण्णा, शोधून न सापडणाऱ्या आणि मागून न मिळणाऱ्या आयुष्याचा जमेल तसा डाव मांडणारे गीतकार सुधीर मोघे, झोपेचा वेळ सोडला तर अखंड पुस्तक विक्रीचे व्रत चालवणारे आयडियलचे कांताशेठ नेरूरकर, तुम्हाला गाफील ठेवून तुमचा नेमका मूड कुशलतेने टिपणारे छायाचित्रकार राजदत्त, संगीतकारांच्या हुबेहुब नकला करणारे नकलाकार वि.र. गोडे, कुटुंबाच्या गरजा संपल्या की कर्तापुरुष कुटुंबाचं देणं लागत नाही; त्यानं चार भिंतीच्या बाहेर पडायला हवं तरच तो मोठा होईल, असे सांगणारे आणि त्याप्रमाणे वागणारे डॉ. श्रीखंडे, आपल्या हातचलाखीने बघता बघता हातातला रुपाया गायब करून चकित करणारे जादूगार अशोक अशा माणसांना `चिअ र्स` म्हणून मैफलीत आणून वपुंनी या मैफलीचा थाट खुलविला आहे. इतरही माणसांना वपुंनी या मैफलीत सामील करून घेतले आहे. त्यात इंदूरचे ज्योतिषी अण्णा पुराणिक आहेत. या पुराणिकांनी बॅ. महमद अली जीना यांनाही आपल्या ज्योतिषशास्त्राच्या बळावर काबीज केले. मोरारजीभार्इंनी मुख्यमंत्री असताना सचिवालयातील कार्यालयात बोलावले तेव्हा ``माफ करा. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत देशाच्या भवितव्याचा विचार करायचा, स्वतःचा नव्हे.`` असे त्यांना सुनावण्याएवढा परखडपणाही अण्णा दाखवतात आणि `अपॉइंटमेंट शिवाय मला कुठल्याही दिवशी सकाळी चहाच्या वेळी भेटू शकता` असा कायमचा पास मिळवून ठेवतात. `हे अण्णा मैफलीच्या बादशहांचे बादशहा असतात. वेळ, काळ, रात्र, दिवस, वय, वर्ष कशाचाही हिशेब नसतो. वपुंच्या इंदौरच्या ट्रिपा अण्णांमुळे संस्मरणीय होतात आणि इंदौरच्या स्वागताच्या एकूणच खानदानीपणाच्या गोष्टी सांगण्यात मशगुल होतात. वपुंची कुंडली ते मागतात. वपु त्यांना सांगतात, ``अण्णा, तसा खूप गोष्टींचा कंटाळा आलाय. नोकरी, दौरे, लेखन, कथाकथन सगळी पळापळ फुकट आहे. सगळं चांगलं असून वैयर्थाची भावना छळत राहते. केव्हातरी हे सगळं थांबायला हवं. एकदम वेगळा, चिरंतन प्रवासाचा ट्रॅक हवाय.`` त्यावर अण्णा सांगतात– ``तुमचा कर्केचा गुरू आहे. रास तूळ आहे. वैराग्याचा सूर कायमच राहणार. काहीही करायचं नाही. काहीही सोडायचं नाही. जुनं सगळं करता करताच नवं सापडेल. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी आपण प्रथमच श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच की नाही?`` `चित्रलेखा` नाट्यसंस्थेचे अध्वर्यू मोहन वाघ हे उत्तम छायाचित्रकारही आहेत. वपुंनी मोहन वाघ आणि पंजा नामक मासिक चालवणारा खराखुरा वाघ यांच्यातील सामना घडवून आणला आहे. या खऱ्याखुऱ्या वाघाला वाघीण नावाच्या नव्या मासिकासाठी मुखपृष्ठावर टाकण्याकरिता चित्र हवे आहे. संपूर्ण विवस्त्र अवस्थेतील चित्र वाटायला हवे आणि ते काढायला आपले सोज्ज्वळ मोहन वाघ तयार होत नाहीत. वाघांच्या रानटी दुनियेत वाघ मादीने कपडे घालणे हीच अश्लीलता समजली जाते. त्यामुळे डोक्यावरून पदर घेतलेला, हातात तबक असलेला नटीचा फोटो बघून हा पंजा मासिकाचा संपादक गर्जना करीत ओरडतो, ``तुम्ही सभ्य आहात असं समजत होतो. पण तुमच्याजवळ एवढा घाणेरडा फोटो?`` आणि तो सरळ मोहन वाघांवर उडी घेतो. अर्थात दोन वाघांची ही सगळी मुलाखत स्वप्नात होते असे दाखवून व.पु. काळे वाचकांना (आणि मोहन वाघांनाही) वाचवतात– हे अलाहिदा! नाहीतर मोहन वाघांना `ऑल दि बेस्ट` किंवा `रणांगण` सादर करण्याची संधी कशी लाभली असती? जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरचा या पुस्तकातला लेख सर्वात जास्त लांबीचा आहे. त्यात अनेक शेरही उद्धृत केले आहेत. दुर्लक्षिले जेव्हा आम्ही साहित्यिकांना या अशा मैफलीही जागजागी रंगल्या जेव्हा अशा जेव्हा कुठे कीर्ती प्रियाही हासूनी आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे.`` असा भाऊसाहेबांचा अनुभव. वपुंना ते समानधर्मी वाटावेत यात नवल काय? `चिअर्स` मधील सर्वात वाचनीय लेख कुठला असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मिळेल– `निगुडकर.` तुम्हाला प्रश्न पडेल हे काय प्रकरण आहे? हे नाव तर काही आमच्या परिचयाचे नाही. मग या व्यक्तीवरचा लेख सर्वात वाचनीय असे का म्हणताय?... निगुडकर म्हणजे वपुंच्या सौभाग्यवती. आता कोणीही पुरुष आपल्या बायकोवर लिहितो तेव्हा तो मजकूर वाचनीय असणारच! तर वपु कधीकाळी म्हणे घरोघर जाऊन साड्या विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यात या `निगुडकर` ची गाठ पडली. ती म्हणे रोज एक साडी ठेवून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी हिचा रंग पसंत नाही, म्हणून दुसरी साडी बदलून घ्यायची. असा हा सिलसिला दीर्घकाळ चालू राहिला. वपुंनाही तिच्या घरी राजरोस रोजरोज जायला निमित्त मिळत राहिले. तिचे भाऊ डोळ्यांत तेल घालून पहारा करीत असतानाही वपुंनी हा किल्ला सर केला. ``निगुडकर वस्तादच. लग्न होईतो निगुडकरांच्या नावानं एकाही साडीसाठी आम्हाला पावती फाडता आली नाही``, वपु कबुली देतात. निगुडकर म्हणे, ``मी यांच्या केसावर भाळले.`` वपु म्हणत, ``मी हिच्या गाण्यावर भाळलो.`` कालांतराने वपुंचे केस गेले; निगुडकरचे गाणेही गेले. अशा खूप गमती-जमती या लेखात आहेत. वपु स्वतःच्या फिरक्या घेत त्या सर्व सांगतात. वपुंना-निगुडकरला सून येते; नातवंडांची चाहूल लागते. सव्वीस वर्षांच्या सहवासाने एकमेकांचे स्वभाव सही न् सही समजले आहेत. असे कोणालाही वाटते. पण निगुडकर बोलून जाते, ``तुमच्या काळ्यांच्या घरात टिकणं ही एक अवघड गोष्ट आहे.`` सव्वीस वर्षे काळ्यांच्या या घरात राहूनही `तुमचं काळ्यांचं घर` ही भाषा उरतेच. `चिअर्स`ची झिंग थोडीफार उतरायलाही अशी काही निरीक्षणे उपयोगी ठरतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more