SURESH VASANT NAIK

About Author

Birth Date : 01/04/1900


EDUCATION: B. SC., LL. B. ASSOCIATE OF KRANTIVEER BHAGATINSAG AND RAJGURU AND RENOWNED LAWYER IN PUNE KAI SON OF VASANTRAO NAIK. STARTED THE LEGAL PROFESSION AND LATER WORKED AS A GOVERNMENT PROSECUTOR. APPOINTMENT AS JUDGE AT VARIOUS PLACES IN MAHARASHTRA. WORKED AS DISTRICT JUDGE AT KOLHAPUR, AKOLA, SANGLI, ALIBAG. SERVED AS PRESIDENT OF MAHARASHTRA INDUSTRIAL TRIBUNAL IN MUMBAI. AFTER RETIREMENT WORKED AS ADVOCATE IN HIGH COURT AND SUPREME COURT.

शिक्षण : बी. एस्सी., एलएल. बी. क्रांतिवीर भगतिंसग व राजगुरू यांचे सहकारी व पुण्यातील नामंवत वकील कै. वसंतराव नाईक यांचे पुत्र. वकिली व्यवसायास प्रारंभ करून नंतर सरकारी वकील म्हणून काम केले. महाराष्ट्रामध्ये न्यायाधीश म्हणून निरनिराळ्या ठिकाणी नियुक्ती. कोल्हापूर, अकोला, सांगली, अलिबाग येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबईमध्ये महाराष्ट्र औद्योगिक न्यायाधिकरण येथे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. निवृत्तीनंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत. आय.एल.एस., सिम्बॉयसिस लॉ कॉलेज व इतर कॉलेजमध्ये कायदा या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत. इतर कार्य : विश्वकोशाचे अभ्यागत संपादक म्हणून निरीक्षण व स्फुटलेखन. मासिक व वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन, प्रवासवर्णनपर लेखन प्रसिद्ध, कृषिवल, केसरी, श्री समर्थ मासिक, साईबोध मासिक इ. ठिकाणी लेखन. तसेच रामदासस्वामी न्यायसंस्थेमध्ये काम केले.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
KAVITA DOGHANCHI Rating Star
Add To Cart INR 90
YA SUKHANNO Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more