* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BEFORE MEMORY FADES
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9788184985245
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 480
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
STARTING WITH HIS FORMATIVE YEARS, WHEN HE HAD THE GOOD FORTUNE TO INTERACT WITH MANY EMINENT JUDGES AND ADVOCATES,659~ MOVES ON TO DEAL WITH A WIDE VARIETY OF IMPORTANT SUBJECTS, SUCH AS: THE SANCTITY OF THE INDIAN CONSTITUTION AND ATTEMPTS TO TAMPER WITH IT. CRUCIAL CASES THAT HAVE MADE A DECISIVE IMPACT ON THE NATION, ESPECIALLY ON THE INTERPRETATION OF THE LAW. THE RELATIONSHIP BETWEEN THE POLITICAL CLASS AND THE JUDICIARY. THE CANCER OF CORRUPTION AND HOW TO COMBAT THIS MENACE. THE AUTHOR OUTLINES MEASURES TO RESTORE THE NOW-LOW CREDIBILITY OF THE LEGAL PROFESSION. HE ALSO DELINEATES HIS ROLE IN SEVERAL HIGH-PROFILE CASES. IN RECOGNITION OF HIS TRACK RECORD, THE GOVERNMENT OF INDIA NOMINATED HIM TO THE RAJYA SABHA. HE DESCRIBES THE HIGHLIGHTS OF HIS TENURE THERE. BOTH MEMBERS OF THE LEGAL PROFESSION AND THE LAY READER WILL FIND THE CONTENTS INFORMATIVE AND USEFUL.
शासन, प्रशासन आणि न्यायसंस्था यांच्यातील संबंध आणि शासनाच्या फायद्यासाठी, सत्तेचे वर्चस्व टिकवण्यासाठी न्यायालयीन निर्णयांचा राजकारण्यांकडून केला जाणारा वापर – कायदा आणि न्यायव्यवस्था यांची ढासळती प्रतिमा व प्रतिष्ठा सावरण्याचे, त्यांची विश्वासार्हता परत मिळविण्यासंबंधी केलेले उत्तम मार्गदर्शन – आणीबाणी आणि भोपाळ वायुगळती दुर्घटना यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांबाबत स्वत:ची भूमिका – आणि राज्यसभेतील कारकिर्दीचे तपशीलवार वर्णन याद्वारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ फली नरीमन यांनी वाचकांशी साधलेला हा प्रांजळ संवाद!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDARSHANATHAWALE #TRAVELLINGTOINFINITY:MYLIFEWITHSTEPHEN #ट्रॅव्हलिंगटूइन्फिनिटी #BIOGRAPHY #BEFOREMEMORYFADES #बिफोरमेमरीफेड्स #AUTOBIOGRAPHY "
Customer Reviews
  • Rating StarCampus Express

    Published by the pioneers in Marathi Publishing Industry Mehta Publishing House, Before Memory Fades is not just a book but a classic piece of art. It is a commentary on the most important court cases like Shankari Prasad (1951), Sajjan Singh (1965),Golaknath (1967), Keshavananda Bharti (1973), and Minerva Mills (1980) which laid the fundamental basis of the Indian Constitution, Nariman recalls some of the most touching family sentiments, when he was offered High Court Judgeship at the age of 38 but declined the honour for financial reasons. Born on the January 10 of 1929, at the General Hospital in faraway Rangoon, to a Zoroastrian, or (Parsis) family as they are called, Fali Sam Nariman, ‘Baba’ to his parents, had to leave for India and take refuge when the Japanese bombed Rangoon in December 1941, during the second World War. Little did they know that their son would rise to become one of India’s greatest lawyer of all times. This autobiography gives a detailed insight of the National Emergency in 1975, when he was the Additional Solicitor General of India, Fali recalls of those days like 12th June 1975 when Justice Jagmohan Lal Sinha of the Allahabad High Court pronounced the judgment in the election petition filed against Indira Gandhi by Raj Narain where she was held guilty of corrupt practice and thus was disqualified from holding any public office and events following this. Nariman’s book describes the circumstances and facts of the greatest industrial accident, The Union Carbide Gas Leak at Bhopal in 1984 in real. The lead counsel for the Union Carbide Corporation received severe criticisms while representing the company Tribune des Droits Humains described him as a ‘Fallen Angel’, questioning his reputation as a human rights activist. In one of the most important cases (Second Judges Case) decided by the Supreme Court Nariman appeared and won, ‘A Case I Won – But I Would Prefer To Have Lost’. Criticizing his own win, Narman said ‘I don’t see what is so special about the first five judges of the Supreme Court. They are only the first five in seniority of appointment – not necessarily in superiority of wisdom or competence. I see no reason why all the judges in the highest court should not be consulted when a proposal is made for appointment of a high court judge (or an eminent advocate) to be a judge of the Supreme Court. I would suggest that the closed-circuit network of five judges should be disbanded.’ While reading this book, one can sense that that is is not only an autobiography but describes India’s political and constitutional history with utmost sincerity and transparency. Mehta Publishing House, the largest Marathi book publisher’s in the world known for translating the best of world literature in Marathi have made this book available in Marathi language for Marathi Readers. The good news is that this book shall soon be available in DRM enabled e-book format for the next gen population and those living a hectic life. The simplest language, legal & typical jargons managed by author Fali. S. Nariman as well as the translator Sudarshan Athawale, creates a beautiful flow of story of Nariman’s life. This book stands true in quality in terms of binding, fonts, cover page & content. Before Memory Fades is much more than a chronological account of an eminent lawyer and humble person’s successful life. It is the work of a storyteller whose observations about places, people and circumstances add up to provide a unique insight into the legal profession, from the early years of independence when a young Fali joined the Bombay Bar and did ‘more watching than pleading.’ It is a classic example of an extraordinary life lived so ordinarily and is much more than just a collection of anecdotes and reflections on the events and people that have filled his life. This book is a must read for all who have admires the living legend Mr. Fali Sam Nariman who was awarded the Padma Bhushan (1991) and Padma Vibhushan (2007), by the President of India in recognition of distinguished service in the field of jurisprudence and public affairs. ...Read more

  • Rating StarVIJAY DARDA (MP)

    Dear Respected Shri Fali Nariman It was indeed a great pleasure to receive the Marathi translation of your celebrated autobiography. It was an unusual account of an unusual life that out shown others in the legal field in India. your sense of humor picturization of the times you lived in so fruitfully comes out alive in every page. The Marathi translation by Mr. Sudarshan Athavale is equally brilliant & is a true depiction of the original in English. The writer seems to have captured the ca would surely add to the richness of Marathi literature. It would certainly enrich the Marathi readers. The Marathi man of letters is always fascinated by brilliant autobiographies & this edition is sure to be a proud possession for them. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, LOKRANG 10 AUGUST

    प्रामाणिक व मार्गदर्शक अनुभवकथन... देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले ज्येष्ठ विविध फली नरिमन यांनी आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या हक्कांचे अंतिम आश्रयस्थान असलेले सर्वोच न्यायालय कसे वागले, यावर मार्मिक विवेचन केले आहे. ‘बिफोर मेमरी फेड्स..’ हे त्यांचे आत्मकथन. विधिवर्तुळात अतिशय आदराने ज्यांचे नाव घेतले जाते आणि त्यांच्या देदीप्यमान कामगिरीचा आलेख सतत उंचावत गेला, असे हे व्यक्तिमत्त्व. नरिमन हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे व स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आहेत. आणीबाणी लागू होताच निषेध व्यक्त करण्यासाठी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदाचा राजीनामा त्यांनी तात्काळ सरकारकडे पाठवून दिला होता. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या या अधिकारांची जी गळचेपी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्या बाबत ‘ब्र’ ही न काढता ती निमूटपणे सहन केली, या विषयी नरिमन यांनी आपला संताप अतिशय तीव्र शब्दांमध्ये नोंदवला आहे. एडीएम जबलपूर प्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने ‘कयद्याने राज्य’ हा ‘अविचारी विचार’ मांडला. नशीब बलवत्तर म्हणून तो घटनाकारांनी संविधानाचा पाया म्हणून स्वीकारलेला नाही. हा विचार ‘कायद्याचे राज्य’ असाच असला पाहिजे. म्हणजे राजदंड व न्यायदंड न्यायालयाच्या हाती राहिल. ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना म्हणजे त्याला न्यायसंस्थाही आव्हान देऊ शकत नाही. परिणामी लोकप्रतिनिधींच्या हाती निरंकुश सत्ता एकवटेल. मी ‘कायद्याने चालवलेल्या राज्यापेक्षा कायद्याच्या राज्यात’ राहणे पसंत करीन, असे नरिमन यांनी नि:संदिग्धपणे या आत्मकथनात सांगितले आहे. नरिमन कुटुंब हे ब्रह्मदेशातील रंगूनचे. दुसऱ्या महायुद्धाच्या झळा बसू लागल्याने भारतात येण्याची वेळ त्यांच्यावर आली. १९५० मध्ये नरिमन यांनी वकिलाची सनद घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रख्यात वकील सर जमशेदजी कांगा यांच्याकडे काम सुरू केले होते. ते नरिमन यांना गुरुस्थानी. कांगा हे अतिशय ज्ञानी व निर्गवी व्यक्तिमत्त्व. हरिलाल कनिया (भारताचे प्रथम सरन्यायाधीश) यांच्यासह अनेक ज्येष्ठ न्यायमूर्ती, वकील त्यांच्याबरोबर काम करून पुढे महत्त्वाच्या पदांवर गेले किंवा ख्यातनाम वकील झाले. मुख्य न्यायमूर्ती एम. सी. छागला यांच्या व्यक्तिमत्त्वानेही नरिमन आकर्षिक झाले. मुंबईतील मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती आणि जेष्ठ वकिलांबरोबरच्या विविध अनुभवांमधून आपण कसे शिकत गेलो, याचे विस्तृत विवेचन नरिमन यांनी या आत्मकथनात केले आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयांपासून उच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र काम केले. सर्वोच्च न्यायलयात वकिली करीत असताना असंख्य महत्त्वाच्या याचिकांमध्ये नरिमन यांनी काम पाहिले. देशाच्या इतिहासात आणि न्यायालयीन वर्तुळात महत्त्वाच्या असलेल्या घटनात्मक प्रकरणांमध्ये त्यांनी हिरीरीने बाजू मांडली या संदर्भातील घटनापीठांच्या निर्णयांचे नरिमन यांनी परखड विवेचनही केले आहे. पथदर्शक न्यायमूर्ती म्हणून सरन्यायाधीश के. सुब्बाराव आणि न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा उल्लेख यांनी केला आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणून २१व्या कलमाचा व्यापक अर्थ सुब्बाराव यांनी खरकसिंग प्रकरणात स्पष्ट केला. कोणाही व्यक्तीस एका जागेवरून दुसऱ्या जागी कोणत्याही नियंत्रणावाचून, निर्बंधावाचून जाण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी नमूद केले. गोलकनाथ प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यासाठी केशवानंद भारती प्रकरणात सरन्यायाधीश एस.एम.सिक्री यांच्या अध्यक्षतेखाली १३ न्यायमूर्तीचे घटनापीठ १९७३ मध्ये स्थापन करण्यात आले होते. संसदेला कलम ३६८ नुसार घटनादुरुस्तीचे विस्तूत व विनाअट अधिकार असले तरी संविधानाच्या पायाभूत रचनेत बदल करण्याचा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही, असा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. पण या घटनापीठात जोरदार मतभेद झाले. तब्बल ११ निकलापत्रे वाचली गेली, ७ विरुद्ध ६ अशा बहुमताने दिलेल्या निर्णयाच्या अंतिम निकालपत्रावर फक्त ९ न्यायमूर्तींनी स्वाक्षरी केली. सिक्री यांच्यानंतर न्यायमूर्ती जे.एम.शेलाट हे ज्येष्ठतम न्यायमूर्ती होते. त्यांनी सरकार विरोधात मत नोंदवल्याने त्यांचा सरन्यायाधीशपदाचा हक्क डावलून न्यायमूर्ती ए.एन.रॉय यांना हे पद देण्यात आले. अशा न्यायालयीन वर्तुळातील महत्त्वाच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख आपल्या परखड टिप्पणीसह नरिमन यांनी आत्मकथनात केला आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर त्याविरुद्धची त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्यापुढे १९७५ च्या उन्हाळी सुट्टीकालीन न्यायमूर्ती म्हणून काम पाहताना आली. त्यावेळी त्यांनी कोणत्याही दबावाला न झुकता निकालाला सशर्त स्थगिती दिली. त्यामुळे इंदिरा गांधी यांना लोकसभेच्या कामकाजात भाग घेता आला नाही. त्यानंतर पुढे देशावर आणीबाणी लादली गेली. न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यंत्रणा यांनी कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणत्याही दबावाला न झुकता न्यायालयांनी राज्य घटनेतील तरतुदींचा व्यापक अर्थ लावत राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकारांची बूज राखली आणि काही अपवाद वगळता उच्च प्रथा व परंपरांचे पालन केले, याचाही आढावा नरिमन यांनी घेतला आहे. नरिमन यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीशांनी न्यायमूर्तीपद स्वीकारण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ठाम नकार दिला. त्याबद्दल कुठलाही पश्चात्ताप होत नसल्याचे नरिमन यांनी नमूद केले आहे. नर्मदा प्रकल्प, युनियन कार्बाईडसह आंतरराज्य पाणी लवाद आणि असंख्य महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आलेले अनुभव आणि राज्यसभा सदस्य काळात काय केले, यांचे विवेचनहीयात आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात नरिमन यांना कोणताही खेद नाही. कृतार्थतेचा आनंद ते अनुभवत आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात अनेकांनी प्रेम व आनंद दिला, भरभराट झाली आणि येथेच समाधानाने मरण येवो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या आत्मकथनाचा शेवट केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more