* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DENIAL : A MEMOIR OF TERROR
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9788184989922
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :JAGATIK NISHPAP MULANCHA KRUR BALI DIVAS SET 2
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN THIS SKILLFULLY WROUGHT, POWERFUL STUDY, A TERRORISM EXPERT, NATIONAL SECURITY ADVISER (THE ULTIMATE TERRORISTS), AND LECTURER AT HARVARD, RETURNS TO A DEFINITIVE EPISODE OF TERROR IN HER OWN EARLY LIFE AND TRACES ITS GRIM, DAMAGING RAMIFICATIONS. HAVING GROWN UP IN CONCORD, MASS., IN 1973, STERN, THEN 15, AND HER SISTER, A YEAR YOUNGER, WERE FORCIBLY RAPED AT GUNPOINT BY AN UNKNOWN INTRUDER; WHEN THE POLICE REOPENED THE CASE IN 2006, STERN WAS COMPELLED TO CONFRONT THE DEVASTATING EXPERIENCE. THE POLICE INITIALLY TIED THE CASE TO A LOCAL SERIAL RAPIST, WHO SERVED 18 YEARS IN PRISON BEFORE HANGING HIMSELF. STERN`S PAINFUL JOURNEY TAKES HER BACK TO THE TRAUMATIC AFTERSHOCKS OF THE RAPE, WHEN SHE BEGAN TO AFFECT A STERN, HARD VENEER NOT UNLIKE THE STIFF-UPPER-LIP APPROACH TO SURVIVAL HER OWN GERMAN-BORN JEWISH FATHER HAD ASSUMED AFTER HIS CHILDHOOD YEARS LIVING THROUGH NAZI PERSECUTION. COVERING UP HER DEEP-SEATED SENSE OF SHAME WITH ENTRENCHED SILENCE, STERN HAD A CLASSIC POST-TRAUMATIC STRESS DISORDER—WHICH SHE WAS ONLY ABLE TO RECOGNIZE AFTER HER OWN WORK INTERVIEWING TERRORISTS. STERN`S WORK IS A STRONG, CLEAR-EYED, ELUCIDATING STUDY OF THE PROFOUND REVERBERATIONS OF TRAUMA.
फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडं झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतवंचनाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक... एका धाडसी विषया चातितकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्यासमाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DENIALAMEMOIROFTERROR #DENIALAMEMOIROFTERROR #डिनायल #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MAITREYEEJOSHI #JESSICASTERN "
Customer Reviews
  • Rating StarShrikant Adhav

    अलीकडच्या काळात भारतातही स्त्रियांवरच्या बलात्काराच्या, हिंसाचाराच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. त्यातही अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचं प्रमाण खूप आहे. स्त्रिया विशेषत: मुली या घटनेला कशा सामोऱ्या जात असतील! अनेक मुलींना लैंगिकतेचा, लैंगिक संबंधााकाही अनुभव नसतो, त्यांना काय वाटत असेल? या घटनेनंतरची त्यांची मानसिक स्थिती कशी होत असेल? कशा प्रकारची भीती-दहशत त्यांच्या मनात निर्माण होत असेल? हा प्रसंग पुढच्या आयुष्यात त्या विसरू शकत असतील का? सर्वसामान्य आयुष्य त्या जगू शकत असतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिनायल या पुस्तकात मिळतात. इतकंच नाही तर ज्या बलात्काऱ्यांबद्दल आपल्या मनात तीव्र संताप आणि चीड निर्माण होते, ते असा क्रूरपणा का करत असतील याच्याही मानसिकतेचा तपशीलवार शोध घेतलेला दिसतो. या पुस्तकाची लेखिका आहे जेसिका स्टर्न, नावाप्रमाणेच अतिशय करारी स्त्री. जेसिका हॉवर्ड विद्यापीठात दहशतवाद या विषयाची व्याख्याती आहे.दहशतवाद्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन तिने टेरर इन द नेम ऑफ गॉड आणि द अल्टिमेट टेररिस्ट ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील अशा सात विचारवंतांपैकी एक म्हणून टाइम मॅगेझिनने तिची निवड केली होती. ती आणि तिची धाकटी बहीण सारा या दोघींवर एका अनोळखी माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला होता. डिनायल हे जेसिकाच्या स्वानुभवावर आधारित आत्मवृत्त आहे. बलात्कारापूर्वीचं तिचं आयुष्य, बलात्कार होतानाचं आणि बलात्कारानंतरच्या तिच्या मानसिकतेचं तपशीलवार वर्णन जेसिका करते. बलात्कारापेक्षाही तिला जास्त धक्का बसतो तो पोलीस, समाज, नातेवाईक, यांच्या वागणुकीमुळे. पोलीस घटनेचा पुरता तपास करत नाहीत, जेसिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परिणामी तो बलात्कारी नंतरच्या तीन वर्षांच्या काळात आणखी ४४ मुलींवार बलात्कार करतो. अस्वस्थेबरोबरच गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडं झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतवंचनाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक... एका धाडसी विषया चातितकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्यासमाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात. ...Read more

  • Rating StarDaily Loksatta Chaturang 4-2-17

    निर्भया ... जेसिका स्टर्न, बलात्काराची एक घटना तिचं आयुष्य पार उलटं पालटं करून गेली, पण तिने आपल्या वेदनेलाच लेखणीचं माध्यम ठरवत दहशतवाद, हिंसा यांच्या मागचं सत्य जगापुढे आणलं. त्यासाठी ती अनेक देशातल्या दहशतवाद्यांना भेटली, त्यांच्या मुलाखती घेतल्ा. तिची ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा प्रवास ठरली आहेत. त्यासाठी तिला स्वत:मधल्या भीतीशी आधी लढावं लागलं. त्यावर मात करत, निर्भय होत जगभरातल्या पीडितांना आधार देणं, निर्भय करणं हेच तिनं आता आपलं जीवित कार्य ठरवलं आहे. ‘‘तो दिवस होता, सोमवार. तारीख १ ऑक्टोबर १९७३. माझी सावत्र आई लिसा माझ्या सावत्र बहिणींना घेऊन बाहेर जेवायला गेली होती. मी आणि माझी सख्खी बहीण सारा घरीच होतो. लिसाने आम्हाला आमचा ‘गृहपाठ करा,’ असं सांगितलं होतं. आम्ही दोघी आज्ञाधारकपणे आमचं काम करीत होतो. तेवढय़ात एक माणूस आत आला. त्यानं आम्हाला पिस्तूल दाखवलं व म्हणाला, ‘किंचाळू नका. खाली बघा.’ अर्थातच मी खाली बघितलं. मग म्हणाला, तो आम्हाला इजा करणार नाही. आम्ही गप्प बसायचं. ब्र काढला तरी तो आम्हाला ठार करेल. मग शांत राहून, समजूतदारपणे खाली मान घालून, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही जिना चढून वर गेलो. आमच्या पाठीला त्याचं पिस्तूल टेकवलेलं. त्यानंतर त्याने जे जे काही करायला सांगितलं ते ते आम्ही केलं. नंतर त्यानं माझ्यावर बलात्कार केला. मला काही कळेनासं झालं. मी भानरहित अवस्थेत गेले का? मी त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत होते का? असेन बहुधा. तसंच असेल! पण आज्ञाधारकपणे वावरणारी ती ‘मी’ कुणी तरी वेगळीच होते. माझ्या वागण्यात विचार आणि कृती यांचा मेळच नसावा. ज्याने माझ्या मनाचा ताबा घेतला, त्यानं माझ्या शरीराला निष्क्रिय, मूक आणि शांत राहण्याची आज्ञा दिली. किती वेळ गेला? माहीत नाही. कुणाचा आवाज? माझ्या बहिणीचा? वेदनेनं मला बाहेर काढलं. तिचं रक्षण मला करायचं होतं; पण त्याने तर आपला कार्यभाग तिच्या बाबतीतही साधला होता. मी भानावर आले; पण ‘ती’ मीच होते का याविषयी मला शंका आहे. तो म्हणाला, ‘पोलिसांना सांगू नका, आणखी गोत्यात याल.’ मी मान डोलावली. तो जाताना म्हणाला, ‘हे तर खेळण्यातलं पिस्तूल आहे.’ गाडीचा आवाज आला. तो गेला. सारा, माझी लहान बहीण आधी भानावर आली. तिने फोन फिरवला. फोन बंद. मी सैरभैर झाले. बलात्कारानंतर मी सुन्न अवस्थेत गेले. सारानेच सावरलं. बाहेर थंडीचा कडाका. तरी तिनंच बाहेर नेलं आणि एका हॉटेलमधून आम्हाला सांभाळणाऱ्या दाईला फोन केला. तिचा कसा विश्वास बसणार? आम्ही सुरक्षित गावात, चांगला शेजार असणाऱ्या घरात होतो; पण ती आली, फॅमिली डॉक्टरांना बोलावून तिनं आम्हाला दवाखान्यात नेलं. आमचे डॅड तेव्हा नॉर्वेला होते. ते कधी तरी आले, पण त्या वेळेपासून माझं जगच बदललं. अजूनही मी माझी मला पूर्णपणे सापडलेले नाहीये..’’ ..अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना. ती सांगतेय अमेरिकन संशोधक, अभ्यासक डॉ. जेसिका स्टर्न. अमेरिकेतल्या कॉन्कॉर्ड या सुप्रसिद्ध गावात राहणारी. वयाच्या पंधराव्या वर्षी झालेला हा आघात तिनं आणि तिच्या बहिणीनं कसा पचवला असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तासभर तिथे असणाऱ्या त्या बलात्काऱ्याने दोघी बहिणींवर बलात्कार केला. त्या एका तासात जेसिका पार बदलून गेली. तिच्या आठवणी तिने ‘डिनायल- अ मेमॉयर ऑफ टेरर’ – या नावाने प्रकाशित केल्या आहेत. त्या घटनेनंतर ती पुन्हा कशी उभी राहिली, आपलं मन ताळ्यावर आणून आयुष्य जगण्याचा प्रयत्न ती कसा करत राहिली याची ही कहाणी आहे. ती वाचताना तिच्याबद्दल दु:ख तर होतंच, पण तिच्या धाडसाबद्दल अभिमानही वाटतो, कौतुक वाटतं, आयुष्याचा वेगळा अर्थच जणू सापडतो. तो क्लेशकारक प्रसंग घडल्यावर त्या दोघी बहिणी एकमेकींना धरून होत्या. साराला तर किती तरी दिवस एकटीला झोपायची भीती वाटे. आपल्या घरात सगळे निर्भय आहेत. आपण भिऊन कसं चालेल, डॅड रागावतील या दडपणाने त्या तो प्रसंग मनाच्या तळात दडवत राहिल्या. काळ कुणासाठी कधी थांबत नाही. सावत्र आईने या काळात त्यांना सांभाळले, त्यांना समजून घेत जीवनचक्र चालू ठेवलं. दोघींची शिक्षणं झाली, लग्नं झाली. मुलं झाली. वरवर पाहता ठीक होतं; पण आपल्यासारखं कुणी भीतीला कवटाळून राहू नये, भीती व त्यातून येणारी निराशा लपवू नये, असं काही तरी करायची सुप्त इच्छा जेसिकाच्या मनात होती. ‘मग त्यासाठी तिनं काय केलं?’ असं विचारण्यापेक्षा ‘काय केलं नाही तिनं’ असंच म्हणायला हवं. शाळा संपवून ती कॉलेजमध्ये गेली. त्यानंतर १९८५ मध्ये तिने बर्नार्ड कॉलेजमधून रसायनशास्त्रात बी.ए. केलं. तेव्हा तिचा दुय्यम विषय होता- रशियन भाषा. १९८८ मध्ये अमेरिकेच्या एम.आय.टी. या सुप्रसिद्ध संस्थेतून एम.एस. केलं ते केमिकल इंजिनीयिरगमध्ये. त्या वेळी तिचा विशेष विषय होता, अमेरिकेची तंत्रज्ञानविषयक धोरणे. १९९२ मध्ये तिनं हार्वर्डमधून पीएच.डी. मिळवली ती लोकहितवादी (सार्वजनिक) धोरणांच्या विशेष विषयात. खरं म्हणजे तिला लेखनाविषयीचा अभ्यासक्रम घ्यायचा होता; पण त्यासाठी आवश्यक तेवढे गुण तिला मिळाले नाहीत. रसायनशास्त्र हा तिचा दुसरा आवडीचा विषय होता. तिने रसायनशास्त्रात काम करताना रासायनिक शस्त्रांवर संशोधन केलं, पण तिची तिला जाणीव होत होती की, आपल्याला काही वेगळं शोधायचं आहे. शिकत असतानाच दहशतवाद, हिंसा आणि माणसांमधील खलप्रवृत्ती यांचा अभ्यास करण्याचं तिनं मनावर घेतलं आणि १९८३ मध्ये दहशतवादावरील पहिला लेख तिने लिहिला. टॉक्सिक केमिकल्सचा वापर व केमिकल प्लान्ट्सवरील दहशतवादी हल्लय़ांच्या शक्यतेबद्दल सरकारला सावधानतेचा इशारा देणारा तो लेख होता. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंन्टन यांच्या कारकीर्दीत तिने ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ या अमेरिकेच्या उच्च पातळीवरील सुरक्षा समितीत काम केलं ते रशिया, युक्रेन आणि युरेशिया यांच्या बाबतीतील धोरण समितीची संचालक म्हणून. १९९२-१९९४ या काळात ‘लॉरेन्स लिव्हमोर नॅशनल लॅबोरेटरी’मध्ये खास विश्लेषक म्हणून ती काम करीत होती. ते करीत असताना, रशियामधील काही राजकीय घडामोडींमुळे दहशतवाद्यांच्या हाती, अणुशस्त्रांसंबंधित सामग्री लागण्याची शक्यता आहे व ते घातक ठरू शकेल, असा धोक्याचा इशारा तिने दिला होता. २००१ मध्ये ‘टाइम’ या प्रतिष्ठित नियतकालिकाने तिची जगातील सात विचारवंतांमध्ये निवड केली. त्यासाठीचा निकष होता, आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील असे विचारवंत! माणसांवरील आघात (ट्रॉमा) आणि हिंसा यावर तिने जे लेखन केलं त्यासाठी तिला २००९ मध्ये प्रतिष्ठित अशी ‘गुगनहाईम फेलोशिप’ मिळाली. त्यानंतर आजपर्यंत दहशतवाद, हिंसा व माणसांमधील खलप्रवृत्ती यांचाच ती अभ्यास करत आहे. या विषयातील जागतिक पातळीवरील तज्ज्ञ अशी तिची ख्याती आहे. जनकल्याणासाठी, मानवतेसाठी उपयुक्त असे संशोधन करून तिने काढलेले निष्कर्ष अमेरिकन सुरक्षा खात्यास साहाय्यकारी ठरले आहेत. आजवर तिची चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या मुलाखतींवर आधारित पहिले पुस्तक, ‘द अल्टिमेट टेररिस्ट्स’ (२००१), ‘टेरर इन द नेम ऑफ गॉड- व्हाय रिलिजस मिलिटन्टस् किल’ (२००४), ‘डिनायल’ (२०१०) आणि दीडेक वर्षांपूर्वी आलेलं ‘इसिस- द स्टेट ऑफ टेरर’ (२०१५). ही पुस्तकं म्हणजे जगभरच्या दहशतवादाचा आजवरचा प्रवासच आहे म्हणा ना! पण केवळ तेवढंच नाही. दहशतवाद्यांच्या मुलाखती घेण्यासाठी ती जगभर फिरली. सौदी अरेबिया, आखाती प्रदेश, पाकिस्तान, भारत, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, यासारख्या देशांमधून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांना भेटी, त्यांच्या प्रमुख, दुय्यम नेत्यांना भेटणं, प्रश्नावली देऊन उत्तरं मिळवणं अशा अनेक मार्गाचा अवलंब करत ती गेली. धार्मिक दहशतवादाचा फार बारकाईने तिने विचार केला आहे. त्याची वेगवेगळी रूपे, त्यामागची कारणे कोणती, त्या संघटनांमधील नवीन भरती कशी होते, त्यांचे क्रौर्य कशातून जन्माला येते हे सांगताना त्यांच्या दृष्टीने सत् आणि असत् यांचे सापेक्ष रूप कसे ठरवले जाते, सामान्य जनतेलाही त्यांचे आकर्षण कसे व का वाटते अशा अनेक गोष्टी तिने यात वर्णन केल्या आहेत. भाषा अगदी सोपी, लिहिण्यातली तळमळ व अचूकता यामुळे तिची पुस्तके ‘वाचलीच पाहिजेत’च्या यादीत पहिल्या दहांमध्ये राहिली. इसिस या संघटनेच्या जन्मापासून तिचे रूप कसे होते, कसे आहे, इतर दहशतवादी संघटनांपेक्षा तिची कार्यप्रणाली कशी वेगळी आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाचा वापर त्यांनी किती प्रभावीपणे केला आहे याचे अतिशय सखोल विवेचन तिच्या या पुस्तकात दिसते. त्यांच्याविरुद्ध आपणही सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करू शकतो हे ती सांगते. दहशतवाद हा आज आपल्यासाठी दूरस्थ विषय राहिला नसून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे, कारण तो आपल्या घरात आला आहे. त्याचे रूप विलक्षण क्रूर व भीतीदायक आहे, ते तुम्हाला विळखा घालत आहे तेव्हा सावध राहण्याचा इशारा जेसिका आपल्या लेखनातून सतत देत आहे. यासाठी सरकारी उच्च स्तरावरून तिचे प्रयत्न चालू आहेत. तरीही या साऱ्या उज्ज्वल कारकीर्दीतही तिचं मन अस्वस्थ होतं. तिचं तिला ते कळत होतं. तिला हळूहळू जाणवत होतं की, आपण एकीकडे करारी, निर्भय अधिकारी असलो तरी दुसरीकडे बलात्कारपीडित, लज्जेनं काळवंडलेली एक जेसिकाही आपल्यात आहे. ‘तिला’ आपल्यातून बाहेर काढून मोकळी करणं भाग आहे. आपल्याला दहशतवादाची भीती वाटतेय का? असेल तर ती विघातक आहे, ती काढून टाकायला हवी. तसं होत नाही तोवर आपण असं दोन स्तरांवर जगत राहणार का? अशा विचारांनी ती मध्येच सैरभैर होई. अतिशय भीती आणि आत्यंतिक आनंद या भावना देखील तिला अनुभवता येत नव्हत्या. तिच्या साऱ्या भावनाच जणू गोठून गेल्या होत्या. जेसिकाने दहशतवाद व हिंसा असा विषय जेव्हा निवडला त्या वेळी हा काही अभ्यासाचा विषय म्हणून निवड करण्याजोगा नाही असंच साऱ्यांचं मत होतं. शिवाय स्त्रियांनी यात काम करणं ही गोष्ट असंभवनीय असंच साऱ्यांना वाटत होतं. तिला मात्र याच विषयात काम करण्याची आतून इच्छा होती. असं का? दहशतवाद या विषयात मला का आवड वाटते? त्या विषयाकडे वळताना मला भीती कशी वाटली नाही? असे प्रश्न तिला आधी पडले नव्हते; पण भूतकाळात घडलेल्या बलात्काराच्या त्या घटनेनंतर तिच्यावर झालेला जो परिणाम होता, त्यामुळे ती नकळत या विषयाकडे वळली होती. हा एक विरोधाभासच होता. मोठय़ा आघातानंतर येणाऱ्या तणावामुळे माणसाचे वागणे बदलते. अनेकदा त्याच्या वर्तनात जाणवेल-न जाणवेल अशी विकृती निर्माण होते. त्याला पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस डिसऑर्डर (ढळरऊ) असे म्हणतात. तिचं तिला हे कळायला, किंबहुना तिला ते स्वीकारायला मात्र तब्बल तेहेतीस वर्षांचा काळ जावा लागला. खरे म्हणजे १९७३ मध्ये पोलीस चौकीत या बलात्काराच्या गुन्ह्य़ाची नोंद झाली. त्याआधी तेथील आजूबाजूच्या परिसरात १९७१ ते १९७३ या काळात तेथे बलात्कारांच्या ४४ पेक्षा अधिक घटनांची नोंद झाली होती असे पोलीस फाइलमध्ये दिसते; परंतु पोलिसांना तेव्हा त्यात काही धागा सापडेना. त्यांनी ती फाइल बंद केली होती. २००६ मध्ये जेसिकाविषयी आस्था असणारा, शाळेतील तिचा वर्गमित्र, पोलीस अधिकारी होता. तो तेथे आला आणि त्याने ती बंद फाइल परत उघडली. तिच्याशी संपर्क साधला. पाठपुरावा करत हे सारे बलात्कार एकानेच केले हे दाखवले. मात्र त्याआधीच अमली पदार्थाचे सेवन करण्याच्या गुन्ह्य़ासाठी त्याच गुन्हेगाराला अठरा वर्षांचा तुरुंगवास झाला होता, त्याने बाहेर आल्यावर आत्महत्या केली, हेही तिला कळले. ती एक प्रकारे मुक्त झाली. आतापर्यंत तिच्या लक्षात आले होते की, कोणत्याही भयानक प्रसंगात आपल्याला भीती वाटत नाही, पण विशिष्ट गंध, क्षुल्लक पण विशिष्ट आवाज, यांच्यामुळे आपण अत्यंत घाबरतो. तसेच दहशतवाद्यांच्या मुलाखती घेताना, दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर त्यांना भेटताना भीती वाटत नाही हे खरे, तरी आपण अनैसर्गिकरीत्या शांत राहतो. त्यावरची एक उपाययोजना म्हणून, मानसशास्त्रज्ञांच्या सल्लय़ानुसार तिने या नकोशा वाटणाऱ्या, मनाच्या तळाशी खोल दडवल्या गेलेल्या आठवणी लिहायला सुरुवात केली. त्यातून किती गोष्टी बाहेर आल्या. ज्या आपल्या मनाशी कबूल करणंही कठीण असतं, त्या गोष्टी मोठय़ा धाडसानं तिनं जगासमोर मांडल्या. ते करताना मनाशी केवढा तरी संघर्ष करावा लागला. कुटुंबाचा, नातेवाईकांचा रोष पत्करावा लागला. एक प्रकारच्या बेभान अवस्थेतच ते लेखन तिनं केलं. भावनांचे वादळ, अनेक पातळ्यांवरील फ्लॅशबॅक, शरम वाटत असतानाही गरज म्हणून अलिप्तता राखत लिहिणं हे सारं दिव्य तिनं पार पाडलं. हेतू कोणता? तर वैयक्तिक, अत्यंत खासगी असं न मानता लिहिलं म्हणजे अशाच पीडितांना आधार वाटेल. बलात्कारासारखा नीच पातळीवरचा गुन्हा समाज पटकन विसरतो, ते करणारा उजळ माथ्याने फिरतो, पण पीडित व्यक्ती वा तिचं कुटुंब मात्र उद्ध्वस्त जीवन जगत राहतात-मरण येत नाही म्हणून! मला वाटतं ‘डिनायल-अ मेमॉयर ऑफ टेरर’ ही केवळ जेसिकाची आत्मकहाणी नाही. अनेक गोष्टींची भीती बाळगत, सत्याचा अस्वीकार करत जगणाऱ्या पीडितांना आणि समाजालाही ती सत्य जाणून घेत, ते समजून घेण्याची प्रेरणा देतेय- भीतीचा, दहशतीचा अस्वीकार करून, आपल्या वेदनेला जाहीर वाचा फोडून! डॉ. मीना वैशंपायन ...Read more

  • Rating StarMILUN SARYAJANI - FEB 2017

    अलीकडच्या काळात भारतातही स्त्रियांवरच्या बलात्काराच्या, हिंसाचाराच्या बातम्या रोज वाचायला मिळतात. त्यातही अल्पवयीन मुलींवरच्या बलात्काराचं प्रमाण खूप आहे. स्त्रिया विशेषत: मुली या घटनेला कशा सामोऱ्या जात असतील! अनेक मुलींना लैंगिकतेचा, लैंगिक संबंधाा काही अनुभव नसतो, त्यांना काय वाटत असेल? या घटनेनंतरची त्यांची मानसिक स्थिती कशी होत असेल? कशा प्रकारची भीती-दहशत त्यांच्या मनात निर्माण होत असेल? हा प्रसंग पुढच्या आयुष्यात त्या विसरू शकत असतील का? सर्वसामान्य आयुष्य त्या जगू शकत असतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला डिनायल या पुस्तकात मिळतात. इतकंच नाही तर ज्या बलात्काऱ्यांबद्दल आपल्या मनात तीव्र संताप आणि चीड निर्माण होते, ते असा क्रूरपणा का करत असतील याच्याही मानसिकतेचा तपशीलवार शोध घेतलेला दिसतो. या पुस्तकाची लेखिका आहे जेसिका स्टर्न, नावाप्रमाणेच अतिशय करारी स्त्री. जेसिका हॉवर्ड विद्यापीठात दहशतवाद या विषयाची व्याख्याती आहे. दहशतवाद्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन तिने टेरर इन द नेम ऑफ गॉड आणि द अल्टिमेट टेररिस्ट ही दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे आपल्या अभिनव कल्पनांनी जग बदलतील अशा सात विचारवंतांपैकी एक म्हणून टाइम मॅगेझिनने तिची निवड केली होती. ती आणि तिची धाकटी बहीण सारा या दोघींवर एका अनोळखी माणसाने पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केला होता. डिनायल हे जेसिकाच्या स्वानुभवावर आधारित आत्मवृत्त आहे. बलात्कारापूर्वीचं तिचं आयुष्य, बलात्कार होतानाचं आणि बलात्कारानंतरच्या तिच्या मानसिकतेचं तपशीलवार वर्णन जेसिका करते. बलात्कारापेक्षाही तिला जास्त धक्का बसतो तो पोलीस, समाज, नातेवाईक, यांच्या वागणुकीमुळे. पोलीस घटनेचा पुरता तपास करत नाहीत, जेसिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. परिणामी तो बलात्कारी नंतरच्या तीन वर्षांच्या काळात आणखी ४४ मुलींवार बलात्कार करतो. अस्वस्थेबरोबरच गंभीरपणे विचार करायला लावणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद मैत्रेयी जोशी यांनी केला आहे. – अंजली मुळे पुणे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more