* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387319950
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“ARCHITECTURE IS THE MOTHER OF ARTS.” THAT WAS MERELY A ‘LETTERING’ EXERCISE IN THE INITIAL WEEKS OF ARCHITECTURE SCHOOL. MY MIND OFTEN DRAWS UPON THE PARAPHRASE. MY THREE-DECADE LIFE IN ARCHITECTURE BROUGHT UNMATCHED GRATIFICATION AND JOY ALONG WITH LIVELIHOOD; BUT ARCHITECTURE ALSO UNFOLDED SOMETHING MORE. ARTS WERE ALWAYS SOUL TO ME BUT IT WAS DURING MY ARCHITECTURAL EXPLORATIONS THAT THE LINES BETWEEN ARTS TRULY DIFFUSED AND I SAW THEIR OVERLAPS LENDING NEW BEAUTIFUL SHADES TO A NEW ARTISTIC AMALGAM. MUSIC, DANCE, PAINTING, LITERATURE ... HOW GREATLY THEY HAVE ENRICHED MY JOURNEY! I HAVE OFTEN LOST MYSELF IN A MEDITATION-LIKE TRANCE SEEING HOW THEIR AURAS MERGE INTO EACH OTHER. THE PURSUIT OF CAREERS TOOK US BACK AND FORTH BETWEEN INDIA AND AMERICA IN A UNIQUELY INSPIRING PATTERN, EXPOSING US TO WORLD’S FINE BITS OF HISTORY, GEOGRAPHY, NATURE AND HUMANITY. I HAVE MET MOST WONDERFUL PEOPLE AND SEEN SOME BREATHTAKINGLY BEAUTIFUL PLACES ON THE WAY THAT EVOKED A COMPELLING EMOTION INSIDE ME. ‘MAGNOLIA’ IS A WORD PORTRAIT OF MY JOURNEY. A MEMOIR OF AN ARCHITECT-ARTIST THAT TOUCHES UPON THE PROCESSES, PASSIONS AND PLIGHTS OF A CREATIVE LIFE, EXPRESSED AS FREE-FORM RUMINATIONS, AND REFLECTIONS.
"कुणाही व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक कथा असते आणि आपल्या परीनं ती अद्वितीय, चमत्कृतीपूर्णच असते! संवेदनेला झालेले अनेकविध स्पर्श शब्दात मांडणारी ओघवती भाषा असेल, तर ती कथा वाचनीयही होते. सूर-शब्द-रेषा-रंग यांवर मनस्वी प्रेम करत लेखिका भारत आणि अमेरिकेत एक समृद्ध आणि कलासक्त आयुष्य जगली. पन्नास वर्षांचं तिचं आयुष्य म्हणजे चौफेर अनुभव, साक्षात्कारी क्षण आणि नवरस यांचा जणू एक जगदव्यापी मेळाच! त्यातलं भावलं -भिडलं ते इतरांना आवर्जून सांगण्याची तिची गरज, हौस आणि तळमळ या पुस्तकातून व्यक्त होते. लेखिकेच्याच शब्दात, "" `मैत्र`, `भटकंत्या`,`कलंदरी` ही प्रकरणं लिहिताना आठवणीतली शेकडो माणसं, जागा, प्रसंग जिवंत झाले आणि नेसत्या वस्त्रानिशी मी त्या जथ्यात घुसले. नेपाळी मित्रांची नितळ हास्यं. शिशिराच्या पानगळीची भूल. तीव्र-कोमल सुरांच्या अनाहत श्रुतींचे ब्लू -रिज पर्वतांत घुमणारे भाव. केपकॉडच्या एकाकी टोकावर भर रात्री समुद्रातल्या बिनकठड्याच्या लाकडी कॉजवेवरून चालवलेली गाडी आणि येणाऱ्या भरतीचा थरार. जॉर्जियातल्या किर्र रानात मध्यरात्री पसरलेलं दुधासारखं चांदणं. मार्टिनला चोवीस वर्षांनी अचानक सापडलेली लिंडा. निर्मितीच्या गाभ्यातून निघणारी आणि पसरत जाऊन हलकेच परत अज्ञातात विरणारी कवितेची वर्तुळं...... मनावर कोरून राहिलेलं असं बरंच काही आणि त्यांना घेऊन उलगडणारे दिवस यांची रंगीत वीण! सरसकट, तसंच डिझाइनर टाक्यांची ही बहुपदरी वीण आपण कधी, कशी घातली? किती मोहक आहे तिची अनवट लय! .... आवडणारं काही वाचलं की मला छान मोकळा आनंद सापडतो. भाषेचं सौन्दर्य फार भावतं. कधी वाचनानंतर अस्वस्थताही येते. ही तर आनंदाची दुसरी बाजू. मंथन - चर्वण घडलं नाही, काहीच चिकटून राहिलं नाही तर मग तो वेळेचा खुर्दाच. लिखाण करून आपणही त्या पाण्यात उतरावं हा मोह झाला खरा! "" ... आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केल्यानंतर लेखिकेला आनंदाचं एक शिवार सापडलं. मॅग्नोलियातल्या अनेक नोंदी आर्किटेक्चर या विषयातल्या आहेत. विचारांचा, व्यवसायाचा आणि जगण्याचाच सर्वंकष तात्त्विक आधार तिला या `कला-जननी` विषयात सापडतो. या पुस्तकाचं स्वरूप मुख्यत्वे वैचारिक लेख, स्फुटं, चिंतनं, रसग्रहण, समीक्षा असं आहे. उत्सुक, रसिक वाचकाशी यातल्या काही लिखाणांनी संवाद साधला, तरी निर्मितीचं एक आवर्तन पूर्ण होईल! "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%##वायव्हा आणि कॉरिन्थियन खांबमाथा # ‘अनावश्यकाची काटछाट #‘कुकीकटर’# ‘‘होम ईज व्हेअर द हार्ट ईज!’’ # बुलेव्हार्ड संस्कृती# नॉट्रडेम# बट्रेस# अमापसमाप# अमूर्त परिचय# बॉस्टन ब्रॅह्मिन्सचा सत्संग# अ‍ॅमहस्र्टची वर्षं# इंद्रधनुषी शक्यतांचा कॅनव्हास#भ्रमंत्या#मैत्र #कलंदरी #YUP (YOUNG URBAN PROFESSIONALISM), # (ELIMINATION OF THE INSIGNIFICANT) # (BUTTRESS) #ANITA KULKARNI# VISUALISATION# LANDSCAPE ARCHITECTURE# ARCHITECTURE# VERNACULAR# ZEN ARCHITECTURE# PARIS ART ACADEMY #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 07-06-2019

    वास्तुविश्वाचा कलात्मक प्रवास... कोणत्याही प्रदेशात बहरणाऱ्या कलापंरपरेवर त्या त्या देशातील समाजाचा अमिट ठसा असतो. वास्तुकलाही त्याला अपवाद नाही. भारतातील गावखेड्यांतील लिंपलेल्या घरांपासून ते अमेरिकेतील भव्यदिव्य वास्तूंपर्यंत विविध प्रकारच्या रचनाचे रसग्रहण करणाऱ्या, त्यांचे मनावर उमटलेले ठसे जपून नवनिर्मित मग्न झालेल्या वास्तुविशारदाचा प्रवास म्हणजे ‘मॅग्नोलिया’. ठाण्यातील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या आणि वास्तुकलेची मनापासून साधना करत यशस्वी वास्तुविशारद म्हणून नावारूपाला आलेल्या अनिता कुलकर्णी यांचा कलाप्रवास त्यांच्याच नजरेतून पाहण्याची संधी ‘मॅग्नोलिया’तून मिळते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वास्तूपासून सुरू होणारा हा प्रवास बोस्टनमधला हिमवर्षाव, जॉर्जियातला सुंदर तुरुंग, अमेरिकेतील जंगलात दडलेली काचेची घरं, तिथली ऐसपैस पसरलेली महाविद्यालयं अशी बरीच ठिकाणं दाखवून पुन्हा एकदा भारतात घेऊन येतो. त्यानिमित्ताने त्या त्या प्रदेशातील समाजजीवनाची झलक अनुभवता येते. वास्तुविशारदाला त्याचा व्यवसाय करताना कलात्मक आणि व्यावहारिक पातळ्यांवर अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. मात्र, कलेच्या साधनेतून समृद्ध होणारं अनुभवविश्व पाहता, कलाकाराचा संषर्घ सार्थकी लागल्याचीच भावना उरते, हे यातून जाणवतं. ठाण्यातील मराठमोळ्या तुलनेनं एकसुरी वातावरणातून थेट दक्षिण मुंबईतील विविधरंगी विश्वात प्रवेश करताना उडालेली तारांबळ, जे. जे. मध्ये शिकताना जगाविषयीच्या बदलत गेलेल्या धारणा, कलाभ्यासात गढून जाणं, वर्गाबाहेर कॅम्पसमध्ये सहाध्यायींबरोबर समृद्ध होत गेलेलं आयुष्य हा नवखा काळ यात मांडण्यात आला आहे. उपनगरातून शहराच्या झगमगाटात प्रवेश करताना आलेल्या दडपणाचं यथार्थ चित्रण यात दिसतं. कलाभ्यास पूर्ण करून प्रत्यक्ष व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यानंतर स्वप्नांचे इमले कोसळून पडताना ‘आपल्याला नेमकं काय करायचं नाही’, हे कळण्याचा काळही इथे दिसतो. त्यानंतर सुरू होतो शेकडो संधींनी भरलेला प्रवास. अमेरिकेत पाऊल टाकताच तिथल्या वास्तुवैभवाने केलेलं स्वागत, पहिला हिमवर्षाव यांची चित्रमय वर्णनं वाचणं ही पर्वणी ठरते. तिथल्या विविध लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतानाच्या अनुभवांतून तिथली कार्यसंस्कृती, व्यावसायिकता, प्रत्येक समाजघटाचा विचार करून निश्चित केलेले आणि काटेकोरपणे पाळले जाणारे वास्तुरचनेचे नियम, कागदावरच्या आराखड्यांची प्रत्यक्ष बांधकामस्थळी अंमलबजावणी करताना येणारी आव्हानं, कौशल्याला व्यवहाराची जोड देण्याचं नकळत मिळालेलं प्रशिक्षण, परस्परांना यथोचित मान देऊन एकत्र काम करण्याची अमेरिकन वृत्ती यांचे कृतज्ञ दाखले पुस्तकात आढळतात. आपल्या व्यवसायापलीकडेही आपलं एक आयुष्य असावं याविषयी तिथले लोक किती जागरूक असतात, या दोन्ही आघाड्यांचा समतोल, ते कसं साधतात, याची उदाहरणंही जागोजागी आहेत. अनिता यांनी अमेरिकेत काम करताना लॅण्डस्केपमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. तेव्हा तिथल्या आणि इथल्या शिक्षणातील तफावत पाहताना वाटलेला विषाद लेखनात प्रतिबिंबित झाला आहे. निसर्गाची अमेरिकेवरील कृपादृष्टी आणि तिथल्या समाजात त्याविषयी असलेली कृतज्ञता यांची प्रशंसा वारंवार दिसते. घर, विद्यापीठ, कार्यालये, हॉटेल, रस्ते, चौक अशा सर्व वर्णनात निसर्गाची स्तुती आहे. ऋतूनुसार फुलणारी विविधरंगी फुलं, प्रत्येक घराला घेरून उभ्या असलेल्या बागा यांची चित्रमय वर्णनं आहेत. तिथल्या आणि भारतातल्याही अनेक कुटुंबांनी वास्तुकलेची पार्श्वभूमी नसताना स्वत:च रसिकतेने आणि डोळसपणे बांधलेली, सजवलेली घरं इथे दिसतात. भारतातील खेडेगावातील मातीशी नातं जोडलेल्या आणि वयाबरोबर परिपक्व दिसू लागणाऱ्या वास्तूही इथे पाहायला मिळतात. या कलाप्रवासाच्या विविध टप्प्यांवर सान्निध्यात आलेल्या व्यक्तींच्या निमित्ताने तिथल्या आणि इथल्या नातेसंबंधांचीही तुलना दिसते. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी नात्याची किंमत मोजायला तयार असणारे अमेरिकन आणि चिवटपणे नाती जपणं म्हणजेच आयुष्य अशी श्रद्धा असलेले भारतीय अशा टोकाच्या मानसिकता इथे दिसतात. भारतात परतल्यानंतर तिथल्या आणि इथल्या कार्यसंस्कृतीची तुलना होणं स्वाभाविकच। इथल्या अघळपघळ व्यवहारांविषयीची नाराजी स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. भारतीय कारागिरांची कला, अत्यल्प मोबदल्यातही प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती वाखाणली आहे. पुस्तक भारत आणि अमेरिकेतील वास्तुकलेचा एक समृद्ध पट वाचकांसमोर मांडतं. त्याच्या सौंदर्याविषयीची कृतज्ञता सतत व्यक्त होत राहते. – विजया जागळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 09-09-2018

    अनुभवांचे चिंतनशील कथन... प्रत्येकाचे आयुष्य ही एक कथाच असते आणि ती तिच्या परीने तरी सुरसच असते. हे स्वरस्यच मग लेखनाला प्रवृत्त करते. ‘मॅग्नोलिया’ हे अनिता कुलकर्णी यांचे आत्मकथनही तसेच आहे. सुरुवातीलाच हे नेहमीसारखे आत्मकथन नाही, हे लेखिकेने स्पषट केले आहे. म्हणजे शाळेतल्या गमतीजमती, कुटुंबाची माहिती, एकूणच ‘मी कशी घडले?’ किंवा त्या स्वरूपाचे वैयक्तिक तपशील याबद्दल जवळजवळ काहीच या पुस्तकात नाही. त्यामुळे त्या अपेक्षेने हे पुस्तक वाचायला जाणाऱ्या वाचकांचा भ्रमनिरासच होईल. लेखिकेने आसुसून जगलेल्या आयुष्यातील त्यांना जे भावलं, भिडलं ते इतरांना सांगावे या हौसेतून, तशी गरज वाटल्याने हे लेखन केले आहे. आपल्या व्यवसायातील टप्पे आणि आयुष्यात घेतलेल्या रसरशीत अनुभवांना उजाळा... थोडक्यात– ‘जगले अशी’ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. अनिता कुलकर्णी या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. जे. जे. आर्किटेक्चर कॉलेज आणि अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वास्तव्यही दोन देशांत असते. वास्तुशास्त्राचे अध्यापन, लिखाण याबरोबरच त्यांनी ललित लिखाणही केले आहे. शास्त्रीय संगीताचा त्यांचा दीर्घ व्यासंग आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्य भरभरून जगण्याची आस त्यांना आहे. त्यामुळे जिथे सौंदर्य दिसते, मनाला ओढ लावणारे काही सापडते, तिथे त्या रेंगाळतात. त्यामुळे आठवणी, वेगवेगळे अनुभव, चिंतन यांचा एक मोहक कोलाजच आपल्याला या पुस्तकात पाहायला, वाचायला मिळतो. अर्थातच त्यात सुसंगतपणा किवां नियमितपणा नाही. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे, भौतिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक पातळ्यांवर जगत असताना मनात सहज उलगडलेले हे पदर आहेत. आपल्याला सुरुवातीला अशा आत्मकथनात्मक लेखनाची सवय नसल्याने गांगरायला होते. परंतु नंतर हाच मांडणीतील मोकळेपणा आवडायला लागतो. सुरुवातीलाच जे. जे. महाविद्यालयातील आठवणी आल्या आहेत. त्या इतक्या छान उतरल्या आहेत, की त्यांच्या मनातला तो परिसर, वर्गातील प्रयोग, प्रेझेन्टेशनची धावपळ, पायऱ्यांवर बसून मित्र-मैत्रिणींबरोबर मारलेल्या गप्पा, वाटून घेतलेले हास्यविनोद हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पुढे अमेरिकेत लँडस्केप डिझाइनमधले प्रगत शिक्षण घेताना त्यांच्या मनाच्या कक्षा अजून रुंदावल्या. तिथली मोकळीढाकळी शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा, क्षमतेचा अंदाज घेत पुढे जाण्याची मुभा, कुठलाही अभ्यासक्रम विशिष्ट वर्षातच पुरा न करण्याचे स्वातंत्र्य या गोष्टींमुळे ‘ही वर्षे समृद्ध करणाऱ्या कष्टांची वर्षे आहेत...’ असे लखिका म्हणतात. तेव्हा आपल्या चौकटबद्ध शिक्षणपद्धतीशी त्याची नकळतच मनात तुलना होते, हे नक्की. जे. जे. महाविद्यालयातील आयुष्यात त्यांच्या विचारांना एक शिस्त लागली होती. पण त्यात लवचिकपणा आला तो अमेरिकेतील अभ्यासक्रमाने. या गोष्टीचा उपयोग त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर झाला. वास्तुरचनेकरता सल्ल्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या आपल्याला बांधायच्या असलेल्या रचनेबाबत काही कल्पना असतात. त्या सौंदर्यशास्त्रात नीट बसवण्यासाठी त्यांना मदत करणे आणि आपले म्हणणे किती योग्य असले, तरी त्यांच्यावर न लादणे, ही पथ्ये त्यांनी कायम पाळली. आपल्या काही विशिष्ट कामांचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यातही उत्तर कर्नाटकातील एका प्रकल्पाबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांच्या निरनिराळ्या प्रकल्पात त्यांनी इतक्या वेगवेगळ्या झाडांचा वापर केलेला आहे, की ते वाचून अचंबित व्हायला होते. त्यांनी देशात आणि परदेशात दोन्हीकडे काम केलेले असल्याने दोन्ही देशांच्या कार्यपद्धतीची तुलना होणे साहजिकच आहे. अमेरिकेतील नेमकेपणा, सुबकता, रेखीवपणा आणि अनेक गोष्टी लक्षात घेऊन काम करण्याची पद्धत हे गुण असले, तरी भारतातला साधेपणा, माणसांचा इरसालपणा, आपुलकी याच्या प्रेमात लेखिका आहे. इथल्या कामाचे स्वरूप अधिक जिवंत आणि उत्कट आहे, असे त्यांना वाटते. चांगल्या रचनांचा महागडेपणाशी किंवा दिखाऊपणाशी काही संबंध नाही. त्याचे खरे नाते आहे ते गुणवत्ता, सौंदर्याशी. ‘हवामान, व्यवहार यांची सांगड घालून नजरेला आणि मनाला आनंद देणारे, राहणीचा दर्जा वाढवणारे ते आर्किटेक्चर’ अशी या शास्त्राची व्याख्याही त्या सहजगत्या करून जातात. मित्रांबद्दलही त्यांनी फार आत्मियतेने लिहिले आहे. या मित्रांत जे. जे. च्या सहाध्यायांपासून वयाने खूप ज्येष्ठ असलेले डॉ. गोसावी वा नलिनी इनामदार यांच्यापर्यंत अनेकजणांचा समावेश आहे. या बहुतेक सगळ्या व्यक्ती खूप हरहुन्नरी आहेत. या पुस्तकातील नेपाळच्या निर्वासित मुलांवरचा भाग मुळातूनच वाचावा असा आहे. लेखिकेची कलंदरी या पुस्तकात खूप ठिकाणी दिसत असली, तरी त्यांनी केलेली भटकंती हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भाग असावा हे जाणवते. त्या म्हणतात, ‘एकमेवाद्वितीय ठिकाणं आम्ही पाहिली. रौद्र बर्फवादळात, प्रलयकारी वृष्टीत, दुधाळ, नीरव चांदण्यात पाहिली. अस्सल मराठी शिखरं, पर्वत, टेकड्या, नद्या, समुद्र, उन्हाळी उघडं आकाश, भरून येणारे ढग, किनारे, पळस-पांगारे, कॅशिया-गुलमोहोर आणि रसरसलेली चेरी ब्लॉसम्स, जलप्रपात, निळ्या समुद्रावर झुकलेले काळकडे, अटलांटिक महासागरातल्या बेटांवरचा भन्नाट वारा... ही शेकडो निसर्गरूपं माझ्यासाठी रूपक बनली. या भटकंत्यांनी माझ्या आयुष्याचा रंगच बदलून टाकला. सूर, अक्षर, रंग सगळ्यांना त्या प्रेरणा झाल्या.’ कामाच्या निमित्ताने किंवा केवळ भटकण्यासाठी कुठल्याही रूपानं त्यांनी खूप प्रवास केले आहेत. कधी एकट्याने, कधी साथीने. परंतु प्रत्येक वेळेस हा प्रवास त्यांना काही ना काही देऊनच गेला आहे. भारत, अमेरिका, युरोप फिरताना रस्ते, वेगवेगळ्या वास्तुरचना, निसर्ग या सगळ्याबरोबरच त्यांनी माणसेही खूप वाचली आहेत याचा प्रत्यय येतो. लेखिकेची शैली सहज संवाद साधल्यासारखी आहे. आपण घडण्यात कुटुंबीयांचा, मित्रांचा वाटा आहे हे लेखिकेला मान्य आहेच; पण तरीही ‘आपलं’ असं एक कर्तृत्ववान, रसिक व्यक्तिमत्त्व आहे याचं भानही त्यांना आहे. त्यामुळे त्यांचे हे कथन खऱ्या अर्थाने ‘आत्मकथन’ आहे. ‘मॅग्नोलिया’ हे उत्तर अमेरिकेत फुलणारे फुल त्यांनी रूपकासारखे वापरले आहे. हे पांढरेशुभ्र फुल म्हणजे सौंदर्य, आनंद आणि शांतीचे प्रतीकच! आपल्या वाटचालीत लेखिकेलाही हे सौंदर्य कुठंतरी सापडलं आणि मग सगळी बेचैनी दूर होऊन या फुलासारखेच ‘लेट इट बी’ असं म्हणणं त्यांना सहज शक्य झालं. –सीमा भानू ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 9-09-2018

    वास्तुशिल्पकार, मनस्वी कलाकार अनिता कुलकर्णी यांनी मांडलेला हा स्वत:चा प्रवास. जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात मिळालेला प्रवेश, तिथले अनुभव, नंतर परदेशात उमेदवारी करताना आलेले अनुभव, भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, पुन्हा भारतात परतल्यानंतर व्यसायातला प्रवास, टेरेस गार्डन ते टाऊनशिप असा प्रवास, भटकंती, आकलन, अनुभवलेली निसर्गाची रूपं अशा सगळ्याच गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. या निमित्तानं त्यांना जाणवलेलं सर्जनाचं सूत्रही त्या उलगडतात. ...Read more

  • Rating Starअंजली पटवर्धन

    चिंतनशीलतेने जीवनाला भिडताना त्यातील प्रसन्नता अधोरेखित करणारे आत्मकथन... मेहता पब्लिशिंग हाऊसने आतापर्यंत स्त्रियांची अनेक आत्मचरित्रं/आत्मकथनं (स्वतंत्र आणि अनुवादित) प्रकाशित केली आहेत; अर्थातच प्रत्येक आत्मचरित्राचा रंग वेगळा आहे. आत्मचरित्रातूनआत्मकथनातून त्या स्त्रीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतीत होत असतो. अनिता कुलकर्णी यांचं ‘मॅग्नोलिया’ हे आत्मकथन जीवनाकडे अतिशय चिंतनशीलतेने पाहतानाही त्यातील प्रसन्नता टिपणारं आहे. जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात त्यांना मिळालेला प्रवेश, त्यावेळचं त्यांचं महाविद्यालयीन जीवन, त्यांच्या खास मध्यमवर्गीय जाणिवा, जे.जे.तील वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात उमेदवारी करताना नोकरीत आणि व्यवसायात आलेले अनुभव आणि त्यादरम्यान भेटलेल्या व्यक्तींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. परदेशात गेल्यानंतर केन मिचेलकडे त्यांनी उमेदवारी केली. त्याच्याकडून त्यांना काय काय शिकायला मिळालं, हे त्या कृतज्ञतापूर्वक सांगतात. अशाच कृतज्ञतेने त्या बोलतात मार्था स्ट्रोक्सबद्दल. केन मिचेलनंतर त्यांनी मार्थाकडे उमेदवारी केली तिच्याकडून त्यांना काय शिकायला मिळालं, हेही त्या नमूद करतात. मार्थाकडे काम करणारा स्टीव्ह, वास्तुशास्त्रज्ञ डेव्हिड मार्किन्स, एमिली, पीटर, लारा इ. अनेक व्यक्तींचा कधी तपशीलाने तर कधी जाता जाता उल्लेख करतात. भारतात परतल्यानंतर त्यांनी आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय सुरू केला. टेरेस गार्डन ते टाउनशिप असा त्यांचा व्यावसायिक प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभव त्यांनी सांगितले आहेत. तसेच वास्तुशास्त्राचं सौंदर्याच्या आणि भावनांच्या चष्म्यातून केलेलं आकलनही त्या मांडतात. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील अपप्रवृत्तींबद्दलही त्या लिहितात. भारतात आणि भारताबाहेर केलेल्या भटकंतीचे अनुभवही त्यांनी सांगितले आहेत. या भटकंती दरम्यान त्यांनी अनुभवलेली निसर्गाची विविध रूपं त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दलच्या, ज्येष्ठांबद्दलच्या भावना त्यांनी अतिशय उत्कटतेने व्यक्त केल्या आहेत. त्यांचे व्यावसायिक अनुभव असोत, शिक्षणाच्या बाबतीतले अनुभव असोत, भटकंती असो किंवा व्यक्तिचित्रण असो, भारत आणि परदेश यांची तुलना त्या करतात. परदेशात काही वर्षं राहूनही भारतीय माणसाचं साधं जगणं, आपली कुटुंबसंस्था, नातेसंबंध याविषयी त्यांना अभिमान आहे; मात्र तिथलं शिक्षण आणि भारतातील शिक्षण यातील फरक त्यांना प्रकर्षाने जाणवतो. तिथल्या शिक्षण पद्धतीतील खुलेपणा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा आत्मविश्वास यावर त्या भाष्य करतात. नवोदितांना घडवण्याची अमेरिकेतील आणि भारतातील पद्धत, यांची तुलना करताना त्या लिहितात,‘ विचारांना पुरेसं खाद्य मिळत होतं आणि माझे विचार कसाला लागत होते. तुलनात्मक निरीक्षणं घडत होती. मुंबईतल्या त्या ऑफिसच्या आठवणी अजून अगदीच ताज्या असताना केन मिचेलकडचा काळ आला आणि संपलाही. मला या दोन ऑफिसांमध्ये हजारो विरोधाभास जाणवले. मुंबईतल्या नोकरीत मला पुरेसं आव्हान मिळालं नाही. परिणामी, चांगल्या कार्यपूर्तीतून येणारा आनंद, समाधान हेही दूरवरच राहिलं. शिकण्याची इच्छा होती, परंतु आजूबाजूचे सीनिअर्स शिकवण्यात रस घेणारे नव्हते. केनने मात्र पहिल्या दिवसापासून माझ्या अभ्यासाचा, अभ्यासक्रमाचा आणि व्यक्तिशः माझा- संपूर्ण आदर केला. क्षेत्रात नवोदित म्हणून शिरतानाच्या काळात मिळालेल्या या आदरामुळे माझ्या ठिकाणी नैसर्गिकपणे, त्या आदराचा मान मी चांगल्या कामाद्वारा ठेवला पाहिजे, ही एक प्रामाणिक भावना रुजू लागली.’ आपल्या व्यवसायाविषयी बोलताना जाता जाता एखादी टिपही देतात. उदा. ‘स्वतःच्या क्षेत्रात नुसतं तांत्रिकदृष्ट्या ठीकठाक राहून भागत नाही. प्रॅक्टिसच्या सगळ्या अंगांनी चालू असणा-या उलाढालींचा ताबा घ्यावा लागतो. छंदिष्ट एकटेपणातून उत्तम डिझाइनच्या निर्मितीची उपासना करत असताना चांगल्या जनसंपर्काचं भानही ठेवावं लागतं. कागदावर सुंदर चित्र रंगवत असताना संबंधित जगातलं राजकारणही जगावं लागतं.’ त्यांच्या या आत्मकथनातून वास्तुशास्त्रज्ञ किंवा आर्किटेक्टचं काम नक्की कसं चालतं, या व्यवसायातील आव्हानं काय आहेत, व्यवसाय करताना कोणती पथ्यं पाळावी लागतात इ. या व्यवसायाशी निगडित अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. लालित्यपूर्ण भाषा हे या आत्मकथनाचं वैशिष्ट्यं आहे. जीवनात भौतिक गोष्टींसाठी किंवा मानसिक, भावनिक संघर्ष आला नाही तरी आपलं आपल्या मनाशी जीवनविषयक चिंतन चालू असतं. ते चिंतन त्यांनी शेवटच्या प्रकरणात मांडलं आहे. एकूणच त्यांच्या या आत्मकथनाला चिंतनशीलतेची, अध्यात्माची किनार आहे. लौकिक अनुभव आणि सौंदर्यपूर्ण अनुभव या हिंदोळ्यावर त्यांचं मन झुलताना दिसतं. जीवनाला चिंतनशीलतेने भिडताना त्यातील सौंदर्य, आनंद आणि शब्दातीत अनुभूती त्या टिपतात. म्हणूनच या आत्मकथनाला ‘मॅग्नोलिया’ असं सार्थ नाव त्यांनी दिलं आहे. मॅग्नोलियाबद्दल त्या स्वत:च लिहितात, ‘मॅग्नोलिया म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, आनंद आणि शांती!’ त्यांचं हे आत्मकथनही वाचकाला या तीन गोष्टींची अनुभूती देतं. तेव्हा जीवनाला विविध सकारात्मक अंगांनी कवेत घेऊ पाहणारं हे आत्मकथन मुळातून आणि आवर्जून वाचावं असं आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more