* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAGNOLIA
  • Availability : Available
  • ISBN : 9789387319950
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
“ARCHITECTURE IS THE MOTHER OF ARTS.” THAT WAS MERELY A ‘LETTERING’ EXERCISE IN THE INITIAL WEEKS OF ARCHITECTURE SCHOOL. MY MIND OFTEN DRAWS UPON THE PARAPHRASE. MY THREE-DECADE LIFE IN ARCHITECTURE BROUGHT UNMATCHED GRATIFICATION AND JOY ALONG WITH LIVELIHOOD; BUT ARCHITECTURE ALSO UNFOLDED SOMETHING MORE. ARTS WERE ALWAYS SOUL TO ME BUT IT WAS DURING MY ARCHITECTURAL EXPLORATIONS THAT THE LINES BETWEEN ARTS TRULY DIFFUSED AND I SAW THEIR OVERLAPS LENDING NEW BEAUTIFUL SHADES TO A NEW ARTISTIC AMALGAM. MUSIC, DANCE, PAINTING, LITERATURE ... HOW GREATLY THEY HAVE ENRICHED MY JOURNEY! I HAVE OFTEN LOST MYSELF IN A MEDITATION-LIKE TRANCE SEEING HOW THEIR AURAS MERGE INTO EACH OTHER. THE PURSUIT OF CAREERS TOOK US BACK AND FORTH BETWEEN INDIA AND AMERICA IN A UNIQUELY INSPIRING PATTERN, EXPOSING US TO WORLD’S FINE BITS OF HISTORY, GEOGRAPHY, NATURE AND HUMANITY. I HAVE MET MOST WONDERFUL PEOPLE AND SEEN SOME BREATHTAKINGLY BEAUTIFUL PLACES ON THE WAY THAT EVOKED A COMPELLING EMOTION INSIDE ME. ‘MAGNOLIA’ IS A WORD PORTRAIT OF MY JOURNEY. A MEMOIR OF AN ARCHITECT-ARTIST THAT TOUCHES UPON THE PROCESSES, PASSIONS AND PLIGHTS OF A CREATIVE LIFE, EXPRESSED AS FREE-FORM RUMINATIONS, AND REFLECTIONS.
"कुणाही व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक कथा असते आणि आपल्या परीनं ती अद्वितीय, चमत्कृतीपूर्णच असते! संवेदनेला झालेले अनेकविध स्पर्श शब्दात मांडणारी ओघवती भाषा असेल, तर ती कथा वाचनीयही होते. सूर-शब्द-रेषा-रंग यांवर मनस्वी प्रेम करत लेखिका भारत आणि अमेरिकेत एक समृद्ध आणि कलासक्त आयुष्य जगली. पन्नास वर्षांचं तिचं आयुष्य म्हणजे चौफेर अनुभव, साक्षात्कारी क्षण आणि नवरस यांचा जणू एक जगदव्यापी मेळाच! त्यातलं भावलं -भिडलं ते इतरांना आवर्जून सांगण्याची तिची गरज, हौस आणि तळमळ या पुस्तकातून व्यक्त होते. लेखिकेच्याच शब्दात, "" `मैत्र`, `भटकंत्या`,`कलंदरी` ही प्रकरणं लिहिताना आठवणीतली शेकडो माणसं, जागा, प्रसंग जिवंत झाले आणि नेसत्या वस्त्रानिशी मी त्या जथ्यात घुसले. नेपाळी मित्रांची नितळ हास्यं. शिशिराच्या पानगळीची भूल. तीव्र-कोमल सुरांच्या अनाहत श्रुतींचे ब्लू -रिज पर्वतांत घुमणारे भाव. केपकॉडच्या एकाकी टोकावर भर रात्री समुद्रातल्या बिनकठड्याच्या लाकडी कॉजवेवरून चालवलेली गाडी आणि येणाऱ्या भरतीचा थरार. जॉर्जियातल्या किर्र रानात मध्यरात्री पसरलेलं दुधासारखं चांदणं. मार्टिनला चोवीस वर्षांनी अचानक सापडलेली लिंडा. निर्मितीच्या गाभ्यातून निघणारी आणि पसरत जाऊन हलकेच परत अज्ञातात विरणारी कवितेची वर्तुळं...... मनावर कोरून राहिलेलं असं बरंच काही आणि त्यांना घेऊन उलगडणारे दिवस यांची रंगीत वीण! सरसकट, तसंच डिझाइनर टाक्यांची ही बहुपदरी वीण आपण कधी, कशी घातली? किती मोहक आहे तिची अनवट लय! .... आवडणारं काही वाचलं की मला छान मोकळा आनंद सापडतो. भाषेचं सौन्दर्य फार भावतं. कधी वाचनानंतर अस्वस्थताही येते. ही तर आनंदाची दुसरी बाजू. मंथन - चर्वण घडलं नाही, काहीच चिकटून राहिलं नाही तर मग तो वेळेचा खुर्दाच. लिखाण करून आपणही त्या पाण्यात उतरावं हा मोह झाला खरा! "" ... आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केल्यानंतर लेखिकेला आनंदाचं एक शिवार सापडलं. मॅग्नोलियातल्या अनेक नोंदी आर्किटेक्चर या विषयातल्या आहेत. विचारांचा, व्यवसायाचा आणि जगण्याचाच सर्वंकष तात्त्विक आधार तिला या `कला-जननी` विषयात सापडतो. या पुस्तकाचं स्वरूप मुख्यत्वे वैचारिक लेख, स्फुटं, चिंतनं, रसग्रहण, समीक्षा असं आहे. उत्सुक, रसिक वाचकाशी यातल्या काही लिखाणांनी संवाद साधला, तरी निर्मितीचं एक आवर्तन पूर्ण होईल! "

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%##वायव्हा आणि कॉरिन्थियन खांबमाथा # ‘अनावश्यकाची काटछाट #‘कुकीकटर’# ‘‘होम ईज व्हेअर द हार्ट ईज!’’ # बुलेव्हार्ड संस्कृती# नॉट्रडेम# बट्रेस# अमापसमाप# अमूर्त परिचय# बॉस्टन ब्रॅह्मिन्सचा सत्संग# अ‍ॅमहस्र्टची वर्षं# इंद्रधनुषी शक्यतांचा कॅनव्हास#भ्रमंत्या#मैत्र #कलंदरी #YUP (YOUNG URBAN PROFESSIONALISM), # (ELIMINATION OF THE INSIGNIFICANT) # (BUTTRESS) #ANITA KULKARNI# VISUALISATION# LANDSCAPE ARCHITECTURE# ARCHITECTURE# VERNACULAR# ZEN ARCHITECTURE# PARIS ART ACADEMY #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 07-06-2019

    वास्तुविश्वाचा कलात्मक प्रवास... कोणत्याही प्रदेशात बहरणाऱ्या कलापंरपरेवर त्या त्या देशातील समाजाचा अमिट ठसा असतो. वास्तुकलाही त्याला अपवाद नाही. भारतातील गावखेड्यांतील लिंपलेल्या घरांपासून ते अमेरिकेतील भव्यदिव्य वास्तूंपर्यंत विविध प्रकारच्या रचनाचे रसग्रहण करणाऱ्या, त्यांचे मनावर उमटलेले ठसे जपून नवनिर्मित मग्न झालेल्या वास्तुविशारदाचा प्रवास म्हणजे ‘मॅग्नोलिया’. ठाण्यातील मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढलेल्या आणि वास्तुकलेची मनापासून साधना करत यशस्वी वास्तुविशारद म्हणून नावारूपाला आलेल्या अनिता कुलकर्णी यांचा कलाप्रवास त्यांच्याच नजरेतून पाहण्याची संधी ‘मॅग्नोलिया’तून मिळते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वास्तूपासून सुरू होणारा हा प्रवास बोस्टनमधला हिमवर्षाव, जॉर्जियातला सुंदर तुरुंग, अमेरिकेतील जंगलात दडलेली काचेची घरं, तिथली ऐसपैस पसरलेली महाविद्यालयं अशी बरीच ठिकाणं दाखवून पुन्हा एकदा भारतात घेऊन येतो. त्यानिमित्ताने त्या त्या प्रदेशातील समाजजीवनाची झलक अनुभवता येते. वास्तुविशारदाला त्याचा व्यवसाय करताना कलात्मक आणि व्यावहारिक पातळ्यांवर अनेक संघर्षांना सामोरं जावं लागतं. मात्र, कलेच्या साधनेतून समृद्ध होणारं अनुभवविश्व पाहता, कलाकाराचा संषर्घ सार्थकी लागल्याचीच भावना उरते, हे यातून जाणवतं. ठाण्यातील मराठमोळ्या तुलनेनं एकसुरी वातावरणातून थेट दक्षिण मुंबईतील विविधरंगी विश्वात प्रवेश करताना उडालेली तारांबळ, जे. जे. मध्ये शिकताना जगाविषयीच्या बदलत गेलेल्या धारणा, कलाभ्यासात गढून जाणं, वर्गाबाहेर कॅम्पसमध्ये सहाध्यायींबरोबर समृद्ध होत गेलेलं आयुष्य हा नवखा काळ यात मांडण्यात आला आहे. उपनगरातून शहराच्या झगमगाटात प्रवेश करताना आलेल्या दडपणाचं यथार्थ चित्रण यात दिसतं. कलाभ्यास पूर्ण करून प्रत्यक्ष व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यानंतर स्वप्नांचे इमले कोसळून पडताना ‘आपल्याला नेमकं काय करायचं नाही’, हे कळण्याचा काळही इथे दिसतो. त्यानंतर सुरू होतो शेकडो संधींनी भरलेला प्रवास. अमेरिकेत पाऊल टाकताच तिथल्या वास्तुवैभवाने केलेलं स्वागत, पहिला हिमवर्षाव यांची चित्रमय वर्णनं वाचणं ही पर्वणी ठरते. तिथल्या विविध लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतानाच्या अनुभवांतून तिथली कार्यसंस्कृती, व्यावसायिकता, प्रत्येक समाजघटाचा विचार करून निश्चित केलेले आणि काटेकोरपणे पाळले जाणारे वास्तुरचनेचे नियम, कागदावरच्या आराखड्यांची प्रत्यक्ष बांधकामस्थळी अंमलबजावणी करताना येणारी आव्हानं, कौशल्याला व्यवहाराची जोड देण्याचं नकळत मिळालेलं प्रशिक्षण, परस्परांना यथोचित मान देऊन एकत्र काम करण्याची अमेरिकन वृत्ती यांचे कृतज्ञ दाखले पुस्तकात आढळतात. आपल्या व्यवसायापलीकडेही आपलं एक आयुष्य असावं याविषयी तिथले लोक किती जागरूक असतात, या दोन्ही आघाड्यांचा समतोल, ते कसं साधतात, याची उदाहरणंही जागोजागी आहेत. अनिता यांनी अमेरिकेत काम करताना लॅण्डस्केपमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. तेव्हा तिथल्या आणि इथल्या शिक्षणातील तफावत पाहताना वाटलेला विषाद लेखनात प्रतिबिंबित झाला आहे. निसर्गाची अमेरिकेवरील कृपादृष्टी आणि तिथल्या समाजात त्याविषयी असलेली कृतज्ञता यांची प्रशंसा वारंवार दिसते. घर, विद्यापीठ, कार्यालये, हॉटेल, रस्ते, चौक अशा सर्व वर्णनात निसर्गाची स्तुती आहे. ऋतूनुसार फुलणारी विविधरंगी फुलं, प्रत्येक घराला घेरून उभ्या असलेल्या बागा यांची चित्रमय वर्णनं आहेत. तिथल्या आणि भारतातल्याही अनेक कुटुंबांनी वास्तुकलेची पार्श्वभूमी नसताना स्वत:च रसिकतेने आणि डोळसपणे बांधलेली, सजवलेली घरं इथे दिसतात. भारतातील खेडेगावातील मातीशी नातं जोडलेल्या आणि वयाबरोबर परिपक्व दिसू लागणाऱ्या वास्तूही इथे पाहायला मिळतात. या कलाप्रवासाच्या विविध टप्प्यांवर सान्निध्यात आलेल्या व्यक्तींच्या निमित्ताने तिथल्या आणि इथल्या नातेसंबंधांचीही तुलना दिसते. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी नात्याची किंमत मोजायला तयार असणारे अमेरिकन आणि चिवटपणे नाती जपणं म्हणजेच आयुष्य अशी श्रद्धा असलेले भारतीय अशा टोकाच्या मानसिकता इथे दिसतात. भारतात परतल्यानंतर तिथल्या आणि इथल्या कार्यसंस्कृतीची तुलना होणं स्वाभाविकच। इथल्या अघळपघळ व्यवहारांविषयीची नाराजी स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. भारतीय कारागिरांची कला, अत्यल्प मोबदल्यातही प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती वाखाणली आहे. पुस्तक भारत आणि अमेरिकेतील वास्तुकलेचा एक समृद्ध पट वाचकांसमोर मांडतं. त्याच्या सौंदर्याविषयीची कृतज्ञता सतत व्यक्त होत राहते. – विजया जागळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA (LOKRANG) 09-09-2018

    अनुभवांचे चिंतनशील कथन... प्रत्येकाचे आयुष्य ही एक कथाच असते आणि ती तिच्या परीने तरी सुरसच असते. हे स्वरस्यच मग लेखनाला प्रवृत्त करते. ‘मॅग्नोलिया’ हे अनिता कुलकर्णी यांचे आत्मकथनही तसेच आहे. सुरुवातीलाच हे नेहमीसारखे आत्मकथन नाही, हे लेखिकेने स्पषट केले आहे. म्हणजे शाळेतल्या गमतीजमती, कुटुंबाची माहिती, एकूणच ‘मी कशी घडले?’ किंवा त्या स्वरूपाचे वैयक्तिक तपशील याबद्दल जवळजवळ काहीच या पुस्तकात नाही. त्यामुळे त्या अपेक्षेने हे पुस्तक वाचायला जाणाऱ्या वाचकांचा भ्रमनिरासच होईल. लेखिकेने आसुसून जगलेल्या आयुष्यातील त्यांना जे भावलं, भिडलं ते इतरांना सांगावे या हौसेतून, तशी गरज वाटल्याने हे लेखन केले आहे. आपल्या व्यवसायातील टप्पे आणि आयुष्यात घेतलेल्या रसरशीत अनुभवांना उजाळा... थोडक्यात– ‘जगले अशी’ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. अनिता कुलकर्णी या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. जे. जे. आर्किटेक्चर कॉलेज आणि अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वास्तव्यही दोन देशांत असते. वास्तुशास्त्राचे अध्यापन, लिखाण याबरोबरच त्यांनी ललित लिखाणही केले आहे. शास्त्रीय संगीताचा त्यांचा दीर्घ व्यासंग आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्य भरभरून जगण्याची आस त्यांना आहे. त्यामुळे जिथे सौंदर्य दिसते, मनाला ओढ लावणारे काही सापडते, तिथे त्या रेंगाळतात. त्यामुळे आठवणी, वेगवेगळे अनुभव, चिंतन यांचा एक मोहक कोलाजच आपल्याला या पुस्तकात पाहायला, वाचायला मिळतो. अर्थातच त्यात सुसंगतपणा किवां नियमितपणा नाही. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे, भौतिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक पातळ्यांवर जगत असताना मनात सहज उलगडलेले हे पदर आहेत. आपल्याला सुरुवातीला अशा आत्मकथनात्मक लेखनाची सवय नसल्याने गांगरायला होते. परंतु नंतर हाच मांडणीतील मोकळेपणा आवडायला लागतो. सुरुवातीलाच जे. जे. महाविद्यालयातील आठवणी आल्या आहेत. त्या इतक्या छान उतरल्या आहेत, की त्यांच्या मनातला तो परिसर, वर्गातील प्रयोग, प्रेझेन्टेशनची धावपळ, पायऱ्यांवर बसून मित्र-मैत्रिणींबरोबर मारलेल्या गप्पा, वाटून घेतलेले हास्यविनोद हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पुढे अमेरिकेत लँडस्केप डिझाइनमधले प्रगत शिक्षण घेताना त्यांच्या मनाच्या कक्षा अजून रुंदावल्या. तिथली मोकळीढाकळी शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा, क्षमतेचा अंदाज घेत पुढे जाण्याची मुभा, कुठलाही अभ्यासक्रम विशिष्ट वर्षातच पुरा न करण्याचे स्वातंत्र्य या गोष्टींमुळे ‘ही वर्षे समृद्ध करणाऱ्या कष्टांची वर्षे आहेत...’ असे लखिका म्हणतात. तेव्हा आपल्या चौकटबद्ध शिक्षणपद्धतीशी त्याची नकळतच मनात तुलना होते, हे नक्की. जे. जे. महाविद्यालयातील आयुष्यात त्यांच्या विचारांना एक शिस्त लागली होती. पण त्यात लवचिकपणा आला तो अमेरिकेतील अभ्यासक्रमाने. या गोष्टीचा उपयोग त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर झाला. वास्तुरचनेकरता सल्ल्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या आपल्याला बांधायच्या असलेल्या रचनेबाबत काही कल्पना असतात. त्या सौंदर्यशास्त्रात नीट बसवण्यासाठी त्यांना मदत करणे आणि आपले म्हणणे किती योग्य असले, तरी त्यांच्यावर न लादणे, ही पथ्ये त्यांनी कायम पाळली. आपल्या काही विशिष्ट कामांचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यातही उत्तर कर्नाटकातील एका प्रकल्पाबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांच्या निरनिराळ्या प्रकल्पात त्यांनी इतक्या वेगवेगळ्या झाडांचा वापर केलेला आहे, की ते वाचून अचंबित व्हायला होते. त्यांनी देशात आणि परदेशात दोन्हीकडे काम केलेले असल्याने दोन्ही देशांच्या कार्यपद्धतीची तुलना होणे साहजिकच आहे. अमेरिकेतील नेमकेपणा, सुबकता, रेखीवपणा आणि अनेक गोष्टी लक्षात घेऊन काम करण्याची पद्धत हे गुण असले, तरी भारतातला साधेपणा, माणसांचा इरसालपणा, आपुलकी याच्या प्रेमात लेखिका आहे. इथल्या कामाचे स्वरूप अधिक जिवंत आणि उत्कट आहे, असे त्यांना वाटते. चांगल्या रचनांचा महागडेपणाशी किंवा दिखाऊपणाशी काही संबंध नाही. त्याचे खरे नाते आहे ते गुणवत्ता, सौंदर्याशी. ‘हवामान, व्यवहार यांची सांगड घालून नजरेला आणि मनाला आनंद देणारे, राहणीचा दर्जा वाढवणारे ते आर्किटेक्चर’ अशी या शास्त्राची व्याख्याही त्या सहजगत्या करून जातात. मित्रांबद्दलही त्यांनी फार आत्मियतेने लिहिले आहे. या मित्रांत जे. जे. च्या सहाध्यायांपासून वयाने खूप ज्येष्ठ असलेले डॉ. गोसावी वा नलिनी इनामदार यांच्यापर्यंत अनेकजणांचा समावेश आहे. या बहुतेक सगळ्या व्यक्ती खूप हरहुन्नरी आहेत. या पुस्तकातील नेपाळच्या निर्वासित मुलांवरचा भाग मुळातूनच वाचावा असा आहे. लेखिकेची कलंदरी या पुस्तकात खूप ठिकाणी दिसत असली, तरी त्यांनी केलेली भटकंती हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भाग असावा हे जाणवते. त्या म्हणतात, ‘एकमेवाद्वितीय ठिकाणं आम्ही पाहिली. रौद्र बर्फवादळात, प्रलयकारी वृष्टीत, दुधाळ, नीरव चांदण्यात पाहिली. अस्सल मराठी शिखरं, पर्वत, टेकड्या, नद्या, समुद्र, उन्हाळी उघडं आकाश, भरून येणारे ढग, किनारे, पळस-पांगारे, कॅशिया-गुलमोहोर आणि रसरसलेली चेरी ब्लॉसम्स, जलप्रपात, निळ्या समुद्रावर झुकलेले काळकडे, अटलांटिक महासागरातल्या बेटांवरचा भन्नाट वारा... ही शेकडो निसर्गरूपं माझ्यासाठी रूपक बनली. या भटकंत्यांनी माझ्या आयुष्याचा रंगच बदलून टाकला. सूर, अक्षर, रंग सगळ्यांना त्या प्रेरणा झाल्या.’ कामाच्या निमित्ताने किंवा केवळ भटकण्यासाठी कुठल्याही रूपानं त्यांनी खूप प्रवास केले आहेत. कधी एकट्याने, कधी साथीने. परंतु प्रत्येक वेळेस हा प्रवास त्यांना काही ना काही देऊनच गेला आहे. भारत, अमेरिका, युरोप फिरताना रस्ते, वेगवेगळ्या वास्तुरचना, निसर्ग या सगळ्याबरोबरच त्यांनी माणसेही खूप वाचली आहेत याचा प्रत्यय येतो. लेखिकेची शैली सहज संवाद साधल्यासारखी आहे. आपण घडण्यात कुटुंबीयांचा, मित्रांचा वाटा आहे हे लेखिकेला मान्य आहेच; पण तरीही ‘आपलं’ असं एक कर्तृत्ववान, रसिक व्यक्तिमत्त्व आहे याचं भानही त्यांना आहे. त्यामुळे त्यांचे हे कथन खऱ्या अर्थाने ‘आत्मकथन’ आहे. ‘मॅग्नोलिया’ हे उत्तर अमेरिकेत फुलणारे फुल त्यांनी रूपकासारखे वापरले आहे. हे पांढरेशुभ्र फुल म्हणजे सौंदर्य, आनंद आणि शांतीचे प्रतीकच! आपल्या वाटचालीत लेखिकेलाही हे सौंदर्य कुठंतरी सापडलं आणि मग सगळी बेचैनी दूर होऊन या फुलासारखेच ‘लेट इट बी’ असं म्हणणं त्यांना सहज शक्य झालं. –सीमा भानू ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 9-09-2018

    वास्तुशिल्पकार, मनस्वी कलाकार अनिता कुलकर्णी यांनी मांडलेला हा स्वत:चा प्रवास. जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात मिळालेला प्रवेश, तिथले अनुभव, नंतर परदेशात उमेदवारी करताना आलेले अनुभव, भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, पुन्हा भारतात परतल्यानंतर व्यसायातला प्रवास, टेरेस गार्डन ते टाऊनशिप असा प्रवास, भटकंती, आकलन, अनुभवलेली निसर्गाची रूपं अशा सगळ्याच गोष्टींवर त्यांनी लिहिलं आहे. या निमित्तानं त्यांना जाणवलेलं सर्जनाचं सूत्रही त्या उलगडतात. ...Read more

  • Rating Starअंजली पटवर्धन

    चिंतनशीलतेने जीवनाला भिडताना त्यातील प्रसन्नता अधोरेखित करणारे आत्मकथन... मेहता पब्लिशिंग हाऊसने आतापर्यंत स्त्रियांची अनेक आत्मचरित्रं/आत्मकथनं (स्वतंत्र आणि अनुवादित) प्रकाशित केली आहेत; अर्थातच प्रत्येक आत्मचरित्राचा रंग वेगळा आहे. आत्मचरित्रातूनआत्मकथनातून त्या स्त्रीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतीत होत असतो. अनिता कुलकर्णी यांचं ‘मॅग्नोलिया’ हे आत्मकथन जीवनाकडे अतिशय चिंतनशीलतेने पाहतानाही त्यातील प्रसन्नता टिपणारं आहे. जे. जे. कला-वास्तुशास्त्र महाविद्यालयात त्यांना मिळालेला प्रवेश, त्यावेळचं त्यांचं महाविद्यालयीन जीवन, त्यांच्या खास मध्यमवर्गीय जाणिवा, जे.जे.तील वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात उमेदवारी करताना नोकरीत आणि व्यवसायात आलेले अनुभव आणि त्यादरम्यान भेटलेल्या व्यक्तींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. परदेशात गेल्यानंतर केन मिचेलकडे त्यांनी उमेदवारी केली. त्याच्याकडून त्यांना काय काय शिकायला मिळालं, हे त्या कृतज्ञतापूर्वक सांगतात. अशाच कृतज्ञतेने त्या बोलतात मार्था स्ट्रोक्सबद्दल. केन मिचेलनंतर त्यांनी मार्थाकडे उमेदवारी केली तिच्याकडून त्यांना काय शिकायला मिळालं, हेही त्या नमूद करतात. मार्थाकडे काम करणारा स्टीव्ह, वास्तुशास्त्रज्ञ डेव्हिड मार्किन्स, एमिली, पीटर, लारा इ. अनेक व्यक्तींचा कधी तपशीलाने तर कधी जाता जाता उल्लेख करतात. भारतात परतल्यानंतर त्यांनी आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय सुरू केला. टेरेस गार्डन ते टाउनशिप असा त्यांचा व्यावसायिक प्रवास झाला. त्या प्रवासातील अनुभव त्यांनी सांगितले आहेत. तसेच वास्तुशास्त्राचं सौंदर्याच्या आणि भावनांच्या चष्म्यातून केलेलं आकलनही त्या मांडतात. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील अपप्रवृत्तींबद्दलही त्या लिहितात. भारतात आणि भारताबाहेर केलेल्या भटकंतीचे अनुभवही त्यांनी सांगितले आहेत. या भटकंती दरम्यान त्यांनी अनुभवलेली निसर्गाची विविध रूपं त्यांनी शब्दबद्ध केली आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींबद्दलच्या, ज्येष्ठांबद्दलच्या भावना त्यांनी अतिशय उत्कटतेने व्यक्त केल्या आहेत. त्यांचे व्यावसायिक अनुभव असोत, शिक्षणाच्या बाबतीतले अनुभव असोत, भटकंती असो किंवा व्यक्तिचित्रण असो, भारत आणि परदेश यांची तुलना त्या करतात. परदेशात काही वर्षं राहूनही भारतीय माणसाचं साधं जगणं, आपली कुटुंबसंस्था, नातेसंबंध याविषयी त्यांना अभिमान आहे; मात्र तिथलं शिक्षण आणि भारतातील शिक्षण यातील फरक त्यांना प्रकर्षाने जाणवतो. तिथल्या शिक्षण पद्धतीतील खुलेपणा आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारा आत्मविश्वास यावर त्या भाष्य करतात. नवोदितांना घडवण्याची अमेरिकेतील आणि भारतातील पद्धत, यांची तुलना करताना त्या लिहितात,‘ विचारांना पुरेसं खाद्य मिळत होतं आणि माझे विचार कसाला लागत होते. तुलनात्मक निरीक्षणं घडत होती. मुंबईतल्या त्या ऑफिसच्या आठवणी अजून अगदीच ताज्या असताना केन मिचेलकडचा काळ आला आणि संपलाही. मला या दोन ऑफिसांमध्ये हजारो विरोधाभास जाणवले. मुंबईतल्या नोकरीत मला पुरेसं आव्हान मिळालं नाही. परिणामी, चांगल्या कार्यपूर्तीतून येणारा आनंद, समाधान हेही दूरवरच राहिलं. शिकण्याची इच्छा होती, परंतु आजूबाजूचे सीनिअर्स शिकवण्यात रस घेणारे नव्हते. केनने मात्र पहिल्या दिवसापासून माझ्या अभ्यासाचा, अभ्यासक्रमाचा आणि व्यक्तिशः माझा- संपूर्ण आदर केला. क्षेत्रात नवोदित म्हणून शिरतानाच्या काळात मिळालेल्या या आदरामुळे माझ्या ठिकाणी नैसर्गिकपणे, त्या आदराचा मान मी चांगल्या कामाद्वारा ठेवला पाहिजे, ही एक प्रामाणिक भावना रुजू लागली.’ आपल्या व्यवसायाविषयी बोलताना जाता जाता एखादी टिपही देतात. उदा. ‘स्वतःच्या क्षेत्रात नुसतं तांत्रिकदृष्ट्या ठीकठाक राहून भागत नाही. प्रॅक्टिसच्या सगळ्या अंगांनी चालू असणा-या उलाढालींचा ताबा घ्यावा लागतो. छंदिष्ट एकटेपणातून उत्तम डिझाइनच्या निर्मितीची उपासना करत असताना चांगल्या जनसंपर्काचं भानही ठेवावं लागतं. कागदावर सुंदर चित्र रंगवत असताना संबंधित जगातलं राजकारणही जगावं लागतं.’ त्यांच्या या आत्मकथनातून वास्तुशास्त्रज्ञ किंवा आर्किटेक्टचं काम नक्की कसं चालतं, या व्यवसायातील आव्हानं काय आहेत, व्यवसाय करताना कोणती पथ्यं पाळावी लागतात इ. या व्यवसायाशी निगडित अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. लालित्यपूर्ण भाषा हे या आत्मकथनाचं वैशिष्ट्यं आहे. जीवनात भौतिक गोष्टींसाठी किंवा मानसिक, भावनिक संघर्ष आला नाही तरी आपलं आपल्या मनाशी जीवनविषयक चिंतन चालू असतं. ते चिंतन त्यांनी शेवटच्या प्रकरणात मांडलं आहे. एकूणच त्यांच्या या आत्मकथनाला चिंतनशीलतेची, अध्यात्माची किनार आहे. लौकिक अनुभव आणि सौंदर्यपूर्ण अनुभव या हिंदोळ्यावर त्यांचं मन झुलताना दिसतं. जीवनाला चिंतनशीलतेने भिडताना त्यातील सौंदर्य, आनंद आणि शब्दातीत अनुभूती त्या टिपतात. म्हणूनच या आत्मकथनाला ‘मॅग्नोलिया’ असं सार्थ नाव त्यांनी दिलं आहे. मॅग्नोलियाबद्दल त्या स्वत:च लिहितात, ‘मॅग्नोलिया म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, आनंद आणि शांती!’ त्यांचं हे आत्मकथनही वाचकाला या तीन गोष्टींची अनुभूती देतं. तेव्हा जीवनाला विविध सकारात्मक अंगांनी कवेत घेऊ पाहणारं हे आत्मकथन मुळातून आणि आवर्जून वाचावं असं आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more