* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHALI JAMIN VAR AAKASH
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666588
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KHALI JAMEEN VAR AKASH (LITERALLY BETWEEN THE SKY AND THE EARTH) IS THE AUTOBIOGRAPHY OF DR. SUNILKUMAR LAWATE WHO AFTER BEING BORN TO AN UNWED MOTHER WAS DESERTED BY HER AND WHO SPENT HIS CHILDHOOD AS AN ORPHAN. HE WAS SHUNTED FROM AN ORPHANAGE TO A REMAND HOME (A DETENTION A PLACE) THOUGH HE WAS NOT AN OFFENDER. THE CHILD IN DR. LAWATE SUFFERED MENTALLY BEHIND THE HIGH WALLS. HIS NEW JOURNEY BEGAN WHEN HE JOINED A PRIVATE SCHOOL WHERE HE EXPERIENCED HUMANITY FOR THE FIRST TIME. ALL THROUGHOUT HIS STUDENT DAYS, HE HAD TO FACE THE STIGMA OF BEING AN ORPHAN AS ALSO TO DODGE RULES OF A RIGID BUREAUCRACY. AFTER COMPLETING SCHOOLING, HE CONTINUED HIS EDUCATION AND STUDIED UPTO HIS DOCTORATE. DR. LAWATE NOW TOOK TO TEACHING WHICH HE DID FOR ALMOST TWO DECADES. HE ALSO DECIDED TO DEVOTE HIMSELF TO THE CAUSE OF THE ORPHANS. HE CARRIED OUT VARIOUS EXPERIMENTS, VISITED FOREIGN COUNTRIES AND SOON ROSE TO THE POSITION OF A DECISION MAKER IN CHILD WELFARE. KHALEE JAMEEN VAR AKASH BRINGS OUT THE MANY FACETED PERSONALITY OF DR. LAWATE WHO HAS HAD A HARD AND PAINFUL JOURNEY OF LIFE STARTING FROM NNK (NAME NOT KNOWN) TO NWK (NAME WELL KNOWN).
अनाथाश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते. जात, धर्म, कुल, गोत्र, वंश, नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता, जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नोन’ होता. त्याला नाव नव्हतं. होता, एक नंबर. (कैद्याला असतो तसा!) त्याचं बालपण प्रश्नग्रस्त होतं. कौमार्य कुस्करलेलं. तारुण्य अव्हेरलं गेलेलं. तो वयात आला तसे त्याचे प्रश्नही वयात आले. प्रश्नांनी त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्त्व पेललं. प्रश्नांनीच तो शिकला-सवरला नि सावरलाही! आज त्याच्या पुढे आहे पर्यायांच्या प्राजक्तांचा सडा! सर्व काही असताना काही न करणा-यांना आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे – ‘खाली जमीन वर आकाश.’
* राज्य पुरस्कार-लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २००६ * स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार २००६ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार २००७
YOU TUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#खालीजमीनवरआकाश #डॉसुनीलकुमारलवटे #आत्मकथन #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #KHALIJAMINVARAAKASH #SUNILKUMARLAVATE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarAshok Chougale

    नमस्कार, मी अशोक चौगुले. पुस्तक परिचय मालिकेत तिसरे पुस्तकाची आज ओळख करुन देत आहे. पुस्तकांचं नाव आहे " खाली जमिन वर आकाश " "अनाथ आश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला, आई वडील नाहीत, जात, धर्म, कुल याच्या कसल्याही खुणा नाहीत. जन्मलेला तो क `नेम नॉट नोन` होता. कैद्याला असतो तसा एक नंबर जन्मापासून प्रश्न घेऊन आलेला. वय वाढले तसे प्रश्न वाढले. त्या प्रश्नांनीच त्याच पालकत्व घेतले. कठोर परिश्रम आणि सदैव शिकण्याचीउमेद यामुळे त्यांच्यासमोर पर्यायांचा प्राजक्ताचा सडाच उभा राहिला." पुस्तकाच्या मल पृष्ठावर हा छोटासा परिचय दिलेला आहे. यातून डॉ सुनीलकुमार लवटे सर हे काय रसायन आहे, याची छोटीशी झलक दिसते. आज मी त्यांचे जीवन कहाणी असलेल्या `खाली जमीन वर आकाश` या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीचा आणि संकटांचा सामना, लेखकाने वाचकासमोर मांडली आहे. या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनपट स्पष्ट व सहजपणे उलगडून दाखविला आहे. लेखकाने भोगलेले प्रसंग वाचताना डोले कधी भरुन आले कळत नाही. आश्रु आवरणे कठीण जाते. अनेक कठिणं संकटाशी सामना, समाजाकडुन झालेली उपेक्षा, हेटाळ्नी, अवहेलना सहन करूनही लेखकाने त्याविषयी कुठेही कटुता व्यक्त केलेली नाही. आयुष्यात भेटलेली चांगली माणसे आणि परिस्थिती बद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी सरळ, साध्या व सोप्या शब्दात मनापासून लिहिले आहे. मनाला खोलवर भिडेल असे हे पुस्तक आहे. लेखक रिमांड होममधील एक वेगळ्याच दुनियेची ओळख करून देतात. त्यांच्या शब्दांना धार आहे पण कोठेही कटुता नाही. शालेय जीवनात अतिशय खडतर प्रसंगात तावून सुलाखून निघालेल्या सरानी पुढे महाविद्यालयीन जीवनात सतत भरपूर वाचन, मनन, अभ्यास याद्वारे आपला विवेक सदृढ केला. स्वभिमान, मानवता, विवेक त्यांनी जीवनभर ढळू दिला नाही. हिंदी विषयात पीएचडी केलेल्या सरांना शिक्षण क्षेत्रात अत्युच्य स्थान प्राप्त करता आले. वि स खांडेकर यांची अनेक पुस्तके सरानी संपादित केली. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जीवनमुल्याशी कधीही तडजोड केली नाही. जगण्याची आणि काही करून दाखविण्याची प्रेरणा देणारे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते. सर्व काही असताना काही न करणाऱ्या लोकांना धडा देणारी ही कर्मकहाणी आहे. जीवनात कोणत्याही अपयशा मुळे आलेले निराशेचे मळभ या पुस्तकाच्या वाचनाने दुर होतिल अस मला वाटते. या पुस्तकाने अनेक पुरस्कार मिळवले असुन हिंदी , गुजराथी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपीत पण रुपांतर झाले आहे. तुम्ही ही वाचा. आवडेल तुम्हाला. अशोक चौगुले 020920 ...Read more

  • Rating Starधनाजी माळी.

    वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी करणारे थोर- ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. सुनीलकुमार लवटे सरांचं आत्मचरित्र `खाली जमीन वर आकाश` नुकतंच वाचनात आलं. आदरणीय लवटे सरांना खूपदा भेटलो. त्यांचं चरित्र जाणण्याचीही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. साहित्यिक मित् उत्तम पाटील सर यांच्याकडून मिळालेलं हे पुस्तक वाचून ती पूर्ण झाली. पुस्तकाची सुरुवातच एकदम धक्कादायक अशी आहे. वासनेची शिकार बनलेल्या एका कुमारी मातेच्या पोटी लेखकाचा जन्म झाला. इवलासा मांसाचा गोळा पंढरपुरच्या आश्रमात सोडून ती माता परागंदा झाली. पुढं दुसऱ्याच एका मातेनं लेखकाला मायेचा आधार दिला. पोटच्या मतिमंद पोरीला सांभाळत लेखकालाही त्या माऊलीनं सांभाळलं. वाढत्या वयाबरोबर लेखकाचं तिसरीपर्यंतचं शिक्षण पंढरपुरात झालं. तिथून पुढं कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये रवानगी झाली. अन् शिक्षणही कोल्हापुरातच सुरू झालं. लेखकाचं रिमांड होममधलं अनाथ- वंचित जगणं, सतत होणारी हेटाळणी- उपेक्षा. पुढं कळत्या-सवरत्या वयातही लेखकाने सोसलेले कटू अनुभव अन् या साऱ्या कटू गोष्टींना- अनुभवांना पुरून उरणारं लेखकाचं कर्तृत्व खरोखरच आचंबित करणारं आहे. रिमांड होममधलं अनाथ बालक ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा थोर विचारवंत असा लेखकाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. समाजाचा वंचितांकडे बघण्याचा विचित्र दृष्टिकोन अन् वंचित म्हणून लेखकाला आलेला अनुभव.. निदान त्या बालकांना तरी यायला नको म्हणून लेखकाची धडपड, रिमांड होमचं नामकरण बाल- कल्याण संकुल, लेखकाने सेवाभावी- निस्वार्थी वृत्तीने केलेले... डोळे दिपवणारे समाजकार्य, त्यात येणारे अडथळे, तरीही लेखकाचा विवेकी दृष्टिकोन अन् त्याचीच फलश्रुती म्हणून परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेकडून लाभलेले राज्याध्यक्षपद. पुढे अनेक प्रगत देशांचे अभ्यास दौरे करण्याकरिता केंद्रीय समितीत लेखकाची झालेली निवड, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे हिंदीतील अनुवादित साहित्य... त्यासाठी त्यांना दोनदा मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार अन् लवटे सरांच्याच पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची झालेली स्थापना.... हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. यासाठीच ` खाली जमीन - वर आकाश ` हे पुस्तक जरूर वाचावे. ---- धनाजी माळी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-04-2006

    कुणीच नसलेल्यांची कहाणी... ‘खाली जमीन, वर आकाश’ ही डॉ. सुनीलकुमार लवटे यांची जीवनकहाणी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर अडगळीत विखुरलेल्या आठवणी मोठ्या हिमतीनं गोळा केल्या आहेत. त्यांनी त्या प्रयत्नांत हाती आलेलं बालपणीच्या आठवणींचं गाठोडं तर वलक्षणच आहे. समाजातल्या इतर मुलांना मोठं मधुर वाटणारं हे बालपण लहानग्या सुनीलकुमारांसाठी प्रश्नांचं एक मोहोळ होतं. या असंख्य प्रश्नांना तोंड देण्याच्या समर्थ प्रयत्नांचं सार्थ रूप म्हणजे हे पुस्तक. ज्यांना या जगात आपलं असं कुणीच नाही, अशा सर्वांचीच ही कहाणी आहे. या कहाणीची सुरुवात होते १९४९च्या सरत्या काळात पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात एक माता बनू पाहणारी कुमारी मुलगी आपल्या वडिलांसह आली. वडील मुलीला आश्रामात ठेवून निघून गेले. मुलगी तिथंच राहिली. ११ एप्रिल १९५० ला तिनं एका तान्हुल्याला जन्म दिला. हा मुलगा जेमतेम दोन महिन्यांचा होतो, न होतो तोच मुलीचे वडील तिला न्यायला आले; पण त्या लहनग्या मातेला तोपर्यंत आपल्या बाळाचा चांगलाच लळा लागला होता. शेवटी मुलाला कोणीतरी सांभाळायला घ्यावं’ या अटीवर ती बाळाला सोडायला तयार झाली. ते दोन महिन्यांचं बाळ उमाबाई कस्तुरे नावाच्या एका आश्रमवासिनीच्या ओटीत घातलं गेलं. अशा तऱ्हेनं डॉ. सुनीलकुमार लवटे या नावानं पुढे कीर्तिवंत झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास सुरू झाला. वरवर पाहता ही डॉ. लवटे यांच्या जीवनाची कहाणी वाटली तरी पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. डॉ. लवटे यांच्या लिखाणाला इतिहासाच्या स्पर्शाचं सातत्य तर असतंच; पण लिहिण्याची एकंदर ढब अतिशय ललित असल्यानं पुस्तकातील शतकाहूनही अधिक वर्षांचा प्रवास वाचक उत्कंठेनं पार करीत जातो. नवरंगे बालकाश्रमातील शाळा, परित्यक्त महिलांसाठी असलेलं ‘रेस्क्यू होम’ यांचं वाचकाला अंतर्मुख करणारं वर्णन तर पुस्तकात आहेच; शिवाय त्या अनुषंगानं आश्रमात रात्रंदिवस ऐकू येणारा प्रसूतिवेदनांचा आक्रोश आणि जन्माला आलेल्यांचं ट्यांहा, ट्यांहा यांची वर्णनं वाचताना वाचक सुन्न होऊन जातो. ६ जून १९५९ या दिवशी सुनीलकुमारची बदली नवरंगे आश्रमातून कोल्हापूरच्या रिमांड होमला झाली. टांग्यातून जायला मिळणार म्हणून आनंदलेल्या त्या दहा वर्षांच्या मुलाच्या नजरेतून रिमांड होमचं दर्शन घेताना या संस्थांच्या कमालीच्या निर्मम कारभाराची कल्पना वाचकाला येते. या निर्मम व्यवस्थेशी झगडत सुनीलचा डॉ. सुनीलकुमार झाला. हा प्रवास खडतर होता; पण त्यातही माणुसकीचे अनंत झरे लेखकाच्या वाट्याला आले. त्यामुळेच असेल, डॉ. लवटे यांनी जे आयुष्य भोगलं, पाहिलं त्याचा वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ दिला नाही; उलट त्या अनुभवाचं रूपांतर केवढ्या सकारात्मक आयुष्यात केलं! या प्रवासात आपला सद्सद्विवेक असा काही घडवला, की त्यानं कामाची दिशा दाखवली, बळ दिले. हे बळ साथीला घेऊन डॉ. सुनीलकुमार लवटे वयाची पंचावन्न वर्षं चालत राहिले. ‘नेम नॉन नोन’ ही आयुष्याची सुरुवात; पण पुढे कितीतरी पदं भूषवली, कितीतरी सन्मानांचे मानकरी ठरले. देश-विदेशात भ्रंमती झाली. तिथल्या सामाजिक कार्यांचे निरीक्षण करता आले. विपुल लेखनही हातून घडले; पण त्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे जी अनाथपणाची वेदना स्वत: भोगली, त्याचा विसर कधीच पडला नाही. रिमांड होमचा प्रमुख या नात्यानं संस्थेचा संपूर्ण कायापालट तर केलाच, शिवाय अनेक मुलांना पितृत्वाच्या उबदार भावनेची ऊब दिली. डॉ. लवटे यांनी ही सारी कहाणी कधी त्या कहाणीतली प्रमुख भूमिका घेऊन मांडली आहे, तर कधी त्रयस्ताच्या नात्यानं मानवी जीवनातील संगती-विसंगती वाचकांच्या पुढे ठेवल्या आहेत. हा मांडणीचा दुरंगी गोफ, हेच या पुस्ताकचं मोठं यश आहे. अनुसधा ऊर्फ मारिया या मुलीची गोष्ट वाचताना डॉ. लवटे यांच्यातील सहृदय माणूस तर प्रत्ययाला येतोच, पण लिखाणाच्या सामर्थ्याचीही प्रचिती येते. -रेणू गावस्कर ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-04-2006

    शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी... शून्यातून जग निर्माण करणाऱ्या या शर्थीच्या प्रयत्नांची कर्म कहाणी आता साहित्याच्या प्रांतात ‘खाली जमीन वर आकाश’ होऊन अवतरलीय. २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन. या पुस्तकदिनाच्या निमित्तानं जगावेगळं आयुष्य जगलेल्या या मणसाच्या जीवनकहाणीची आणि त्याच्या पुस्तकनिर्मितीचा घेतलेला धांडोळा... अनाथाश्रमात जन्मलेला... रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते... जात-धर्म-कुल-गोत्र-वंश नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नॉन’ होता... त्याला नाव नव्हतं. होता एक नंबर. जसा कैद्यांना असतो तसा तो वयात आला तसा त्याचे प्रश्नही वाढत गेले. प्रश्नांनीच त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्व स्विकारलं. प्रश्नानीच तो शिकला-सवरला. नि सावलाही. अस्तित्वाच्या, परिचयाच्या कोणत्याच पारंपरिक खुणा नसलेला तो, समाजानं दिलेल्या जमिनीवर स्वत:च आकाश आकारत डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणून चमकले. आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख निर्माण केली. एक अनाथ मुलगा ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य इथंपर्यंत झेप मारताना समाजतील अनेक विध क्षेत्रात प्रत्यक्ष काम केलं. प्रत्येकजण बालपणी देवाकडं एक मागणं मागत असतो. ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ मात्र लवटे सराचं जीवनचं वेगळं. त्याचं बालपण छोट्या प्रश्नाचं मोठं काहूर होतं. शालेय जीवन प्रश्नग्रस्त होतं. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या निरागस बालकाला ‘तुझं नाव काय? तुझे आई वडील कोण? गाव कुठलं? तू कुणापैकी?’ असे छोटे-छोटे प्रश्न थरकाप उडवून लावायचे. कारण या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसायची. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेल्या या मुलाला अनाश्रमात वाढावं लागलं. त्यामुळं त्याच्या बालवयात माणूसपणाचा मागमूसही नव्हता. लवटे सर आपली चित्तरकहानी सांगू लागतात, कधी काळी असा जन्मलेला मी... अनाथाश्रम, रिमांड होममध्ये, वाढलो, शिकलो, सावरलो आणि सावरलोही यामुळं माझे बालपण ‘अहा ते सुंदर दिन हरपले’ अशी हुरहूर लावणारेही नव्हते. माणूस सुजाण झाला की जमीन मागे पडते नि आकाश बार वर सरकत राहतं. आकाशात चंद्र-सूर्य असतात म्हणे. कळत्या उमलत्या वयात मी फक्त तळपणारा सूर्यच अनुभवला. कडाडणाऱ्या विजाच रात्री माझ्या सोबतीला असायच्या. ‘शुक्रतारा... मंद वारा’ मला कधी भावला, लाभला नाही. धु्रवपण नाही कधी आवडला. हा मात्र उल्का धुमकेतू का कुणास ठाऊक मला आपले वाटत आलेत, का ते नाही सांगता येत’ आयुष्यभर सोसलेल्या लवटे सरांनी आक्रोश, आक्रस्ताळेपणा, आरोप यांना बगल देत नि रचनात्मक मार्गाची कास धरत आपली जीवनकहाणी ‘खाली जमीन, वर आकाश’ मध्ये शब्दबद्ध केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने नुकतेच हे आत्मकथन बाजारात आलंय. अजून त्याचा प्रकाशन समारंभ सुद्धा झाला नाही. तरीसुद्धा जीवनविषयक चिंतन मांडणारी ही साहित्यकृती वाचकांच्या हृदयाला भिडलीय. साहित्यवर्तुळात त्याचा गाजावाजा होऊ लागलाय. ‘ललित’ने तर एक लक्षवेधी साहित्यकृती म्हणून याला गौरविलंय. या पुस्तकाविषयी सांगताना लवटे सर म्हणाले, ही कथा स्नेह आणि सहयोगातून उभारलेल्या एका नव्या जगात वाचकांना घेऊन जाईल. हे नवं जग माणुसकीच्या गहिवराचं खरं पण तुमच्या रोजच्या जिंदगीला छेद देणारं आहे. माझं जगणं सवर्ण - अवर्तणेच्या पलीकडचं असल्यानं जे जगलं, भोगलं ते लिहिलं. हे आत्मकथन रक्तसंबंध, जातपंचायत, धर्मसभा, संस्कार आदी पारंपरिकतेस भेदून घेतलेला माणूसपणाचा एक आत्मशोध आहे. -आप्पासाहेब माळी, कोल्हापूर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more