* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666588
  • Edition : 8
  • Publishing Year : FEBRUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KHALI JAMEEN VAR AKASH (LITERALLY BETWEEN THE SKY AND THE EARTH) IS THE AUTOBIOGRAPHY OF DR. SUNILKUMAR LAWATE WHO AFTER BEING BORN TO AN UNWED MOTHER WAS DESERTED BY HER AND WHO SPENT HIS CHILDHOOD AS AN ORPHAN. HE WAS SHUNTED FROM AN ORPHANAGE TO A REMAND HOME (A DETENTION A PLACE) THOUGH HE WAS NOT AN OFFENDER. THE CHILD IN DR. LAWATE SUFFERED MENTALLY BEHIND THE HIGH WALLS. HIS NEW JOURNEY BEGAN WHEN HE JOINED A PRIVATE SCHOOL WHERE HE EXPERIENCED HUMANITY FOR THE FIRST TIME. ALL THROUGHOUT HIS STUDENT DAYS, HE HAD TO FACE THE STIGMA OF BEING AN ORPHAN AS ALSO TO DODGE RULES OF A RIGID BUREAUCRACY. AFTER COMPLETING SCHOOLING, HE CONTINUED HIS EDUCATION AND STUDIED UPTO HIS DOCTORATE. DR. LAWATE NOW TOOK TO TEACHING WHICH HE DID FOR ALMOST TWO DECADES. HE ALSO DECIDED TO DEVOTE HIMSELF TO THE CAUSE OF THE ORPHANS. HE CARRIED OUT VARIOUS EXPERIMENTS, VISITED FOREIGN COUNTRIES AND SOON ROSE TO THE POSITION OF A DECISION MAKER IN CHILD WELFARE. KHALEE JAMEEN VAR AKASH BRINGS OUT THE MANY FACETED PERSONALITY OF DR. LAWATE WHO HAS HAD A HARD AND PAINFUL JOURNEY OF LIFE STARTING FROM NNK (NAME NOT KNOWN) TO NWK (NAME WELL KNOWN).
अनाथाश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला तो. त्यास आई-वडील नव्हते. जात, धर्म, कुल, गोत्र, वंश, नातेवाईक अशा पारंपरिक अस्तित्वाच्या कसल्याही खुणा न घेता, जन्मलेला तो एक ‘नेम नॉट नोन’ होता. त्याला नाव नव्हतं. होता, एक नंबर. (कैद्याला असतो तसा!) त्याचं बालपण प्रश्नग्रस्त होतं. कौमार्य कुस्करलेलं. तारुण्य अव्हेरलं गेलेलं. तो वयात आला तसे त्याचे प्रश्नही वयात आले. प्रश्नांनी त्याला प्रौढ केलं. प्रश्नांनीच त्याचं पालकत्त्व पेललं. प्रश्नांनीच तो शिकला-सवरला नि सावरलाही! आज त्याच्या पुढे आहे पर्यायांच्या प्राजक्तांचा सडा! सर्व काही असताना काही न करणा-यांना आपल्या नाकर्तेपणाची जाण देणारी ही कर्मकहाणी आहे – ‘खाली जमीन वर आकाश.’
* राज्य पुरस्कार-लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार २००६ * स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार २००६ * महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार २००७
YOU TUBE
No Records Found
No Records Found
Keywords
#खालीजमीनवरआकाश #डॉसुनीलकुमारलवटे #आत्मकथन #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #KHALIJAMINVARAAKASH #SUNILKUMARLAVATE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starअनिल कृष्णा जमाले

    मी आतापर्यंत थोडीफार आत्मचरित्रे वाचली आहेत , काही संग्रही आहेत , परंतु हे आत्मचरित्र वाचताना मेंदू बधीर होऊन जातो आहे , या पेक्षा अधिक ते काय बोलणार , निशब्द !

  • Rating StarAshok Chougale

    नमस्कार, मी अशोक चौगुले. पुस्तक परिचय मालिकेत तिसरे पुस्तकाची आज ओळख करुन देत आहे. पुस्तकांचं नाव आहे " खाली जमिन वर आकाश " "अनाथ आश्रमात जन्मलेला, रिमांड होममध्ये वाढलेला, आई वडील नाहीत, जात, धर्म, कुल याच्या कसल्याही खुणा नाहीत. जन्मलेला तो क `नेम नॉट नोन` होता. कैद्याला असतो तसा एक नंबर जन्मापासून प्रश्न घेऊन आलेला. वय वाढले तसे प्रश्न वाढले. त्या प्रश्नांनीच त्याच पालकत्व घेतले. कठोर परिश्रम आणि सदैव शिकण्याचीउमेद यामुळे त्यांच्यासमोर पर्यायांचा प्राजक्ताचा सडाच उभा राहिला." पुस्तकाच्या मल पृष्ठावर हा छोटासा परिचय दिलेला आहे. यातून डॉ सुनीलकुमार लवटे सर हे काय रसायन आहे, याची छोटीशी झलक दिसते. आज मी त्यांचे जीवन कहाणी असलेल्या `खाली जमीन वर आकाश` या पुस्तकाचा परिचय करून देत आहे. जन्मापासून प्रतिकूल परिस्थितीचा आणि संकटांचा सामना, लेखकाने वाचकासमोर मांडली आहे. या पुस्तकातून त्यांनी आपला जीवनपट स्पष्ट व सहजपणे उलगडून दाखविला आहे. लेखकाने भोगलेले प्रसंग वाचताना डोले कधी भरुन आले कळत नाही. आश्रु आवरणे कठीण जाते. अनेक कठिणं संकटाशी सामना, समाजाकडुन झालेली उपेक्षा, हेटाळ्नी, अवहेलना सहन करूनही लेखकाने त्याविषयी कुठेही कटुता व्यक्त केलेली नाही. आयुष्यात भेटलेली चांगली माणसे आणि परिस्थिती बद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी सरळ, साध्या व सोप्या शब्दात मनापासून लिहिले आहे. मनाला खोलवर भिडेल असे हे पुस्तक आहे. लेखक रिमांड होममधील एक वेगळ्याच दुनियेची ओळख करून देतात. त्यांच्या शब्दांना धार आहे पण कोठेही कटुता नाही. शालेय जीवनात अतिशय खडतर प्रसंगात तावून सुलाखून निघालेल्या सरानी पुढे महाविद्यालयीन जीवनात सतत भरपूर वाचन, मनन, अभ्यास याद्वारे आपला विवेक सदृढ केला. स्वभिमान, मानवता, विवेक त्यांनी जीवनभर ढळू दिला नाही. हिंदी विषयात पीएचडी केलेल्या सरांना शिक्षण क्षेत्रात अत्युच्य स्थान प्राप्त करता आले. वि स खांडेकर यांची अनेक पुस्तके सरानी संपादित केली. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जीवनमुल्याशी कधीही तडजोड केली नाही. जगण्याची आणि काही करून दाखविण्याची प्रेरणा देणारे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे मला वाटते. सर्व काही असताना काही न करणाऱ्या लोकांना धडा देणारी ही कर्मकहाणी आहे. जीवनात कोणत्याही अपयशा मुळे आलेले निराशेचे मळभ या पुस्तकाच्या वाचनाने दुर होतिल अस मला वाटते. या पुस्तकाने अनेक पुरस्कार मिळवले असुन हिंदी , गुजराथी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपीत पण रुपांतर झाले आहे. तुम्ही ही वाचा. आवडेल तुम्हाला. अशोक चौगुले 020920 ...Read more

  • Rating Starधनाजी माळी.

    वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी करणारे थोर- ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व डॉ. सुनीलकुमार लवटे सरांचं आत्मचरित्र `खाली जमीन वर आकाश` नुकतंच वाचनात आलं. आदरणीय लवटे सरांना खूपदा भेटलो. त्यांचं चरित्र जाणण्याचीही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. साहित्यिक मित् उत्तम पाटील सर यांच्याकडून मिळालेलं हे पुस्तक वाचून ती पूर्ण झाली. पुस्तकाची सुरुवातच एकदम धक्कादायक अशी आहे. वासनेची शिकार बनलेल्या एका कुमारी मातेच्या पोटी लेखकाचा जन्म झाला. इवलासा मांसाचा गोळा पंढरपुरच्या आश्रमात सोडून ती माता परागंदा झाली. पुढं दुसऱ्याच एका मातेनं लेखकाला मायेचा आधार दिला. पोटच्या मतिमंद पोरीला सांभाळत लेखकालाही त्या माऊलीनं सांभाळलं. वाढत्या वयाबरोबर लेखकाचं तिसरीपर्यंतचं शिक्षण पंढरपुरात झालं. तिथून पुढं कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये रवानगी झाली. अन् शिक्षणही कोल्हापुरातच सुरू झालं. लेखकाचं रिमांड होममधलं अनाथ- वंचित जगणं, सतत होणारी हेटाळणी- उपेक्षा. पुढं कळत्या-सवरत्या वयातही लेखकाने सोसलेले कटू अनुभव अन् या साऱ्या कटू गोष्टींना- अनुभवांना पुरून उरणारं लेखकाचं कर्तृत्व खरोखरच आचंबित करणारं आहे. रिमांड होममधलं अनाथ बालक ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा थोर विचारवंत असा लेखकाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. समाजाचा वंचितांकडे बघण्याचा विचित्र दृष्टिकोन अन् वंचित म्हणून लेखकाला आलेला अनुभव.. निदान त्या बालकांना तरी यायला नको म्हणून लेखकाची धडपड, रिमांड होमचं नामकरण बाल- कल्याण संकुल, लेखकाने सेवाभावी- निस्वार्थी वृत्तीने केलेले... डोळे दिपवणारे समाजकार्य, त्यात येणारे अडथळे, तरीही लेखकाचा विवेकी दृष्टिकोन अन् त्याचीच फलश्रुती म्हणून परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेकडून लाभलेले राज्याध्यक्षपद. पुढे अनेक प्रगत देशांचे अभ्यास दौरे करण्याकरिता केंद्रीय समितीत लेखकाची झालेली निवड, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे हिंदीतील अनुवादित साहित्य... त्यासाठी त्यांना दोनदा मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार अन् लवटे सरांच्याच पुढाकाराने शिवाजी विद्यापीठात वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालयाची झालेली स्थापना.... हा साराच प्रवास थक्क करणारा आहे. यासाठीच ` खाली जमीन - वर आकाश ` हे पुस्तक जरूर वाचावे. ---- धनाजी माळी. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 02-04-2006

    कुणीच नसलेल्यांची कहाणी... ‘खाली जमीन, वर आकाश’ ही डॉ. सुनीलकुमार लवटे यांची जीवनकहाणी. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर अडगळीत विखुरलेल्या आठवणी मोठ्या हिमतीनं गोळा केल्या आहेत. त्यांनी त्या प्रयत्नांत हाती आलेलं बालपणीच्या आठवणींचं गाठोडं तर वलक्षणच आहे. समाजातल्या इतर मुलांना मोठं मधुर वाटणारं हे बालपण लहानग्या सुनीलकुमारांसाठी प्रश्नांचं एक मोहोळ होतं. या असंख्य प्रश्नांना तोंड देण्याच्या समर्थ प्रयत्नांचं सार्थ रूप म्हणजे हे पुस्तक. ज्यांना या जगात आपलं असं कुणीच नाही, अशा सर्वांचीच ही कहाणी आहे. या कहाणीची सुरुवात होते १९४९च्या सरत्या काळात पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात एक माता बनू पाहणारी कुमारी मुलगी आपल्या वडिलांसह आली. वडील मुलीला आश्रामात ठेवून निघून गेले. मुलगी तिथंच राहिली. ११ एप्रिल १९५० ला तिनं एका तान्हुल्याला जन्म दिला. हा मुलगा जेमतेम दोन महिन्यांचा होतो, न होतो तोच मुलीचे वडील तिला न्यायला आले; पण त्या लहनग्या मातेला तोपर्यंत आपल्या बाळाचा चांगलाच लळा लागला होता. शेवटी मुलाला कोणीतरी सांभाळायला घ्यावं’ या अटीवर ती बाळाला सोडायला तयार झाली. ते दोन महिन्यांचं बाळ उमाबाई कस्तुरे नावाच्या एका आश्रमवासिनीच्या ओटीत घातलं गेलं. अशा तऱ्हेनं डॉ. सुनीलकुमार लवटे या नावानं पुढे कीर्तिवंत झालेल्या एका माणसाचा जीवनप्रवास सुरू झाला. वरवर पाहता ही डॉ. लवटे यांच्या जीवनाची कहाणी वाटली तरी पुस्तकाचा आवाका खूप मोठा आहे. डॉ. लवटे यांच्या लिखाणाला इतिहासाच्या स्पर्शाचं सातत्य तर असतंच; पण लिहिण्याची एकंदर ढब अतिशय ललित असल्यानं पुस्तकातील शतकाहूनही अधिक वर्षांचा प्रवास वाचक उत्कंठेनं पार करीत जातो. नवरंगे बालकाश्रमातील शाळा, परित्यक्त महिलांसाठी असलेलं ‘रेस्क्यू होम’ यांचं वाचकाला अंतर्मुख करणारं वर्णन तर पुस्तकात आहेच; शिवाय त्या अनुषंगानं आश्रमात रात्रंदिवस ऐकू येणारा प्रसूतिवेदनांचा आक्रोश आणि जन्माला आलेल्यांचं ट्यांहा, ट्यांहा यांची वर्णनं वाचताना वाचक सुन्न होऊन जातो. ६ जून १९५९ या दिवशी सुनीलकुमारची बदली नवरंगे आश्रमातून कोल्हापूरच्या रिमांड होमला झाली. टांग्यातून जायला मिळणार म्हणून आनंदलेल्या त्या दहा वर्षांच्या मुलाच्या नजरेतून रिमांड होमचं दर्शन घेताना या संस्थांच्या कमालीच्या निर्मम कारभाराची कल्पना वाचकाला येते. या निर्मम व्यवस्थेशी झगडत सुनीलचा डॉ. सुनीलकुमार झाला. हा प्रवास खडतर होता; पण त्यातही माणुसकीचे अनंत झरे लेखकाच्या वाट्याला आले. त्यामुळेच असेल, डॉ. लवटे यांनी जे आयुष्य भोगलं, पाहिलं त्याचा वैयक्तिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ दिला नाही; उलट त्या अनुभवाचं रूपांतर केवढ्या सकारात्मक आयुष्यात केलं! या प्रवासात आपला सद्सद्विवेक असा काही घडवला, की त्यानं कामाची दिशा दाखवली, बळ दिले. हे बळ साथीला घेऊन डॉ. सुनीलकुमार लवटे वयाची पंचावन्न वर्षं चालत राहिले. ‘नेम नॉन नोन’ ही आयुष्याची सुरुवात; पण पुढे कितीतरी पदं भूषवली, कितीतरी सन्मानांचे मानकरी ठरले. देश-विदेशात भ्रंमती झाली. तिथल्या सामाजिक कार्यांचे निरीक्षण करता आले. विपुल लेखनही हातून घडले; पण त्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे जी अनाथपणाची वेदना स्वत: भोगली, त्याचा विसर कधीच पडला नाही. रिमांड होमचा प्रमुख या नात्यानं संस्थेचा संपूर्ण कायापालट तर केलाच, शिवाय अनेक मुलांना पितृत्वाच्या उबदार भावनेची ऊब दिली. डॉ. लवटे यांनी ही सारी कहाणी कधी त्या कहाणीतली प्रमुख भूमिका घेऊन मांडली आहे, तर कधी त्रयस्ताच्या नात्यानं मानवी जीवनातील संगती-विसंगती वाचकांच्या पुढे ठेवल्या आहेत. हा मांडणीचा दुरंगी गोफ, हेच या पुस्ताकचं मोठं यश आहे. अनुसधा ऊर्फ मारिया या मुलीची गोष्ट वाचताना डॉ. लवटे यांच्यातील सहृदय माणूस तर प्रत्ययाला येतोच, पण लिखाणाच्या सामर्थ्याचीही प्रचिती येते. -रेणू गावस्कर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more