* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAR HAR MAIDAN FATEH
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175214
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VISHWAS NANGRE PATIL IS THE MAN OF VIRTUE & TRUE INSPIRATION TO THE MARATHI YOUTH. HIS BIOGRAPHY ‘KAR HAR MAIDAN FATEH’ IS SUCH AN INSPIRATIONAL STORY, THAT AFTER READING THIS YOU`LL FIND YOURSELF COMPLETELY CHARGED UP AND YOU WILL START HEADING YOUR DAYS IN THE NEW DIRECTION ! THIS BOOK SHINE THE LIGHT ON HIS JOURNEY FROM A SMALL VILLAGE BOY TO MOST PROMISING IPS OFFICER. THIS BOOK IS A CLUSTER OF HARDSHIPS, A JOURNEY ESCAPING UP ALL THE BARRIERS AND GIVING UP EVERYTHING FOR ACHIEVING THE ULTIMATE GOAL OF LIFE
सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.

No Records Found
No Records Found
Keywords
#KARHARMAIDANFATEH #VISHWASNANGREPATIL #BIOGRAPHY #IPS #UPSC #2611MUMBAIBLAST #MAHARASHTRAPOLICE #MUMBAIJOINTCOMMISSIONEROFPOLICE #INSPIRATIONALSTORY #YOGAFORHEALTH #LALBAHADURSHASTRINATIONALACADEMYOFADMINISTRATION #करहरमैदानफ़तेह #विश्वासनांगरेपाटील #महाराष्ट्रपोलीस #आयपीएस #यूपीएससी #लालबहादूरशास्त्रीराष्ट्रीयप्रशासकीयअकादमी #भारतीयपोलीससेवा #मुंबईदहशतवादीहल्ला
Customer Reviews
  • Rating StarPurva

    Nice

  • Rating StarPankaj Kharade, Vachanveda Group

    ` मन में हैं विश्वास ` नंतर विश्वास नांगरे सरांचे पुढील पुस्तक म्हणजे ` कर हर मैदान फतेह` . विद्यार्थ्यांना आणि नवयुवक यांना अतिशय मार्गदर्शन पर असे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तर नक्की वाचावेच पण पालकांनीही ते जरूर वाचायला हवे . सरांचे न में हैं विश्वास हे पुस्तक आणि त्याविषयी माहिती मी या ग्रूपवर शेअर केली होती त्याविषयी अनेक उलट सुलट किंवा नकारात्मक आणि विरोधी कमेंट काही वाचकांच्या आल्या होत्या . नांगरे पाटील यांनी या पुस्तकात स्वतःची आत्मप्रौढी वगैरे मिरवली आहे असा काहीसा त्यांचा स्वर होता. हे त्यांचे आत्मचरित्र आहे , आणि त्यात त्यांनी केलेले संघर्ष आणि त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांना मिळालेले यश त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोल वॉल्ट सारखी उंच उडी त्यांनी मारली आणि त्याचे वर्णन केले तर ती आत्मप्रौढी होऊ शकत नाही. एखाद्या लेखकाने स्वतःच्या गरिबीचे आत्मकथन केले की आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते पण जर तशाच एखाद्या लेखकाने स्वतःच्या संघर्षाचे आणि मिळालेल्या यशाचे वर वर्णन केले की ती आत्मप्रौढी होते काय? .. असो या गोष्टीवर अनेक वादविवाद असू शकतात पण आधीचे पुस्तक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारे होते विषेतः कॉलेज आणि काहीतरी बनू इच्छिणाऱ्या युवकांसाठी . यूपीएससी झाल्यानंतरचा विश्वास सरांचा पुढील प्रवास हा तितकाच प्रेरक आणि मार्गदर्शन पर आहे . फक्त विद्यार्थीच नाही तर प्रत्येक पालक , नागरिक ,महिला आणि अबालवृद्ध यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधक नियम आणि कायदे सरांनी अनेक उदाहरणे , अनेक थोर व्यक्तींची सुभाषिते आणि विचार मांडून पटवून दिले आहेत . शरीर आणि मन निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणते व्यायाम किंवा योग करावे , महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करावे किंवा काय करू नये, लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांची कोणती कर्तव्ये आहेत . किंवा डिजिटल बँकिंग वापरताना कोणती खबरदारी घ्यावी . अगदी आपले डिजिटल पासवर्ड कसे असावे आणि कधी बदलावे या विषयी अगदी कळकळीने विश्वास सर व्यक्त झाले आहेत . विपरीत परिस्थिती कशी हाताळावी , आलेल्या संकटसमयी त्याला धैर्याने कसे सामोरे जायला हवे , सर्व काही असताना डिप्रेशन का येते आणि त्यातून कसे सावरावे हे सर सांगूच शकतात कारण जिया खान किंवा सुशांत राजपूत सारखी अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत . वर्दीच्या आतला प्रत्येक पोलिस हा एक नागरिक असतो आणि प्रत्येक नागरिक हा बिन वर्दीचा पोलिस असतो . किती अर्थपूर्ण आहे हे विधान . अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग वाचताना खूप आत्मविश्वास निर्माण होतो . म्हणून प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावयास हवे असे मला वाटते.🙏 ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 04-07-2021

    प्रेरक स्वानुभव... ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसिद्ध आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे विद्यमान पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे ‘कर हर मैदान फतेह’ हा आत्मकथनाचा दुसरा भाग ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केला आहे. ‘म में है विश्वास’मध्ये नांगरे पाटील यांनी त्यांचा सुरुवातीचा संघर्षाचा कालखंड मांडला आहे. त्यांची आयपीएसमधील निवड हा त्यातील सर्वोच्च बिंदू होता. ‘कर हर मैदान फतेह’ या दुसऱ्या भागात त्यांनी आयपीएस निवडीनंतर कुंभार मातीला आकार देतो, तसे एका युवकाचे एक अधिकाऱ्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध केले आहे. समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या पुस्तकातून नांगरे पाटील यांनी युवावर्गाला समजेल, अशा सोप्या शब्दांत सांगितल्या आहेत. सायबर गुन्हे, पोलीस प्रणाली, व्यसनाधीनता, सार्वजनिक जीवनात सुरक्षितता, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन, वेळेचे व कामाचे नियोजन या विषयांना नांगरे पाटील यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक त्यांच्या अनुभवांची, प्रशिक्षणाची व कर्तव्यांची सरमिसळ आहे. ज्याला जे पाहिजे, ते त्यातून निवडून घेऊन ते आपापल्या व्यक्तित्वाशी सांगड घालू शकतील, अशी या पुस्तकाची मांडणी आहे. ...Read more

  • Rating StarMeenakshi Sonawane

    कर हर मैदान फतेह. विश्वास नांगरे पाटील (मेहता पब्लिशिंग हाऊस) जानेवारी महिन्यात `चला हवा येऊ द्या` कार्यक्रमात `कर हर मैदान फतेह` पुस्तक प्रकाशित झाल्याचं समजलं......, `मन मै है विश्वास` आत्मकथनामध्ये सुरवातीचा संघर्ष वाचला ोता, आता उत्सुकता होती ती कर हर मैदान फतेहची...... तरुण वयातील प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि ताकदीला सकारात्मक दिशा दाखवणारा मार्गदर्शक म्हणजे कर हर मैदान फतेह. कोकरूड सारख्या छोट्याशा खेडेगावातील कोकरू...... आय. पी. एस. अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर कुंभार मातीला आकार देतो तसे एका युवकाचे एका अधिकाऱ्यांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. एकाच वेळी आय पी एस ,उपजिल्हाधिकारीआणि विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झालेला आणि कोणतीही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी नसलेला ग्रामीण भागातील तरुण. प्रवेशावेळची घुसमट, त्यातलं द्वंद्व आणि कमान हाती घेतली की सुरू होणारं भन्नाट जीवन. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अंगाची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा `विश्वास`. मुळात क्षमतांचा विकास न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाच बीज प्रेरणारा हा प्रवास....... आपणास खूप काही शिकवून जातो. या पुस्तकात आपणास लबास्ना,एन पी ए, आऊट डोअर ट्रेनिंग, व्यवस्थापन जीवनाचे व व्यवसायाचे, अडथळे आणि आत्मघात याविषयी सविस्तर वाचायला मिळते.अनुभव आणि प्रसंग अधिक जिवंत वाटण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुविचार, श्लोक, उदाहरणे ,कवने दिली आहेत.(अगदी डायरीत नोंद करून ठेवावी अशी) वाचताना मसुरीची थंडी, लबात्स्ना ट्रेनिंग सेंटर, हैदराबाद सेंटर चे चित्र डोळ्यासमोर उभे राहते तसेच पिळदार मिशा, उस्ताद, कुस्तीचा आखाडा, गवळोबाचा डोंगर, कोल्हापुरी तांबडा पांढरा आपल्याला कोल्हापूर फिरवून आणल्याशिवाय राहत नाही. या पुस्तकामुळे आपणास जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड इच्छाशक्ती,उत्साह मिळतो. पुस्तकातील आवडलेला एक उतारा.... `तुम्ही हळूहळू मरता, जेव्हा तुम्ही भटकत नाही,प्रवास करत नाही,वाचन करत नाही,जीवनाचं संगीतच ऐकत नाही, तुम्ही स्वतः च कौतुकच करत नाही,स्वतः च मन मारून तडजोड करत राहता. आयुष्याला सुंदर वळण देण्याचा धोकाच स्वीकारत नाही.स्वतः च्या स्वप्नाच्या मागे धावत नाही आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झपाटून झोकून देत नाही त्यावेळी तुम्ही हळूहळू मरता. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगा, प्रत्येक क्षण वेगळा आहे आणि वेगळेपणात आनंद आहे.जीवन किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे,त्याचे संदर्भ किती विविध अंगांनी नटलेले आहेत...............( बाकी तुम्ही प्रत्यक्ष वाचा) प्रत्येकाने आवर्जुन वाचावे असे पुस्तक. शेवटी " इन मुटठीयो में चांद तारे भर के आसामा की हद से गुजर के हो जा तू भीड से जुदा, भीड से जुदा रे बंदिया कर हर मैदान फतेह......... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more