* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE JOY OF CANCER
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANBHAG
  • ISBN : 9788177664348
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :WORLD HEALTH DAY OFFER SET - 3
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS IRONICAL THAT IN THE FACE OF DEATH, I BEGAN, FOR THE FIRST TIME, TO REALLY LIVE." BY THE TIME ANUP KUMAR DISCOVERED HE HAD CANCER, IT HAD ALREADY ADVANCED TO THE LAST STAGES AND HE WAS TOLD HE HAD FOUR MONTHS TO LIVE. THE JOY OF CANCER IS THE OUTCOME OF THE EMOTIONAL AND PHYSICAL ANGUISH THAT FOLLOWED, BUT EVEN MORE, IT IS ABOUT THE POWER OF THE HUMAN MIND AND BODY TO REVERSE A DEATH SENTENCE. IT IS SAID THAT THE ONLY REAL EXPERTS ON CANCER ARE THOSE WHO HAVE SUFFERED FROM IT. THEY WILL TELL YOU THINGS THAT DOCTORS WON`T. ON HOW TO ACCEPT THE PRESENCE OF CANCER IN YOUR LIFE, FOR INSTANCE AND HOW TO CONQUER FEAR. ON THE REAL SIDE-EFFECTS OF CHEMOTHERAPY AND THE PRECAUTIONS YOU SHOULD TAKE. THE JOY OF CANCER ADDRESSES ALL THESE QUESTIONS AND MORE. WRITTEN IN THE FORM OF A GUIDE, IT ENUMERATES A SEVEN-POINT BATTLE PLAN AGAINST CANCER. THE BASIC PREMISE OF THIS PLAN IS THAT SURVIVAL IS AS MUCH IN THE HANDS OF THE PATIENT AS THE DOCTOR
कॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कॅन्सरचं निदान होतं, तेव्हा त्या व्यक्तीची आणि कुटुंबीयांची काय अवस्था होते, या रोगाचे आर्थिक, कौटुंबिक परिणाम कसे होतात, त्या रोगावर कोणते उपचार केले जातात, उपचारांदरम्यान त्या रोग्याची मानसिक, शारीरिक स्थिती काय असते आणि या रोगाला धीरादात्तपणे कसे सामोरे जावे याची माहिती देणारं पुस्तक आहे, ’द जॉय ऑफ कॅन्सर.’ अनुपकुमार यांच्या स्वानुभवातून साकारलेलं हे पुस्तक आहे. एका आंतररराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्षपदावर काम करणार्‍या अनुपकुमार यांची नोकरी गेली. वयाची पन्नाशी उलटलेली, मुलीचं लग्न तोंडावर आलेलं, जाहिरात क्षेत्र मंदीच्या लाटेखाली होतं; त्यामुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होत नव्हत्या. ज्या होत होत्या त्या तरुणांसाठी होत्या. एकूण अशी निराशाजनक परिस्थिती असताना अबुधाबीतील एका दूरसंचार संस्थेने त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. त्या नोकरीसाठी अनुपकुमार यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्या तपासणीदरम्यान त्यांच्या फुफ्फुसावर डाग असल्याचे आढळले आणि मग तपासण्यांचे चक्र चालू झाले. त्या तपासण्यांमधून त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्या फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला लक्षात आल्याने अनुपकुमार चार महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाहीत, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं; त्यामुळे त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचारही करू नयेत, असंही डॉक्टर म्हणाले होते; पण अनुपकुमार यांना जगायची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी केमोथेरपी करायचे ठरवले. केमोथेरपीदरम्यान शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली; त्यामुळे त्यांना मरणप्राय यातना सोसाव्या लागल्या. त्याचदरम्यान त्यांच्या चालू असलेल्या क्ष-किरण तपासण्या, सीटीस्कॅन त्यांचा कर्करोग हटत असल्याचे दाखवत होत्या. सहा महिन्यांच्या या वेदनामय कालखंडात या पुस्तकाचा बराचसा भाग त्यांनी लिहिला. स्वत: कर्करोगाशी झुंजत असताना कर्करोगाच्या इतर रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी ते संपर्क साधत होते. त्याचाही हे पुस्तक लिहिताना त्यांना फायदा झाला. या पुस्तकात त्यांनी कर्करोगाशी लढण्याचा सातकलमी कार्यक्रम सांगितला आहे. पहिल्या कलमात कर्करोगाचा स्वीकार कसा करायचा याचं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे. दुसर्‍या कलमात तुम्ही तुमचे उपचार आणि डॉक्टर कसे निवडाल हे सांगितले आहे. तिसर्‍या कलमात सकारात्मकतेची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या कलमात कुटुंबाच्या, स्नेह्यांच्या आधाराची मांडणी कशी करावी, हे सांगितलं आहे. पाचव्या कलमात उर्वरित आयुष्यासाठी ध्येयनिश्‍चिती कशी करावी, याबद्दल लिहिले आहे. आरोग्याकडे नेणारा मार्ग मन:चक्षूने कसा पाहावा, हे सहाव्या कलमात सांगितले आहे आणि सातव्या कलमात आहार नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले आहे. सगळ्या उपचारांनंतर त्यांना जेव्हा बरं वाटू लागलं त्यानंतरचं त्यांचं जीवन, कॅन्सर परत उद्भवला तेव्हाही त्यांनी त्या परिस्थितीला कसं तोंड दिलं, याबद्दलही त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. या पुस्तकाच्या शेवटी नोंदवलेल्या परिशिष्टामध्ये त्यांनी कर्करोग म्हणजे काय, कर्करोग कशामुळे होतो, कर्करोगाचे प्रकार, कर्करोगाच्या खुणा आणि लक्षणे, कर्करोगावरील उपचार, उपचारांचे आनुषंगिक परिणाम, उपचार चालू असताना घ्यावयाची दक्षता, भविष्यातील कर्करोग उपचार काय असतील याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच विविध कर्करोग संस्था आणि त्यांच्याकडून मिळणार्‍या मदतीचे स्वरूप याविषयी माहिती दिली आहे. कर्करोगाशी संबंधित इंठाजी शब्द आणि त्यांचे अर्थ समाविष्ट केले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#CANCER #ANUPKUMAR #कॅन्सर #अनुपकुमार
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो