* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTAL HAWA-AMAR MEYEBELA PART 2
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITYE
  • ISBN : 9788184981070
  • Edition : 3
  • Publishing Year : 2010
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 464
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UDHAN WARA IS VILAS GITAY`S MARATHI TRANSLATION OF TASLIMA NASRIN`S BENGALI AUTOBIOGRAPHICAL BOOK "UTOL HAWA` WHICH IS THE SECOND PART OF AMAR MEYEBELA` (MAZE KUWARPAN) IN `UDHAN WARA` TASLIMA NASRIN TELLS THE STORY OF HER LIFE FROM THE AGE OF 16 TO 26. SHE WRITES ABOUT HER TEACHERS, HER DEAREST FRIEND CHANDANA, CHAKMA, SAJNI. IN LATER CHAPTERS, SHE WRITES ABOUT HER EDUCATION AT MAIMAN SINGH MEDICAL COLLEGE, HER EXPERIENCES AS A DOCTOR AND HER LITERARY ACTIVITIES. TASLIMA STARTED WRITING ARTICLES AND POETRY WHEN SHE WAS IN HIGH SCHOOL. LATER, SHE STARTED A LITTLE MAGAZINE SENJUTI`. SHE CAME IN CONTACT WITH THE POET RUDRA MOHAMMAD SHADIDAULLAH. THEY STARTED MEETING AT DIFFERENT PLACES. AT RUDRA`S INSISTENCE, TASLIMA MARRIED HIM WHEN SHE WAS JUST 19. THIS SHE DID WITHOUT INFORMING HER PARENTS. SHE STARTED GOING TO HIS PLACE. TO HER HORROR, SHE DISCOVERED, AFTER THEIR FIRST INTER COURSE, THAT HE HAD SYPHILIS. RUDRA CONFESSED THAT HE USED TO GO TO BROTHELS. TASLIMA ALSO CAUGHT SYPHILIS. THEY HAD TO TAKE INJECTIONS TO CURE THE DISEASE. LATER, SHE DISCOVERED THAT RUDRA WAS ALSO ADDICTED TO DRUGS AND SHE DIVORCED HIM. IN THIS BOOK, TASLIMA ALSO TELLS US ABOUT HER RELATIVES- HER PARENTS, HER BROTHER KAMAL & NAMAN, THEIR WIVES, HER YOUNGER SISTER YASMIN AND HER MATERNAL GRANDFATHER. TASLIMA`S STYLE IS FORTH RIGHT AND SHE ALSO SHOWS A GOOD SENSE OF HUMOUR.
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंदवेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे– हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    तसलिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा (`आमार मेयेबेला`) चा हा दुसरा भाग.या आत्मकथे मधे तुम्हाला भेटणार आहेत तिचे कुटुंबिय - वडिल डॉ.रजबअली जे एक संवेदनाशुन्य आणि कोरडे गृहस्थ आहेत,आई ईदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीहि साधी सहानुभुती नसलेली सत लक्तरा मधे वावरणारी ,मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समन व त्याची अहंमन्य दिसायला सामान्य बायको हसीना मुमताज उर्फ मुमु,त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा - कमाल ,त्याची बायको नखरेल गीता़, छोटी बहिण यास्मीन,नासरीन चा कवीमित्र रूद्र खरे नाव शहिदुल्ला अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी,दारुडा,वेश्यागमनी,गुप्तरोगी याने भावने चे प्रदर्शन करून नासरीन ची सही एका कागदावर घेउन तिला पत्नी घोषीत केलेले.तिच्याशी संबंध ठेवायच्या नादात तिलाहि गुप्तरोगाचा चटका देउन बसतो. यांतील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात ढिलेआहेत.डॉ.रजबअली ह्यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी रईसाबेगम सोबत केलेले आहे.लग्न झाल्यापासुन दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग.नासरीन ने रूद्र शी घेतलेला तलाक. अशा घडामेडीने गच्च अशी हि आत्म कथा अत्यंत वाचनीय! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 12-09-2010

    तारुण्यातला उधाण वारा… तस्लिमा नसरिनचं सारं बोलणं, लिहिणं, नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येतं. त्यामुळे साक्षात `उधाण वारा’ म्हणून लिहिलेलं लेखन बहुचर्चित झालं. यापूर्वी नसरिन यांच्या १९९९ मध्ये `आमार मेयेबेला’ या आत्मचरित्राच्या पहिल्या भागात तिच्या कौार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी चितारले. `उधाण वारा’ या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेतं. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते... पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. तस्लिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारं वर्णन! तस्लिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावं लागलं होतं. मॅट्रिक परीक्षेसाठी त्यावेळी पंधरा वर्षाची अट म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवलं. आई उदार, वडील कंजूष. वाढदिवस साजरा नाही करायचे, का तर खर्च होतो. तस्लिमानं तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हतं. झालं, आयुष्यातलं हाती आलेलं पहिलं प्रेमपत्र! अवघं एक ओळीचं `डोळे मनातील गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर’ तेही वडिलांना मिळावं, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झालं, पहारा बसला. बडोदा (मोठ्या भावाच्या) पहाऱ्यात शाळेत जाणं-येणं. मोठं अपराध्यासारखं वाटायचं. बरेच दिवस दुसरं पत्र न आल्यानं. मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तस्लिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची. प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठंही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तस्लिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रिणींवर लिहिलेला लेख `चित्राली’ मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तकं मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनानी प्रगल्भ झालेली तस्लिमा कॉलेजमध्ये असतानाच `सेंजुती’ हे काव्यास वाहिलेलं हस्तलिखित प्रकाशित करु लागली. यातून तिला `रुद्र’ भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर, नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पाडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तस्लिमाला मात्र प्रेमानं पश्चात्ताप दिला. ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचं हळवं मन इथं आहे नि कठेर संघर्षही! वैचारिक द्वंदाचा शाप घेऊन येणारं स्त्री जीवन हे आत्मकथन आपणास अनेक अर्थांनी बुचकळ्यात टाकतं; स्त्री समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी.) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाऱ्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी `वाचनीय’ प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून `विचारणीय’ ऐवज ठरते, ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे, पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही! या आत्मकथेत जीवनातील सर्व द्वंद्व भेटतात. श्रध्दा-अंधश्रध्दा, विश्वास-अविश्वास, आपपरभेद, जीवन-मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारं असल्यानं कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साऱ्या गोष्टी, काही कथा, कादंबऱ्या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमूळे. तस्लिमा नसरिनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री, स्वप्रज्ञ, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थानं `उधाण वारा’ पुरुषासाठी अप्रत्यक्षरीत्या एक `जागर कथा’ बनते. `मी काही खूप चांगला नाही, याचं कारण तुझं चांगलं असणं आहे’ ही यातील रुद्रची तस्लिामाबद्दलची कबुली म्हणजे तमाम पुरुषांच्यावतीने रुद्रनं दिलेला कबुलीजाब होय. `उधाण वारा’ ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 07-08-2010

    रोखठोक लेखणीचे दर्शन… एका मागासलेल्या समाजात मोठ्या झालेल्या युवतीने पुराणमतवादाची बंधने कशी तोडून टाकली, हे तस्लिमा नसरिन यांच्या `उधाण वारा’ या अनुवादित पुस्तकात वाचायला मिळते. तस्लिमा नासरिन या प. बंगालमधील वादग्रस्त लेखिका. `उतोलहवा’ या त्यांच्या आत्मकथनाचा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. या भागात तस्लिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. तस्लिमांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोक लेखणीचे दर्शन होते. तस्लिमा यांना त्यांच्या वडिलांनी डॉक्टर होण्यास प्रोत्साहन दिले; पण एकीकडे आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यास प्रोत्साहन देत असताना आपल्या पत्नीला मात्र मोलकरणीसारखे वागवणारे तस्लिमांचे वडील त्या ठिकाणच्या समाजप्रवृत्तीचे दर्शन घडवतात. लहानपणापासून केवळ दुसऱ्यांची मनं सांभाळणारी आई, काबाडकष्ट करत मुले मोठी झाल्यावर चार दिवस सुखाचे येतील म्हणून वाट पाहते, ते क्षण तिच्या वाट्याला येतच नाहीत. आईविषयी कळकळ वाटत असूनही तस्लिमा त्या पुराणमतवादी घरात तिच्यासाठी काही करु शकत नाहीत, याची त्यांना वाटणारी खंतही यातून जाणवते. आपल्या वडिलांच्या दोन भावांच्या, बहिणीच्या मानसिकतेतले बारकावे, जगण्याची-विचार करण्याची पध्दती, जीवनशैली पाहत तस्लिमा मोठ्या झाल्या. हिंदू मुलीशी विवाह केल्यानंतर आपल्याच घरात आसरा मागणारा लहान भाऊ जेव्हा मोठ्या शहरात जाऊन भरपूर पैसे मिळवू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल तस्लिमांनी चांगला टिपला आहे. तस्लिमांची लेखणी अगदी तरुण वयापासूनच धारदार होती. त्यांच्या सहजच लिहिलेल्या कवितांना प्रसिध्दी मिळाली. तिथून पुढे ती तळपतच राहिली. त्याच लेखणीच्या माध्यमातून तस्लिमांचा रुद्रशी झालेला परिचय, त्याच्याशी झालेला विवाह आणि काडीमोड यांचा तपशीलही यामध्ये आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more