* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTAL HAWA-AMAR MEYEBELA PART 2
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITAY
  • ISBN : 9788184981070
  • Edition : 3
  • Publishing Year : 2010
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 464
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UDHAN WARA IS VILAS GITAY`S MARATHI TRANSLATION OF TASLIMA NASRIN`S BENGALI AUTOBIOGRAPHICAL BOOK "UTOL HAWA` WHICH IS THE SECOND PART OF AMAR MEYEBELA` (MAZE KUWARPAN) IN `UDHAN WARA` TASLIMA NASRIN TELLS THE STORY OF HER LIFE FROM THE AGE OF 16 TO 26. SHE WRITES ABOUT HER TEACHERS, HER DEAREST FRIEND CHANDANA, CHAKMA, SAJNI. IN LATER CHAPTERS, SHE WRITES ABOUT HER EDUCATION AT MAIMAN SINGH MEDICAL COLLEGE, HER EXPERIENCES AS A DOCTOR AND HER LITERARY ACTIVITIES. TASLIMA STARTED WRITING ARTICLES AND POETRY WHEN SHE WAS IN HIGH SCHOOL. LATER, SHE STARTED A LITTLE MAGAZINE SENJUTI`. SHE CAME IN CONTACT WITH THE POET RUDRA MOHAMMAD SHADIDAULLAH. THEY STARTED MEETING AT DIFFERENT PLACES. AT RUDRA`S INSISTENCE, TASLIMA MARRIED HIM WHEN SHE WAS JUST 19. THIS SHE DID WITHOUT INFORMING HER PARENTS. SHE STARTED GOING TO HIS PLACE. TO HER HORROR, SHE DISCOVERED, AFTER THEIR FIRST INTER COURSE, THAT HE HAD SYPHILIS. RUDRA CONFESSED THAT HE USED TO GO TO BROTHELS. TASLIMA ALSO CAUGHT SYPHILIS. THEY HAD TO TAKE INJECTIONS TO CURE THE DISEASE. LATER, SHE DISCOVERED THAT RUDRA WAS ALSO ADDICTED TO DRUGS AND SHE DIVORCED HIM. IN THIS BOOK, TASLIMA ALSO TELLS US ABOUT HER RELATIVES- HER PARENTS, HER BROTHER KAMAL & NAMAN, THEIR WIVES, HER YOUNGER SISTER YASMIN AND HER MATERNAL GRANDFATHER. TASLIMA`S STYLE IS FORTH RIGHT AND SHE ALSO SHOWS A GOOD SENSE OF HUMOUR.
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंदवेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे– हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    तसलिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा (`आमार मेयेबेला`) चा हा दुसरा भाग.या आत्मकथे मधे तुम्हाला भेटणार आहेत तिचे कुटुंबिय - वडिल डॉ.रजबअली जे एक संवेदनाशुन्य आणि कोरडे गृहस्थ आहेत,आई ईदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीहि साधी सहानुभुती नसलेली सत लक्तरा मधे वावरणारी ,मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समन व त्याची अहंमन्य दिसायला सामान्य बायको हसीना मुमताज उर्फ मुमु,त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा - कमाल ,त्याची बायको नखरेल गीता़, छोटी बहिण यास्मीन,नासरीन चा कवीमित्र रूद्र खरे नाव शहिदुल्ला अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी,दारुडा,वेश्यागमनी,गुप्तरोगी याने भावने चे प्रदर्शन करून नासरीन ची सही एका कागदावर घेउन तिला पत्नी घोषीत केलेले.तिच्याशी संबंध ठेवायच्या नादात तिलाहि गुप्तरोगाचा चटका देउन बसतो. यांतील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात ढिलेआहेत.डॉ.रजबअली ह्यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी रईसाबेगम सोबत केलेले आहे.लग्न झाल्यापासुन दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग.नासरीन ने रूद्र शी घेतलेला तलाक. अशा घडामेडीने गच्च अशी हि आत्म कथा अत्यंत वाचनीय! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 12-09-2010

    तारुण्यातला उधाण वारा… तस्लिमा नसरिनचं सारं बोलणं, लिहिणं, नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येतं. त्यामुळे साक्षात `उधाण वारा’ म्हणून लिहिलेलं लेखन बहुचर्चित झालं. यापूर्वी नसरिन यांच्या १९९९ मध्ये `आमार मेयेबेला’ या आत्मचरित्राच्या पहिल्या भागात तिच्या कौार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी चितारले. `उधाण वारा’ या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेतं. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते... पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. तस्लिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारं वर्णन! तस्लिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावं लागलं होतं. मॅट्रिक परीक्षेसाठी त्यावेळी पंधरा वर्षाची अट म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवलं. आई उदार, वडील कंजूष. वाढदिवस साजरा नाही करायचे, का तर खर्च होतो. तस्लिमानं तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हतं. झालं, आयुष्यातलं हाती आलेलं पहिलं प्रेमपत्र! अवघं एक ओळीचं `डोळे मनातील गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर’ तेही वडिलांना मिळावं, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झालं, पहारा बसला. बडोदा (मोठ्या भावाच्या) पहाऱ्यात शाळेत जाणं-येणं. मोठं अपराध्यासारखं वाटायचं. बरेच दिवस दुसरं पत्र न आल्यानं. मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तस्लिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची. प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठंही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तस्लिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रिणींवर लिहिलेला लेख `चित्राली’ मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तकं मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनानी प्रगल्भ झालेली तस्लिमा कॉलेजमध्ये असतानाच `सेंजुती’ हे काव्यास वाहिलेलं हस्तलिखित प्रकाशित करु लागली. यातून तिला `रुद्र’ भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर, नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पाडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तस्लिमाला मात्र प्रेमानं पश्चात्ताप दिला. ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचं हळवं मन इथं आहे नि कठेर संघर्षही! वैचारिक द्वंदाचा शाप घेऊन येणारं स्त्री जीवन हे आत्मकथन आपणास अनेक अर्थांनी बुचकळ्यात टाकतं; स्त्री समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी.) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाऱ्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी `वाचनीय’ प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून `विचारणीय’ ऐवज ठरते, ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे, पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही! या आत्मकथेत जीवनातील सर्व द्वंद्व भेटतात. श्रध्दा-अंधश्रध्दा, विश्वास-अविश्वास, आपपरभेद, जीवन-मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारं असल्यानं कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साऱ्या गोष्टी, काही कथा, कादंबऱ्या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमूळे. तस्लिमा नसरिनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री, स्वप्रज्ञ, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थानं `उधाण वारा’ पुरुषासाठी अप्रत्यक्षरीत्या एक `जागर कथा’ बनते. `मी काही खूप चांगला नाही, याचं कारण तुझं चांगलं असणं आहे’ ही यातील रुद्रची तस्लिामाबद्दलची कबुली म्हणजे तमाम पुरुषांच्यावतीने रुद्रनं दिलेला कबुलीजाब होय. `उधाण वारा’ ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 07-08-2010

    रोखठोक लेखणीचे दर्शन… एका मागासलेल्या समाजात मोठ्या झालेल्या युवतीने पुराणमतवादाची बंधने कशी तोडून टाकली, हे तस्लिमा नसरिन यांच्या `उधाण वारा’ या अनुवादित पुस्तकात वाचायला मिळते. तस्लिमा नासरिन या प. बंगालमधील वादग्रस्त लेखिका. `उतोलहवा’ या त्यांच्या आत्मकथनाचा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. या भागात तस्लिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. तस्लिमांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोक लेखणीचे दर्शन होते. तस्लिमा यांना त्यांच्या वडिलांनी डॉक्टर होण्यास प्रोत्साहन दिले; पण एकीकडे आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यास प्रोत्साहन देत असताना आपल्या पत्नीला मात्र मोलकरणीसारखे वागवणारे तस्लिमांचे वडील त्या ठिकाणच्या समाजप्रवृत्तीचे दर्शन घडवतात. लहानपणापासून केवळ दुसऱ्यांची मनं सांभाळणारी आई, काबाडकष्ट करत मुले मोठी झाल्यावर चार दिवस सुखाचे येतील म्हणून वाट पाहते, ते क्षण तिच्या वाट्याला येतच नाहीत. आईविषयी कळकळ वाटत असूनही तस्लिमा त्या पुराणमतवादी घरात तिच्यासाठी काही करु शकत नाहीत, याची त्यांना वाटणारी खंतही यातून जाणवते. आपल्या वडिलांच्या दोन भावांच्या, बहिणीच्या मानसिकतेतले बारकावे, जगण्याची-विचार करण्याची पध्दती, जीवनशैली पाहत तस्लिमा मोठ्या झाल्या. हिंदू मुलीशी विवाह केल्यानंतर आपल्याच घरात आसरा मागणारा लहान भाऊ जेव्हा मोठ्या शहरात जाऊन भरपूर पैसे मिळवू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल तस्लिमांनी चांगला टिपला आहे. तस्लिमांची लेखणी अगदी तरुण वयापासूनच धारदार होती. त्यांच्या सहजच लिहिलेल्या कवितांना प्रसिध्दी मिळाली. तिथून पुढे ती तळपतच राहिली. त्याच लेखणीच्या माध्यमातून तस्लिमांचा रुद्रशी झालेला परिचय, त्याच्याशी झालेला विवाह आणि काडीमोड यांचा तपशीलही यामध्ये आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more