* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UTAL HAWA-AMAR MEYEBELA PART 2
  • Availability : Available
  • Translators : VILAS GITYE
  • ISBN : 9788184981070
  • Edition : 3
  • Publishing Year : 2010
  • Weight : 450.00 gms
  • Pages : 464
  • Language : TRANSLATED FROM BENGALI TO MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
UDHAN WARA IS VILAS GITAY`S MARATHI TRANSLATION OF TASLIMA NASRIN`S BENGALI AUTOBIOGRAPHICAL BOOK "UTOL HAWA` WHICH IS THE SECOND PART OF AMAR MEYEBELA` (MAZE KUWARPAN) IN `UDHAN WARA` TASLIMA NASRIN TELLS THE STORY OF HER LIFE FROM THE AGE OF 16 TO 26. SHE WRITES ABOUT HER TEACHERS, HER DEAREST FRIEND CHANDANA, CHAKMA, SAJNI. IN LATER CHAPTERS, SHE WRITES ABOUT HER EDUCATION AT MAIMAN SINGH MEDICAL COLLEGE, HER EXPERIENCES AS A DOCTOR AND HER LITERARY ACTIVITIES. TASLIMA STARTED WRITING ARTICLES AND POETRY WHEN SHE WAS IN HIGH SCHOOL. LATER, SHE STARTED A LITTLE MAGAZINE SENJUTI`. SHE CAME IN CONTACT WITH THE POET RUDRA MOHAMMAD SHADIDAULLAH. THEY STARTED MEETING AT DIFFERENT PLACES. AT RUDRA`S INSISTENCE, TASLIMA MARRIED HIM WHEN SHE WAS JUST 19. THIS SHE DID WITHOUT INFORMING HER PARENTS. SHE STARTED GOING TO HIS PLACE. TO HER HORROR, SHE DISCOVERED, AFTER THEIR FIRST INTER COURSE, THAT HE HAD SYPHILIS. RUDRA CONFESSED THAT HE USED TO GO TO BROTHELS. TASLIMA ALSO CAUGHT SYPHILIS. THEY HAD TO TAKE INJECTIONS TO CURE THE DISEASE. LATER, SHE DISCOVERED THAT RUDRA WAS ALSO ADDICTED TO DRUGS AND SHE DIVORCED HIM. IN THIS BOOK, TASLIMA ALSO TELLS US ABOUT HER RELATIVES- HER PARENTS, HER BROTHER KAMAL & NAMAN, THEIR WIVES, HER YOUNGER SISTER YASMIN AND HER MATERNAL GRANDFATHER. TASLIMA`S STYLE IS FORTH RIGHT AND SHE ALSO SHOWS A GOOD SENSE OF HUMOUR.
१९९९ साली प्रकाशित झालेल्या तसलिमा नासरिन यांच्या ‘आमार मेयेबेला’ (माझं कुवारपण) या आत्मकथनाने बंगाली साहित्यविश्वात खळबळ माजवली. एक अविस्मरणीय आत्मकथन म्हणून आता ते पुस्तक मान्यता पावले आहे. ‘उतोल हवा’ (उधाण वारा) हा त्याच आत्मकथनाचा दुसरा भाग आहे. या भागात तसलिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोकपणाचे व करुणेचे दर्शन होते. पण आता तसलिमा वयाने मोठ्या झाल्या आहेत. त्यांची भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी आणखी तीक्ष्ण झाली आहे. अनुभवांचा परीघ आणखी विस्तृत झाला आहे. त्यामुळे तसलिमांची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकात आणखी तपशीलवारपणे समजते. एका मागासलेल्या समाजात आणि कुटुंबात मोठ्या झालेल्या युवतीने कशा प्रकारे पुराणमतवादाची बंधने तोडून टाकली हे या पुस्तकात दिसते. त्यांचे प्रेमप्रकरण, त्यामधील आनंदवेदना, संबंधामधले चढउतार आणि शेवटी त्यातून बाहेर पडणे– हे सारे वाचताना वाचकांनाही खिन्नतेचा अनुभव येतो. तसलिमांचे गद्य काव्याच्या तेजाने झळाळणारे आहे. या धारदार आत्मकथनाचा मराठी अनुवाद समर्थ अनुवादक विलास गीते यांनी तितक्याच प्रत्ययकारीपणे केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    तसलिमा नासरीन यांच्या आत्मकथेचा (`आमार मेयेबेला`) चा हा दुसरा भाग.या आत्मकथे मधे तुम्हाला भेटणार आहेत तिचे कुटुंबिय - वडिल डॉ.रजबअली जे एक संवेदनाशुन्य आणि कोरडे गृहस्थ आहेत,आई ईदन प्रेमळ व कष्ट करून करून वाकलेली आणि कोणाचीहि साधी सहानुभुती नसलेली सत लक्तरा मधे वावरणारी ,मोठा भाऊ नोमान कंपनीचा सेल्समन व त्याची अहंमन्य दिसायला सामान्य बायको हसीना मुमताज उर्फ मुमु,त्याच्यापेक्षा लहान भाऊ छोटेदा - कमाल ,त्याची बायको नखरेल गीता़, छोटी बहिण यास्मीन,नासरीन चा कवीमित्र रूद्र खरे नाव शहिदुल्ला अत्यंत ज्वलंत मानवताप्रेमी कवी,दारुडा,वेश्यागमनी,गुप्तरोगी याने भावने चे प्रदर्शन करून नासरीन ची सही एका कागदावर घेउन तिला पत्नी घोषीत केलेले.तिच्याशी संबंध ठेवायच्या नादात तिलाहि गुप्तरोगाचा चटका देउन बसतो. यांतील जवळजवळ सर्व पुरुष स्त्रियांच्या संबंधात ढिलेआहेत.डॉ.रजबअली ह्यांचे एक दुसरे कुटुंब त्यांनी रईसाबेगम सोबत केलेले आहे.लग्न झाल्यापासुन दोघे भाऊ बायको एके बायको या मंत्रात गुंग.नासरीन ने रूद्र शी घेतलेला तलाक. अशा घडामेडीने गच्च अशी हि आत्म कथा अत्यंत वाचनीय! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 12-09-2010

    तारुण्यातला उधाण वारा… तस्लिमा नसरिनचं सारं बोलणं, लिहिणं, नेहमीच नवा उधाण वारा घेऊन येतं. त्यामुळे साक्षात `उधाण वारा’ म्हणून लिहिलेलं लेखन बहुचर्चित झालं. यापूर्वी नसरिन यांच्या १९९९ मध्ये `आमार मेयेबेला’ या आत्मचरित्राच्या पहिल्या भागात तिच्या कौार्याची कथा होती. जन्मापासून ते ऋतुप्राप्तीपर्यंतच्या (१९६२ ते १९७६) आठवणी, जीवनातील विविध प्रसंग त्यांनी चितारले. `उधाण वारा’ या शीर्षकापासूनच ते आपली पकड घेतं. कौमार्य ओलांडून ही मुलगी किशोरी होते... पुढे युवती... हा कालखंड म्हणजे मैत्रीचा न संपणारा वसंत ऋतूच असतो. तस्लिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारं वर्णन! तस्लिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावं लागलं होतं. मॅट्रिक परीक्षेसाठी त्यावेळी पंधरा वर्षाची अट म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवलं. आई उदार, वडील कंजूष. वाढदिवस साजरा नाही करायचे, का तर खर्च होतो. तस्लिमानं तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हतं. झालं, आयुष्यातलं हाती आलेलं पहिलं प्रेमपत्र! अवघं एक ओळीचं `डोळे मनातील गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर’ तेही वडिलांना मिळावं, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झालं, पहारा बसला. बडोदा (मोठ्या भावाच्या) पहाऱ्यात शाळेत जाणं-येणं. मोठं अपराध्यासारखं वाटायचं. बरेच दिवस दुसरं पत्र न आल्यानं. मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तस्लिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची. प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठंही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तस्लिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रिणींवर लिहिलेला लेख `चित्राली’ मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तकं मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनानी प्रगल्भ झालेली तस्लिमा कॉलेजमध्ये असतानाच `सेंजुती’ हे काव्यास वाहिलेलं हस्तलिखित प्रकाशित करु लागली. यातून तिला `रुद्र’ भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर, नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पाडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तस्लिमाला मात्र प्रेमानं पश्चात्ताप दिला. ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचं हळवं मन इथं आहे नि कठेर संघर्षही! वैचारिक द्वंदाचा शाप घेऊन येणारं स्त्री जीवन हे आत्मकथन आपणास अनेक अर्थांनी बुचकळ्यात टाकतं; स्त्री समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी.) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाऱ्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी `वाचनीय’ प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून `विचारणीय’ ऐवज ठरते, ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे, पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही! या आत्मकथेत जीवनातील सर्व द्वंद्व भेटतात. श्रध्दा-अंधश्रध्दा, विश्वास-अविश्वास, आपपरभेद, जीवन-मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारं असल्यानं कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साऱ्या गोष्टी, काही कथा, कादंबऱ्या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमूळे. तस्लिमा नसरिनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री, स्वप्रज्ञ, स्वयंसिध्दा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थानं `उधाण वारा’ पुरुषासाठी अप्रत्यक्षरीत्या एक `जागर कथा’ बनते. `मी काही खूप चांगला नाही, याचं कारण तुझं चांगलं असणं आहे’ ही यातील रुद्रची तस्लिामाबद्दलची कबुली म्हणजे तमाम पुरुषांच्यावतीने रुद्रनं दिलेला कबुलीजाब होय. `उधाण वारा’ ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 07-08-2010

    रोखठोक लेखणीचे दर्शन… एका मागासलेल्या समाजात मोठ्या झालेल्या युवतीने पुराणमतवादाची बंधने कशी तोडून टाकली, हे तस्लिमा नसरिन यांच्या `उधाण वारा’ या अनुवादित पुस्तकात वाचायला मिळते. तस्लिमा नासरिन या प. बंगालमधील वादग्रस्त लेखिका. `उतोलहवा’ या त्यांच्या आत्मकथनाचा अनुवाद विलास गीते यांनी केला आहे. या भागात तस्लिमांच्या सोळा ते सव्वीस वर्षापर्यंतच्या वयाची कहाणी आहे. तस्लिमांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही आपल्याला त्यांच्या रोखठोक लेखणीचे दर्शन होते. तस्लिमा यांना त्यांच्या वडिलांनी डॉक्टर होण्यास प्रोत्साहन दिले; पण एकीकडे आपल्या मुलींना उच्च शिक्षण देण्यास प्रोत्साहन देत असताना आपल्या पत्नीला मात्र मोलकरणीसारखे वागवणारे तस्लिमांचे वडील त्या ठिकाणच्या समाजप्रवृत्तीचे दर्शन घडवतात. लहानपणापासून केवळ दुसऱ्यांची मनं सांभाळणारी आई, काबाडकष्ट करत मुले मोठी झाल्यावर चार दिवस सुखाचे येतील म्हणून वाट पाहते, ते क्षण तिच्या वाट्याला येतच नाहीत. आईविषयी कळकळ वाटत असूनही तस्लिमा त्या पुराणमतवादी घरात तिच्यासाठी काही करु शकत नाहीत, याची त्यांना वाटणारी खंतही यातून जाणवते. आपल्या वडिलांच्या दोन भावांच्या, बहिणीच्या मानसिकतेतले बारकावे, जगण्याची-विचार करण्याची पध्दती, जीवनशैली पाहत तस्लिमा मोठ्या झाल्या. हिंदू मुलीशी विवाह केल्यानंतर आपल्याच घरात आसरा मागणारा लहान भाऊ जेव्हा मोठ्या शहरात जाऊन भरपूर पैसे मिळवू लागतो, तेव्हा त्याच्या वर्तणुकीत झालेला बदल तस्लिमांनी चांगला टिपला आहे. तस्लिमांची लेखणी अगदी तरुण वयापासूनच धारदार होती. त्यांच्या सहजच लिहिलेल्या कवितांना प्रसिध्दी मिळाली. तिथून पुढे ती तळपतच राहिली. त्याच लेखणीच्या माध्यमातून तस्लिमांचा रुद्रशी झालेला परिचय, त्याच्याशी झालेला विवाह आणि काडीमोड यांचा तपशीलही यामध्ये आला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more