* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A GLANCE AT THE FEMALE CHARACTERS IN MAHABHARATA IS ENOUGH TO POINT OUT THE HERO OF THE EPIC. ALL THESE MOTHERS HAVE UNDERGONE SUCH EMOTIONAL TRAUMA, OVER AND OVER AGAIN, MAHARISHI VYAS ALSO COULD NOT GIVE JUSTICE TO THEIR SUFFERINGS. NO ONE ELSE HAS SUCCEEDED IN DESCRIBING THEIR UNIQUENESS AS A SEPARATE PERSONALITY. ON THE CONTRARY; HARDLY ANYONE HAS TRIED TO SKETCH THEIR JOURNEY. ALL THESE FEMALES OF MAHABHARATA CAST A SPELL ON US; THEY HAVE THE POWER TO HYPNOTIZE US. THEY LEAVE US SPELLBOUND. ONCE THIS SPELL IS BROKEN THEN THE FIRST IMPRESSION IT LEAVES ON US IS ABOUT ALL THESE MOTHERS. THERE SHOULD BE NO SECOND OPINION ABOUT WHO IS THE MAIN CHARACTER OF MAHABHARATA! WITHOUT ANY DOUBT IT GOES TO THOSE MOTHERS, AND THEIR MOTHERHOOD.
महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच ‘महाभारताच्या नायकपदी कोण’ हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विशिष्ट दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत हे नक्की. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते अरे! महाभारताच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल, तर दुसया तिसया कुणाला नाही ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #ANKRAHITSHUNYANCHIBERIJ #RAMAYANATILPATRAVANDANA #ANJANINARAVANE #SUSHMAKAROGAL
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    मला भावलेले पुस्तक महाभारतातील पितृवंदना ! महाभारतातील मातृवंदना ! लेखक :--,दिनकर जोशीं मराठी अनुवाद :-- सुषमा शाळिग्राम रामायण ,महाभारत हे आपले आद्य,पुरातन,पूज्य महान ग्रंथ,अक्षर व अक्षय असे वाङमय ! लहानपण ते किशोर अवस्थे र्यंत त्यातील गोष्टी, कथा मनावर संस्कार कर तात,मनाचे मनोरंजन करतात. वाढत्या वयाबरोबर बुद्धी प्रगल्भ झाल्यावर मात्र या अभि जात साहित्यकृतीत गूढार्थ, विषयाची व्यापकता,मानवी जीवनातील भावभावनां या सगळ्यांचे उत्कट,समग्र,सर्वां गीण असे दर्शन घडते कृष्ण द्वैपायन महर्षी व्यास मुनींच्या सर्वस्पर्शी,ओजस्वी व त्रिकालापलीकडचा वेध घेणाऱ्या दिव्य,अद्वितीय लेखणीतून महा भारताचा विशाल पट मांडला गेला आहे. अनेक विचारवंत,ज्ञानमहर्षी, सारस्वतानी आपापल्यापरीने महाभारताचा व्यासांना अभि प्रेत असलेला अर्थ उलगडून दाखवतांना दर्जेदार ग्रंथांची पुस्तकांची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध गुजराथी लेखक दिनकर जोशी यांनी गुजराती त लिहिलेलीव सुषमा शाळी ग्राम यांनी मराठीत अनुवाद केलेली" महाभारतातील मातृवंदना व महाभारतातील पितृवंदना ही दोन वेगवेगळी पुस्तक माझ्या वाचनात आली आणि आपण महाभार तावर काहीतरी खूप वेगळे वाचल्याचा अनुभव आला, महाभारतातील व्यासनिर्मित स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावाचे मनोविश्लेषण लेखकाने किती खुबीने केले आहे याची प्रचिती ही दोन वेग वेगळी पुस्तके वाच ताना आली.वाचनानंद आला पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रस्तावनेत लेखकाने खूप सुंदर वैचारिक प्रकट चिंतन करून वाचकाला अंतर्मुख केले आहे. त्यात महाभारताचा खरा नाय क कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे.भीष्म,द्रोण,कौरव पांडव हे सारे नायकपदी त्याच्यातील त्रुटी,वैगुण्या मुळे बसू शकत नाही .कारण पुत्रा ला अवैधरित्या जन्म देऊन त्यांचे संगोपनाची जबाबदारी स्वपत्नीवर टाकून ते नामनिराळे झाले आहेत.त्यामुलांचे संगोपन करताना या स्त्रीयांनी खूप कष्ट घेतले.परिस्थितीशी संघर्ष केला सत्यवती,गांधारी,कुंती,उत्तरा यांनी ही अग्निपरीक्षा दिली तरी त्या दुर्भागी ठरल्या!महाभारता च्या नायिका त्या नायिका शोभ ल्या असत्या परंतु त्यांच्यातील काही त्रुटींमुळे त्या होउ शकल्या नाही किंवा आपण नेमकी तशी भूमिका घेउ शकत नाही. महाभारतातील मातृवंदनेत गंगा सात्यकी,,कुंती,गांधारी, अशा स्रियांची व पितृवंदनेत श्रीकृष्ण,भीष्म धर्म,अर्जुन,द्रोणाचार्य,दुर्योधन कर्ण, शकुनी या पुरुषांची नियतीने रचलेली अदभुत, रोमहर्षक अशी जीवनगाथा आहे ,शूरवीर, महान योद्धे असूनही अहंकार,मोह,लोभ, द्वेष,असूया,वैर यासारख्या षडरिपुनी व्यक्ती तसेच समिष्टी ग्रासली असेल तर त्याची परिणीती कुलविनाशात ,समाज विनाशत कशी होते हेच महाभार कार दाखवून देतात.ही मातृ पितृ वंदना त्यातील स्त्री पुरुष पात्रांच्या स्वभावातील विविध पैलूंचे दर्शन घडविते ! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    महाभारत हा एक न संपणारा विषय आहे. गेल्या पाच हजार वर्षात त्याचा अभ्यास ऋषिमुनींपासून सामान्य वाचकांच्या संगणकयुगीन प्रतिक्रियांपर्यंत हजारो पुस्तकांद्वारे जगापुढे आला आहे. येत आहे. देव माणूस राक्षस या वृत्तीभोवती फिरणाऱ्या घटना जुन्या कधी होतच नाहीत. त्यातही वैदिक, पौराणिक, अर्वाचीन आणि आधुनिक स्त्रियांचे चरित्रचित्रण हे जेवढे शोकात्म दिसते, तेवढे इतरत्र कुठे असेल असे वाटत नाही. सत्यवती, गंगा, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, हिडिंबा, उलुपी आणि चित्रागंदा यांच्या ‘मायाममते’चा अभ्यास करून गुजराती साहित्यातील आदरणीय नाव दिनकर जोशी यांनी ‘महाभारतातील मातृवंदना’ ही लेखमाला ‘चित्रलेखा’साठी लिहिली. ती तुफान गाजली आणि पुस्तकरूपाने आता वाचकांच्या भेटीस आली आहे. रामायण हे राम आणि सीता यांच्याभोवती फिरते. परंतु महाभारत तसे नाही अनेक पात्रांचे ते मायाजाल आहे. शब्दाचे अरण्य आहे. त्यात हवी ती फुले, फळ, पाने मिळतात. सत्यवती ही सर्वात वरिष्ठ कोळ्याची मुलगी. तिचा जन्म एका माशाच्या पोटी झाला होता असाही पौराणिक दाखला आहे. तिचा पराशरमुनींशी संबंध आला. व्यासांना तिने जन्म दिला. योजनागंधाची ती सत्यवती झाली शांतनूशी तिचे लग्न झाले. त्याला पुढे गंगा भेटते. तिच्यापासून भीष्म जन्मतो. गंगा जाते. परत येत नाही. येते ती अगदी भीष्माच्या अंतकाळी. कुंती ही राजघराण्यातील असून तिच्या जन्मापूर्वीच तिची शोकांतिका कशी सुरू झाली, गांधारी डोळस असून अंधपण का स्वीकारले, सर्वगुणसंपन्न, लावण्यसुंदरी द्रौपदी मूर्तिमंत वेदना ठरली, ती का? कृष्णाची बहीण असूनही सुभद्रा दुर्दैवी का ठरली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात आणि वाचकांस समाधान देतात. ...Read more

  • Rating Starआकाशाचार्य रमाकांत देशपांडे

    महाभारतामध्ये व्यक्तिरेखांची एवढी गर्दी असताना योग्य संदर्भानं वाचताना आपल्या व्यक्तिचित्रणानं मनात कोणताही गोंधळ निर्माण होत नाही. हे मुद्दाम नमूद करावसं वाटतं. लेखनापेक्षा भाषांतर करणं अधिक अवघड असतं. आपण एवढ्या ओघवत्या भाषेत हे लेखन केलं आहे, की े भाषांतर आहे, असे वाटत नाही. हेच आपल्या लेखनाचं फार मोठं यश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more