YASHODHARA KATKAR

About Author

Birth Date : 23/04/1954


YASHODHARA KATKAR HAS EMERGED AS A PROLIFIC WRITER IN THE POST-MODERNIST ERA OF MARATHI LITERATURE IN THE 21ST CENTURY .WITH A M.A. FROM UNIVERSITY OF MUMBAI AND PG DIPLOMA IN TOURISM MANAGEMENT, SHE MADE IT HER MISSION TO MENTOR STUDENTS THROUGH VOCATIONAL EDUCATION-TRAINING STREAM TO SET THEM ON CAREER PATHS IN TRAVEL, HOSPITALITY AND TOURISM INDUSTRY. WITH AN EYE FOR CONTEMPORARY ISSUES ,SHE CHOOSES TO WRITE ABOUT HUMAN STRUGGLES ,RELATIONSHIPS AND MOODS IN CURRENT TIMES .HER DIVERSE LITERARY WORKS INCLUDE A COLLECTION OF AUTIBIOGRAPHICAL ESSAYS ‘BANJARYACHE GHAR’ , PORTRAITS OF EMINENT PERSONALITIES CLOSE TO HER ‘ APOORVA ,ALAUKIK ,EKMEV’ , A COLLECTION OF SHORT STORIES ‘THIRD PERSON ‘ , ‘SWAYAM SHIKSHIT ,SWAYAM PRAKASHIT ‘ FOCUSSING ON RURAL WOMEN OF MARATHWADA AND ‘MOOLMANTRA CAREERECHA ‘ , OUTLINING VOCATIONAL/CAREER GUIDANCE FOR SCHOOL DROP-OUTS AND SSC /HSC STUDENTS . A VORACIOUS READER AND FILM BUFF, SHE CONTRIBUTES BOOK AND FILM REVIEWS AND IS CURRENTLY CONTRIBUTING ‘MANASKANYA BIMALDANCHYA ‘, FOR A LEADING MARATHI DAILY, BASED ON THE PORTRAYAL OF WOMEN IN THE FILMS MADE BY THE LEGENDARY PRODUCER –DIRECTOR, BIMAL ROY. A NOVEL FOCUSING ON THE UPS AND DOWNS IN THE INDIAN ART WORLD IS ALSO IN PROCESS. YASHODHARA IS THE RECIPIENT OF ‘SENIOR RESEARCH FELLOWSHIP ‘ BY CCRT ,MINISTRY OF CULTURE ,GOVT OF INDIA ,FOR 2017-19. SHE CHOSE THE TOPIC, ‘A STUDY OF MARATHI ‘NAVKATHA’ AND THE CONTRIBUTION OF AUTHOR ARVIND GOKHALE TO IT ’ , TO HIGHLIGHT THE HUGE CONTRIBUTION MADE BY GOKHALE AND CORRECT THE PERSPECTIVE ABOUT HIS RIGHTFUL PLACE IN THE HISTORY OF INDIAN LITERATURE . AMONG THE AWARDS AND ACCOLADES RECEIVED , ‘SWAMIKAAR RANJIT DESAI PURSKAR’ , ‘RAMSHETH THAKUR PURSKAR FOR THE BEST SHORT STORY WRITER OF THE YEAR ’ AND THE PRESTIGIOUS ‘BHAIRURATAN DAMANI PURASKAR’ ARE THE CLOSEST TO HER HEART .

समकालीन मराठी साहित्यातील आघाडीच्या लेखिका. मुंबई विद्यापीठातून एम.ए. आणि प्रवास-पर्यटन व्यवस्थापन विषयक पदव्युत्तर पदविका घेतल्यानंतर व्यवसायाभिमुख शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रात अध्यापक म्हणून दीर्घ काळ कार्यरत. त्यांनी नव्याने उदयाला येणाऱ्या या क्षेत्रात अध्यापन, त्या अनुषंगाने लेखन-समुपदेशन, व्यवस्थापन आणि जनसंपर्क अशा विविध उच्चपदस्थ जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिक्षण, साहित्य, कला आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांत अंगभूत रुची आणि अभ्यास असल्याने त्यांचे लेखनही त्या अनुषंगाने कथा, व्याQक्तचित्रणे, ललितबंध, चित्रपटविषयक लेख, करिअर मार्गदर्शनपर लेखन, मराठी विश्वकोशासाठी नोंदी आणि अनुवाद अशा अनेक साहित्यप्रकारांत बहरत गेलेले दिसते. त्यांच्या कथासाहित्यात महानगरी स्त्रीच्या जीवनातले ताणतणाव, भावच्छटा, एकाकीपण आणि तिची ससेहोलपट अशी वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांच्या वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमध्ये ‘बंजाऱ्याचे घर’ (आत्मकथनात्मक ललितबंध), ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ (व्यक्तिचित्रणे), ‘स्वयम शिक्षित, स्वयम प्रकाशित’ (मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या चळवळींच्या कहाण्या) आणि ‘मूलमंत्र करिअरचा’ (१०वी – १२वीच्या विद्याथ्र्यांसाठी मार्गदर्शन) तसेच ‘थर्ड पर्सन’ (कथासंग्रह) यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या २०१७-१९च्या ‘सीनिअर रिसर्च फेलोशिप’च्या मानकरी. ‘स्वामी’कार रणजित देसाई पुरस्कार’, ‘रामशेठ ठाकूर सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार’ आणि ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’ यांनी सन्मानित.
Sort by
Show per page
Items 1 to 4 of 4 total
APURVA, ALOUKIK, EKMEV Rating Star
Add To Cart INR 260
BANJARYACHE GHAR Rating Star
Add To Cart INR 190
KAMBAKTH NINDAR Rating Star
Add To Cart INR 250
THIRD PERSON Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.