* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPEEDPOST
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788177664409
  • Edition : 11
  • Publishing Year : JANUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE RELATION BETWEEN A MOTHER AND HER CHILDREN IS THE MOST PRIMITIVE ONE, THEY ARE TIED TOGETHER TIGHTLY THROUGH THE UMBILICAL CORD AND THROUGH THEIR MINDS AS WELL. THIS NEW ERA HAS GIVEN A DIFFERENT DEPTH TO THE RELATION BETWEEN A MOTHER AND HER CHILDREN. THIS NEW ERA, WITH ITS COLLAPSED MORAL CULTURE AND DISINTEGRATING VIRTUES IS SHATTERING AND CHALLENGING THE RELATIONSHIP, THE FAITH ON EACH OTHER. THE INTERNATIONALLY FAMOUS AUTHOR SHOBHA DE, HAS WRITTEN LETTERS TO ALL HER 6 CHILDREN AS A MOTHER. THESE LETTERS ARE COMPILED TOGETHER IN THIS BOOK. EACH MOTHER WILL FIND THEM CLOSE TO HER HEART; EACH LETTER REVEALS A MOTHER'S MIND. THE LETTER REFLECTS THE WORRIES OF A MOTHER, THE BURDEN ON HER HEART AND MIND IN THE ANXIETY OF HER CHILDREN'S WELFARE. TODAY'S COMPETITION AND THE WORLD WITH ITS VICE AND TEMPTATIONS IS MORE THAN ENOUGH TO MAKE ANY MOTHER ANXIOUS. TOPICS LIKE THE FAMILY, THE RELATIONSHIP, THE FAMILY CULTURE, TRADITIONS, THE INSISTENCE ON BEING VIRTUOUS, STRICT DISCIPLINE, THE REVOLUTIONARY ATTITUDE OF THE YOUNG GENERATION, THE LENGTHY PHONE CONVERSATIONS, THE BILLS CAUSING SEVERE ARGUMENTS IN THE HOUSE, THE LINGERING PARTIES TILL MIDNIGHTS, THE INTERNET CHATTING, THE LIST IS ENDLESS; ALL THIS IS COMPILED IN THIS BOOK. IT ALSO INCLUDES THE TOPICS LIKE ADOLESCENCE, LOVE AT A TENDER AGE, THE PHYSICAL ATTRACTION, FRIENDSHIP WITH ITS VARIOUS DIMENSIONS, CHOOSING A PARTNER, AND THE DISPUTES IN THE CLOSE RELATIONSHIPS. COUNTRY, GOD, RELIGION. SOCIAL LIABILITIES, SENSE OF CITIZENSHIP! THE TOPICS ARE VARIOUS, THE INCIDENCES ARE DIFFERENT. THESE LETTERS WILL SHOW THE TENDER LOVE OF A MOTHER, FULL OF AFFECTION, FULL OF WORRIES. SHE LOVES YOU, SHE BEATS YOU TO AWAKE THE SLEEPING SENSES. SHE TEASES, SHE RIDICULES. SHE MAKES YOU LAUGH, SHE MAKES YOU CRY. SHE HAS WRITTEN THESE LETTERS, FULL OF ALL THE FEELINGS YOU WISH TO FEEL, EACH LETTER WILL TOUCH EVERY LIVELY MIND.
N/A

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarTrupti Kulkarni

    शोभा डे लिखित, अपर्णा वेलणकर अनुवादित ‘स्पीडपोस्ट’ या मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या ‘पेज थ्री आई’ या पात्राला ‘प्रणव कुलकर्णी’ यांनी लिहिलेले पत्र. _________________ झगमगत्या दुनियेतून मुलांच्या भावविश्वात अगद उतरता येणाऱ्या पेज थ्री पण तितक्याच हळव्या आईस, तब्बल सहा मुलांचं नेटानं संगोपन करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पत्ररूपानं त्यांच्यासमोर तू अनुभवांची शिदोरी खुली केलीस. ही पत्रं तुला प्रकाशित का करावीशी वाटली माहीत नाही; पण ती केलीस हे उत्तम झालं. कसंय, अडनेडी वयातल्या प्रत्येकालाच कधीतरी वाटतं की `आई आपल्याला पुरेसा वेळच देत नाही आणि आपल्यावर तिचं मुळी थोडंफारही प्रेम नाहीये. इतरांच्या आया बघा.` तुलनेचं हे वादळ आई आणि मुलाच्या नात्यात आलं की जहाजावर कितीही रसद असली तरी आपल्याला सुखी ठेवण्यासाठी झटणाऱ्या फूटभर अंतरावरल्या चेहऱ्यावरच्या गाजदार लाटाही मग, मन ओळखेनासं होतं. नात्यांमधले अडथळे असो वा नातं सुशेगात वल्हवणारी वल्ही, दुनियेत सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच असतात; पण बंडखोर वयात हे सांगणार तरी कोण आणि कसं? तू लिहिलेली पत्रं केवळ तुझ्या सहा मुलांपुरती मर्यादित न राहता कितीतरी टीनएजर्सच्या मनांचा अचूक ठाव घेतात ती तू हे सांगतेस म्हणूनच. सतत चेहऱ्यावर मेकअपची मागणी करणारं जग, लेखिका म्हणून सगळी व्यवधानं विसरून वाचकांना आवडणाऱ्याच साच्यात शाई ओतायला सांगणारा कागद, वैवाहिक आयुष्याच्या स्वतःच्या म्हणून असलेल्या स्वतंत्र अपेक्षा आणि या सगळ्याला पुरून उरत मुलांना पत्रांतून आयुष्य उत्फुल्लपणे जगायला शिकवणारी तू. आमच्या आया पेज थ्री कल्चरच्या नसतीलही, स्वतःच्या मनातलं कागदावर मुक्तपणे लिहिणं त्यांना कदाचित कॉलेजनंतर जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात जमलंही नसेल, पण म्हणून त्यांनी आमच्यासाठी आयुष्यासोबत केलेल्या तडजोडीचं महत्त्व थोडीच कमी होतं? `स्पीडपोस्ट` वाचताना प्रत्येकजण आईसोबतच्या आपल्या नात्याचे अर्थ पानापानांवरच्या अवकाशात शोधत राहतो. प्रत्यक्ष ओळीं इतकंच बिटविन दि लाईन्स लिहिणाऱ्या तुझ्या लेखणीचं हे खरं यश. मुलांपाशी व्यक्त होताना तू इतका कमालीचा मोकळेपणा कसा राखू शकतेस याचं कॉलेजात हे पुस्तक वाचल्यावर प्रचंड आश्चर्य वाटलेलं (पुढं `स्पाउज`सारख्या पुस्तकांतून मात्र तुझ्या जगण्याची फिलॉसॉफी गवसली). जे विषय बोलताना आम्हीही संकोचतो तेसुद्धा तू किती सुंदरपणे हाताळले आहेत. जबाबदारीपूर्ण जगण्यासाठी मुलांची मानसिक बैठक घडवताना कुठलाच विषय तू गौण मानला नाहीस. जगण्याबद्दल तू आमच्या भाषेत बोललीस आणि कितीतरी गुंते झरझर सुटले. स्वतःच्याच विश्वात मुलं हरवलेली असताना आई म्हणून खंबीर स्टँड मांडलास आणि जाणवू देत नसली तरी आईचंही स्वतंत्र आयुष्य असतं हे मान्य करायला शिकवलंस तू आणि हेही शिकवलंस की स्वतंत्र आयुष्य असूनसुद्धा मुलंच तिच्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतात. असंख्य टिनएजर्सच्या मनांतलं द्वंद्व शांत करत आयुष्याला स्थिरत्व आणि दिशा देणाऱ्या तुझ्या या दीपस्तंभरूपी `स्पीडपोस्ट`ला म्हणूनच हे प्रतिपत्र. आयांवर कितीही रुसलो तरी त्यांच्याशी असलेले अतूट बंध जाणणारी आम्ही मुलं ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2004

    जगण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं : स्पीडपोस्ट... पत्रे ही खरे तर प्रत्येक व्यक्तिच्या जीवनातील अत्यंत खासगी मालमत्ता. खासगी आणि एक वेगळा ‘आपुलकीचा अनुभव देणारी. दुसऱ्याची पत्रे वाचायची नसतात असा संकेत असतानाही जेव्हा दुसरे ती पत्रे स्वत:हून प्रसिद्ध रतात तेव्हा? तेव्हा अशी पत्रे नेहमीच वाचायची असतात. किमान शोभा डे यांनी त्यांच्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रे तरी प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवीत. पत्रांबाबतचा लोकसंकेत माहीत असूनही ही पत्रे केवळ आपल्याच मुलांसाठी मार्गदर्शक ठरणारी नाहीत तर इतरांनाही त्यातून खूप काही मिळण्यासारखे आहे. हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. अपर्णा वेलणकर यांनी स्पीडपोस्टचा मराठीमधून केलेला अनुवाद तितक्याच मुक्तपणे व्यक्त झाला आहे. बोलीभाषेतील शब्दांमध्येही सेलिब्रेटिज वर्गाचा टच आणि त्यातून मनाचा धांडोळा शोधण्याची सुरेल कसरत या अनुवादामध्ये उमटली आहे. थोडसं लांबण वाटत असलं तरी ते आवश्यकच आहे, याची पुरेपूर जाणीव वाचताना होत राहते. समाजाच्या अत्यंत उच्चभ्रू वर्गातील एक नामांकित प्रस्थ असलेल्या डे यांच्या जीवनशैलीचा पुस्तकावर प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पार्टी, शेड्युल्स, देशात आणि परदेशातील असाईनमेंटस अशा बिझी लाईफस्टाईलमध्येही आईच्या मनात आपल्या मुलांविषयी असलेल्या सर्वसामान्य चिंता आणि शंकांपासून त्याही सुटलेल्या नाहीत, याचे सरळसोट चित्रण स्पीडपोस्टमध्ये आहे. त्यातही त्यांची मुले म्हणजे पहिल्या लग्नाची दोन, दुसऱ्या लग्नाची दोन आणि दुसऱ्या पतीची दोन अशी सहाजणं. घरामध्ये गोकुळ असावं असं वाटणाऱ्या या वलयांकित कुटुंबातील प्रश्न चारचौघांसारखेच पण उत्तर मात्र खास शोभा डे स्टाईलची. आपलं आणि आपल्या मुलांच्या आयुष्याची तुलना करताना कुठेही आपण ‘ग्रेट’ असल्याचा ‘फील’ त्या होऊ देत नाहीत हेच त्यांचे ‘ग्रेट’पण सर्वात धाकटी मुलगी आनंदिता रडून विचारते की, आज रात्री तू पार्टीला न जाता माझ्याबरोबर राहू नाही का शकत, तरीही तिचा विरोध पत्करून लेखिकेचं पार्टीला जाणं आणि घरी परत येईपर्यंत मुलीच्या आठवणीने झालेली जिवाची घालमेल या पुस्तकाच्या प्रारंभापासूनच त्यातील आशय मनामध्ये घट्ट बसून जातो. सकाळी आनंदिताने येऊन मारलेली मिठी एखाद्याने थोबाडीत मारण्यापेक्षाही कठोर शिक्षा होती ही लेखिकेची जाणीव स्वत:च्या चुका आणि संवेदनशीलता प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आहे. स्पीडपोस्टची पकड तेथूनच सुरू होते. रणदीप, राधिका, आदित्य, अवंतिका, अरुंधती, आनंदिनी या आपल्या मुलांना लिहिलेली पत्रे म्हणजे स्पीडपोस्ट, मुलांच्या आयुष्यातील अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या आणि नसलेल्या आईने याबद्दल मुलांशी, मुलांच्या भाषेत, मुलांसाठी आणि स्वत:साठीही केलेला हा लेखनप्रपंच. या घटनांमध्ये मुलांच्या शाळा, त्यांचा पहिला जॉब, इंटरव्ह्यू, मुलींखती शाळेची सहल, मैत्रिणीमध्ये झालेली भांडाभांडी अशा रुटिन घटना तर आहेतच, पण मुलीने पहिल्यांदा आईशिवाय केलेली शॉपिंग, मुलांच्या गर्लफ्रेंडस, प्रेमप्रकरण, त्यांची पहिली घरच्याशिवाय केलेली व्हॅकेशन टूर, चॅटरुममधील गप्पा आणि त्यातून लेखिकेला आलेलं टेन्शन... अशा काही पत्रांमधून आईला वाटणारी काळजी, मुलं आपल्यापासून दूर तर जात नाहीत ना, याची चिंता आणि पुन्हा मुलांकडे आपल्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी त्यांना आपली आठवण आहे याचा विश्वास, प्रत्येक पत्राच्या शेवटी व्यक्त होताच. स्पीडपोस्टमधील अनेक पत्रं मनाला भिडणारी आहेत. तरीही त्यातील एका पत्राचा इथे उल्लेख करायलाच हवा. घरातला मोठा मुलगा असलेल्या रणदीपला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देताना, त्याच्या हाती परिवाराची जबाबदारी सोपविताना लेखिकेने त्याच्यावर असलेला विश्वास आणि लहान भावंडांना समजावून घेण्यासाठी त्याला करावी लागणारी कसरत या दोन्हींची सांगड घातली आहे. त्याच्यात आणि त्याच्या सर्वात धाकट्या बहिणींमध्ये असलेले तब्बल सोळा वर्षांचे अंतर तसे प्रचंडच. तरीही तो आपल्या परिवाराला एकसंघ ठेवू शकतो. ही तिची सक्षम जाणीव तिने अतिशय भावस्पर्शीपणे मांडली आहे. यातील लेखिकेच्या लिखाणाची स्टाईल कोठेही न मारता चपखलपणे अनुवाद करण्याची किमया वेलणकर यांना उत्तम रितीने जमली आहे. सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुभव त्यांच्याकडे असला तरी स्पीडपोस्टकरता त्यांचे कौतुक करायलाच हवे. जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन ही पत्रे आपल्याला देतात. ज्याला जीवनाच्या आसक्तीचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल त्यांनी ही स्पीडपोस्ट वाचायलाच हवीत. -सुनिता महामुणकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-03-2004

    आईची मुलांसाठी ‘भेट’... सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आयुष्याला सामोरे जाताना आपली मुले तग धरतील ना, मोहमयी दुनियेत पावलापावलावर दिसणाऱ्या प्रलोभनांना केवळ आधुनिकता आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी भुलून ती भरकटणार तर नाहीत ना, ही चिंता सध्या प्रत्यक आईलाच भेडसावते. अशाच आधुनिकतेच्या झंझावातात वावरणाऱ्या आल्या सहा मुलांना प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी लिहिलेली पत्रे कोणत्याही आईच्या हृदयातील भावनाच बोलून दाखवतात. ई-मेल, एसएमएसच्या सध्याच्या जमान्यात मुलांचा आईवडिलांशी संवादही दुर्मीळ झाला आहे. अशा मुलांना नव्या जगात जगताना, झुंजताना, संकटांमधून वाट शोधताना एक शिदोरी हवी म्हणून लेखिकेने या पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला आहे. कुटुंब, त्यातील व्यक्तींचे परस्परांशी नाते, परंपरा, नीतिमूल्ये यांची चर्चा या पत्रांत आहे. आपल्या संस्कृतीची, कुटुंबव्यवस्थेची मुलांना ओळख करून देत असतानाच आपण ही संस्कृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यास कमी पडलो, ही खंतही त्यांना आहे. झगमगत्या दुनियेत, प्रसिद्धीच्या वलयात वावरत असताना मुलांच्या बालपणातील काही गोष्टी निसटून गेल्याची जाणीव त्यांना आहे. पण त्याचबरोबर मुलांचे वाढते वय, बदलते भावविश्व, नव्या पिढीला हवेहवेसे वाटणारे स्वतंत्र, मुक्तजीवन, बंडखोर वृत्ती या गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी जाणल्या आहेत, टिपल्या आहेत. मुलांना त्यांच्या विचारांनी जगू देताना, तरुण वयात त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देत असतानाच बाह्य जगातील प्रलोभनांना, दिखाऊपणाला ती भुलणार नाहीत, याची काळजीही आई या नात्याने पुरेपूर घेतली आहे. त्यासाठी त्यांनी उपदेशाचे डोस पाजलेले नाहीत किंवा आकांडतांडवही केलेले नाही. एखादी गोष्ट पटली नाही किंवा योग्य नाही म्हणून नकार देऊन त्यांनी मुलांना दुखावले नाही. मुलांना त्या गोष्टीचा त्यांनी अनुभव घेऊ दिला. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती तुलना व स्पर्धा यांचा स्पर्श न होता एकत्र राहू शकत नाहीत. पण स्पर्धेची क्षणिक भावना जोवर तुमच्या मनाचा पूर्ण कब्जा घेत नाही आणि नात्याच्या मुळावर घाव घालण्याइतकी प्रबळ होत नाही, तोवर तिचे अस्तित्व नाकारण्याची केविलवाणी धडपड करू नका, असे त्या मुलांना बजावतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज असते आणि ती आई, भावंडांच्या आधारानेच भागविली जाते. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध दृढ असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणतात. आपल्या सहा मुलांचे स्वभाव भिन्न असले, आवडीनिवडी टोकाच्या असल्या तरी प्रेमाच्या धाग्याने त्यांच्यातील नात्याची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न शोभा डे यांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ करणारी, कधी रागावणारी, वास्तवाची जाणीव करून देत चिमटे काढणारी, कधी हसवणारी, तर कधी धारेवर धरणारी ही सुंदर पत्रे कोणत्याही आईला आपलीच वाटतील. आधुनिक जगाला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीतील मुलांसाठी ही पत्रे म्हणजे खरोखरच शिदोरी आहे. संदर्भ बदलले तरी कोणत्याही दोन पिढ्यांमधील नातेसंबंध, परस्परांविषयीच्या भावनाच ही पत्रे व्यक्त करतात. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 04-04-2004

    तरुणांपासून प्रौढांपर्यंत साधलेला संवाद... शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला होता. त्यांनीच शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. या पत्ररूपी पुस्तकाचं वेगळेपण यात आहे की मुलांना द्देशून लिहिलेल्या या पत्रातील संवाद तरुणांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांशीच साधतो. खरं म्हणजे ई-मेलच्या जमान्यात पत्रं हा कालबाह्य प्रकार ठरला आहे. तरीही ‘स्पीड पोस्ट’नं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘स्पीड पोस्ट’मधली सहा मुलांची ममा ही जगातल्या कोणत्याही मातेची प्रतिमा. आपल्या काळजाच्या तुकड्यांवर अपार मायेचा वर्षाव करणारी, प्रेमळ कधी तितकीच कठोर, तर कधी काळजीनं हळवी होणारी आई आपल्याशी जवळीक साधते. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणाईपुढील आव्हानं, स्पर्धा, बदलती जीवनमूल्यं, अर्थसत्तेचं अनिर्बंध प्राबल्य यामुळे अवघे आयुष्य ढवळून निघत आहे. त्यातच नातेसंबंधांना हादरे बसत आहेत. या साऱ्याला सामोरे जाताना तरुणाई कधी गोंधळलेली, कधी भरकटलेली होऊ शकते. कोवळ्या वयातील त्यांच्या विश्वाशी सुसंवाद साधण्याचा, त्यांचं आधुनिक बदलतं, अपरिहार्य जग समजून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न या पुस्तकात केला गेलाय. मुलांशी संवाद साधताना कुठेही छडी उगारलेली दिसत नाही. प्रसंगी समज दिली गेली असेल, पण चुकलेलं कोकरू उबदार घरट्याच्या वाटेवर परतेल असा विश्वास यात व्यक्त होतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, अत्यंत व्यस्त आयुष्य, धावपळ, मन अस्वस्थ करणाऱ्या आयुष्यात घडलेल्या अनेक कडू-गोड घटना त्यातूनही कुटंबाशी असलेलं घट्ट नातं हे ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ असंच. कुटुंबात पहिल्या पतीची, दुसऱ्या पतीची मुलं अशी. अपरिपक्व वयातील मुलांशी संवाद, आपुलकी साधणं, सर्वांनाच आपलं घर वाटणं यात ममाची स्त्रीची भूमिका महत्त्वाची. ही कसरत करताना आलेले अनुभव, प्रसंग, मनाची होणारी घालमेल पत्रांतून व्यक्त होत राहते. पुस्तकातील असंख्य पत्रांत विविध विषयांवर चर्चा आहे. कौटुंबिक चौकट, परस्पर नातेसंबंध, संस्कृती, नीतिमूल्यांचा आग्रह, तर दुसरीकडे आधुनिक जगाचं अनिवार आकर्षण असलेली जीवनशैली पार्ट्या, इंटरनेट चॅटिंग, तासन्तास चालणारे टेलिफोन कॉल्स, स्पर्धा, आव्हानं, प्रलोभनं अशा सर्वस्पर्शी पत्रांचा खजिना मनाला स्पर्शून जातो. या पत्रांचा सूर केवळ उपदेशाचा, काळजीचा आग्रहाचा नाही. लेखिकेनं आपलं मनही अत्यंत दिलदारपणे उलगडलंय. मागे वळून बघताना नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुलीही आहे. आधुनिक जगात वावरताना आपली मुलं विचारपूर्वक निर्णय घेतील. नातेसंबंधांना हादरे बसणार नाहीत, मोठा मुलगा वडीलकीच्या नात्याने कुटुंबाचे बंध सैल होऊ देणार नाही असा सार्थ विश्वास त्या व्यक्त करतात. पत्रातील भाषेचा डौल काही वेळा सेलिब्रिटी टच वाटला तरी तो भावस्पर्शी, हळुवार मनाचा उद्गार आहे हे जाणवतं. काही पत्रांचा शेवट मात्र अगदी काळीज ओतल्यासारखा. ‘सदैव काळजी आणि संशयात बुडालेली तुमची ममा.’ असा आपल्या दोन मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातील हा तुकडा ‘तुम्ही किती बदल्या मिळवता किती पैसा अगर पुरस्कार मिळवता याच्याशी मला देणं-घेणं नाही. तर मग मी चुकूनसुद्धा तुमच्या पायात पाय अडकवायला मध्ये मध्ये येणार नाही. ‘प्रॉमिस!’ प्रस्तुत पुस्तकातील हा संवाद कोणत्याही संवेदनशील जागरूक पालकाच्या व पाल्याच्याही काळजाला हात घालणारा, त्यांचं अंत:करण उलगडून दर्शविणारा एकमेकांवरच्या विश्वासानं, मायेनं एकमेकांशी घट्ट बंध असलेलं हे कुटुंब वर्षाच्या सरत्या रात्री उगवत्या वर्षाच्या स्वागतासाठी एकमेकांसोबत सज्ज असतं. तो क्षण एकमेकांच्या मिठीत पाणावलेल्या नेत्रांनी साजरा होता. वाचकांनाही पत्रांप्रमाणेच हा क्षणही मुठीत धरून ठेवावासा, हृदयात साठवून ठेवावासा वाटतो. -माधुरी महाशब्दे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more