* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPEEDPOST
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788177664409
  • Edition : 11
  • Publishing Year : JANUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 392
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE RELATION BETWEEN A MOTHER AND HER CHILDREN IS THE MOST PRIMITIVE ONE, THEY ARE TIED TOGETHER TIGHTLY THROUGH THE UMBILICAL CORD AND THROUGH THEIR MINDS AS WELL. THIS NEW ERA HAS GIVEN A DIFFERENT DEPTH TO THE RELATION BETWEEN A MOTHER AND HER CHILDREN. THIS NEW ERA, WITH ITS COLLAPSED MORAL CULTURE AND DISINTEGRATING VIRTUES IS SHATTERING AND CHALLENGING THE RELATIONSHIP, THE FAITH ON EACH OTHER. THE INTERNATIONALLY FAMOUS AUTHOR SHOBHA DE, HAS WRITTEN LETTERS TO ALL HER 6 CHILDREN AS A MOTHER. THESE LETTERS ARE COMPILED TOGETHER IN THIS BOOK. EACH MOTHER WILL FIND THEM CLOSE TO HER HEART; EACH LETTER REVEALS A MOTHER'S MIND. THE LETTER REFLECTS THE WORRIES OF A MOTHER, THE BURDEN ON HER HEART AND MIND IN THE ANXIETY OF HER CHILDREN'S WELFARE. TODAY'S COMPETITION AND THE WORLD WITH ITS VICE AND TEMPTATIONS IS MORE THAN ENOUGH TO MAKE ANY MOTHER ANXIOUS. TOPICS LIKE THE FAMILY, THE RELATIONSHIP, THE FAMILY CULTURE, TRADITIONS, THE INSISTENCE ON BEING VIRTUOUS, STRICT DISCIPLINE, THE REVOLUTIONARY ATTITUDE OF THE YOUNG GENERATION, THE LENGTHY PHONE CONVERSATIONS, THE BILLS CAUSING SEVERE ARGUMENTS IN THE HOUSE, THE LINGERING PARTIES TILL MIDNIGHTS, THE INTERNET CHATTING, THE LIST IS ENDLESS; ALL THIS IS COMPILED IN THIS BOOK. IT ALSO INCLUDES THE TOPICS LIKE ADOLESCENCE, LOVE AT A TENDER AGE, THE PHYSICAL ATTRACTION, FRIENDSHIP WITH ITS VARIOUS DIMENSIONS, CHOOSING A PARTNER, AND THE DISPUTES IN THE CLOSE RELATIONSHIPS. COUNTRY, GOD, RELIGION. SOCIAL LIABILITIES, SENSE OF CITIZENSHIP! THE TOPICS ARE VARIOUS, THE INCIDENCES ARE DIFFERENT. THESE LETTERS WILL SHOW THE TENDER LOVE OF A MOTHER, FULL OF AFFECTION, FULL OF WORRIES. SHE LOVES YOU, SHE BEATS YOU TO AWAKE THE SLEEPING SENSES. SHE TEASES, SHE RIDICULES. SHE MAKES YOU LAUGH, SHE MAKES YOU CRY. SHE HAS WRITTEN THESE LETTERS, FULL OF ALL THE FEELINGS YOU WISH TO FEEL, EACH LETTER WILL TOUCH EVERY LIVELY MIND.
N/A

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
  • Rating StarTrupti Kulkarni

    शोभा डे लिखित, अपर्णा वेलणकर अनुवादित ‘स्पीडपोस्ट’ या मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातल्या ‘पेज थ्री आई’ या पात्राला ‘प्रणव कुलकर्णी’ यांनी लिहिलेले पत्र. _________________ झगमगत्या दुनियेतून मुलांच्या भावविश्वात अगद उतरता येणाऱ्या पेज थ्री पण तितक्याच हळव्या आईस, तब्बल सहा मुलांचं नेटानं संगोपन करताना वेगवेगळ्या टप्प्यांवर पत्ररूपानं त्यांच्यासमोर तू अनुभवांची शिदोरी खुली केलीस. ही पत्रं तुला प्रकाशित का करावीशी वाटली माहीत नाही; पण ती केलीस हे उत्तम झालं. कसंय, अडनेडी वयातल्या प्रत्येकालाच कधीतरी वाटतं की `आई आपल्याला पुरेसा वेळच देत नाही आणि आपल्यावर तिचं मुळी थोडंफारही प्रेम नाहीये. इतरांच्या आया बघा.` तुलनेचं हे वादळ आई आणि मुलाच्या नात्यात आलं की जहाजावर कितीही रसद असली तरी आपल्याला सुखी ठेवण्यासाठी झटणाऱ्या फूटभर अंतरावरल्या चेहऱ्यावरच्या गाजदार लाटाही मग, मन ओळखेनासं होतं. नात्यांमधले अडथळे असो वा नातं सुशेगात वल्हवणारी वल्ही, दुनियेत सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच असतात; पण बंडखोर वयात हे सांगणार तरी कोण आणि कसं? तू लिहिलेली पत्रं केवळ तुझ्या सहा मुलांपुरती मर्यादित न राहता कितीतरी टीनएजर्सच्या मनांचा अचूक ठाव घेतात ती तू हे सांगतेस म्हणूनच. सतत चेहऱ्यावर मेकअपची मागणी करणारं जग, लेखिका म्हणून सगळी व्यवधानं विसरून वाचकांना आवडणाऱ्याच साच्यात शाई ओतायला सांगणारा कागद, वैवाहिक आयुष्याच्या स्वतःच्या म्हणून असलेल्या स्वतंत्र अपेक्षा आणि या सगळ्याला पुरून उरत मुलांना पत्रांतून आयुष्य उत्फुल्लपणे जगायला शिकवणारी तू. आमच्या आया पेज थ्री कल्चरच्या नसतीलही, स्वतःच्या मनातलं कागदावर मुक्तपणे लिहिणं त्यांना कदाचित कॉलेजनंतर जबाबदाऱ्यांच्या धबडग्यात जमलंही नसेल, पण म्हणून त्यांनी आमच्यासाठी आयुष्यासोबत केलेल्या तडजोडीचं महत्त्व थोडीच कमी होतं? `स्पीडपोस्ट` वाचताना प्रत्येकजण आईसोबतच्या आपल्या नात्याचे अर्थ पानापानांवरच्या अवकाशात शोधत राहतो. प्रत्यक्ष ओळीं इतकंच बिटविन दि लाईन्स लिहिणाऱ्या तुझ्या लेखणीचं हे खरं यश. मुलांपाशी व्यक्त होताना तू इतका कमालीचा मोकळेपणा कसा राखू शकतेस याचं कॉलेजात हे पुस्तक वाचल्यावर प्रचंड आश्चर्य वाटलेलं (पुढं `स्पाउज`सारख्या पुस्तकांतून मात्र तुझ्या जगण्याची फिलॉसॉफी गवसली). जे विषय बोलताना आम्हीही संकोचतो तेसुद्धा तू किती सुंदरपणे हाताळले आहेत. जबाबदारीपूर्ण जगण्यासाठी मुलांची मानसिक बैठक घडवताना कुठलाच विषय तू गौण मानला नाहीस. जगण्याबद्दल तू आमच्या भाषेत बोललीस आणि कितीतरी गुंते झरझर सुटले. स्वतःच्याच विश्वात मुलं हरवलेली असताना आई म्हणून खंबीर स्टँड मांडलास आणि जाणवू देत नसली तरी आईचंही स्वतंत्र आयुष्य असतं हे मान्य करायला शिकवलंस तू आणि हेही शिकवलंस की स्वतंत्र आयुष्य असूनसुद्धा मुलंच तिच्या आयुष्याचा ड्रायव्हिंग फोर्स असतात. असंख्य टिनएजर्सच्या मनांतलं द्वंद्व शांत करत आयुष्याला स्थिरत्व आणि दिशा देणाऱ्या तुझ्या या दीपस्तंभरूपी `स्पीडपोस्ट`ला म्हणूनच हे प्रतिपत्र. आयांवर कितीही रुसलो तरी त्यांच्याशी असलेले अतूट बंध जाणणारी आम्ही मुलं ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-02-2004

    जगण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं : स्पीडपोस्ट... पत्रे ही खरे तर प्रत्येक व्यक्तिच्या जीवनातील अत्यंत खासगी मालमत्ता. खासगी आणि एक वेगळा ‘आपुलकीचा अनुभव देणारी. दुसऱ्याची पत्रे वाचायची नसतात असा संकेत असतानाही जेव्हा दुसरे ती पत्रे स्वत:हून प्रसिद्ध रतात तेव्हा? तेव्हा अशी पत्रे नेहमीच वाचायची असतात. किमान शोभा डे यांनी त्यांच्या सहा मुलांना लिहिलेली ही पत्रे तरी प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी वाचायला हवीत. पत्रांबाबतचा लोकसंकेत माहीत असूनही ही पत्रे केवळ आपल्याच मुलांसाठी मार्गदर्शक ठरणारी नाहीत तर इतरांनाही त्यातून खूप काही मिळण्यासारखे आहे. हा लेखिकेचा विश्वास सार्थ आहे. अपर्णा वेलणकर यांनी स्पीडपोस्टचा मराठीमधून केलेला अनुवाद तितक्याच मुक्तपणे व्यक्त झाला आहे. बोलीभाषेतील शब्दांमध्येही सेलिब्रेटिज वर्गाचा टच आणि त्यातून मनाचा धांडोळा शोधण्याची सुरेल कसरत या अनुवादामध्ये उमटली आहे. थोडसं लांबण वाटत असलं तरी ते आवश्यकच आहे, याची पुरेपूर जाणीव वाचताना होत राहते. समाजाच्या अत्यंत उच्चभ्रू वर्गातील एक नामांकित प्रस्थ असलेल्या डे यांच्या जीवनशैलीचा पुस्तकावर प्रभाव असणे स्वाभाविक आहे. पार्टी, शेड्युल्स, देशात आणि परदेशातील असाईनमेंटस अशा बिझी लाईफस्टाईलमध्येही आईच्या मनात आपल्या मुलांविषयी असलेल्या सर्वसामान्य चिंता आणि शंकांपासून त्याही सुटलेल्या नाहीत, याचे सरळसोट चित्रण स्पीडपोस्टमध्ये आहे. त्यातही त्यांची मुले म्हणजे पहिल्या लग्नाची दोन, दुसऱ्या लग्नाची दोन आणि दुसऱ्या पतीची दोन अशी सहाजणं. घरामध्ये गोकुळ असावं असं वाटणाऱ्या या वलयांकित कुटुंबातील प्रश्न चारचौघांसारखेच पण उत्तर मात्र खास शोभा डे स्टाईलची. आपलं आणि आपल्या मुलांच्या आयुष्याची तुलना करताना कुठेही आपण ‘ग्रेट’ असल्याचा ‘फील’ त्या होऊ देत नाहीत हेच त्यांचे ‘ग्रेट’पण सर्वात धाकटी मुलगी आनंदिता रडून विचारते की, आज रात्री तू पार्टीला न जाता माझ्याबरोबर राहू नाही का शकत, तरीही तिचा विरोध पत्करून लेखिकेचं पार्टीला जाणं आणि घरी परत येईपर्यंत मुलीच्या आठवणीने झालेली जिवाची घालमेल या पुस्तकाच्या प्रारंभापासूनच त्यातील आशय मनामध्ये घट्ट बसून जातो. सकाळी आनंदिताने येऊन मारलेली मिठी एखाद्याने थोबाडीत मारण्यापेक्षाही कठोर शिक्षा होती ही लेखिकेची जाणीव स्वत:च्या चुका आणि संवेदनशीलता प्रामाणिकपणे व्यक्त करणारी आहे. स्पीडपोस्टची पकड तेथूनच सुरू होते. रणदीप, राधिका, आदित्य, अवंतिका, अरुंधती, आनंदिनी या आपल्या मुलांना लिहिलेली पत्रे म्हणजे स्पीडपोस्ट, मुलांच्या आयुष्यातील अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या आणि नसलेल्या आईने याबद्दल मुलांशी, मुलांच्या भाषेत, मुलांसाठी आणि स्वत:साठीही केलेला हा लेखनप्रपंच. या घटनांमध्ये मुलांच्या शाळा, त्यांचा पहिला जॉब, इंटरव्ह्यू, मुलींखती शाळेची सहल, मैत्रिणीमध्ये झालेली भांडाभांडी अशा रुटिन घटना तर आहेतच, पण मुलीने पहिल्यांदा आईशिवाय केलेली शॉपिंग, मुलांच्या गर्लफ्रेंडस, प्रेमप्रकरण, त्यांची पहिली घरच्याशिवाय केलेली व्हॅकेशन टूर, चॅटरुममधील गप्पा आणि त्यातून लेखिकेला आलेलं टेन्शन... अशा काही पत्रांमधून आईला वाटणारी काळजी, मुलं आपल्यापासून दूर तर जात नाहीत ना, याची चिंता आणि पुन्हा मुलांकडे आपल्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी त्यांना आपली आठवण आहे याचा विश्वास, प्रत्येक पत्राच्या शेवटी व्यक्त होताच. स्पीडपोस्टमधील अनेक पत्रं मनाला भिडणारी आहेत. तरीही त्यातील एका पत्राचा इथे उल्लेख करायलाच हवा. घरातला मोठा मुलगा असलेल्या रणदीपला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देताना, त्याच्या हाती परिवाराची जबाबदारी सोपविताना लेखिकेने त्याच्यावर असलेला विश्वास आणि लहान भावंडांना समजावून घेण्यासाठी त्याला करावी लागणारी कसरत या दोन्हींची सांगड घातली आहे. त्याच्यात आणि त्याच्या सर्वात धाकट्या बहिणींमध्ये असलेले तब्बल सोळा वर्षांचे अंतर तसे प्रचंडच. तरीही तो आपल्या परिवाराला एकसंघ ठेवू शकतो. ही तिची सक्षम जाणीव तिने अतिशय भावस्पर्शीपणे मांडली आहे. यातील लेखिकेच्या लिखाणाची स्टाईल कोठेही न मारता चपखलपणे अनुवाद करण्याची किमया वेलणकर यांना उत्तम रितीने जमली आहे. सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुभव त्यांच्याकडे असला तरी स्पीडपोस्टकरता त्यांचे कौतुक करायलाच हवे. जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन ही पत्रे आपल्याला देतात. ज्याला जीवनाच्या आसक्तीचा मनमुराद अनुभव घ्यायचा असेल त्यांनी ही स्पीडपोस्ट वाचायलाच हवीत. -सुनिता महामुणकर ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-03-2004

    आईची मुलांसाठी ‘भेट’... सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आयुष्याला सामोरे जाताना आपली मुले तग धरतील ना, मोहमयी दुनियेत पावलापावलावर दिसणाऱ्या प्रलोभनांना केवळ आधुनिकता आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी भुलून ती भरकटणार तर नाहीत ना, ही चिंता सध्या प्रत्यक आईलाच भेडसावते. अशाच आधुनिकतेच्या झंझावातात वावरणाऱ्या आल्या सहा मुलांना प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी लिहिलेली पत्रे कोणत्याही आईच्या हृदयातील भावनाच बोलून दाखवतात. ई-मेल, एसएमएसच्या सध्याच्या जमान्यात मुलांचा आईवडिलांशी संवादही दुर्मीळ झाला आहे. अशा मुलांना नव्या जगात जगताना, झुंजताना, संकटांमधून वाट शोधताना एक शिदोरी हवी म्हणून लेखिकेने या पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला आहे. कुटुंब, त्यातील व्यक्तींचे परस्परांशी नाते, परंपरा, नीतिमूल्ये यांची चर्चा या पत्रांत आहे. आपल्या संस्कृतीची, कुटुंबव्यवस्थेची मुलांना ओळख करून देत असतानाच आपण ही संस्कृती पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यास कमी पडलो, ही खंतही त्यांना आहे. झगमगत्या दुनियेत, प्रसिद्धीच्या वलयात वावरत असताना मुलांच्या बालपणातील काही गोष्टी निसटून गेल्याची जाणीव त्यांना आहे. पण त्याचबरोबर मुलांचे वाढते वय, बदलते भावविश्व, नव्या पिढीला हवेहवेसे वाटणारे स्वतंत्र, मुक्तजीवन, बंडखोर वृत्ती या गोष्टी छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी जाणल्या आहेत, टिपल्या आहेत. मुलांना त्यांच्या विचारांनी जगू देताना, तरुण वयात त्यांना हवे ते क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य देत असतानाच बाह्य जगातील प्रलोभनांना, दिखाऊपणाला ती भुलणार नाहीत, याची काळजीही आई या नात्याने पुरेपूर घेतली आहे. त्यासाठी त्यांनी उपदेशाचे डोस पाजलेले नाहीत किंवा आकांडतांडवही केलेले नाही. एखादी गोष्ट पटली नाही किंवा योग्य नाही म्हणून नकार देऊन त्यांनी मुलांना दुखावले नाही. मुलांना त्या गोष्टीचा त्यांनी अनुभव घेऊ दिला. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती तुलना व स्पर्धा यांचा स्पर्श न होता एकत्र राहू शकत नाहीत. पण स्पर्धेची क्षणिक भावना जोवर तुमच्या मनाचा पूर्ण कब्जा घेत नाही आणि नात्याच्या मुळावर घाव घालण्याइतकी प्रबळ होत नाही, तोवर तिचे अस्तित्व नाकारण्याची केविलवाणी धडपड करू नका, असे त्या मुलांना बजावतात. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला ‘सपोर्ट सिस्टिम’ची गरज असते आणि ती आई, भावंडांच्या आधारानेच भागविली जाते. त्यासाठी कुटुंबातील व्यक्तींचे परस्पर नातेसंबंध दृढ असणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणतात. आपल्या सहा मुलांचे स्वभाव भिन्न असले, आवडीनिवडी टोकाच्या असल्या तरी प्रेमाच्या धाग्याने त्यांच्यातील नात्याची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न शोभा डे यांनी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. प्रेमाने ओथंबलेली, मायेने जवळ करणारी, कधी रागावणारी, वास्तवाची जाणीव करून देत चिमटे काढणारी, कधी हसवणारी, तर कधी धारेवर धरणारी ही सुंदर पत्रे कोणत्याही आईला आपलीच वाटतील. आधुनिक जगाला सामोरे जाणाऱ्या नव्या पिढीतील मुलांसाठी ही पत्रे म्हणजे खरोखरच शिदोरी आहे. संदर्भ बदलले तरी कोणत्याही दोन पिढ्यांमधील नातेसंबंध, परस्परांविषयीच्या भावनाच ही पत्रे व्यक्त करतात. -नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 04-04-2004

    तरुणांपासून प्रौढांपर्यंत साधलेला संवाद... शोभा डे यांच्या सिलेक्टिव्ह मेमरीज या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला होता. त्यांनीच शोभा डे यांच्या ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचाही अनुवाद केला आहे. या पत्ररूपी पुस्तकाचं वेगळेपण यात आहे की मुलांना द्देशून लिहिलेल्या या पत्रातील संवाद तरुणांपासून प्रौढांपर्यंत साऱ्यांशीच साधतो. खरं म्हणजे ई-मेलच्या जमान्यात पत्रं हा कालबाह्य प्रकार ठरला आहे. तरीही ‘स्पीड पोस्ट’नं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ‘स्पीड पोस्ट’मधली सहा मुलांची ममा ही जगातल्या कोणत्याही मातेची प्रतिमा. आपल्या काळजाच्या तुकड्यांवर अपार मायेचा वर्षाव करणारी, प्रेमळ कधी तितकीच कठोर, तर कधी काळजीनं हळवी होणारी आई आपल्याशी जवळीक साधते. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणाईपुढील आव्हानं, स्पर्धा, बदलती जीवनमूल्यं, अर्थसत्तेचं अनिर्बंध प्राबल्य यामुळे अवघे आयुष्य ढवळून निघत आहे. त्यातच नातेसंबंधांना हादरे बसत आहेत. या साऱ्याला सामोरे जाताना तरुणाई कधी गोंधळलेली, कधी भरकटलेली होऊ शकते. कोवळ्या वयातील त्यांच्या विश्वाशी सुसंवाद साधण्याचा, त्यांचं आधुनिक बदलतं, अपरिहार्य जग समजून घेण्याचा स्तुत्य प्रयत्न या पुस्तकात केला गेलाय. मुलांशी संवाद साधताना कुठेही छडी उगारलेली दिसत नाही. प्रसंगी समज दिली गेली असेल, पण चुकलेलं कोकरू उबदार घरट्याच्या वाटेवर परतेल असा विश्वास यात व्यक्त होतो. त्यांची उच्चभ्रू जीवनशैली, अत्यंत व्यस्त आयुष्य, धावपळ, मन अस्वस्थ करणाऱ्या आयुष्यात घडलेल्या अनेक कडू-गोड घटना त्यातूनही कुटंबाशी असलेलं घट्ट नातं हे ‘घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी’ असंच. कुटुंबात पहिल्या पतीची, दुसऱ्या पतीची मुलं अशी. अपरिपक्व वयातील मुलांशी संवाद, आपुलकी साधणं, सर्वांनाच आपलं घर वाटणं यात ममाची स्त्रीची भूमिका महत्त्वाची. ही कसरत करताना आलेले अनुभव, प्रसंग, मनाची होणारी घालमेल पत्रांतून व्यक्त होत राहते. पुस्तकातील असंख्य पत्रांत विविध विषयांवर चर्चा आहे. कौटुंबिक चौकट, परस्पर नातेसंबंध, संस्कृती, नीतिमूल्यांचा आग्रह, तर दुसरीकडे आधुनिक जगाचं अनिवार आकर्षण असलेली जीवनशैली पार्ट्या, इंटरनेट चॅटिंग, तासन्तास चालणारे टेलिफोन कॉल्स, स्पर्धा, आव्हानं, प्रलोभनं अशा सर्वस्पर्शी पत्रांचा खजिना मनाला स्पर्शून जातो. या पत्रांचा सूर केवळ उपदेशाचा, काळजीचा आग्रहाचा नाही. लेखिकेनं आपलं मनही अत्यंत दिलदारपणे उलगडलंय. मागे वळून बघताना नकळत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुलीही आहे. आधुनिक जगात वावरताना आपली मुलं विचारपूर्वक निर्णय घेतील. नातेसंबंधांना हादरे बसणार नाहीत, मोठा मुलगा वडीलकीच्या नात्याने कुटुंबाचे बंध सैल होऊ देणार नाही असा सार्थ विश्वास त्या व्यक्त करतात. पत्रातील भाषेचा डौल काही वेळा सेलिब्रिटी टच वाटला तरी तो भावस्पर्शी, हळुवार मनाचा उद्गार आहे हे जाणवतं. काही पत्रांचा शेवट मात्र अगदी काळीज ओतल्यासारखा. ‘सदैव काळजी आणि संशयात बुडालेली तुमची ममा.’ असा आपल्या दोन मुलांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रातील हा तुकडा ‘तुम्ही किती बदल्या मिळवता किती पैसा अगर पुरस्कार मिळवता याच्याशी मला देणं-घेणं नाही. तर मग मी चुकूनसुद्धा तुमच्या पायात पाय अडकवायला मध्ये मध्ये येणार नाही. ‘प्रॉमिस!’ प्रस्तुत पुस्तकातील हा संवाद कोणत्याही संवेदनशील जागरूक पालकाच्या व पाल्याच्याही काळजाला हात घालणारा, त्यांचं अंत:करण उलगडून दर्शविणारा एकमेकांवरच्या विश्वासानं, मायेनं एकमेकांशी घट्ट बंध असलेलं हे कुटुंब वर्षाच्या सरत्या रात्री उगवत्या वर्षाच्या स्वागतासाठी एकमेकांसोबत सज्ज असतं. तो क्षण एकमेकांच्या मिठीत पाणावलेल्या नेत्रांनी साजरा होता. वाचकांनाही पत्रांप्रमाणेच हा क्षणही मुठीत धरून ठेवावासा, हृदयात साठवून ठेवावासा वाटतो. -माधुरी महाशब्दे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more