* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613137
  • Edition : 17
  • Publishing Year : JUNE 1979
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SOME OF THE `RAGA` SOME KEYNOTES ARE STRICTLY NOT EXCLUDED, NOT BECAUSE THEY ARE NOT SUITABLE; ON THE CONTRARY THEY ARE& EXCLUDED TO MAKE THE `RAGA` MORE BEAUTIFUL, THEY ARE; EXCLUDED WILLINGLY TO GIVE A PECULIARITY AND WHILE DOING SO THEIR EXISTENCE IS NOT FORGOTTEN AT ALL, ONLY IT IS AVOIDED. THAT IS THE REASON WHY MY HUSBAND CANNOT FIT INTO YOUR LIFE AND MEMORIES AND WHY WE BOTH CANNOT FIT INTO EACH OTHER`S LIVES." VA PU HAS A VERY PECULIAR AND UNIQUE STYLE TO HANDLE DIFFICULT THINGS IN THE MOST SIMPLE MANNER, REVEALING THE HARSH AND HARD CORES OF TRUTHS IN A VERY EASY STYLE, UNTANGLING THE KNOTS SMOOTHLY YET FIRMLY AND SUCCESSFULLY. THE SUCCESS OF HIS STORIES LIES IN THE SELECTION OF THE MOMENTS. THESE SAME MOMENTS ARE WITNESSED BY MANY BUT IT TAKES A VERY SENSITIVE MIND TO PUT THEM INTO WORDS, NEEDLESS TO SAY THAT ONLY VA PU HAS THE CAPACITY, HE GIVES SUCH STRENGTH AND DIMENSIONS TO THESE MOMENTS THAT THEY GLOW IN THEMSELVES, THEY MAKE US THINK, INSPECT OURSELVES, CONTEMPLATE OVER THEM. IT IS HIS STYLE AND FRESHNESS WITH WHICH HE SEES LIFE, HIS HOPEFUL AND MAGNANIMOUSNESS WHICH MAKES EACH STORY A UNIQUE PIECE OF LIFE DAWDLING IN OUR MINDS HOURS LATER.
काही काही रागदारीत काही काही स्वर वर्ज्यच असतात... वर्ज्य झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायचा नसतो, तर एक राग उभा करण्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो... वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं..! म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही.’’ लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं अशी चपखल उदाहरणं देऊन आयुष्यातली गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा आपल्या हाती देतात. त्यांच्या सर्वच कथांमध्ये कथेच्या ओघात मिसळून असं चिंतन येतं आणि ते वाचकांना विचार करायला लावतं. मुळात कथा अतिशय खुमासदार; सहसा कुणाच्या ध्यानीमनी न येणाया क्षणांच्या, घटनांच्या झालेल्या. त्याची अभिव्यक्ती असते वपुंच्या खास मिस्कील शैलीत! त्यांच्या लेखनातील जीवनविषयक प्रसन्न, उदार, आशावादी दृष्टिकोनामुळे त्यांची प्रत्येक कथा वाचकाचं मन जिंकून घेते. ‘स्वर’मधील कथाही वाचून संपल्या तरी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतील...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मध्यमवर्गीय जीवनातील समस्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकलन... लोकप्रिय कथाकार वपु काळे अतिशय सहजतेनं चपखल उदाहरणांद्वारे आयुष्यातील गुंतागुंत सोपी करण्याचा नेमका धागा वाचकांच्या हाती सोपवतात. त्यांच्या प्रत्येक कथेत चिंतनाचे सूर उमटत राहतात आणि त्या चिंतनाचया सुरांनी अर्थांची वेगवेगळी वलये मनात फेर धरू लागतात. मुळात अत्यंत खुमासदार घटना; चमत्कृतिपूर्ण प्रसंग व व्यक्ती; आणि त्यांच्या अनपेक्षित वर्तनामुळे उडणारा गोंधळ... पण तो वपु आपल्या खास कथाकथनतंत्रशैलीने कमालीचा उत्कंठापूर्ण बनवतात. त्यामुळे त्यांच्या कथेचा शेवट एकतर ध्यानीमनी नसलेली कलाटणी देऊन होतो किंवा आसमंत लख्खकन चकाकून सोडणारे जीवनविषयक तत्त्वज्ञान किंवा सत्य सांगून होतो. जीवनविषयक प्रसन्न, आशावादी व उदार जाणीव ही त्यांच्या प्रत्येक कथेला एक वेगळीच उंची देऊन जाते. ‘स्वर’ या कथासंग्रहाच्या शेवटच्या पृष्ठावर हा आशय व्यक्त करणारा ‘ब्लर्ब’ दिला आहे; तो यथोचितच आहे. वपुंच्या कथचे मर्म प्रकट करणारा आहे. ‘स्वर’ मध्ये एकूण पंधरा कथा आहेत. ठुमरी, सोळा जानेवारी, स्वर, सत्कार, धर्म, किक्, पराभव, जिद्द, दुर्वास, भाऊचा धक्का, पहिली खेप, वसावसाचा वसा, मोले घातले बोलाया, मला समजतंय, आणि ‘मी, माझी सौ व तिचा प्रियकर’, ठुमरी ही गोष्ट वीस पृष्ठांची आहे. बाकीच्या सहा ते पंधरा पृष्ठांच्या. आपल्या पतीनं आपली एकेकाळची प्रेयसी अचानक भेटल्याचे सांगितल्यावर जयश्रीमधला संशय चवताळून उठतो. स्वप्नात कोणीतरी देवी येते आणि तिला सांगते, ‘‘तुझ्या नवऱ्याला सांभाळ.’’ एका सिनेमाला जयश्री जाते, त्या चित्रपटाची कथा तिला आवडते. लग्नापूर्वीचे प्रियकर-प्रेयसी एकमेकांना भेटतात आणि दोघांच्यात काहीही न घडता ते एक रात्र एकत्र काढतात. फक्त गप्पा मारतात. जयश्री ही कथा रंगवून शेजाऱ्यांना सांगते आणि म्हणते, ‘‘पण हे असे आदर्श पुरुष सिनेमातच सापडणार. प्रत्यक्षात एवढा संयम पाळू शकणारा माणूस अशक्य. आलेली संधी पुरुष सोडतो काय कधी? नाटक, सिनेमा, कथा-कादंबरीत ठीक आहे हे सगळं–’’ तेव्हा निवेदकाला सांगावंसं वाटतं की, ‘‘मूर्ख स्त्रिये, अगं, असा एक मर्यादा पुरुषोत्तम ह्या क्षणी तुझ्या या उंबऱ्यात उभा आहे.’’ ठुमरी हे नाव या कथेला दिलेय; ते का? अनुराधा सुनीलला सांगते, ‘‘संसार हा धीरगंभीर उदात्त रागदारीसारखा असतो. तास तास चालणारा. ठाम, विलंबित, द्रुत अशा अंगानं फुलणारा. केव्हा केव्हा फार संथ वाटणारा. उदास करणारा. कंटाळा आणणारा आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण, हा मोठा राग आळवून झाल्यानंतरच्या ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी. मरगळ घालवणारी.’’ रजेवर जाण्यापूर्वी लीला फडणीस प्रत्येक सहकाऱ्याला एकेकट्याला गाठून कॉन्फिडेन्शियली सांगते, ‘‘डॉक्टरांनी सोळा तारीख दिली आहे. कुणाला सांगू नका.’’ प्रत्येकाला मनातून वाटते, ‘‘ही कॉन्फिडेन्शियल बातमी फक्त आपल्यालाच ठाऊक आहे... लीला फडणीसने ही खास बातमी फक्त आपल्यालाच सांगितलीय या जाणिवेने प्रत्येकजण मोहरतो. परिणाम? सोळा तारखेला ऑफिसात कोणीच येत नाही. प्रत्येकाची रजेची चिठ्ठी... एकटे बॉस येतात. तेही मॅटर्निटी होमचा नंबर फिरवतात... यासारखा किस्साही वपु काळे मोठा खुलवून पेश करतात. हेच वपुंचे मानसशास्त्राचे ज्ञान ‘सत्कार’ कथेतही आपल्याला दिसते. आपला एकसष्टीचा गौरवांक निघावा ही एकेकाळी नाट्यचित्रपटसाहित्यक्षेत्रात काही काळ कार्य करणाऱ्या केशवरावांची इच्छा. ते स्वत: आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले. म्हणून साठीबाबत संबंधित व्यक्तींना स्मरण देण्यासाठी ते त्यांना भेटायचे पत्नी सरस्वीबाई हिला सुचवतात. पण संबंधित व्यक्ती फारसा प्रतिसाद देत नाहीत. साठीच्या दिवशी नेमका केशवरावांना भेटून डॉ. साठे हार घालतात. त्याच आनंदाच्या भरात केशवरावांना अ‍ॅटॅक येतो आणि ते पलंगावर कोसळतात. डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा केशवराव शुद्धीवर येतात. डॉ. साठे सरस्वतीबार्इंना सांगतात, ‘‘आज त्यांना कुणालाही भेटू देऊ नका. कुणी हार आणले तर तुम्ही ते घेऊन त्यांना नेऊन द्या. पण भेटायला देऊ नका.’’ सरस्वतीबाई दर तासाने एकेक हार घेऊन केशवरावांना देत हा अमक्याचा, हा तमक्याचा असे सांगत राहतात आणि केशवरावांच्या मनाला उभारी आणत राहतात. ‘‘हा लपंडाव. लोकांनी मला फसवायचं. मी लोकांना फसवायचं. कृतघ्न सहकाऱ्यांच्या उपेक्षेचा धक्का पतीला या अवस्थेत जाणवू नये’’ म्हणून सरस्वतीबाईनी चालवलेली ही कसरत म्हणजे एक मानसशास्त्रीय उपचारच ! टेलिफोन ऑपरेटरच्या जागेसाठी इंटरव्ह्यूचा कॉल आलेली पुष्पा शाळिग्राम फोनवरून आपणास उशीर होईल असे सांगते, तेव्हा तिच्या आवाजातला गोडवा व मार्दव जाणवून कथानिवेदक तिचीच नेमणूक करायचे मनोमन नक्की करतो. तंबोऱ्याच्या तारांना जवारी लावल्यावर ज्याप्रमाणे स्वर काही काळ घुमत राहतो, त्याची आस मनी राहते तसा काहीसा तिचा आवाज - तो त्याला जिंकतो. प्रत्यक्षात ती येते, तेव्हा तिचा काळा रंग व सामान्य रूप पाहून त्याला प्रश्न पडतो, ‘‘परमेश्वरानं या मुलीला काहीही न देण्याएवढं कफल्लक का असावं?’’ तरीही त्या आवाजामुळं तिला नोकरी दिली जाते. बॉसला ती नंतर एकदा आपल्यावर असलेल्या कर्जाची कल्पना देताना म्हणते, ‘‘माझ्यासारखी मुलगी ज्या आईवडिलांना असते, त्यांना ती मुलगी म्हणजे कर्जच नाही का?... कातडीचा रंग काळा. त्याचे हजार रुपये मी धरले. केस आखूड. त्याचे पाचशे रुपये. डोळेही पाणीदार नाहीत. त्याचे पाचशे. ओठ जाड. त्याचे हजार. बांधा- त्याचे दोन तीन हजार. लग्नाच्या वेळी फक्त पैसाच धावून येईल. एखादा अडलेला वरपिता देईल त्याच्या गृहलक्ष्मीची जागा मला.’’ आपल्याच ऑफिसमधल्या अच्युतबरोबर ती दोन तीन महिने फिरताना दिसल्याचे बॉसला कळते. तेव्हा त्याला आश्चर्य वाटते. खरे तर अच्युतचे लग्न ठरलेले असते; त्याची भावी पत्नी परगावी गेलेली असते, हे सर्वांना ठाऊक असते. बॉसच्या प्रश्नाला उत्तर देताना पुष्पा आपली भूमिका प्रकट करते, ‘‘मी निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी अच्युतबरोबर फिरते. मला थोडा कैफ हवा होता. धुंदी हवी होती. पुरुष बाईसाठी कसा वेडापिसा होतो हे मला लांबून पाहायचं होतं. माझ्या लग्नानंतर मला तसा कैफ अनुभवायला मिळेलच ह्याची खात्री नव्हती... एकदा पुरुषाच्या वासनेने उसळी खाल्ली की त्याला फक्त स्त्री हवी असते. मग ती कशी का असेना !... मला माझ्या या कुरूपतेनंच वरदान दिलंय असं म्हणायला हवं. माझ्यासारख्या कुरूप मुलीबरोबर अच्युतसारख्या राजबिंड्या गृहस्थाचं काही गणित असेल अशी शंकाही घेण्याचं धाडस कुणाला झालं नाही.. जसं एखादीचं सौंदर्य अपूर्व असतं तशी माझी कुरूपताही अपूर्व आहे.’’ ‘स्वर’ या कथेच्या माध्यमातून वपुंनी रूपहीन कुमारी तरुणीच्या व्यथांची एक वेगळीच कैफियत सादर केली आहे. पुष्पाला घेऊन अच्युत आपल्या भावी सासुरवाडीलाही भेट देतो; तरी कोणाला काही वाटत नाही. यासारखे तपशील म्हणजे वपुंचे मास्टर स्ट्रोकच ! ‘आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण होता’ अशा कहाणीच्या ढंगात ‘वसावसाचा वसा’ ही कथा वपु सांगतात. कथेतल्या ब्राम्हण अविरत पत्नीधर्माचा वसा घेतो, त्यामुळे त्याला वडिलांनी दिलेला शाप बाधत नाही. बायको वसावसा ओरडत नाही. ‘‘हे व्रत कायम करायचं असतं, हे व्रत शंकरानं पार्वतीला, पार्वतीनं गणेशाला, गणेशानं नारदाला आणि नारदांनी अनेकांना सांगितलं’’ असाही परंपरेचा हवाला वपु देतात. बंद पडलेली स्कुटर मेकॅनिक दोन मिनिटातच ठीक करतो आणि ती वाघिणीसारखी गुरगुरू लागते. त्या मेकॅनिकनं स्कुटरचीच कळ फिरवली नाही, आपलीही फिरवली असं निवेदकाला वाटतं, आणि घरातल्या मुलाच्या समस्येकडे नव्या दृष्टीने तो बघायला सिद्ध होतो. (किक्) एका साहित्यिकाकडे रविवारी लेखककवींची मैफल जमते. हॉटेलमधून खाद्यपदार्थ येतात. लेखककवी खूष होतात. अनेक रविवार असे जातात... हे खाद्यपदार्थ कोण पाठवते?... वपु आपल्या चाहत्या रसिकाचे कौतुक ‘पराभव’ या कथेद्वारे करण्याची संधी देतात. वपु काळे यांच्या या कथांमधून मध्यमवर्गीय जीवनातील अनेकविध सामाजिक-नैतिक-कौटुंबिक समस्यांचेही एक वेगळे रूप समोर येते. या अस्तित्वाला भक्कम मानसिक आधार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. जगण्यासाठी विशिष्ट मूल्यभानाची गरज असते. आयुष्याची इमारत भक्कम पायावर उभी करावी लागते. भावभावनांच्या पायावर ती सदैव हादरत राहते; तिला भक्कमपणा आणण्यासाठी, एका नैतिक भानाची गरज असते. त्या नैतिक भानाचे विविध पैलू प्रकट करणे हे एक कथाकार म्हणून वपु काळे आपले उत्तरदायित्व मानत राहिले. ‘स्वर’मधील कथा त्याची साक्ष देतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 14-07-2002

    संवादोत्सुक कथा… कथा या वाङ्मयप्रकाराचा कौटुंबिक कथा हा जर एक उपप्रकार मानला, तर त्या कथांच्या सदंर्भात कथाकार व. पु. काळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. खास मध्यमवर्गीय संसारकथा म्हणजे व. पु असं समीकरण मांडायला अजिबात हरकत नाही, इतक्या विपुल संख्यनं व. पुं. नी ‘आंबटगोड’ कुटुंबकथा लिहिल्या. माणसांमध्ये वाढत चाललेला विसंवाद, एकलेपणा व. पुं. च्या कथांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या तीन पुस्तकांची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ‘स्वर’ हा संग्रह १९७९ साली प्रथम प्रकाशित झाला. ही त्याची पाचवी सुधारित आवृत्ती आहे. तीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि त्यातून उतरलेली जीवाला हुरहूर लावतील, अशी व्यक्तिचित्रणं व.पुं.च्या इतर संग्रहांप्रमाणेच ‘स्वर’मध्येही वाचायला मिळतात. आपल्या सांसारिक जीवनात कधी ना कधी वाट्याला येणाऱ्या प्रसंगांपैकी जवळच्या आप्ताचा मृत्यू ही एक घटना. लहान मुलांना शक्यतो त्यापासून दूर ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न नेहमीच केला जातो. ‘मला समजलंय’ ही कथा अशा प्रसंगांमधलं गांभीर्य, वैय्यर्थता आणि दु:ख खूप तपशीलवार आणि नेमकेपणानं टिपते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more