MANI BHAUMIK

About Author

Birth Date : 30/03/1931


BHOWMIK WAS BORN IN A SLUM IN TAMLUK VILLAGE IN MIDNAPORE, WEST BENGAL. HIS CHILDHOOD WAS SPENT FACING PROBLEMS LIKE CYCLONES, FLOODS, DROUGHT AND POVERTY. HE COMPLETED HIS EDUCATION IN MATERIALS SCIENCE FROM I.I.T., KHARAGPUR, WITH THE HELP OF A SCHOLARSHIP. FROM HERE PH.D. OBTAINED IN 1959, HE WENT TO THE UNIVERSITY OF CALIFORNIA, USA TO CONDUCT RESEARCH ON A SLOAN SCHOLARSHIP.

पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथल्या तामलुक खेड्यातील एका झोपडपट्टीत भौमिक यांचा जन्म झाला. चक्रीवादळे, महापूर, दुष्काळ व गरिबी आदी समस्यांना तोंड देत त्यांचे बालपण गेले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या साहाय्याने आपले शिक्षण पूर्ण करत पदार्थविज्ञानात खरगपूर, आय.आय.टी. येथून पीएच.डी. मिळवली. १९५९मध्ये ते स्लोन शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करण्यास गेले. त्यांचे काम पाहून १९६८मध्ये नॉरथ्रॉप कॉर्पोरेट, रिसर्च लॅबोरेटरी या जगप्रसिद्ध संस्थेने त्यांना आपल्याकडे काम करण्यासाठी बोलावले. तिथे भौमिक यांनी संशोधनातून जगातील अत्यंत कार्यक्षम असे पहिले एक्सायमर लेसर किरण तयार करणारे यंत्र निर्माण केले. या लेसर किरणांच्या साहाय्याने माणसाच्या बुबुळाच्या वक्र पृष्ठभागाला पाहिजे तसा आकार देण्याची शस्त्रक्रिया त्यांनी शोधली. यामुळे डोळ्यांचा नंबर जाऊन चश्मा किंवा लेन्सेस यांशिवाय माणसाला अधिक स्वच्छ दिसू लागते. या क्रांतिकारी शस्त्रक्रियेला लॅसिक (LASIK) असे नाव पडले. यामुळे भौमिक यांचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे अनेक संशोधननिबंध प्रसिद्ध आहेत. क्वांटम पदार्थविज्ञान, विश्वरचनाशास्त्र यांमध्ये लागणारे अद्भुत शोध व त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम या विषयांत त्यांना रस आहे. त्यांनी क्वांटम नावाची एक मालिका तयार केली असून, ती सध्या लोकप्रिय होत आहे. बंगालमध्ये भौमिक यांनी भौमिक एज्युकेशनल फाउंडेशन स्थापन केले आहे. त्याद्वारे अत्यंत हुशार, पण गरीब विद्याथ्र्यांना दरवर्षी मदत केली जाते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
PARMESHWAR EK SANKETIK NAV Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more