* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661736
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LITERATURE IS NOT AN INDEPENDENT ENTITY. IT IS A SORT OF CONSORT OF SOMETHING ELSE. HUMAN LIFE IS BASED ON CERTAIN BELIEFS AND VALUES. LITERATURE IS BASED ON THESE VERY BELIEFS AND VALUES. BUT AN AUTHORS OWN EXPERIENCES AND HIS VISION OF LIFE IS NOT ENOUGH FOR THE BIRTH OF LITERATURE. HE IS NOT JUST A PRESENTER OF REALTY. IT IS NOT AS IF EVERY ASPECT OF REALITY APPEALS TO HIM. SOME THINGS TOUCH HIM DEEPLY AND AWAKEN HIS MIND. IT IS SUCH A MIND, PRIMED BY A PERSONAL INSIGHT INTO REALITY THAT CREATED LITERATURE WHEN IT IS TOUCHED BY IDEALISM. THE RAYS OF THE SUN FALLING UPON THE SURFACE OF WATER DO NOT PRODUCE A RAINBOW. IT IS ONLY WHEN THE RAYS, REFLECTED BY THE CLOUDS PASS THROUGH THE MYRIAD DROPLETS OF DEW IN THE ATMOSPHERE, THAT WE SEE THE BRILLIANT HUES OF THE RAINBOW. WHEN REALITY GETS THE MAGICAL TOUCH OF IDEALISM, ONLY THEN LITERATURE REACHES A DIFFERENT DIMENSION…! AS THE CHIEF GUEST OF VARIOUS LITERARY MEETS, RANJIT DESAI HAS DELIVERED MANY SPEECHES THAT HAVE TOUCHED UPON CLASSIC LITERATURE AND THE INSPIRATIONS BEHIND IT. THIS IS A SELECT COLLECTION OF SOME OF HIS SPEECHES!
... साहित्य ही निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्यातरी सह जाणारी वस्तू आहे. आपलं मानवी जीवन अनेक निष्ठांच्या बळावर जगलं जातं. साहित्यातून याच निष्ठा साकारत असतात. लेखकाच्या स्वानुभवातून त्याला घडणारं जीवनदर्शन एवढ्यानं साहित्यनिर्मिती होत नसते. त्याचं साहित्य सहित म्हणजे हितासाहित असावं लागतं. लेखक निव्वळ वास्तवता टिपत नसतो. वास्तवाच्या साऱ्याच गोष्टींनी त्याचं मन भारलं जात नाही; काही गोष्टी त्याच्या अनुभूतीला भिडतात; त्यातूनच त्याचं मन जागं होतं. या वास्तवाच्या अनुभूतींतून जाग्या झालेल्या मनाला कुठंतरी आदर्शाच्या स्पर्श होतो आणि त्याचं साहित्य साकारतं. नुसते सूर्यकिरण पाण्यावर पडून इंद्रधनुष्य उमटत नाही. मेघावरून परावर्तीत झालेले सूर्यकिरण जेव्हा आकाशातून स्त्रवणाया दवबिंदुंवर पडतात, तेव्हाच सप्तरंगांचं इंद्रधनुष्य प्रगटतं. वास्तवाला आदर्शाचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हाच त्या साहित्याला वेगळं रूप लाभतं...! अभिजात साहित्य आणि त्याच्या निर्मितिप्रेरणा यासंदर्भात वेगवेगळ्या निमित्तांनी, वेगवेगळ्या संमेलनांत श्री. रणजीत देसाई यांनी अध्यक्षपदावरून केलेल्या निवडक भाषणांचा एकत्रित संग्रह !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    ‘स्वामी’कारांच्या साहित्य निष्ठेचे ‘संचित’... ललित लेखन व मराठी कादंबरीला वेगळे वळण देणारे रणजित देसाई ‘स्वामी’च्या माध्यमातून घरोघरी जावून पोहोचले. रमा-माधवाचं सुंदर भावविश्व त्यांनी साकारून मराठी रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान पटकावलं. ‘स्वामी’ च्ा अगोदर प्रसिद्ध झालेली त्यांची ‘बारी’ ही कादंबरी मात्र विशेष वाचकप्रिय झाली नाही. एखादी साहित्यकृती वाचकप्रिय का व कशी होते? एखादी का होत नाही? साहित्यनिर्मिती मागील लेखकाची प्रेरणा केवळ ‘स्वानय सुखाय’ असते की आणखी घटक परिणामकारक ठरतात? हे प्रश्न साहित्य सृष्टीत नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. रणजित देसाई यांनी विविध साहित्य संमेलने, ग्रंथालय चळवळी येथील व्यासपीठांवर केलेल्या भाषणाचे हे पुस्तकरूपी ‘संचित’ साहित्यिकांच्या अशाच मूळ प्रेरणांचा तळ शोधणारे ठरले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे संपादन पांडुरंग कुंभार यांनी केले आहे. अनुक्रमणिका, प्रस्तावना अशा उपचारांना स्थान न देता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ७४ व्या वार्षिक उत्सवाचे डिसेंबर ७२ मध्ये अध्यक्षस्थान भूषविताना देसाई यांनी केलेल्या भाषणाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो. विविध ठिकाणची अशी नऊ अध्यक्षीय भाषणे या ‘संचिता’मध्ये समाविष्ट आहेत. ‘वास्तवा’ला जेव्हा ‘आदर्शा’चा स्पर्श होतो तेव्हाच साहित्याला वेगळं रूप लाभतं. भकास, उजाड, पर्णहीन वनांमध्ये कुजलेल्या पालापाचोळ्यातून सरपटत जाणारा सरडा हे आपलं रूप वाटतं आहे. हे कलावंताचं खरं रूप नव्हे. त्या पर्णहीन नावाची अवस्था जाणून, धीट मनानं त्या वनात प्रवेश करून भविष्यातल्या वसंताचं आगमन सांगणारा कोकीळ हा कलावंत मनाचा प्रतीक आहे असे रणजित देसाई सांगतात. या विविध भाषणांमध्ये देसाई यांनी अन्य देशातील समकालीन वास्तवाचा, उत्कट मानवी अनुभूतीचा वेध घेणाऱ्या कोणत्या साहित्यकृती आपल्याला भावल्या त्याचाही उल्लेख वेळोवेळी केला आहे. मराठी साहित्यात समाजमन घुसळून काढणाऱ्या कलाकृती का निर्माण होत नाही, दिवाळी अंकासाठी आगाऊ चेक आल्यानंतरच आमच्यातील अनेक लेखकांची प्रतिभा का जागी होते यांसारख्या प्रश्नांमुळे झालेली अस्वस्थताही त्यांनी अनेक ठिकाणी व्यक्त केली आहे. एका भाषणात ते म्हणतात, महाराष्ट्राच्या सीमाभागाने आमच्या मनाला तडे गेले. पण हजारो मैलांचा मुलुख गमावला याचं दु:ख आम्हाला वाटत नाही. त्याची वेदना जाणवत नाही. लेखकाच्या अनुभूतीचं विश्व एवढं लहान असून कसं चालेल? रशियामध्ये राहूनच दास्तरनाकनं डॉ. झिवागो लिहिली ना! अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘फॉर हून दि बेल रोल्स’, ‘अ‍ॅक्रॉस दि रिव्हर इंटू द ट्रीज’ किंवा इस्रायलच्या नवजीवनावर आधारलेली ‘एक्सोडस’ सारखी कादंबरी या कलाकृती का भाडोत्री, प्रचारकी समजायच्या? प्रादेशिकतेची कक्षा ओलांडून भारतीय रूप घेणारी, कलाकृती आम्ही केव्हा पाहणार आहोत? एकंदरीत पाहता नवोदितांबरोबरच प्रस्थापितांच्या प्रतिभेला उत्तेजना देणारे असेच हे ‘संचित’ असून ‘स्वामी’कारांची साहित्यनिष्ठ त्यातून वेळोवेळी प्रगट झाली आहे. चांगला लेखक व्हायचा असेल तर केवळ शब्द सामर्थ्य आणि कल्पनाविलास पुरेसा नसतो. त्यापेक्षाही आंतरिक तळमळ ही महत्त्वाची ठरते. हा ‘स्वामी’ कारांचा कानमंत्र साहित्याच्या वाटेवरील सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे! -निलेश मदाने ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more