* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357207904
  • Edition : 4
  • Publishing Year : OCTOBER 2018
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :DR. SUVARNA NAIK NIMBALKAR COMBO SET-5 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"MAHARANI YESUBAI – A SYMBOL OF SACRIFICE IN THE MARATHA DYNASTY.. MAHARANI YESUBAI WAS A BEACON OF SACRIFICE AND RESILIENCE IN THE MARATHA DYNASTY. FOLLOWING THE BRUTAL MURDER OF HER HUSBAND, SHE SET ASIDE PERSONAL INTERESTS AND PLACED RAJARAM MAHARAJ ON THE THRONE, FOREGOING HER OWN SON SHAHU’S CLAIM. A FEARLESS WARRIOR, SHE TOOK TO THE BATTLEFIELD TO PROTECT HER PEOPLE. EVEN DURING HER IMPRISONMENT UNDER AURANGZEB, SHE NEVER WAVERED IN HER DIGNITY AND SELF-RESPECT. DURING THIS TIME, SHE IMPARTED THE VALUES OF HINDUISM AND RAJDHARMA TO SHAHU MAHARAJ. YEARS LATER, AFTER SHAHU MAHARAJ’S RELEASE, SHE CONTINUED TO GUIDE HIM WITH WISDOM, OFFERING COUNSEL WITHOUT INTERFERING IN GOVERNANCE. THIS IS THE EXTRAORDINARY LIFE STORY OF MAHARANI YESUBAI—A STRATEGIST, DIPLOMAT, AND SELFLESS LEADER—WHO DEDICATED HERSELF TO PRESERVING MARATHA UNITY AND SAFEGUARDING SWARAJYA IN THE AFTERMATH OF CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ’S ASSASSINATION."
महाराणी येसूबाई...मराठेशाहीतील एक त्यागमूर्ती...पतीची निर्घृण हत्या झालेली असताना स्वत:च्या मुलाला, शाहूला राज्यावर न बसवता राजाराम महाराजांचं मंचकारोहण करणारी, त्यांना आणि अन्य महत्त्वाच्या लोकांना रायगडावरून अन्यत्र रवाना करून स्वत: रायगड लढविणारी, मुघल वरचढ होत आहेत हे पाहिल्यावर स्वत:च्या, शाहूराजांच्या आणि स्वत:बरोबरच्या अन्य लोकांच्या सुरक्षिततेची हमी मिळवून मग मुघलांना शरण जाणारी, औरंगजेबासमोर राजाराम महाराजांची निंदा करून, आतून मात्र पत्रव्यवहाराद्वारे राजाराम महाराजांच्या संपर्कात राहणारी...औरंगजेबाच्या कैदेतेही स्वाभिमान न सोडणारी...त्या कैदेतही शाहू महाराजांवर हिंदुत्वाचे आणि राजधर्माचे संस्कार करणारी...शाहूराजांच्या सुटकेनंतर काही वर्षांनी सुटका झाल्यावर शाहूंराजांच्या राज्यकारभारात ढवळाढवळ न करता योग्य सल्ला देणारी...संभाजीराजांच्या हत्येनंतर मराठ्यांमध्ये फूट पडू नये आणि स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून त्याग करणार्‍या मुत्सद्दी महाराणी येसूबाईंची धगधगती जीवनगाथा
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#महाराणीयेसूबाई#डॉ.सुवर्णानाईकनिंबाळकर#ऐतिहासिक #छावा #MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#MAHARANIYESUBAI#DR.SUVARNANAIK-NIMBALKAR#HISTORICAL #CHHAVA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more