* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
S STORY TAKES PLACE IN THE CITY OF MYSORE. SOMESHWAR, OUR HERO IS AN ARCHITECT WHO HAS LOST HIS WIFE A FEW YEARS BACK. INTENDING TO START ANEW HE SHIFTS HIS BASE FROM MUMBAI TO MYSORE; FROM A WELLSETTLED BUSINESS TO A FRESH START.AMRITA, A MARRIED WOMAN WITH TWO YOUNG CHILDREN STAYS ALONE IN HER FARM HOUSE WITH THE TWO CHILDREN AND IS A LECTURER IN THE COLLEGE. DESTINY BRINGS SOMESHWAR AND AMRITA TOGETHER. THOUGH MARRIED, AMRITA DOES NOT LIVE WITH HER HUSBAND RANGA. RANGA`S SISTER IS AMRITA`S AUNT. AMRITA HAS LOST HER MOTHER WHEN SHE WAS VERY YOUNG. HER AUNT GRADUALLY TAKES POSSESSION OF AMRITA`S HOUSEHOLD AND HER FATHER TOO. SHE CONCEIVES A CHILD FROM HIM. AMRITA AND SOMESHWAR GET TIED UP IN A BOND. BUT THERE ARE TOO MANY HURDLES IN THEIR WAY. THE WORST OF ALL IS HER NATURE. SHE IS TOO SHORT TEMPERED AND POSSESSIVE ABOUT HIM. MANY A TIMES, SOMESHWAR DECIDES TO LEAVE HER FOR BETTER, WIND UP EVERYTHING FROM MYSORE AND GO BACK TO MUMBAI. ONE DAY, HE DOES SO. BUT HE COMES BACK TO MYSORE. HOW, WHY, WHEN ?READ THIS IN KAATH.
अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. व्यक्तीला आयुष्यात नक्की काय हवे असते? स्त्रीपुरुषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते? खरे प्रेम म्हणजे काय? मनोविकारांना आरंभ कसा होतो? अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का? असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय? अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंबरीच्या यशाचे खरे गमक आहे! डॉ. अंजली जोशी मानसोपचार तज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    डॉ. एस. एल.भैरप्पा यांची कन्नड कादंबरी, अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे ... डॉ. अमृता आणि सोमशेखर या दोघांची ही गोष्ट आहे , सध्या संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या चित्रपटांवर वाद सुरू आहे की तो Toxic Masculinity ला promote करतो, Toic femininity काय असू शकते हे अमृताच्या कॅरेक्टर वरून समजून जाईल, तिच्या स्वभावाचे विविध पेलू आपणास पाहायला मिळतात त्याउलट सोमशेखर अगदी शांत संयमी , दोघांची फुलत जाणारी प्रेमकहाणी त्यात नैतिक आणि अनैतिकतेचे पेलू खूप चांगल्या प्रकारे मांडले आहेत. Anxiety, depression, suicidal ideation, sadism, mood swings हे सर्व अमृताच्या character मध्ये दिसून येते ... शेवट अगदी अनपेक्षित आहे नक्की वाचावी अशी कादंबरी... #वाचनवेडा #भैरप्पा ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी.....! ...Read more

  • Rating StarVIJAY SARAVATE

    तशी कथा अगदी साधी आहे, पण आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनोविचार आणि विकार खूप विस्तृत पणे मांडले आहेत. त्यामुळे थोडी पुनरुक्ती आढळते, बाकी उत्त्तम.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more