* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
S STORY TAKES PLACE IN THE CITY OF MYSORE. SOMESHWAR, OUR HERO IS AN ARCHITECT WHO HAS LOST HIS WIFE A FEW YEARS BACK. INTENDING TO START ANEW HE SHIFTS HIS BASE FROM MUMBAI TO MYSORE; FROM A WELLSETTLED BUSINESS TO A FRESH START.AMRITA, A MARRIED WOMAN WITH TWO YOUNG CHILDREN STAYS ALONE IN HER FARM HOUSE WITH THE TWO CHILDREN AND IS A LECTURER IN THE COLLEGE. DESTINY BRINGS SOMESHWAR AND AMRITA TOGETHER. THOUGH MARRIED, AMRITA DOES NOT LIVE WITH HER HUSBAND RANGA. RANGA`S SISTER IS AMRITA`S AUNT. AMRITA HAS LOST HER MOTHER WHEN SHE WAS VERY YOUNG. HER AUNT GRADUALLY TAKES POSSESSION OF AMRITA`S HOUSEHOLD AND HER FATHER TOO. SHE CONCEIVES A CHILD FROM HIM. AMRITA AND SOMESHWAR GET TIED UP IN A BOND. BUT THERE ARE TOO MANY HURDLES IN THEIR WAY. THE WORST OF ALL IS HER NATURE. SHE IS TOO SHORT TEMPERED AND POSSESSIVE ABOUT HIM. MANY A TIMES, SOMESHWAR DECIDES TO LEAVE HER FOR BETTER, WIND UP EVERYTHING FROM MYSORE AND GO BACK TO MUMBAI. ONE DAY, HE DOES SO. BUT HE COMES BACK TO MYSORE. HOW, WHY, WHEN ?READ THIS IN KAATH.
अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. व्यक्तीला आयुष्यात नक्की काय हवे असते? स्त्रीपुरुषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते? खरे प्रेम म्हणजे काय? मनोविकारांना आरंभ कसा होतो? अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का? असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय? अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंबरीच्या यशाचे खरे गमक आहे! डॉ. अंजली जोशी मानसोपचार तज्ज्ञ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    डॉ. एस. एल.भैरप्पा यांची कन्नड कादंबरी, अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे ... डॉ. अमृता आणि सोमशेखर या दोघांची ही गोष्ट आहे , सध्या संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या चित्रपटांवर वाद सुरू आहे की तो Toxic Masculinity ला promote करतो, Toic femininity काय असू शकते हे अमृताच्या कॅरेक्टर वरून समजून जाईल, तिच्या स्वभावाचे विविध पेलू आपणास पाहायला मिळतात त्याउलट सोमशेखर अगदी शांत संयमी , दोघांची फुलत जाणारी प्रेमकहाणी त्यात नैतिक आणि अनैतिकतेचे पेलू खूप चांगल्या प्रकारे मांडले आहेत. Anxiety, depression, suicidal ideation, sadism, mood swings हे सर्व अमृताच्या character मध्ये दिसून येते ... शेवट अगदी अनपेक्षित आहे नक्की वाचावी अशी कादंबरी... #वाचनवेडा #भैरप्पा ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी ...Read more

  • Rating StarPinesh Jadhav

    काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी ! म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत ! अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते ! त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता. आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते.. डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते. या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो ! कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते. या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो. अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी.....! ...Read more

  • Rating StarVIJAY SARAVATE

    तशी कथा अगदी साधी आहे, पण आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनोविचार आणि विकार खूप विस्तृत पणे मांडले आहेत. त्यामुळे थोडी पुनरुक्ती आढळते, बाकी उत्त्तम.

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more