* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201438
  • Edition : 5
  • Publishing Year : APRIL 2007
  • Weight : 265.00 gms
  • Pages : 240
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘GANDHARVAGATHA’ IS THE TALE OF BAL GANDHARVA WHO WAS GIFTED WITH THE LOYALTY, LOVE, DEVOTION TOWARDS ART, A SOULFUL VOICE AND GENUINE BEAUTY! HE BLESSED MAHARASHTRA WITH EXCEPTIONAL MUSIC PLAYS LIKE SWAYAMVAR, MAAN-APAMAN, SHAKUNTAL, SANGEET SAUBHADRA, SAUNSHAY KALLOL, KANHOPATRA, AND EKACH PYALA. BALGANDHARVA WAS ALWAYS A DOWN TO EARTH PERSON. WHEN THE COMPANY WAS IN DEBT, LADSAHEB OF MUMBAI, LAKHMICHAND OF KARACHI AND PHILANTHROPISTS LIKE V. SHANTARAM SAVED THE COMPANY. ALTHOUGH WHEN THE COMPANY’S MANAGEMENT FELL INTO THE HANDS OF GOHARBAI, THE ARTISTIC AND WORLDLY LIFE OF THE BALGANDHARVA STARTED STARTED TO DECLINE. LATER, BALGANDHARVA’S DOWNFALL FROM THE PEAK OF POPULARITY TO HIS DAYS OF POVERTY AND DESTITUTION WERE STOPPED BY DEATH ITSELF. THIS NOVEL IS THE JOURNEY OF BALGANDHARVA’S OPULENT LIFE FROM PLAYING THE MOST BRILLIANT ROLES IN MARATHI THEATRE TO FACING DESTITUTION AND THE FINAL CALL OF DEATH.
‘गंधर्वांची गाथा’... कलेवरील निष्ठा, प्रेम, भक्ती, गोड गळा आणि अस्सल सौंदर्याचं लेणं लाभलेले बालगंधर्व म्हणजे अप्सराच! स्वयंवर, मानापमान, शाकुंतल, संगीत सौभद्र, संशयकल्लोळ, कान्होपात्रा, एकच प्याला यांसारख्या संगीत नाटकांचं वैभव त्यांनी महाराष्ट्राला दिलं. कायम जमिनीवर पाय ठेवूनच बालगंधर्व वावरले. कंपनीला कर्ज झालं... मुंबईच्या लाडसाहेबांनी, कराचीच्या लखमीचंदांनी व व्ही.शांतारामसारख्या दयावंतांनी कंपनीस तारले...पण गोहरबाईंच्या हाती कंपनीचा कारभार गेला...आणि बालगंधर्वांच्या कलाजीवनाला आणि लौकिक जीवनालाही ओहोटी लागली...लोकप्रियतेच्या शिखरावरून पायउतार झालेल्या आणि विपन्नावस्थेतील बालगंधर्वांची वणवण मृत्यूनेच थांबवली...मराठी रंगभूमीवर एक देदीप्यमान पर्व साकारणार्या बालगंधर्वांच्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाची विपन्नावस्थेकडे झालेली वाटचाल!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठी साहित्य # कादंबरी # गंधर्वगाथा # भा. द. खेर #बालगंधर्व #मराठी पुस्तक # मेहता पब्लिशिंग हाऊस #MARATHI LITERATURE #NOVEL #GANDHARVAGATHA #B.D.KHER #BALGANDHARVA #MARATHI BOOK # MEHTA PUBLISHING HOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more