GODSE SAYALI

About Author

Birth Date : 15/10/1979


SAYALI GODSE HAS DONE MASTERS IN COMMUNICATION FROM PUNE UNIVERSITY. IN THIS COURSE, SHE STOOD FIRST IN THE UNIVERSITY (FIRST CLASS FIRST). EARLY IN HER PROFESSIONAL CAREER, SAYALI WORKED AS A JOURNALIST FOR KESARI NEWSPAPER FOR FIVE YEARS. AFTER THAT SHE WORKED AS A NEWS CORRESPONDENT ON PUNE ALL INDIA RADIO. FOR OVER THREE YEARS, SHE WAS THE DEPUTY EDITOR OF THE REPUTED WEEKLY IN MAHARASHTRA KNOWN AS SAPTAHIK SAKAL. SHE HAS BEEN WORKING INDEPENDENTLY FOR THE LAST 10 YEARS AS A TRANSLATOR. SAYALI HAS TRANSLATED ENGLISH BOOKS OF MANY RENOWNED AUTHORS FROM INDIA AND ABROAD INTO MARATHI.

सायली गोडसे यांनी पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम केलं आहे. या अभ्यासक्रमात त्या विद्यापीठात सर्वप्रथम (FIRST CLASS FIRST) आलेल्या आहेत. सायली यांनी पत्रकार म्हणून केसरी वृत्तपत्रातून पाच वर्षे काम केले. त्यानंतर पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर काही वर्षे त्या साप्ताहिक सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम करत होत्या. गेली ८ वर्षे त्या अनुवादिका म्हणून स्वतंत्रपणे काम करत आहेत. केवळ पुण्यातील नव्हे तर भारतातील काही नामांकित प्रकाशन संस्थाशी त्या जोडलेल्या आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक नामांकित लेखकांच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद सायली यांनी केले आहेत. सायली यांनी आजवर ५६ पुस्तके अनुवादित केली असून आणखी काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्याखेरीज कॉर्पोरेट कंपन्यांची मासिके, नियतकालिके आणि जाहिराती यांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे. लेखनाच्या जोडीला पर्यटन हा देखील सायली यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी आजवर एकूण ३४ देशांमध्ये पर्यटना निमित्त भेट दिली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रवास त्यांनी कोणत्याही पर्यटन संस्थेच्या मदतीशिवाय स्वतः नियोजन करून केला आहे. आपल्या या अनुभवांवर आधारित पर्यटन विषयक ब्लॉग त्या लवकरच सुरु करत असून कमीत कमी खर्चात उत्तम पर्यटन कसे करता येईल याचे मार्गदर्शन या ब्लॉगद्वारे त्या करणार आहेत. विविध देशातील सुलभ सुरक्षित आणि सुरेख पर्यटन कसे साध्य करता येईल या विषयावर स्वतंत्रपणे पुस्तकेही लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KORPORATE KABEER Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more