GODSE SAYALI

About Author

Birth Date : 15/10/1979


SAYALI GODSE HAS DONE MASTERS IN COMMUNICATION FROM PUNE UNIVERSITY. IN THIS COURSE, SHE STOOD FIRST IN THE UNIVERSITY (FIRST CLASS FIRST). EARLY IN HER PROFESSIONAL CAREER, SAYALI WORKED AS A JOURNALIST FOR KESARI NEWSPAPER FOR FIVE YEARS. AFTER THAT SHE WORKED AS A NEWS CORRESPONDENT ON PUNE ALL INDIA RADIO. FOR OVER THREE YEARS, SHE WAS THE DEPUTY EDITOR OF THE REPUTED WEEKLY IN MAHARASHTRA KNOWN AS SAPTAHIK SAKAL. SHE HAS BEEN WORKING INDEPENDENTLY FOR THE LAST 10 YEARS AS A TRANSLATOR. SAYALI HAS TRANSLATED ENGLISH BOOKS OF MANY RENOWNED AUTHORS FROM INDIA AND ABROAD INTO MARATHI.

सायली गोडसे यांनी पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम केलं आहे. या अभ्यासक्रमात त्या विद्यापीठात सर्वप्रथम (FIRST CLASS FIRST) आलेल्या आहेत. सायली यांनी पत्रकार म्हणून केसरी वृत्तपत्रातून पाच वर्षे काम केले. त्यानंतर पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर काही वर्षे त्या साप्ताहिक सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम करत होत्या. गेली ८ वर्षे त्या अनुवादिका म्हणून स्वतंत्रपणे काम करत आहेत. केवळ पुण्यातील नव्हे तर भारतातील काही नामांकित प्रकाशन संस्थाशी त्या जोडलेल्या आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक नामांकित लेखकांच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद सायली यांनी केले आहेत. सायली यांनी आजवर ५६ पुस्तके अनुवादित केली असून आणखी काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्याखेरीज कॉर्पोरेट कंपन्यांची मासिके, नियतकालिके आणि जाहिराती यांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे. लेखनाच्या जोडीला पर्यटन हा देखील सायली यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांनी आजवर एकूण ३४ देशांमध्ये पर्यटना निमित्त भेट दिली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रवास त्यांनी कोणत्याही पर्यटन संस्थेच्या मदतीशिवाय स्वतः नियोजन करून केला आहे. आपल्या या अनुभवांवर आधारित पर्यटन विषयक ब्लॉग त्या लवकरच सुरु करत असून कमीत कमी खर्चात उत्तम पर्यटन कसे करता येईल याचे मार्गदर्शन या ब्लॉगद्वारे त्या करणार आहेत. विविध देशातील सुलभ सुरक्षित आणि सुरेख पर्यटन कसे साध्य करता येईल या विषयावर स्वतंत्रपणे पुस्तकेही लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
KORPORATE KABEER Rating Star
Add To Cart INR 300

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more