* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660647
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1986
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL PRESENTS THE VILLAGE LIFE AS IN THE FIRST HALF OF THE TWENTIETH CENTURY. THE FAMILIAR FACETS OF VILLAGE LIFE LIKE THE FAMILY FEUDS, ASSASSINATIONS ETC. ARE CERTAINLY TRIBES OF MEN WHO CHERISHED VALUES MORE THAN THEIR OWN LIVES AND DEVOTEDLY WORKED FOR THE GOOD OF THEIR VILLAGES AS A WHOLE. THE SETTING AND THE CHARACTERS ARE RATHER CONVENTIONAL BUT THE AUTHOR IS SUCCESSFUL IN CREATING POWERFUL AND CONVINCING CHARACTERS RENDERING SITUATION UNREAL AND LIFE AND MAKING THE READER FEEL THE VINTAGE AROMA OF THE VILLAGE LIFE OF YESTER YEARS.
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarVijay Patil

    `माझा गाव` लेखक- मा.रणजित देसाई मेहता पब्लिशिंग हाऊस ` स्वातंत्र्यपूर्व काळातील तांबड्या मातीचा सुगंध देणारी, एखादा कृष्ण-धवल मराठी चित्रपट पाहतो आहोत याची अनुभूती देणारी, आपण त्या गावाचा एक भाग आहोत असं वाटणारी एक संवेदनशील कलाकृती`. आप्पासाहेब इनामदार म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील त्या गावचे प्रमुख. आपल्या गावातील मंडळींना प्रसंग पडला तर आपल्या छातीचा कोट आणि गरज पडल्यास नरडीचा घोट घ्यायला कमी पडणार नाही असं एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे वरून जरी नारळासारखे कठीण वाटत असेल तरी त्यांचा स्वभाव अतिशय मृदू गोड पाण्यासारखा आहे हे त्यांच्या आपल्या सुनेवर लेकीची माया पांघरणारा व आपल्या सुनेच्या गरोदर आणि बाळंतपणाच्या प्रसंगी सासू-सासरे अशी दुहेरी भूमिका निभावन्यातून दिसून येते.गावात पडलेल्या ओला दुष्काळ वेळी गावातील लोक गाव सोडून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना आपल्या धान्याची कोठारे मोकळी करून देणार, आणि तेही संपल्यावर स्वतःचे घरातील दागिने मोडून त्याचा पैसा उभा करून गावकऱ्यांसाठी धान्य विकत घेणारा आणि गरज पडल्यास आपली जमीन विकायला मागेपुढे न पाहणारा गाव प्रमुख आपल्याला येथेच भेटतो. तात्या म्हणजे गावातील पुजारी आणि वैद्यकशास्त्राला धंदा न मानता, सेवा मानणारे उत्तम वैद्य . रामशास्त्री प्रभुणे यांचं दुसरं रूप म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आप्पा साहेबांचा मोठा आधार आणि प्रत्येक अप्पासाहेबांच्या संकटात बरोबरीने तोंड देणारी व त्यातून मार्ग काढणारी व्यक्ती म्हणजे तात्या. आप्पा साहेबांना योग्य सल्ला व वेळप्रसंगी आप्पासाहेबांना सुनवायला सुद्धा मागेपुढे न बघणारा गावातील एकमेव माणूस म्हणजे तात्या.गावात पटकीच्या साथी वेळी तात्यांनी अहोरात्र केलेले प्रयत्न व आप्पासाहेब यांनी गावाच्या प्रमुख या नात्याने त्यांना दिलेलं बळ.रावबाच्या हौशाच्या वेडापायी आणि नंतर तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावात झालेली दुफळी व बिघडलेल्या वातावरण आणि या बाक्या प्रसंगावर त्यांनी केलेली मात.मनात आदर्श सल्लागार व आदर्श गावप्रमुख कसा असावा याच उदाहरण घालून देतात उमा म्हणजे आप्पासाहेब यांची थोरली सून, वाड्यातील जबाबदार स्त्री, आपल्या सासूच्या निधनानंतर आपल्या दिरावर आईची माया लावणारी आदर्श सून.आपल्या नवऱ्याचा चुकत आहे हे माहीत असूनही तोंड न उघडणारी, आपले वडील आणि सासरे यांच्यात वाद झाल्यानंतर तब्बल 11 वर्षे आपल्या माहेरचं नाव न काढणारी व माहेरचे तोंड न बघणारी, दरोड्याच्या वेळी आपल्या कुटुंबांना सोडून न जाण्याची हिंमत दाखवणारी, आदर्श कारभारी आणि सून उमा वहिनी. रावबा म्हणजे आप्पा साहेबांच्या शेती आणि शिकारीची आवड असलेले पण आप्पांच्या धाकात असलेले तरुण रक्ताची रग असणारे, थोरले वारसदार. जयवंत म्हणजे आपल्या आईच्या निधनानंतर, उमा वहिनी च्या सावलीत वाढणारा आणि वहिनीलाच आई मानणारे संवेदनशील असे अप्पासाहेबांच्या धाकले वारसदार. कथानकाच्या शेवटी आप्पासाहेब दरोडेखोरांच्या गोळीबाराला बळी पडतात आणि काकी पण तापाने मरण पावतात व त्या धक्क्याने तात्या ही हे जग सोडून जगतात आणि जयवंत पुढच्या शिक्षणासाठी बेळगावला निघून जाण्यास तयार होतो. त्यावेळेस आपल्याला स्वतःला ही जयवंत सारखी वाटते की, खरोखरच आता या गावात आपलं काही राहिले नाही. पण उमा वहिनी साठी व छोटया यशवंत साठी हा गाव सोडून आपण जाऊ नये असं एक मन सांगत असते. शेवटची 2-3 पाने वाचताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबायचं नाव घेत नाहीत आणि गावच्या तांबड्या वाटेवरून मागे बघवत ही नाही,माझ्या गावातून पाय ही निघत नाही. ✅️विजय पाटील ✅️ ...Read more

  • Rating StarPriya Deshmukh

    #माझागावं ◆◆◆◆◆◆◆ कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीचं. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली. मीही कल्पना केली माझ्या गावाची.. !!! होय मझा गावं. बेळगावातील डोंगराच्या कुशीत वसलेलं. माणुसकीच्या झऱ्याचा किनारा लाभलेलं माझं गावं. रणजीत देसाईंचं `माझा गावं`. कल्पना केली अन् थेट गावात उडी मारली. गावगाडा, गणगोत, नदी, डोंगर, मंदिर, यात्रा, मेळे ह्या सगळ्या मनातल्या आठवणी एका क्षणात नजरेसमोरुन गेल्या.... जयवंत हा या कादंबरीचा सूत्रधार असून त्याचे वडील आप्पासाहेब इनामदार हे मुख्य पात्र आहे. गावची आठवण यावी आणि माझा गावं न वाचाव असं होऊच शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं हा हेतू कादंबरी लिहीण्यामागे होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसं जुळवून घेत होता, कसं वाहून घेत होता, कसा जगत होता याचं वर्णन माझा गावमध्ये देसाईंनी उत्तम पद्धतीने रेखाटलं आहे. अठरापगड जाती, त्यांचे उद्योग, गावच्या वेशीवर होणाऱ्या बैठका, शिकारीवर जाण्याचे प्रसंग अत्यंत रंजक स्वरूपात मांडले आहे. गावचा कारभारी म्हणून आप्पासाहेबांकडे बघितले जाते. आपल्या पंखाखाली असलेल्या या गावचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची सतत जाणिव असणारे आप्पासाहेब. प्रशस्त वाडा, त्याची रचना, वाड्यातील नोकर-चाकर यावरून त्या काळातील त्यांचा रुबाब आणि तो वाडा डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहतो. सत्तालोलूप नसलेले आप्पासाहेब गावचे प्रमुख असून गावाबद्दल त्यांनी नेहमीच योग्य ते कर्तव्य पार पडले आहे. गावातील बोलीचे एकूण एक प्रकार लिहीताना लेखकांनी त्यातील बाज अत्यंत जाणिवपुर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे. गावकऱ्यांची आप्पासाहेबांप्रती नम्रतेची आणि आदराची बोली, आप्पासाहेबांची गर्वविरहीत पण रुबाबदार बोली, तर घरंदाज सुनेची डोक्यावर पदर घेऊन आदराने केलेली सुसंस्कारी बोली, रायबाची अहंकारी आणि स्वार्थी बोली, जयवंताची खट्याळ बोली तर तात्यांची गावकऱ्यांच्याप्रती सेवाभावी आणि मित्राला सल्ला देतानाची सल्लागार म्हणून केलेली बोली जशीच्या तशी वर्णन केली आहे. गावात महामारी दुष्काळ पडला असताना गावकऱ्यांना धान्याचे कोठार रिकामे करणारे दानी आप्पासाहेब दिसून येतात तर वेळप्रसंगी कर्ज काढून गावकऱ्यांना जगवितांना एक गावाचा पालक म्हणून खंबीरपणे उभे राहतात. त्यांचा मुलगा रायबा मात्र त्याच्या अगदीच विरुद्ध वृत्तीचा. कर्तव्य, परंपरा या सगळ्या गोष्टीपासून दूर असलेला, बाहेरख्याली होता. घरात सोन्यासारखी बायको म्हणजेच उमा असताना रायबाचे घरात कमी आणि बाहेरच लक्ष जास्त असायचे. याचा विचार सतत आप्पा साहेबांना खात असायचा. पण तिच्यावर पोरीसारखी माया, प्रेम आणि जीव लावताना सुनेपेक्षा बाप-लेकीचं नातं डोळ्यासमोर उभं राहतं. गावचे ब्राम्हण म्हणजे तात्या कुलकर्णी. आप्पासाहेबांचे खास मित्र आणि एक उत्तम वैद्य देखील. ते ब्राम्हण असून देखील त्यांनी वैद्यकीय सेवा कधीच कमी पडू दिली नाही किंवा त्याच्यामध्ये जात-पात, उच्चनीचता आडवी आणली नाही. प्रत्येक रोगावर त्यांच्याकडे उपचार असतात आणि त्यांची जडीबुटी लवकर रोगावर परिणाम देखील करायची. प्रसंगी तात्या भरल्या ताटावरून उठून देखील गावातील गरिबांच्या उपचारासाठी जायचे. त्यावेळी त्यांच्या पत्नी मधील अस्सल ब्राम्हणी पण प्रेमळ, मायाळू आणि काळजीवाहू स्वभाव दिसून यायचा. व्यभिचारी रायबाच्या वागणुकीचा फटका, त्यांच्या व्यभिचारी कर्माची फळ आप्पासाहेबांना भोगावी लागलेली दिसून येतात. केवळ मुलाच्या चुकीमुळे आप्पासाहेबांवर चवताळून आलेले गावकरी दिसतात आणि गावावर आलेल्या संकटाच्या वेळी आप्पासाहेबांनाच हात जोडून मदत मागणारे गावकरी देखील दिसतात. वाड्यावर आलेल्या या प्रसंगांमध्ये तात्या कुलकर्णींची नेहमीच एक वेगळी भूमिका मनात प्रश्न निर्माण करून जाते. नेहमी सत्य बोलणारे तात्या वाड्याच्या कुलदीपकाची आपल्या हुशारीने सुटका करुन वडिलांची आणि आपल्या मित्राची अब्रू वाचवतात आणि पुन्हा आप्पासाहेबांचे गावातील स्थान आदरसहीत निर्माण होते. जुन्या परंपरांचे उदात्तीकरण न करता त्यांच्या चांगुलपणाचे गुणगान करण्याची मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. त्यातूनच माझा गावाची निर्मिती झाली. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पहिला. तेथेच देसाईंच्या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज बघायला मिळतो. गावात यात्रा मेळे भरतात तेव्हा सहकुटुंब यात्रेत जाताना आणि त्या यात्रेतील देवाच्या समोर मुख्य बकऱ्याची बळी देतानाचा प्रसंग जिवंत उभा केला आहे. उमाला मुलं नसल्यामुळे आप्पासाहेब बकऱ्याची बळी देऊन नवस देखील बोलले होते. त्यातून त्या काळातील दैवी शक्तीचे वर्णन केले आहे. दोन वर्षांचा जयवंत उमाला आपल्या दिरापेक्षा मुलगा जास्त वाटत होता. दीर-भावजयीच्या संवादाला मर्यादा असून मायलेकाचा नातं मात्र खूप मार्मिक रित्या रेखाटलं आहे. प्रत्येक वेळी उमा जयवंताची आई होताना दिसून येते. जयवंताचे देखील तिच्याशिवाय पान हालत नाही. फरक फक्त एवढाच की तो उमाला आई ऐवजी वहिनी म्हणायचा. पण दोघांचाही एकमेकांत फार जीव गुंतला आहे असे लक्षात येते. आप्पासाहेब- उमा, जयवंत-उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातील हळवी तार छेडून जातो. गावचा प्रमुख गावासाठी आनंदातच नाही तर संकट काळात देखील ढाल म्हणून उभा राहतो. गावच्या वेशीवर असलेल्या लक्ष्मी मंदिराची हुबेहूब रचना डोळ्यासमोर क्षणात उभी राहते. रायबा कडून घडलेला प्रसंग मनात भीती निर्माण करून जातो. गावात महामारी आली असताना गावचा कुठलाही नागरिक मृतदेह नेऊन टाकण्यासाठी पुढे सरसावत नव्हता, तेव्हा तरुणांना प्रोत्साहन देऊन आप्पासाहेबांनी स्वतः गावातील मृत पडलेल्या लोकांचे देह उचलले होते. इथे आप्पासाहेबांची माणुसकी दिसून येते. एकदा गावात दरोडा पडला असताना त्यातच आप्पासाहेबांचा मृत्यू होतो. त्यावेळी संपूर्ण गाव धाय मोकलून रडत असतो. उमाचा आधार खचलेला असतो, तात्यांचा मित्र न सांगता, न भेटताच निघून गेला असतो, जयवंत आणि रायबाचा बाप कायमचा निजलेला असतो. गावकऱ्यांचा पालक काळाच्या पडद्याआड गेला असतो. वाड्याची आणि गावची शान निस्तेज झाली असते. इकडे तात्यांची पत्नीदेखील आजाराने ग्रासली असताना त्यांची दोन्हीकडील होत असलेली ओढाताण आणि आलेला ताण त्यांचं दुःख खोलवर रुजत जातो. आप्पासाहेब गेल्यानंतर लगेचच दहाच दिवसात तात्यांची पत्नी देखील स्वर्गवासी होते. तात्यांची आणि त्यांच्या पत्नीची एक वेगळीच प्रेमळ नाळ आणि आत्मिक बांधिलकी या कथेत दिसून येते. तात्यांच्या पत्नी सोबतच तात्यांचा देखील मृत्यू होतो. एकाच दिवशी गावच्या ब्राम्हण दांपत्याचे एकाच घरातून दोन मृतदेह वाजत-गाजत, भगवंताच्या जयजयकाराने, साधुसंतांची पालखी निघावी त्याप्रमाणे अंतिम प्रवासासाठी निघतात. टाळ्याच्या गजरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जातो तेव्हा देखील संपूर्ण गाव दुःखात न्हाऊन निघतं. जयवंतला तात्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा खूप लळा होता. उठसूट वहिनीच्या तक्रारी तर आई म्हणून वाहिनीने केलेल्या कामाचे कौतुक आणि गुणगान करण्यासाठी जयवंत तात्याचे घर गाठायचा. तो प्राथमिक शिक्षण देखील याच ठिकाणी घ्यायचाह यातून आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पाहत असतं. कथेचा सूत्रधार जयवंत आता गाव सोडून निघालेला आहे नदीच्या काठाला वळसा घालून तो पुढे निघालेला आहे. गावात स्मशान शांतता पसरली आहे. गावचा प्रमुख गेला आणि गाव ओसाडं पडल्यासारखं वाटू लागलं. रायबा आता गावच्या प्रमुखपदी आला होता. जयवंताचं पुढील शिक्षण आता उमाच्या माहेरी म्हणजे कोल्हापूरला होणार होतं. जयवंताला खूप शिकायचं होतं पण इथे कथेचा सूत्रधार निराश आणि हताश दिसून येतो. या गावातील त्याची प्रेमाची माणसं एक-एक करून गळून गेली. आज तो उच्चशिक्षणासाठी हे गाव सोडून जातं आहे. पांधीच्या तोंडाशी उभे राहून त्याला या गावचा जीवनपट आठवतो. चांगले-वाईट प्रसंग आठवतात. माझा गाव म्हणून आप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगत आहे. हे गाव सोडून जाताना प्रशस्त वाडा आणि उमाचा नवरा जरी तिच्यासोबत असला तरी ती वाड्यात किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला असते. मायलेकाच्या निरोपाचा हा प्रसंग खूप हळवा आहे; इतका की वाचताना आपल्या डोळ्यातून कधी अश्रू पुस्तकावर गळून पडतात कळत देखील नाही. आप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे वहिनी किती एकटी पडणार याची जाणीव जयवंतला आहे. याच कारणाने त्याचे पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत आहे आणि वाडयाकडे बघून त्याचे हात आपसूकच जोडले गेले आहे. "तुला माहित आहे तु हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा होतो... ...Read more

  • Rating StarAmod Mehta

    रणजीत देसाई यांचे माझा गाव ही कादंबरी तशी वाचकांना अपरिचित आहे. या कादंबरीत काय आहे ते पुस्तकाच्या मलपृष्ठावर सांगितलेच आहे. नेहमीप्रमाणे या या पुस्तकाची भाषा शैली अत्यंत ओघवती आणि हृदयंगम आहे. पुस्तक अतिशय वाचनीय व खिळवून ठेवणारे आहे.

  • Rating StarBageshree Deshmukh

    #रणजितदेसाई #माझागाव उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे पुस्तकांच्या राशीत लोळायचं, उठायचं बसायचं, अखंड वाचायचं. पुस्तकं म्हटले की रणजित देसाई हे नाव मला वगळता येत नाही. या वेळी "माझा गाव" नावाचं पुस्तक हातात घेतलं. सध्याच्या वातावरणात जिथे कोरोनाने धुमाकू घातलाय त्यापासून तुटून एका वेगळ्याच गावी जाऊन बसले. बेळगावच्या परिसरातले डोंगर- टेकाडातले गाव. गावात नदी आहे, देऊळ आहे, विविध जातीचे थर आहेत कुलकर्णी- पाटलांची सत्ता आहे. पण त्या सत्तेत स्वार्थापेक्षा एकमेकांना जगवण्यासाठी लागणारा माणुसकीचा खळाळता झरा आहे. म्हणूनच गावावर अनेक संकटं येऊन गेली तरी माणसा- माणसांतला ओलावा आटलेला नाहीय... कथेचा सुत्रधार त्याचं हे गाव सोडून निघाला आहे, त्याच्या मनात आठवणींनी गर्दी केलीय. नदीकाठाला वळसा देऊन तो पुढे जाताना, टेकडीवरचं लक्ष्मीचं देऊळ त्याच्या नजरेत भरतंय. समोरच्या पांधीतून पुढे जाऊन पुर्वेची टेकडी ओलांडली की तालुक्याला जाणा-या बसने तो बेळगावी जाणार आहे... त्याचं मन भरून आलं आहे. या उंचावरच्या पांधीतून पलीकडे गेला की गाव दृष्टीआड होईल याची त्याला जाणीव आहे. न राहवून मागे वळून पाहताना एकाच ठिकाणी खिळल्यागत तो उभा राहिला आहे. दूर माडांच्या चौकोनाकडे त्याची नजर लागलीय. त्या चौकोनी जागेतच त्याचा दिमाखदार वाडा उभा आहे. इनामदारांचा वाडा. आणि हे स्वतःचं गाव सोडून, भविष्याकडे वाटचाल करताना त्याचं मन त्या वाड्यात, नव्हे. वाड्यातल्या एका व्यक्तीत अडकले आहे.... ती व्यक्ती त्याच्याशिवाय किती एकटीये, याची जाणीव त्याच्या भारलेल्या मनाला अधिकच अस्वस्थ करते आहे..... या पार्श्वभुमीवर सुरू झालेली गोष्ट आपल्याला त्या काळातल्या इनामदारकी. सत्तालोलूप नसलेली पण आपल्या पाखराखाली असलेल्या गावाचं आपण काय आणि कसं देणं लागतो याची जाणीव मनात सतत जागृत असलेले अप्पासाहेब या कथेचे नायक असल्यासारखे शोभतात. अप्पासाहेबांचा मुलगा त्यांच्या अगदीच विरोधी वृत्तीचा. बाहेरख्याली सुद्धा. तोच आपला अधिकृत वारस असल्याने अप्पासाहेबांची पदोपदी होणारी कोंडी. सोन्यासारखी सून, उमा. तिचे तुटलेले माहेर. लग्न होऊन दहा वर्षे उलटून गेली तिला मूल नसल्याने तिची होणारी तगमग आणि अप्पासाहेबांचा दुसरा मुलगा म्हणजेच कथेचा सुत्रधार, जयवंत तो अवघा आठ वर्षांचा. म्हणजे उमा घरात आली तेव्हा दोन वर्षांचा जयवंतच जणू तिचे मूल. त्याने फक्त उमेच्या पोटी जन्म घेतलेला नाही. पण उमेने आईची जागा भरून वर काकणभर जास्तच त्याच्यावर माया केलेली आहे. शेजारी राहणारे तात्यासाहेब गावातले मानलेले ब्राह्मणाचे घर आहे. तात्या- अप्पा बालपणीचे मित्र आहेत. तात्या आणि काकूने गावाला आपलंस केलंय ते फक्त त्यांच्या प्रेमाने नव्हे तर ते गावचे अनाधिकृत वैद्य आहेत. कुठल्याही व्याधीवर तात्या उपचार करू शकतात. ते वैद्य म्हणून धावत जातात तेव्हा त्यांना कुठलाही धर्म, जात त्याज्य नाही. एक आदर्श गाव कदाचित रणजित देसाईंच्या मनात रेंगाळत असावा. त्यातून त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं असावं. जिथे वर्षानुवर्ष जमीनदारकीने पिचलेला समाज भारताच्या इतिहासाने पाहिला आहे, तिथे देसाईंच्या या पुस्तकात माणुसकीने व्यापलेला गाव, समाज पाहिला की जाणवतं असं काही खरोखरच असलं असतं तर आपला समाज फार पूर्वीच माणुसकीने ओतप्रोत, समृद्ध असा झाला असता. जगावर, भारतावर कुठलीही आपदा कोसळल्यावर लोकांनी सर्व थरांतून मदत करावी. एकमेकांना जगवावे हे आवाहन करण्याची वेळ आली नसती. कृती आपोआप घडत गेली असती. तो समाज- स्वभाव ठरला असता. अतिसुखाने नांदणा-या गावात जत्रा भरतात, सोहळे होतात. अप्पासाहेब सूनेवर प्रेम-माया- विश्वास आपल्या पोटच्या पोरापेक्षा अधिक करतात. आपल्या पोरांत असलेल्या दुर्गुणांमूळे या घरात आणलेल्या या मुलीला "पुरेसे" सुख मिळालेले नाहीये, याची जाणीव अप्पासाहेब ठेवून आहेत. आपल्या अवती- भोवती कुठे अशी व्यक्ती सापडते का, आपण शोधत राहतो. गावावर अनेकवेळा अनेक संकटे येतात. अप्पासाहेब धिरोदात्त. परोपकारी. एकदा गावावर महामारी ओढवते. माणसे पटापटा गळून जातात. प्रेतांची विल्हेवाट लावायला तरूण धजावत नाहीत. अप्पसाहेब स्वतः तिरडी धरायला पुढे होतात तसा गाव जागा होतो. पुढे दुष्काळ येतो. अप्पासाहेब धनधान्याचे कोठार खुले करून देतात. गाव इनामदारांचे कोठार बघता बघता रिकामे करतात. अप्पासाहेबांच्या मुलावरच त्याच्या आततायी स्वभावामुळे बाहेरख्यालीपणामुळे नको ते बालंट येतं. तेव्हा मात्र हवालदिल अप्पासाहेब, ज्याला मायेने गोंजारलं तेच गाव यावेळी अप्पासाहेबांच्या विरोधात उभं ठाकल्यावर हललेले अप्पासाहेब देसाई लेखणीतून उभे करतात. गावात पडलेली दुफळी पुन्हा कसबाने जोडून घेतात. गाव पुन्हा अप्पासाहेबांना मानू लागतं. आपल्याला अप्पासाहेबांची काहीही घडलं तरी माझ्यावर कलंक नको ची भुमिका क्षणभर व्यथित करते. त्या पेक्षा जास्त तात्यासाहेबांतले राजकारण पाहून आपण दिग्मुढ होतो. या ठिकाणी देसाईंनी हे राजकारण ब्राह्मण तात्यांनाच का खेळायला लावले, आपण विचारात पडतो. तात्यांची झाकली मुठ, उघडी झाल्यावर, एकाएकी व्यक्तीरेखातला हा बदल पचायला जड जातो. गावावरच्या एका दरोड्यात अप्पासाहेब स्वतः लढून मृत्यूमुखी पडतात तेव्हा मात्र आपण लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टर वाचतो आहोत असा भास होतो. आपल्याला उमा मात्र कथेत धरून ठेवते. एका पातळीवर या अनेक गोष्टी घडत असताना, अप्पासाहेब -उमा, जयवंत- उमा यांच्यातील संवाद आपल्या मनातली हळवी तार छेडून जातातच. वहिनी दीरातले हे संवाद. मर्यादाशील असले तरी, त्यांच्यातलं आई मुलाचं नातं सतत आपल्याकडे डोकावून पहात असतं. देसाईंचे हेच कसब हाती घेतेलेले पुस्तक सोडू देत नाही. जयवंताची एक- एक करून प्रेमाची माणसं गळून गेली आहेत आणि तो वरच्या शिक्षणाकरता हे गाव सोडून जातो आहे. पांधीच्या तोंडाशी त्याला त्याचा जीवनपट उलगडत जातोय. "माझा गाव" म्हणून अप्पासाहेबांची ही कथा तो आपल्याला सांगतो आहे. हे गाव सोडून जाताना, वाड्यात नवरा असला, तिचा तो सहचर असला तरीही, अप्पासाहेब आणि तो नसल्यावर तिथे त्याची उमावहिनी किती एकटी आहे, याची जाणीव होऊन पाय जागीच खिळले आहेत. डोळ्यांतून पाणी अखंड खळतंय.... वाड्याकडे पाहून त्याचे हात जोडले गेले आहेत. "तुला माहिती आहे, तू हाक मारशील तेव्हा मी धावत येईन" असे स्वतःशीच बोलून तो पांधीतून दिसेनासा झाला आहे.... ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more