* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOONG OVER MICROCHIPS:ADVENTURES OF A TECHIE-TURNED-FARMER
  • Availability : Available
  • Translators : DEEPAK KULKARNI
  • ISBN : 9789353173043
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 212
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
  • Available in Combos :KISAN DIWAS OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VENKAT IYER WAS LIVING A FAST-PACED LIFE IN THE IT WORLD IN MUMBAI WHEN HE DECIDED TO STOP AND TAKE A LONG, HARD LOOK AT WHERE HE WAS HEADED. DISHEARTENED BY HIS STRESSFUL EXISTENCE IN THE CITY, HE DECIDED TO GIVE IT ALL UP AND TAKE UP ORGANIC FARMING IN A SMALL VILLAGE NEAR MUMBAI. BUT IT WASN`T EASY. WITH NO EXPERIENCE IN AGRICULTURE, HIS JOURNEY WAS FRAUGHT WITH UNCERTAINTY. HE SOON WENT FROM NEGOTIATING TOUGH CLIENTS, STRICT DEADLINES AND TRAFFIC TO LOOKING FORWARD TO HIS FIRST BUMPER CROP OF MOONG. AS HE BATTLED ERRATIC WEATHER CONDITIONS AND STUBBORN FARM ANIMALS, HE DISCOVERED A WORLD WITH FRESH AIR AND ORGANIC FOOD, ONE WHERE HE COULD LEAD A MORE WHOLESOME EXISTENCE. AT TIMES HILARIOUS, AND OTHER TIMES PROFOUND, THIS BOOK FOLLOWS HIS EXTRAORDINARY STORY.
मुंबईतलं धकाधकीचं आयुष्य..अन् आयटीतील सहा आकडी पगाराची नोकरी..एकीकडे प्रलोभन तर दुसरीकडं तणावाचा कहर..या सगळ्यालाच रामराम ठोकण्याचा वेंकट अय्यर यांनी धाडसी निर्णय घेतला. शेतीतलं गमभन..ही माहिती नसताना त्यांनी काळ्या मातीतली अद्याक्षरं गिरवायला सुरुवात केली. आणि त्यातून साकारली समकालीन जगण्याला अत्यावश्यक असणारी एक प्रेरणादायी कहाणी...

No Records Found
No Records Found
Keywords
#CORPORATELA RAMRAM SHETILA SALAM #MOONG OVER MICROCHIPS #VENKAT IYER #DEEPAK KULKARNI #CORPORATE LIFE #INOVATIVE FARMING #ORGANIC FARMING #FARMING AT PALGHAR
Customer Reviews
  • Rating StarMakarand Ketkar

    I read the book with great Interest. Content is ultimate. Lot of things to learn. I got a feeling as if i am reading the original story not a translation. Very Pure Marathi. Many people will like it. I have discussed the book during my Book Club meting & all have liked the same. Kindly convey my message to Deepak Kulkarni about the quality of Translation. ...Read more

  • Rating Starलोकमत १७-११-१९

    अभिनव प्रयोगाचा प्रवास... स्वत:च्या आयुष्याची वाट निवडायची संधी खूप कमी लोकांना मिळते. त्यानंतर स्वीकारलेल्या संधीला न्याय देण्याची जबाबदारी मात्र पूर्णत: तुमची होऊन जाते. मुंबईच्या आयटी क्षेत्रात धावपळीचे, ताणतणावयुक्त आयुष्य जगत असताना आर्थिकदृष्टा सक्षम झालेल्या पण कुठेतरी शांतता, आनंद, शरीरस्वास्थ्यापासून दुरावत चाललेल्या एका माणसाची जीवनाला कलाटणी आणि प्रफुल्लित करणारी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राला रामराम,शेतीला सलाम हे पुस्तक आहे. वेंकट अय्यरलिखित या पुस्तकात आयटीक्षेत्रातील नोकरी ते मुंबईजवळील एका खेडयात जात तिथे सेंद्रिय शेती प्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. लहरी हवामान आणि अनेक अडथळ्यांचा सामना करीत अय्यर यांनी निर्मिती केलेल्या एका विश्वाशी आपण पुस्तकाच्या रूपाने जोडले जातो. - दीपक कुलकर्णी ...Read more

  • Rating Starलोकसत्ता | October 27, 2019

    कॉर्पोरेटमधील अधिकारी ते शेतकरी ! ग्रामीण सांस्कृतिक जीवन, खेडय़ातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याबद्दलचं अनुभवपर भाष्य या पुस्तकात केलेलं आहे... मोठय़ा कॉर्पोरेट कंपनीतली तगडय़ा पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या आणि पुढे ग्रामीण जीवनपद्धतीतच रममाण झाेल्या वेंकट अय्यर यांची ही कहाणी दीपक कुळकर्णी यांनी अनुवादित केली आहे. आयबीएमसारख्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असलेले अय्यर शहरातली वाढती गर्दी, कॉर्पोरेटमधली स्पर्धा, धकाधकीचं जीवन यामुळे चिंतित झाले होते. अशा वातावरणापासून दूर जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेले अय्यर नव्या आव्हानांसाठी सज्ज होते. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी शेतजमीन विकत घेतली. त्या जमिनीची मशागत, संपूर्णपणे रसायनविरहित शेती करताना येणाऱ्या अडचणी, बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम अशा कित्येक गोष्टी या पुस्तकात सविस्तरपणे सांगितल्या आहेत. तसेच ग्रामीण सांस्कृतिक जीवन, खेडय़ातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याबद्दलचं अनुभवपर भाष्य या पुस्तकात केलेलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.