* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INSIDE THE GAS CHAMBERS-EIGHT MONTHS IN THE SONDERKOMMANDO OF AUSCHWITZ
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981940
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A UNIQUE, EYE-WITNESS ACCOUNT OF EVERYDAY LIFE RIGHT AT THE HEART OF THE NAZI EXTERMINATION MACHINE. SHLOMO VENEZIA WAS BORN INTO A POOR JEWISH-ITALIAN COMMUNITY LIVING IN THESSALONIKI, GREECE. AT FIRST, THE OCCUPYING ITALIANS PROTECTED HIS FAMILY; BUT WHEN THE GERMANS INVADED, THE VENEZIAS WERE DEPORTED TO AUSCHWITZ.
श्लोमो व्हेनेत्सिया हे सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची ऑश्विट्झ-बिर्केनॉ या छळछावणीत रवानगी झाली आणि तेथील झाँडरकमांडो या नावाने ओळखल्या जाणा-या गटात त्यांना घालण्यात आले. तेथून ज्या काही मोजक्या लोकांनी आपली सुटका करून घेतली त्यापैकी ते एक आहेत. एस.एस. या जर्मन पोलीस दलाने गॅस चेंबर्स साफ करण्यासाठी व त्या चेंबर्समध्ये मारल्या जाणा-या माणसांचे मृतदेह जाळण्याकरता या ‘खास गटा’ची स्थापना केली होती.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INSIDETHEGASCHAMBER #INSIDETHEGASCHAMBER #इनसाइडदगॅसचेंबर्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #SHLOMOVENEZIA "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मी ते वाचलेले आहे ,फारच जबरदस्त

  • Rating StarSuhas Birhade

    नरकात जगलेला माणूस.. `इनसाईड द गॅस चेंबर्स` दुस-या महायुध्दाच्या काळात नाझींनी ज्यू लोकांच्या अमानुष कत्तली केल्या. त्यांना गॅस चेंबर्स मध्ये कोंडून मारण्यात आलं. लाखो ज्यू लोकांची अशाप्रकारे कत्तल करण्यात आली. गॅस चेंबर मध्ये तडफडून मरणा-या याप्रेतांना भट्टीत टाकून जाळण्यात आलं. अनेकदा जिवंत भट्टीत टाकले जात असे. हे काम देखील ज्यू लोकांकडून करून घेण्यात येई आणि नंतर त्यांना देखील ठार मारलं जात असे. त्यापैकी जे मूठभर लोकं जिवंत वाचले त्यापैकी सुदैवाने वाचलेला श्लोमो वेत्सानिया हा एक ज्यू तरुण. त्याने अनुभव कथन केलेल्या गॅस चेंबरचं वर्णन असलेलं हे पुस्तक. ``इनसाईट द गॅस चेंबर``... नरक म्हणजे काय असतो तो आपल्यासमोर येतं. लहान मुले, स्त्रिया, वृध्द महिला यांना ज्यावेळी आणलं जात होतं. तेव्हा त्यांचे कपडे काढून या गॅस चेंबर मध्ये पाठविण्यात येई. हे गॅस चेंबर्स कसे होतं, मृत्यूला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या भावना काय होत्या हे सारं श्लोमो यांनी सांगितलं आहे. श्लोमो आणि त्याच्या कुटुंबाला ग्रीस मधून हद्दपार केल्यानंतर बिर्केनो येथील छळछावणीत आणण्यात आले. त्याची आई आणि दोन लहान बहिणी कधीच दिसल्या नाहीत. श्लोमोला `झॉंडरकमांडो` म्हणून ज्यू लोकांना गॅस भट्टीत टाकण्याचं, नंतर प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम देण्यात आलं. हा नरकच होता. त्याचे वर्णन श्लोमो सांगत असताना अंगावर काटा येतो. आपल्याला मरणासाठी गॅस चेंबर मध्ये नेले जात आहे, हे समजल्यावर भयभीत झालेले, लहान मुलांना पोटाशी कवटाळणाऱ्या आया, रडणारे बालके, त्यांना गोळ्या घालणारे, विकृत छळ कऱणारे जर्मन, एक लहान बाळ गॅस चेंबर्स मधून जिवंत बाहेर पडतो कारण तो आईचं दूध पित असतो. ते पाहून संतापलेला जर्मन त्या बालकाला लागलीच गोळ्या घालतो.....सारंच भेसूर, सुन्न करणारं. पुस्तक सलग वाचता येत नाही. हात थरथरतात, छाती धडधडते. सैतानाही लाजवेल असे कृत्य पाहून संवेदना बधीर होतात. या विषयाकडे वळायचं असेल तर नाझी, ज्यू लोकांचा छळ याची पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 1-5-2011

    ‘इनसाइड द गॅस चेंबर्स’ हे पुस्तक कोणाही वाचकाला अस्वस्थ करणारे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने छळछावण्यांतून आणि गॅस चेंबर्समधून साठ लाख ज्यू लोकांना हालहाल करून अत्यंत क्रूरपणे ठार मारले हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासंबंधी नवनवे तपशील गेल्य पन्नास साठ वर्षात उघड झाले आहेत आणि या होलोकास्टचे हत्याकांडाचे भीषण अमानुष स्वरुप जगापुढे उभे राहिले आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’ या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत ऑस्कर शिंडलर या जर्मन माणसाने पोलंडमधील क्रकोव्ह या गावात कारखाना काढून स्वस्तात मजूर मिळतात म्हणून ज्यू मजूरांचा वापर करायला सुरुवात केली. जर्मन सरकारचा कारखान्यांना स्वस्त मजूर पुरवण्यामागचा अंत:स्थ हेतू लक्षात आल्यावर ज्यूंना छळछावण्यांपासून वाचविण्याचे केंद्र म्हणून आपल्या कारखान्याचा वापर करून बाराशेवर ज्यूंचे प्राण वाचवले. थॉमस केनेली या लेखकाला लॉस एंजेलिस येथील एका प्रवासी सामानाच्या दुकानाचा मालक पेफरबर्ग भेटला. तो शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक होता. त्याने शिंडलरच्या ‘ज्यू बचाव’ मोहिमेची माहिती दिली. केनेलीला शिंडलरने वाचवलेल्या आपल्या काही मित्रांचे पत्ते दिले. त्यावरून केनेलीने लिहिलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’ ला बुकर प्राइझ मिळाले. १९९४ मध्ये या कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याला ऑस्कर मिळाले. एका सज्जन जर्मन माणसाची ही कामगिरी दुसऱ्या महायुद्धानंतर चाळीस-पन्नास वर्षांनी जगाला कळली, त्याचप्रमाणे ऑश्वित्झ येथील छळछावणीत हजारो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये ठार मारून नंतर विद्युतदाहिनीत त्यांना जाळून भस्म करण्याच्या कामात गुंतलेल्या झांडरकमांडो या खास गटातील सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील श्लोमो व्हेनेत्सिया या तरुणाने त्या छावणीतून सुटका करून घेऊन, युद्ध संपल्यावर नव्याने आयुष्याची घडी बसवली. साठ वर्षानंतर जीव माउटपा या पत्रकाराने त्याच्याशी संपर्क साधून दीड महिन्यात अनेक तास त्याच्या बरोबर घालवून, त्याच्या आठवणी टेप करून घेतल्या. त्या प्रश्नोत्तरांवरून श्लोमोच्या बालपणापासून ते छळछावणीतील ज्यूंचा हत्याकांडाच्या कार्यपद्धतीचा उलगडा होतो. त्या प्रश्नोत्तरांवरून तयार झालेले ‘इनसाइड द गॅस चेंबर्स ’ हे पुस्तक गॅस चेंबरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे. मराठीत त्याचा अनुवाद होणे ही निश्चितच महत्त्वाची घटना मानायला हवी. श्लोमो हा ऑश्वित्झ येथील छळछावणीत आठ महिने होता. तो झोंडरकमांडो या तुकडीत होता. या तुकडीचे काम होते गॅसचेंबरमधील प्रेते विद्युतदाहिनीत नेऊन त्यांचे दहन करणे. त्याची आई, आईचे भाऊ, त्यांच्या बायका, मुले हे सर्व या हत्याकांडात मारले गेले. फक्त एक भाऊ, एक बहीण एवढेच वाचले. गॅसचेंबरमध्ये लोकांना विवस्त्र करून कोंबणे, ते मृत पावल्यावर त्यांची प्रेते वाहून नेणे, ती विद्युतदाहिनीत लोटणे हा रोजचा क्रम. सतत मृतदेहांचे सान्निध्य. त्याचे सावट मनावरून जात नाही. सर्वसाधारण आयुष्य जगणे त्याला शक्य होत नाही. ‘सारं काही छान होतं असं समजून इतरांप्रमाणे निष्काळजी, निर्भर, मोकळे आयुष्य जगायचे भाग्य आपल्या वाट्याला आलेच नाही’ असे त्याला वाटते. आपले प्राण वाचवण्यासाठी स्वत: ज्यू असून आपण ज्यू स्त्री पुरुषांना गॅस चेंबरमध्ये कोंबून मृत्यूच्या हवाली करत होतो आणि त्यांचे थंडगार मृतदेह, दुर्गंधी सुटलेले मृतदेह आपल्या हाताने विद्युतदाहिनीत लोटत होतो. या जबरदस्तीपुढे आपण हतबल होतो... याबद्दल त्याच्या मनात अपराधभावना आहे. अजूनही आपण खऱ्या अर्थाने क्रिमेटोतिरयममधून बाहेर आलो नाही अशी भावना श्लोमोला भेडसावत असते. रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या युद्ध कैद्यांना जवळच्या लाकडी इमारतीत नेऊन नग्न केले जाई आणि गॅस चेंबरमध्ये नेऊन ठार मारले जाई. ज्यूंना मारण्यासाठी ज्यू मजुरांचीच नेमणूक करण्यात येई. या मजुरांनाही नंतर खलास केले जाई. विद्युत भट्टीत प्रेते जाळण्यात येत. ज्यू युद्ध कैदी मोठ्या प्रमाणावर येत. त्यापैकी काहींना जवळच्या जर्मन कारखान्यात कामगार म्हणून नेमण्यात येई. या कैद्यांना त्या परिसरातील कारखाने मजूर म्हणून काम देत. नव्वद बाय एकवीस फूट अशा एका गॅस चेंबरमध्ये १५०० कैदी कोंबले जात. गॅस चेंबरच्या छताला चार झडपा असत. त्यावर सिमेंटचे जड झाकण. दर कत्तलीनंतर भिंतींना नव्याने चुना फासला जाई. छतावरच्या झडपांमधून सोडलेल्या धातूंच्या तारांच्या नळकांड्यातून झायक्लॉन बी वायू (सायनहाड्रिक अ‍ॅसिड) सोडण्यात येई. त्याच्या स्फटिकांचा हवेशी संयोग झाला की विषारी वायू निघे. दर कत्तलीनंतर चेंबरची झटपट सफाई केली जाई. त्यानंतर झांडर कमांडो पथके प्रेते हलवू लागत. प्रेतांचे केस, सोन्याचे दात वगैरे काढून त्यांना लिफ्टने तळमजल्यावरील भट्टीकडे पाठवले जाई. १९४५ जानेवारी नंतर हा कॅम्प रिकामा करून ५८ हजार कैद्यांना येथून जर्मनीत व अन्यत्र धाडण्यात आले. कत्तलीचे नावनिशाणही राहू नये म्हणून इमारती पाडण्यात आल्या. अगदी आजारी जराजर्जर अशा ९ हजार कैद्यांना ऑश्वित्झ कॅम्पातच ठेवले गेले. त्यापैकी ७०० लोकांना पहारेकरयांनी ठार मारून टाकले. ऑश्वित्झच्या आणि बिर्केनाच्या परिसराचे रुप युद्धातील जर्मनीच्या पराभवाच्या शक्यतेबरोबर बदलण्याचा घाट घातला गेला. आपल्या अमानुष क्रौर्याचे पुरावे नष्ट करण्याबाबत जर्मनीचे नेते फार सावध होते. काही देह लालभडक दिसत, काही फिकुटलेले दिसत. कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होत असे. पण त्या साऱ्यांनाच यातनामय मरण आलेलं असे. लोकांना बरेचदा वाटतं, की गॅस आत फेकला जाई आणि बस्स! माणसं मरत! पण तो कसला भीषण मृत्यू असे!.... एकमेकांना घट्ट पकडलेले देह आमच्या नजरेला पडत. प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याची अतीव धडपड करत असे. गॅस जमिनीवर ओतला जात असे आणि तो खालून अ‍ॅसिड पसरवत असे. त्यामुळे जरी त्यांना एकमेकांच्या अंगावर चढावं लागत असलं, तरी शेवटचं माणूस मरेपर्यंत प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याचा प्रयत्न करत राही. मी खात्रीनं म्हणू शकत नाही, पण मला वाटतं की अनेक लोक आत गॅस ओतला जाण्यापूर्वीच मरण पावत असत. त्यांना इतक्या दाटीवाटीनं आत कोंबलं जाई, की सर्वांत लहान आणि सर्वात अशक्त नक्कीच गुदमरून जात असणार. एका विवक्षित क्षणी त्या दडपणाखाली, त्या धास्तीपोटी माणूस स्वार्थी बनतो आणि तो फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो स्वत:ला कसं वाचवायचं! गॅसचा असा परिणाम होत असे. आम्ही दरवाजा उघडल्यावर नजरेला पडणारं दृश्य भयानक असे, त्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. जर्मन गार्ड या मरणासन्न माणसांचीही क्रूर चेष्टा करीत. दिव्यांची उघडमीट करून घाबरवत. गुदमरून माणसे मरावीत म्हणून गॅस चेंबरचे दिवे बंद करीत. प्रेतांचे तीनचार फूट उंचीचे ढीग लागत. भिंतीवर रक्ताचे डाग दिसत. व्हेंटिलेटर स्वच्छ करावा लागे. मृतांची काहीही खूण मागे राहू नये म्हणून प्रेतांची राखही भट्टीतून काढावी लागे. न जळलेली जाड हाडे बाहेर काढून त्यांचे चूर्ण करून राखेत मिसळावे लागे. ही राख नदीत टाकली जाई. गॅसने मारण्याची किंवा जाळण्याची प्रक्रिया २४ तास चालू राही. मृत्यूला सामोरे जायचे आहे, हे लक्षात आल्यावरही कोणाला काही करता येत नसे. काही माणसे अंगावरच कपडे किंवा अंतर्वस्त्रे काढायला आडकाठी घेत. सिक्रेट सर्विसची माणसे एकेकाच्या कवटीच्या ठिकऱ्या उडवत. मरणाऱ्या माणसाला जमिनीवर कोसळण्याआधी पकडून त्याचे डोके खाली करावे लागे. तसे न केले तर रक्ताचे कारंजे उसळत असे. सिक्रेट सर्विसच्या माणसाच्या अंगावर चुकूनही रक्त उडले तर तो झांडरकमांडोला गोळी घालायला कमी करत नसे. हे सर्व वाचताना आपल्या मनाची अवस्था सैरभैर व्हावी यात काही नवल नाही. हिटलरच्या क्रौर्याची ही झलक आजही अंगावर शहारे आणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more