* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INSIDE THE GAS CHAMBER
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184981940
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR LIVES ARE PRETTY SIMILAR TO THE CHARACTERS WE PLAYED IN THE FILMI WE`VE GONE FROM BEING FROM THE SLUMS OF GARIB NAGAR IN BANDRA EAST TO THE RED CARPET OF THE OSCARS- NINE-YEARS-OLD RUBINA`S JOURNEY HAS BEEN AN ASTONISHING ONE,ALMOST AS ASTONISHING AS JAMAL`S QUIZ SHOW VICTORY IN SLUMDOG MILLIONAIRE. THIS IS HER STORY- OF PLAYING MARBLES IN THE GULEES OF GARIB NAGAR WITH HER FRIENDS, RELUCTANTLY GOING TO SCHOOL, DREAMING OF ACTING IN FILMS, AND THEN HAVING IT COME TRUE. BUT UNDERNEATH THIS FAIRY TALE LIES A GRIMMER REALITY, THE REALITY THAT FACES COUNTLESS NUMBER OF SLUM CHILDREN. RUBINA BRINGS ALIVE THE WORLD OF THE CHAWLS WITH ITS WASTELANDS AND SHANTY DWELLINGS, THE LIVES OF THE CHILDREN WHO GROW UP IN THEM, THE STORY OF HER CART-PULLER FATHER, AND THE REST OF HER FAMILY. SHE TELLS US ABOUT LIFE ON THE FILM SET, THE AFTERMATH OF THE OSCARS (INCLUDING THE CONTROVERSY OVER HER FATHER), AND HOW IT FEELS TO HAVE THE MEDIA SPOTLIGHT ON HER. WHAT DOES IT MEAN FOR A LITTLE GIRL TO MOVE FROM SLUMKID TO STAR SO QUICKLY? WHAT WILL THE FUTURE HOLD FOR HER?
श्लोमो व्हेनेत्सिया हे सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची ऑश्विट्झ-बिर्केनॉ या छळछावणीत रवानगी झाली आणि तेथील झाँडरकमांडो या नावाने ओळखल्या जाणा-या गटात त्यांना घालण्यात आले. तेथून ज्या काही मोजक्या लोकांनी आपली सुटका करून घेतली त्यापैकी ते एक आहेत. एस.एस. या जर्मन पोलीस दलाने गॅस चेंबर्स साफ करण्यासाठी व त्या चेंबर्समध्ये मारल्या जाणा-या माणसांचे मृतदेह जाळण्याकरता या ‘खास गटा’ची स्थापना केली होती.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INSIDETHEGASCHAMBER #INSIDETHEGASCHAMBER #इनसाइडदगॅसचेंबर्स #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUNITIKANE #सुनीतिकाणे #SHLOMOVENEZIA "
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    मी ते वाचलेले आहे ,फारच जबरदस्त

  • Rating StarSuhas Birhade

    नरकात जगलेला माणूस.. `इनसाईड द गॅस चेंबर्स` दुस-या महायुध्दाच्या काळात नाझींनी ज्यू लोकांच्या अमानुष कत्तली केल्या. त्यांना गॅस चेंबर्स मध्ये कोंडून मारण्यात आलं. लाखो ज्यू लोकांची अशाप्रकारे कत्तल करण्यात आली. गॅस चेंबर मध्ये तडफडून मरणा-या याप्रेतांना भट्टीत टाकून जाळण्यात आलं. अनेकदा जिवंत भट्टीत टाकले जात असे. हे काम देखील ज्यू लोकांकडून करून घेण्यात येई आणि नंतर त्यांना देखील ठार मारलं जात असे. त्यापैकी जे मूठभर लोकं जिवंत वाचले त्यापैकी सुदैवाने वाचलेला श्लोमो वेत्सानिया हा एक ज्यू तरुण. त्याने अनुभव कथन केलेल्या गॅस चेंबरचं वर्णन असलेलं हे पुस्तक. ``इनसाईट द गॅस चेंबर``... नरक म्हणजे काय असतो तो आपल्यासमोर येतं. लहान मुले, स्त्रिया, वृध्द महिला यांना ज्यावेळी आणलं जात होतं. तेव्हा त्यांचे कपडे काढून या गॅस चेंबर मध्ये पाठविण्यात येई. हे गॅस चेंबर्स कसे होतं, मृत्यूला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या भावना काय होत्या हे सारं श्लोमो यांनी सांगितलं आहे. श्लोमो आणि त्याच्या कुटुंबाला ग्रीस मधून हद्दपार केल्यानंतर बिर्केनो येथील छळछावणीत आणण्यात आले. त्याची आई आणि दोन लहान बहिणी कधीच दिसल्या नाहीत. श्लोमोला `झॉंडरकमांडो` म्हणून ज्यू लोकांना गॅस भट्टीत टाकण्याचं, नंतर प्रेतांची विल्हेवाट लावण्याचं काम देण्यात आलं. हा नरकच होता. त्याचे वर्णन श्लोमो सांगत असताना अंगावर काटा येतो. आपल्याला मरणासाठी गॅस चेंबर मध्ये नेले जात आहे, हे समजल्यावर भयभीत झालेले, लहान मुलांना पोटाशी कवटाळणाऱ्या आया, रडणारे बालके, त्यांना गोळ्या घालणारे, विकृत छळ कऱणारे जर्मन, एक लहान बाळ गॅस चेंबर्स मधून जिवंत बाहेर पडतो कारण तो आईचं दूध पित असतो. ते पाहून संतापलेला जर्मन त्या बालकाला लागलीच गोळ्या घालतो.....सारंच भेसूर, सुन्न करणारं. पुस्तक सलग वाचता येत नाही. हात थरथरतात, छाती धडधडते. सैतानाही लाजवेल असे कृत्य पाहून संवेदना बधीर होतात. या विषयाकडे वळायचं असेल तर नाझी, ज्यू लोकांचा छळ याची पार्श्वभूमी माहिती असणं आवश्यक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 1-5-2011

    ‘इनसाइड द गॅस चेंबर्स’ हे पुस्तक कोणाही वाचकाला अस्वस्थ करणारे आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने छळछावण्यांतून आणि गॅस चेंबर्समधून साठ लाख ज्यू लोकांना हालहाल करून अत्यंत क्रूरपणे ठार मारले हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासंबंधी नवनवे तपशील गेल्य पन्नास साठ वर्षात उघड झाले आहेत आणि या होलोकास्टचे हत्याकांडाचे भीषण अमानुष स्वरुप जगापुढे उभे राहिले आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’ या १९८३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत ऑस्कर शिंडलर या जर्मन माणसाने पोलंडमधील क्रकोव्ह या गावात कारखाना काढून स्वस्तात मजूर मिळतात म्हणून ज्यू मजूरांचा वापर करायला सुरुवात केली. जर्मन सरकारचा कारखान्यांना स्वस्त मजूर पुरवण्यामागचा अंत:स्थ हेतू लक्षात आल्यावर ज्यूंना छळछावण्यांपासून वाचविण्याचे केंद्र म्हणून आपल्या कारखान्याचा वापर करून बाराशेवर ज्यूंचे प्राण वाचवले. थॉमस केनेली या लेखकाला लॉस एंजेलिस येथील एका प्रवासी सामानाच्या दुकानाचा मालक पेफरबर्ग भेटला. तो शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक होता. त्याने शिंडलरच्या ‘ज्यू बचाव’ मोहिमेची माहिती दिली. केनेलीला शिंडलरने वाचवलेल्या आपल्या काही मित्रांचे पत्ते दिले. त्यावरून केनेलीने लिहिलेल्या ‘शिंडलर्स लिस्ट’ ला बुकर प्राइझ मिळाले. १९९४ मध्ये या कादंबरीवर चित्रपट निघाला. त्याला ऑस्कर मिळाले. एका सज्जन जर्मन माणसाची ही कामगिरी दुसऱ्या महायुद्धानंतर चाळीस-पन्नास वर्षांनी जगाला कळली, त्याचप्रमाणे ऑश्वित्झ येथील छळछावणीत हजारो ज्यूंना गॅस चेंबरमध्ये ठार मारून नंतर विद्युतदाहिनीत त्यांना जाळून भस्म करण्याच्या कामात गुंतलेल्या झांडरकमांडो या खास गटातील सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील श्लोमो व्हेनेत्सिया या तरुणाने त्या छावणीतून सुटका करून घेऊन, युद्ध संपल्यावर नव्याने आयुष्याची घडी बसवली. साठ वर्षानंतर जीव माउटपा या पत्रकाराने त्याच्याशी संपर्क साधून दीड महिन्यात अनेक तास त्याच्या बरोबर घालवून, त्याच्या आठवणी टेप करून घेतल्या. त्या प्रश्नोत्तरांवरून श्लोमोच्या बालपणापासून ते छळछावणीतील ज्यूंचा हत्याकांडाच्या कार्यपद्धतीचा उलगडा होतो. त्या प्रश्नोत्तरांवरून तयार झालेले ‘इनसाइड द गॅस चेंबर्स ’ हे पुस्तक गॅस चेंबरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे. मराठीत त्याचा अनुवाद होणे ही निश्चितच महत्त्वाची घटना मानायला हवी. श्लोमो हा ऑश्वित्झ येथील छळछावणीत आठ महिने होता. तो झोंडरकमांडो या तुकडीत होता. या तुकडीचे काम होते गॅसचेंबरमधील प्रेते विद्युतदाहिनीत नेऊन त्यांचे दहन करणे. त्याची आई, आईचे भाऊ, त्यांच्या बायका, मुले हे सर्व या हत्याकांडात मारले गेले. फक्त एक भाऊ, एक बहीण एवढेच वाचले. गॅसचेंबरमध्ये लोकांना विवस्त्र करून कोंबणे, ते मृत पावल्यावर त्यांची प्रेते वाहून नेणे, ती विद्युतदाहिनीत लोटणे हा रोजचा क्रम. सतत मृतदेहांचे सान्निध्य. त्याचे सावट मनावरून जात नाही. सर्वसाधारण आयुष्य जगणे त्याला शक्य होत नाही. ‘सारं काही छान होतं असं समजून इतरांप्रमाणे निष्काळजी, निर्भर, मोकळे आयुष्य जगायचे भाग्य आपल्या वाट्याला आलेच नाही’ असे त्याला वाटते. आपले प्राण वाचवण्यासाठी स्वत: ज्यू असून आपण ज्यू स्त्री पुरुषांना गॅस चेंबरमध्ये कोंबून मृत्यूच्या हवाली करत होतो आणि त्यांचे थंडगार मृतदेह, दुर्गंधी सुटलेले मृतदेह आपल्या हाताने विद्युतदाहिनीत लोटत होतो. या जबरदस्तीपुढे आपण हतबल होतो... याबद्दल त्याच्या मनात अपराधभावना आहे. अजूनही आपण खऱ्या अर्थाने क्रिमेटोतिरयममधून बाहेर आलो नाही अशी भावना श्लोमोला भेडसावत असते. रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या युद्ध कैद्यांना जवळच्या लाकडी इमारतीत नेऊन नग्न केले जाई आणि गॅस चेंबरमध्ये नेऊन ठार मारले जाई. ज्यूंना मारण्यासाठी ज्यू मजुरांचीच नेमणूक करण्यात येई. या मजुरांनाही नंतर खलास केले जाई. विद्युत भट्टीत प्रेते जाळण्यात येत. ज्यू युद्ध कैदी मोठ्या प्रमाणावर येत. त्यापैकी काहींना जवळच्या जर्मन कारखान्यात कामगार म्हणून नेमण्यात येई. या कैद्यांना त्या परिसरातील कारखाने मजूर म्हणून काम देत. नव्वद बाय एकवीस फूट अशा एका गॅस चेंबरमध्ये १५०० कैदी कोंबले जात. गॅस चेंबरच्या छताला चार झडपा असत. त्यावर सिमेंटचे जड झाकण. दर कत्तलीनंतर भिंतींना नव्याने चुना फासला जाई. छतावरच्या झडपांमधून सोडलेल्या धातूंच्या तारांच्या नळकांड्यातून झायक्लॉन बी वायू (सायनहाड्रिक अ‍ॅसिड) सोडण्यात येई. त्याच्या स्फटिकांचा हवेशी संयोग झाला की विषारी वायू निघे. दर कत्तलीनंतर चेंबरची झटपट सफाई केली जाई. त्यानंतर झांडर कमांडो पथके प्रेते हलवू लागत. प्रेतांचे केस, सोन्याचे दात वगैरे काढून त्यांना लिफ्टने तळमजल्यावरील भट्टीकडे पाठवले जाई. १९४५ जानेवारी नंतर हा कॅम्प रिकामा करून ५८ हजार कैद्यांना येथून जर्मनीत व अन्यत्र धाडण्यात आले. कत्तलीचे नावनिशाणही राहू नये म्हणून इमारती पाडण्यात आल्या. अगदी आजारी जराजर्जर अशा ९ हजार कैद्यांना ऑश्वित्झ कॅम्पातच ठेवले गेले. त्यापैकी ७०० लोकांना पहारेकरयांनी ठार मारून टाकले. ऑश्वित्झच्या आणि बिर्केनाच्या परिसराचे रुप युद्धातील जर्मनीच्या पराभवाच्या शक्यतेबरोबर बदलण्याचा घाट घातला गेला. आपल्या अमानुष क्रौर्याचे पुरावे नष्ट करण्याबाबत जर्मनीचे नेते फार सावध होते. काही देह लालभडक दिसत, काही फिकुटलेले दिसत. कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी होत असे. पण त्या साऱ्यांनाच यातनामय मरण आलेलं असे. लोकांना बरेचदा वाटतं, की गॅस आत फेकला जाई आणि बस्स! माणसं मरत! पण तो कसला भीषण मृत्यू असे!.... एकमेकांना घट्ट पकडलेले देह आमच्या नजरेला पडत. प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याची अतीव धडपड करत असे. गॅस जमिनीवर ओतला जात असे आणि तो खालून अ‍ॅसिड पसरवत असे. त्यामुळे जरी त्यांना एकमेकांच्या अंगावर चढावं लागत असलं, तरी शेवटचं माणूस मरेपर्यंत प्रत्येकजण थोडीफार हवा मिळवण्याचा प्रयत्न करत राही. मी खात्रीनं म्हणू शकत नाही, पण मला वाटतं की अनेक लोक आत गॅस ओतला जाण्यापूर्वीच मरण पावत असत. त्यांना इतक्या दाटीवाटीनं आत कोंबलं जाई, की सर्वांत लहान आणि सर्वात अशक्त नक्कीच गुदमरून जात असणार. एका विवक्षित क्षणी त्या दडपणाखाली, त्या धास्तीपोटी माणूस स्वार्थी बनतो आणि तो फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो स्वत:ला कसं वाचवायचं! गॅसचा असा परिणाम होत असे. आम्ही दरवाजा उघडल्यावर नजरेला पडणारं दृश्य भयानक असे, त्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. जर्मन गार्ड या मरणासन्न माणसांचीही क्रूर चेष्टा करीत. दिव्यांची उघडमीट करून घाबरवत. गुदमरून माणसे मरावीत म्हणून गॅस चेंबरचे दिवे बंद करीत. प्रेतांचे तीनचार फूट उंचीचे ढीग लागत. भिंतीवर रक्ताचे डाग दिसत. व्हेंटिलेटर स्वच्छ करावा लागे. मृतांची काहीही खूण मागे राहू नये म्हणून प्रेतांची राखही भट्टीतून काढावी लागे. न जळलेली जाड हाडे बाहेर काढून त्यांचे चूर्ण करून राखेत मिसळावे लागे. ही राख नदीत टाकली जाई. गॅसने मारण्याची किंवा जाळण्याची प्रक्रिया २४ तास चालू राही. मृत्यूला सामोरे जायचे आहे, हे लक्षात आल्यावरही कोणाला काही करता येत नसे. काही माणसे अंगावरच कपडे किंवा अंतर्वस्त्रे काढायला आडकाठी घेत. सिक्रेट सर्विसची माणसे एकेकाच्या कवटीच्या ठिकऱ्या उडवत. मरणाऱ्या माणसाला जमिनीवर कोसळण्याआधी पकडून त्याचे डोके खाली करावे लागे. तसे न केले तर रक्ताचे कारंजे उसळत असे. सिक्रेट सर्विसच्या माणसाच्या अंगावर चुकूनही रक्त उडले तर तो झांडरकमांडोला गोळी घालायला कमी करत नसे. हे सर्व वाचताना आपल्या मनाची अवस्था सैरभैर व्हावी यात काही नवल नाही. हिटलरच्या क्रौर्याची ही झलक आजही अंगावर शहारे आणते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more