* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHANAKYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662504
  • Edition : 15
  • Publishing Year : APRIL 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY OF A STRATEGIST, BORN SOME 2400 YEARS AGO. DURING THAT PERIOD, INDIA WAS RULED BY MANY SMALL INDEPENDENT STATES. BUT THERE WAS NO HARMONY AMONGST THEM. THERE WERE CONTINUOUS PERIOD OF UNREST AND WAR BETWEEN THEM. THE GREEK GENERAL, SIKANDER HAD A DREAM IN HIS MIND. HE WANTED TO CONQUER THE EARTH. HE TOOK ADVANTAGE OF THE SITUATION IN INDIA. BUT, ALAS, HE HAD TO RETURN BACK WITHOUT FULFILLING HIS DREAM. IT WAS AFTER HIS RETREAT, CHANAKYA CREATED THE STRONG, COMPETENT AND INTEGRATED INDIA. HE MADE CHANDRAGUPTA THE "SAMRAT`. THIS NOVEL PRESENTS A PERFECT PICTURE OF THE EFFORTS OF THIS KINGMAKER, REVEALING HIS INSIGHTS, HIS FORESIGHT, AND HIS REVOLUTIONARY NATURE.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. चंद्रगुप्ताला त्याने सम्राट बनविले — ... ... अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही प्रासादिक भाषेत लिहिलेली ललितरम्य कादंबरी... वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DIGVIJAY #CHANAKYA #PRABUDDHA #B. D. KHER #दिग्विजय #चाणक्य #प्रबुद्ध #बि.डी.खेर #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    ही यशोगाथा त्या धगधगत्या पर्वाचीआहे ; जेव्हा भारत हा विखुरलेला होता . इ.स पुर्व ३०० त्याकाळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती . सर्व राज्यांचे आपापसात मतभेद संघर्ष होत जो तो स्वतचा विचार करित . याने परकीय शत्रुंना फायदा होई तेच एक मोठे कारण भातावर वारंवार आक्रमन होत . सर्व मुळ राष्ट्र संकल्पना विसरुन गेले असे जानवते . ह्या सर्वांना एकत्र करुन राष्ट्रसंकल्पना साधून भारत हा एकसंघ अखंड भारत त्यांचे स्वप्न साधून चंद्रगुप्ताला राजा केले व चंद्रगुप्त मोर्य व त्याचा पुत्र बिंदुसार याने भारतावर एकछत्री राज्य प्रस्थापित केले . कादंबरी ची सुरवात गंगेपासुन होती . राजा धनानंदाचे अत्याचार त्याकडून आपला पिता कपिलदेव याची कैद व पुढे कारागृहात दुर्दैवी मृत्यु आणि आईचा भुखेने हाल - हाल होऊन झालेला अंत , नियतीचे तडाखे लहानपणीच विष्णूने झेलले होते . पुढे तक्षशिलेकडे शिक्षणाकडे वाटचाल , विद्यार्थी ते पुढे आचार्य वाटचाल . पुढे राजा धनानंदाचा दरबारी ` दानाध्यक्ष पदी ` निवड , धनानंदाकडून झालेला चाणक्यांचा अपमान पुढे चाणक्यांनी शेंडीची गाठ सोडून घेतलेली प्रतिज्ञा हे सर्व वाचताना कादंबरी खिळवून ठेवते . चाणक्य चंथ्रगुप्ताची भेट , चंद्रगुप्ताचे प्रशिक्षण , सिकंदराचे भारतावर आक्रमन , चाणक्यांची त्याला पराजित करण्याची योजना प्रत्येक प्रसंग समोर घडत आहे असा वाचकास भास होतो . पुढे धनानंदाचा पराभव , मौर्य वशांची स्थापना , परकीय आक्रमनांना धडा , कादंबरी एका अनोख्या विश्वात टाकते . अखेर त्या महामुत्सदी , कौटिल्य महापंडितांचा मन सुन्न करुन टाकनारा अंत ...!!! जमल्यास कादंबरी नक्की वाचा . ह्यातील संस्कृत श्लोक त्याचा अर्थ अंगावर मुठभर मास चढवतात . चाणक्यांची राजनिति , अर्थशास्त्र , शिक्षा इ . लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे . हे चाणक्यांचा व्यक्तिवेध महाशिवधनुष्य अगदी सोप्या भाषेत भा.द.खेर यांनी सुंदररित्या पेलल आहे . चाणक्य ✒️©️ तेजस यादव ...Read more

  • Rating StarNeta Lele Joshi

    काही वेळा अति परिचयात अवज्ञा होते तशी माझी अवस्था चाणक्य ह्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेबद्दल झाली होती. चाणक्यनीती म्हणून अर्थशात्र आणि राजकारण ह्या विषयात मार्गदर्शन करणारी पुस्तक मला ऐकून माहिती होती. पण कधी काही वाचाल गेलं नाही. चाणक्य हि खरोखरच व्क्ती होतीं कि ती काल्पनिक व्यक्तिरेखा आहे ह्याबद्दल पण माझी खात्री नव्हती. अशा कोऱ्या पाटीसारख्या पार्श्वभूमीवर भा. द. खेर ह्यांचं `चाणक्य` हे पुस्तक वाचण्यात आलं. लायब्ररी माधव पुस्तक घेताना मी ते हातात घेतलं, चाणक्य म्हणजे काहीतरी कठीण असेल असं वाटून खाली ठेवताच होते इतक्यात पुस्तकाच्या मागे लिहिलेला सारांश दिसला. चाणक्यच चरित्र हे गोष्टीरूपाने लिहिलंय हे वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि मी ते पुस्तक घरी आणलं. भा. द. खेर ह्यांचं या आधी मी काही वाचलेलं नव्हतं (माझं अज्ञान अगाध आहे!) पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एकदम इतिहासात मगध राज्यात जाऊन पोहोचले. तिथे राहणारे सुशील दाम्पत्य- कपिलसेन आणि त्यांची पत्नी, त्यांचा हुशार, चुणचुणीत मुलगा विष्णू, त्यांचा मित्रपरिवार, मगध राज्याचा आळशी, अनाचार राजा ह्या सर्व पात्रांनी मनात घर केलं. हा विष्णू म्हणजेच पुढे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आलेला चाणक्य. मगध राज्यात आपल्या आई-वडिलांसोबत आनंदी जीवन जगणारा विष्णू एका घटनेने अचानक पोरका होतो. राजाच्या अनाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या त्याच्या वडिलांना राजा तुरुंगात टाकतो आणि तिथेच त्यांचा अंत होतो. वडील तुरुंगात गेल्यावर त्यांच्या मागे कुटुंबाची वाताहत होते. राजाज्ञेमुळे आजूबाजूचे लोकही त्यांना मदत करू धजत नाहीत. विष्णूचे शिक्षण बंद पडते. घरात अन्नान्न दशा होते. अशा विपरीत परिस्थितीत त्याची आई आजारी पडते आणि मरण पावते. राजाच्या भीतीने लोक त्याच्या आईच्या चितेसाठी लाकूड पण देऊ शकत नाहीत. शेवटी त्याला आपल्या आईचा मृतदेह गंगार्पण करावा लागतो. विष्णूची मगध राज्यात काहीच मागे उरात नाही. तो पुढील शिक्षणासाठी तक्षाशीला येथील प्रसिद्ध विद्यापीठात जाण्याचे ठरवतो. मजल-दरमजल करीत तक्षशीलेला जाणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यात तोही सामील होतो. त्याच प्रवासात त्याची ओळख शिवशंकर ह्या व्यापाऱ्यांशी होते. शिवशंकर हे तक्षशीलेला राहणारे, वयाने जेष्ठ आणि व्यापारी असूनही विद्येच्या क्षेत्रात जण असणारे असतात. विष्णूची हकीकत ऐकून ते त्याला मदत करतात. तिथून त्यांचा जमलेला स्नेह पुढे आयुष्यभर टिकून राहतो. विष्णू तक्षशीलेला जाऊन तेथील अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि तिथेच आचार्य (शिक्षक) म्हणून रुजू होतो. तो आपल्या मूळ गावाचे स्मरण म्हणून चाणक्य हे नाव धारण करतो. चाणक्याच्या बुद्धीमुळे आणि कार्यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. मगध देशाचा राजा त्याला सन्मानाने आमंत्रित करतो आणि त्याच्या मंत्रिमंडळात त्याला मनाचे स्थान देऊ करतो. चाणक्य ते काम स्वीकारतो मात्र थोड्याच दिवसात त्याचे व राजाचे जमेनासे होऊन तो तक्षशिला विद्यापीठात परततो. त्याच वेळेला सिकंदर हा परकीय भारतावर आक्रमण करतो. संपूर्ण भारत जिंकायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा असते. त्या वेळेला भारत हा लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला असतो. ह्या सगळ्या राज्यांमद्धे एकीची भावना नसते. काही राज्ये तर एकमेकांविरुद्ध युद्ध करीत असतात. हि अशी दुभंगलेली पार्श्वभूमी सिकंदराच्या विजयला कारणीभूत ठरते आणि बराचसा भारत त्याच्या अमलाखाली जातो. चाणक्य, चंद्रगुप्त ह्या तरुणाला नेता बनवितो आणि स्वतः त्याचा सल्लागार होतो. पुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. ह्या पुस्तकातील गोष्टीची मांडणी आणि तपशील रंजक आहे. त्यामुळे चरित्र प्रकार असूनही वाचताना उत्सुकता टिकून राहते. चाणक्याची नीतिमत्ता, बुद्धी, चंद्रगुप्तावर त्याने घेतलेली मेहनत ह्या गोषट आपल्याला प्रभावित करतात. सिकंदराबद्दलच वर्णन पण मनोवेधक आहे. तो शत्रू असूनही त्याचे काही गुण अधोरेखित केले आहेत. त्याची तत्वज्ञानाची आवड, भारतीय तत्वज्ञानाबद्दलच त्याच कुतूहल, ते समजून घेण्यासाठी त्याने घेतलेली अनेक साधू-संतांची भेट आणि अथार्त त्याचे नेतृत्वगुण ह्यामुळे त्याच्याबद्दल निश्चित आदर वाटतो. पुस्तक वाचल्यानंतर इतिहासातला एक महत्वाचा सुंदर तपशील वाचल्याचं समाधान मिळत. ...Read more

  • Rating StarBipin Deshmukh

    अतिशय सुंदर पुस्तक आहे.आर्य चाणक्यांचा जिवनपट कै.भा.द.खेर यांच्या नेहेमीच्याच अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही अतिशय रंजक शैलीमध्ये उलगडून दाखविला आहे.माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी चाणक्य ही चरित्रात्मक कादंबरी हे एक महत्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकाची मी क्षरशः पारायणे केली आहेत.आर्य चाणक्याची वास्तविक महानता मला या पुस्तकामुळे समजली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more