* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHANAKYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662504
  • Edition : 15
  • Publishing Year : APRIL 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 16 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY OF A STRATEGIST, BORN SOME 2400 YEARS AGO. DURING THAT PERIOD, INDIA WAS RULED BY MANY SMALL INDEPENDENT STATES. BUT THERE WAS NO HARMONY AMONGST THEM. THERE WERE CONTINUOUS PERIOD OF UNREST AND WAR BETWEEN THEM. THE GREEK GENERAL, SIKANDER HAD A DREAM IN HIS MIND. HE WANTED TO CONQUER THE EARTH. HE TOOK ADVANTAGE OF THE SITUATION IN INDIA. BUT, ALAS, HE HAD TO RETURN BACK WITHOUT FULFILLING HIS DREAM. IT WAS AFTER HIS RETREAT, CHANAKYA CREATED THE STRONG, COMPETENT AND INTEGRATED INDIA. HE MADE CHANDRAGUPTA THE "SAMRAT`. THIS NOVEL PRESENTS A PERFECT PICTURE OF THE EFFORTS OF THIS KINGMAKER, REVEALING HIS INSIGHTS, HIS FORESIGHT, AND HIS REVOLUTIONARY NATURE.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. चंद्रगुप्ताला त्याने सम्राट बनविले — ... ... अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही प्रासादिक भाषेत लिहिलेली ललितरम्य कादंबरी... वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DIGVIJAY #CHANAKYA #PRABUDDHA #B. D. KHER #दिग्विजय #चाणक्य #प्रबुद्ध #बि.डी.खेर #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    ही यशोगाथा त्या धगधगत्या पर्वाचीआहे ; जेव्हा भारत हा विखुरलेला होता . इ.स पुर्व ३०० त्याकाळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती . सर्व राज्यांचे आपापसात मतभेद संघर्ष होत जो तो स्वतचा विचार करित . याने परकीय शत्रुंना फायदा होई तेच एक मोठे कारण भातावर वारंवार आक्रमन होत . सर्व मुळ राष्ट्र संकल्पना विसरुन गेले असे जानवते . ह्या सर्वांना एकत्र करुन राष्ट्रसंकल्पना साधून भारत हा एकसंघ अखंड भारत त्यांचे स्वप्न साधून चंद्रगुप्ताला राजा केले व चंद्रगुप्त मोर्य व त्याचा पुत्र बिंदुसार याने भारतावर एकछत्री राज्य प्रस्थापित केले . कादंबरी ची सुरवात गंगेपासुन होती . राजा धनानंदाचे अत्याचार त्याकडून आपला पिता कपिलदेव याची कैद व पुढे कारागृहात दुर्दैवी मृत्यु आणि आईचा भुखेने हाल - हाल होऊन झालेला अंत , नियतीचे तडाखे लहानपणीच विष्णूने झेलले होते . पुढे तक्षशिलेकडे शिक्षणाकडे वाटचाल , विद्यार्थी ते पुढे आचार्य वाटचाल . पुढे राजा धनानंदाचा दरबारी ` दानाध्यक्ष पदी ` निवड , धनानंदाकडून झालेला चाणक्यांचा अपमान पुढे चाणक्यांनी शेंडीची गाठ सोडून घेतलेली प्रतिज्ञा हे सर्व वाचताना कादंबरी खिळवून ठेवते . चाणक्य चंथ्रगुप्ताची भेट , चंद्रगुप्ताचे प्रशिक्षण , सिकंदराचे भारतावर आक्रमन , चाणक्यांची त्याला पराजित करण्याची योजना प्रत्येक प्रसंग समोर घडत आहे असा वाचकास भास होतो . पुढे धनानंदाचा पराभव , मौर्य वशांची स्थापना , परकीय आक्रमनांना धडा , कादंबरी एका अनोख्या विश्वात टाकते . अखेर त्या महामुत्सदी , कौटिल्य महापंडितांचा मन सुन्न करुन टाकनारा अंत ...!!! जमल्यास कादंबरी नक्की वाचा . ह्यातील संस्कृत श्लोक त्याचा अर्थ अंगावर मुठभर मास चढवतात . चाणक्यांची राजनिति , अर्थशास्त्र , शिक्षा इ . लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे . हे चाणक्यांचा व्यक्तिवेध महाशिवधनुष्य अगदी सोप्या भाषेत भा.द.खेर यांनी सुंदररित्या पेलल आहे . चाणक्य ✒️©️ तेजस यादव ...Read more

  • Rating StarNeta Lele Joshi

    काही वेळा अति परिचयात अवज्ञा होते तशी माझी अवस्था चाणक्य ह्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेबद्दल झाली होती. चाणक्यनीती म्हणून अर्थशात्र आणि राजकारण ह्या विषयात मार्गदर्शन करणारी पुस्तक मला ऐकून माहिती होती. पण कधी काही वाचाल गेलं नाही. चाणक्य हि खरोखरच व्क्ती होतीं कि ती काल्पनिक व्यक्तिरेखा आहे ह्याबद्दल पण माझी खात्री नव्हती. अशा कोऱ्या पाटीसारख्या पार्श्वभूमीवर भा. द. खेर ह्यांचं `चाणक्य` हे पुस्तक वाचण्यात आलं. लायब्ररी माधव पुस्तक घेताना मी ते हातात घेतलं, चाणक्य म्हणजे काहीतरी कठीण असेल असं वाटून खाली ठेवताच होते इतक्यात पुस्तकाच्या मागे लिहिलेला सारांश दिसला. चाणक्यच चरित्र हे गोष्टीरूपाने लिहिलंय हे वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि मी ते पुस्तक घरी आणलं. भा. द. खेर ह्यांचं या आधी मी काही वाचलेलं नव्हतं (माझं अज्ञान अगाध आहे!) पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एकदम इतिहासात मगध राज्यात जाऊन पोहोचले. तिथे राहणारे सुशील दाम्पत्य- कपिलसेन आणि त्यांची पत्नी, त्यांचा हुशार, चुणचुणीत मुलगा विष्णू, त्यांचा मित्रपरिवार, मगध राज्याचा आळशी, अनाचार राजा ह्या सर्व पात्रांनी मनात घर केलं. हा विष्णू म्हणजेच पुढे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आलेला चाणक्य. मगध राज्यात आपल्या आई-वडिलांसोबत आनंदी जीवन जगणारा विष्णू एका घटनेने अचानक पोरका होतो. राजाच्या अनाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या त्याच्या वडिलांना राजा तुरुंगात टाकतो आणि तिथेच त्यांचा अंत होतो. वडील तुरुंगात गेल्यावर त्यांच्या मागे कुटुंबाची वाताहत होते. राजाज्ञेमुळे आजूबाजूचे लोकही त्यांना मदत करू धजत नाहीत. विष्णूचे शिक्षण बंद पडते. घरात अन्नान्न दशा होते. अशा विपरीत परिस्थितीत त्याची आई आजारी पडते आणि मरण पावते. राजाच्या भीतीने लोक त्याच्या आईच्या चितेसाठी लाकूड पण देऊ शकत नाहीत. शेवटी त्याला आपल्या आईचा मृतदेह गंगार्पण करावा लागतो. विष्णूची मगध राज्यात काहीच मागे उरात नाही. तो पुढील शिक्षणासाठी तक्षाशीला येथील प्रसिद्ध विद्यापीठात जाण्याचे ठरवतो. मजल-दरमजल करीत तक्षशीलेला जाणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यात तोही सामील होतो. त्याच प्रवासात त्याची ओळख शिवशंकर ह्या व्यापाऱ्यांशी होते. शिवशंकर हे तक्षशीलेला राहणारे, वयाने जेष्ठ आणि व्यापारी असूनही विद्येच्या क्षेत्रात जण असणारे असतात. विष्णूची हकीकत ऐकून ते त्याला मदत करतात. तिथून त्यांचा जमलेला स्नेह पुढे आयुष्यभर टिकून राहतो. विष्णू तक्षशीलेला जाऊन तेथील अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि तिथेच आचार्य (शिक्षक) म्हणून रुजू होतो. तो आपल्या मूळ गावाचे स्मरण म्हणून चाणक्य हे नाव धारण करतो. चाणक्याच्या बुद्धीमुळे आणि कार्यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. मगध देशाचा राजा त्याला सन्मानाने आमंत्रित करतो आणि त्याच्या मंत्रिमंडळात त्याला मनाचे स्थान देऊ करतो. चाणक्य ते काम स्वीकारतो मात्र थोड्याच दिवसात त्याचे व राजाचे जमेनासे होऊन तो तक्षशिला विद्यापीठात परततो. त्याच वेळेला सिकंदर हा परकीय भारतावर आक्रमण करतो. संपूर्ण भारत जिंकायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा असते. त्या वेळेला भारत हा लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला असतो. ह्या सगळ्या राज्यांमद्धे एकीची भावना नसते. काही राज्ये तर एकमेकांविरुद्ध युद्ध करीत असतात. हि अशी दुभंगलेली पार्श्वभूमी सिकंदराच्या विजयला कारणीभूत ठरते आणि बराचसा भारत त्याच्या अमलाखाली जातो. चाणक्य, चंद्रगुप्त ह्या तरुणाला नेता बनवितो आणि स्वतः त्याचा सल्लागार होतो. पुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. ह्या पुस्तकातील गोष्टीची मांडणी आणि तपशील रंजक आहे. त्यामुळे चरित्र प्रकार असूनही वाचताना उत्सुकता टिकून राहते. चाणक्याची नीतिमत्ता, बुद्धी, चंद्रगुप्तावर त्याने घेतलेली मेहनत ह्या गोषट आपल्याला प्रभावित करतात. सिकंदराबद्दलच वर्णन पण मनोवेधक आहे. तो शत्रू असूनही त्याचे काही गुण अधोरेखित केले आहेत. त्याची तत्वज्ञानाची आवड, भारतीय तत्वज्ञानाबद्दलच त्याच कुतूहल, ते समजून घेण्यासाठी त्याने घेतलेली अनेक साधू-संतांची भेट आणि अथार्त त्याचे नेतृत्वगुण ह्यामुळे त्याच्याबद्दल निश्चित आदर वाटतो. पुस्तक वाचल्यानंतर इतिहासातला एक महत्वाचा सुंदर तपशील वाचल्याचं समाधान मिळत. ...Read more

  • Rating StarBipin Deshmukh

    अतिशय सुंदर पुस्तक आहे.आर्य चाणक्यांचा जिवनपट कै.भा.द.खेर यांच्या नेहेमीच्याच अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही अतिशय रंजक शैलीमध्ये उलगडून दाखविला आहे.माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी चाणक्य ही चरित्रात्मक कादंबरी हे एक महत्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकाची मी क्षरशः पारायणे केली आहेत.आर्य चाणक्याची वास्तविक महानता मला या पुस्तकामुळे समजली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more