* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177662504
  • Edition : 15
  • Publishing Year : APRIL 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 356
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : HISTORICAL, POLITICAL & MILITARY
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A TRUE STORY OF A STRATEGIST, BORN SOME 2400 YEARS AGO. DURING THAT PERIOD, INDIA WAS RULED BY MANY SMALL INDEPENDENT STATES. BUT THERE WAS NO HARMONY AMONGST THEM. THERE WERE CONTINUOUS PERIOD OF UNREST AND WAR BETWEEN THEM. THE GREEK GENERAL, SIKANDER HAD A DREAM IN HIS MIND. HE WANTED TO CONQUER THE EARTH. HE TOOK ADVANTAGE OF THE SITUATION IN INDIA. BUT, ALAS, HE HAD TO RETURN BACK WITHOUT FULFILLING HIS DREAM. IT WAS AFTER HIS RETREAT, CHANAKYA CREATED THE STRONG, COMPETENT AND INTEGRATED INDIA. HE MADE CHANDRAGUPTA THE "SAMRAT`. THIS NOVEL PRESENTS A PERFECT PICTURE OF THE EFFORTS OF THIS KINGMAKER, REVEALING HIS INSIGHTS, HIS FORESIGHT, AND HIS REVOLUTIONARY NATURE.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे. त्या वेळी भारतात अनेक गणराज्ये नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. सतत संघर्ष होत असत. या अंदाधुंदीच्या परिस्थितीचा लाभ उठवून ग्रीक सेनानी सिकंदर याने भारतावर आक्रमण केले. जगज्जेता होण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने पछाडून सिकंदर भारतात आला आणि भारतविजेताही न होता त्याला परतावे लागले. त्यानंतर चाणक्याने एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारताची निर्मिती केली. चंद्रगुप्ताला त्याने सम्राट बनविले — ... ... अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही प्रासादिक भाषेत लिहिलेली ललितरम्य कादंबरी... वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#DIGVIJAY #CHANAKYA #PRABUDDHA #B. D. KHER #दिग्विजय #चाणक्य #प्रबुद्ध #बि.डी.खेर #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarTejas Yadav

    ही यशोगाथा त्या धगधगत्या पर्वाचीआहे ; जेव्हा भारत हा विखुरलेला होता . इ.स पुर्व ३०० त्याकाळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती . सर्व राज्यांचे आपापसात मतभेद संघर्ष होत जो तो स्वतचा विचार करित . याने परकीय शत्रुंना फायदा होई तेच एक मोठे कारण भातावर वारंवार आक्रमन होत . सर्व मुळ राष्ट्र संकल्पना विसरुन गेले असे जानवते . ह्या सर्वांना एकत्र करुन राष्ट्रसंकल्पना साधून भारत हा एकसंघ अखंड भारत त्यांचे स्वप्न साधून चंद्रगुप्ताला राजा केले व चंद्रगुप्त मोर्य व त्याचा पुत्र बिंदुसार याने भारतावर एकछत्री राज्य प्रस्थापित केले . कादंबरी ची सुरवात गंगेपासुन होती . राजा धनानंदाचे अत्याचार त्याकडून आपला पिता कपिलदेव याची कैद व पुढे कारागृहात दुर्दैवी मृत्यु आणि आईचा भुखेने हाल - हाल होऊन झालेला अंत , नियतीचे तडाखे लहानपणीच विष्णूने झेलले होते . पुढे तक्षशिलेकडे शिक्षणाकडे वाटचाल , विद्यार्थी ते पुढे आचार्य वाटचाल . पुढे राजा धनानंदाचा दरबारी ` दानाध्यक्ष पदी ` निवड , धनानंदाकडून झालेला चाणक्यांचा अपमान पुढे चाणक्यांनी शेंडीची गाठ सोडून घेतलेली प्रतिज्ञा हे सर्व वाचताना कादंबरी खिळवून ठेवते . चाणक्य चंथ्रगुप्ताची भेट , चंद्रगुप्ताचे प्रशिक्षण , सिकंदराचे भारतावर आक्रमन , चाणक्यांची त्याला पराजित करण्याची योजना प्रत्येक प्रसंग समोर घडत आहे असा वाचकास भास होतो . पुढे धनानंदाचा पराभव , मौर्य वशांची स्थापना , परकीय आक्रमनांना धडा , कादंबरी एका अनोख्या विश्वात टाकते . अखेर त्या महामुत्सदी , कौटिल्य महापंडितांचा मन सुन्न करुन टाकनारा अंत ...!!! जमल्यास कादंबरी नक्की वाचा . ह्यातील संस्कृत श्लोक त्याचा अर्थ अंगावर मुठभर मास चढवतात . चाणक्यांची राजनिति , अर्थशास्त्र , शिक्षा इ . लेखकांनी सुंदररित्या मांडले आहे . हे चाणक्यांचा व्यक्तिवेध महाशिवधनुष्य अगदी सोप्या भाषेत भा.द.खेर यांनी सुंदररित्या पेलल आहे . चाणक्य ✒️©️ तेजस यादव ...Read more

  • Rating StarNeta Lele Joshi

    काही वेळा अति परिचयात अवज्ञा होते तशी माझी अवस्था चाणक्य ह्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेबद्दल झाली होती. चाणक्यनीती म्हणून अर्थशात्र आणि राजकारण ह्या विषयात मार्गदर्शन करणारी पुस्तक मला ऐकून माहिती होती. पण कधी काही वाचाल गेलं नाही. चाणक्य हि खरोखरच व्क्ती होतीं कि ती काल्पनिक व्यक्तिरेखा आहे ह्याबद्दल पण माझी खात्री नव्हती. अशा कोऱ्या पाटीसारख्या पार्श्वभूमीवर भा. द. खेर ह्यांचं `चाणक्य` हे पुस्तक वाचण्यात आलं. लायब्ररी माधव पुस्तक घेताना मी ते हातात घेतलं, चाणक्य म्हणजे काहीतरी कठीण असेल असं वाटून खाली ठेवताच होते इतक्यात पुस्तकाच्या मागे लिहिलेला सारांश दिसला. चाणक्यच चरित्र हे गोष्टीरूपाने लिहिलंय हे वाचून मला जरा कुतूहल वाटलं आणि मी ते पुस्तक घरी आणलं. भा. द. खेर ह्यांचं या आधी मी काही वाचलेलं नव्हतं (माझं अज्ञान अगाध आहे!) पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एकदम इतिहासात मगध राज्यात जाऊन पोहोचले. तिथे राहणारे सुशील दाम्पत्य- कपिलसेन आणि त्यांची पत्नी, त्यांचा हुशार, चुणचुणीत मुलगा विष्णू, त्यांचा मित्रपरिवार, मगध राज्याचा आळशी, अनाचार राजा ह्या सर्व पात्रांनी मनात घर केलं. हा विष्णू म्हणजेच पुढे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आलेला चाणक्य. मगध राज्यात आपल्या आई-वडिलांसोबत आनंदी जीवन जगणारा विष्णू एका घटनेने अचानक पोरका होतो. राजाच्या अनाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या त्याच्या वडिलांना राजा तुरुंगात टाकतो आणि तिथेच त्यांचा अंत होतो. वडील तुरुंगात गेल्यावर त्यांच्या मागे कुटुंबाची वाताहत होते. राजाज्ञेमुळे आजूबाजूचे लोकही त्यांना मदत करू धजत नाहीत. विष्णूचे शिक्षण बंद पडते. घरात अन्नान्न दशा होते. अशा विपरीत परिस्थितीत त्याची आई आजारी पडते आणि मरण पावते. राजाच्या भीतीने लोक त्याच्या आईच्या चितेसाठी लाकूड पण देऊ शकत नाहीत. शेवटी त्याला आपल्या आईचा मृतदेह गंगार्पण करावा लागतो. विष्णूची मगध राज्यात काहीच मागे उरात नाही. तो पुढील शिक्षणासाठी तक्षाशीला येथील प्रसिद्ध विद्यापीठात जाण्याचे ठरवतो. मजल-दरमजल करीत तक्षशीलेला जाणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यात तोही सामील होतो. त्याच प्रवासात त्याची ओळख शिवशंकर ह्या व्यापाऱ्यांशी होते. शिवशंकर हे तक्षशीलेला राहणारे, वयाने जेष्ठ आणि व्यापारी असूनही विद्येच्या क्षेत्रात जण असणारे असतात. विष्णूची हकीकत ऐकून ते त्याला मदत करतात. तिथून त्यांचा जमलेला स्नेह पुढे आयुष्यभर टिकून राहतो. विष्णू तक्षशीलेला जाऊन तेथील अभ्यासक्रम पूर्ण करतो आणि तिथेच आचार्य (शिक्षक) म्हणून रुजू होतो. तो आपल्या मूळ गावाचे स्मरण म्हणून चाणक्य हे नाव धारण करतो. चाणक्याच्या बुद्धीमुळे आणि कार्यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. मगध देशाचा राजा त्याला सन्मानाने आमंत्रित करतो आणि त्याच्या मंत्रिमंडळात त्याला मनाचे स्थान देऊ करतो. चाणक्य ते काम स्वीकारतो मात्र थोड्याच दिवसात त्याचे व राजाचे जमेनासे होऊन तो तक्षशिला विद्यापीठात परततो. त्याच वेळेला सिकंदर हा परकीय भारतावर आक्रमण करतो. संपूर्ण भारत जिंकायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा असते. त्या वेळेला भारत हा लहान लहान राज्यांमध्ये विभागलेला असतो. ह्या सगळ्या राज्यांमद्धे एकीची भावना नसते. काही राज्ये तर एकमेकांविरुद्ध युद्ध करीत असतात. हि अशी दुभंगलेली पार्श्वभूमी सिकंदराच्या विजयला कारणीभूत ठरते आणि बराचसा भारत त्याच्या अमलाखाली जातो. चाणक्य, चंद्रगुप्त ह्या तरुणाला नेता बनवितो आणि स्वतः त्याचा सल्लागार होतो. पुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. ह्या पुस्तकातील गोष्टीची मांडणी आणि तपशील रंजक आहे. त्यामुळे चरित्र प्रकार असूनही वाचताना उत्सुकता टिकून राहते. चाणक्याची नीतिमत्ता, बुद्धी, चंद्रगुप्तावर त्याने घेतलेली मेहनत ह्या गोषट आपल्याला प्रभावित करतात. सिकंदराबद्दलच वर्णन पण मनोवेधक आहे. तो शत्रू असूनही त्याचे काही गुण अधोरेखित केले आहेत. त्याची तत्वज्ञानाची आवड, भारतीय तत्वज्ञानाबद्दलच त्याच कुतूहल, ते समजून घेण्यासाठी त्याने घेतलेली अनेक साधू-संतांची भेट आणि अथार्त त्याचे नेतृत्वगुण ह्यामुळे त्याच्याबद्दल निश्चित आदर वाटतो. पुस्तक वाचल्यानंतर इतिहासातला एक महत्वाचा सुंदर तपशील वाचल्याचं समाधान मिळत. ...Read more

  • Rating StarBipin Deshmukh

    अतिशय सुंदर पुस्तक आहे.आर्य चाणक्यांचा जिवनपट कै.भा.द.खेर यांच्या नेहेमीच्याच अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही अतिशय रंजक शैलीमध्ये उलगडून दाखविला आहे.माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी चाणक्य ही चरित्रात्मक कादंबरी हे एक महत्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकाची मी क्षरशः पारायणे केली आहेत.आर्य चाणक्याची वास्तविक महानता मला या पुस्तकामुळे समजली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो