* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SARJA
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789999
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARJA, AN OX, TELLING HIS STORY. A VERY SAD INCIDENCE MARKS THE BEGINNING OF THIS STORY. SARJA AND HIS MATE RAJA HAVE A FRIEND, KHILARI. SARJA IS MORE ATTACHED TO HER. THEY ARE SEPARATED FROM EACH OTHER AS THEIR OWNER HAS SOLD THEM DUE TO THEIR AGEING. THE CONTINUOUS DROUGHT CONDITIONS HAVE ADDED TO THE MISERY OF THE FARMER, WHO IS UNABLE TO FEED HIS LIVESTOCK. PACKED IN A TEMPO, THE TRIO SETS OUT ON THEIR JOURNEY TO THE UNKNOWN LAND AND UNKNOWN DESTINY. ON WAY, KHILARI IS MADE TO DISEMBARK AT SOME UNKNOWN PLACE. SARJA AND RAJA ARE FURTHER TAKEN TO THE SLAUGHTER HOUSE. UPON REACHING THERE, SARJA SENSES THE STRONG EVIL VIBES OF DEATH AND MANAGES TO RUN AWAY. SARJA, WAS CALLED AS SHAMBHOO BY HIS ORIGINAL OWNER. THE OWNER SELLS HIM TO ANOTHER PERSON WHO NAMES HIM SARJA. THERE, SARJA MEETS RAJA AND KHILARI. A SPECIAL BOND DEVELOPS BETWEEN SARJA AND KHILARI. AFTER A WHILE, THE OWNER SOLDS SARJA, RAJA AND KHILARI. THIS IS HOW THE TRIO GETS SEPARATED. SARJA SUCCEEDS IN RUNNING AWAY FROM THE SLAUGHTER HOUSE. HE MEETS UPASHYA, A POOR FELLOW. UPASHYA, IN TURN COLOURS SARJA AS A `NANDI BAIL` AND STARTS EARNING MONEY. A FEW DAYS AFTER BEING WITH UPASHYA, SARJA MEETS KHILARO. UPASHYA UNDERSTANDS THE BONDING BETWEEN THESE TWO. HE THEN TAKES THEM BOTH TO AN INSTITUTION WHICH LOOKS AFTER AGED LIVESTOCK. SARJA, TOUCHES THE SOUL OF READERS WITH HIS FEELINGS AND EXPRESSIONS. A MUST READ.
‘सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARJA #SARJA #सर्जा #BIOGRAPHY #MARATHI #KHATMODERAMCHANDRA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 03-01-2020

    जीवनकहाणी सर्जाची... ‘एका बैलाची हृद्य जीवनकहाणी-सर्जा’ या रामचंद्र खाटमोडे लिखित पुस्तकातील कथेचा प्रारंभ होतो तेव्हा कथानायकाला टेम्पोतून कुठंतरी नेलं जात असतं. सोबत असतात त्याचे जिवलग साथी - राजा आणि खिलारी. एके ठिकाणी खिलारीला उतरवून सर्जा आणि रजाला कत्तलखान्यात नेलं जातं. कत्तलखान्यातून सर्जा बाहेर पडतो. त्या धडपडीत जीवावरचं शेपटीवर निभावतं आणि तो बिनशेपटीचा बैल होतो. आता त्याला ओढ लागते ती खिलारीला भेटण्याची. त्या नादात केलेल्या वाटचालीत त्याला आठवतो तो भूतकाळ. त्याची आई, त्याचं बालपण. त्याच्या मालकाचं कुटुंब आणि त्याचा मैतर कृष्णा. आपल्यासारखं सर्जालाही आहे त्याच्या पहिल्यावहिल्या गोष्टीचं कौतुक. मग ते बत्ताशासोबत गाडीला जोडणं असो, नांगराला जुंपणं असो, औत फिरवणं असो. गणेशोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांबद्दलची चर्चा असो किंवा कीर्तन सप्ताह असो ते पाहणं, ऐकणं आणि त्याचा विचार करणं ही सर्जाची प्रवृत्ती होती. बैलांसाठीच्या महत्त्वाच्या सणाचं अर्थात बैलपोळ्याचं वर्णन त्याच ओघात येतं. बैलांच्या गप्पांतल्या विषयांत नंदीबैल हा त्यांच देव आणि बैल हे सगळ्यांचं आडनाव ठरतं. एका टप्प्यावर सर्जाला विकलं जातं. मालक त्याच्या हातातलं दावं समोरच्या माणसाच्या हातात देतो, सर्जाची त्यावर टिप्पणी अशी की, सरकारी अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या होतात, तशी माझी जणू बदलीच झाली होती- कामासाठी. इकडून तिकडे. भूतकाळातून बाहेर येताना सर्जा शहरातल्या जीवनाला सामोरा जातो. तिथं एका सहा जन्म उपाशी असावा असा माणूस गाठतो. सर्जा त्या माणसाचं नाव उपाशा ठेवतो. उपाशा रातोरात सर्जाला नंदीबैल करतो आणि मनातून कितीही नाकारलं तरी जगण्यासाठीचा व्यवसाय म्हणून तो नंदीबैल होणं स्वीकारतो. स्वत:च्या नावात होणारे बदल पाहून त्याचा अहं दुखावला जातो. नंतर ते अनेक शहरांत फिरतात. तिथली वैशिष्ट्य तो सांगतो. दरम्यान त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवायला लागतो. नव्या मालकाचं घरदार, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खिलारी. राजाशी झालेली ओळख आणि पुढं पक्की दोस्तीदेखील. मग खिलारीशी जुळलेले भावबंध, सर्जा-राजाचं शर्यतीत पळणं आणि सततचं जिंकणं. चित्रपटात दाखवतात तशी कॅलेंडरची पानं झरझर सरतात. शरीर थकतं. ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचं आक्रमण होतं. त्यातच दुष्काळाचा तेरावा महिना उगवतो. तिथून सर्जाची कत्तलखान्यातली रवानगी होते. त्यातून वाचल्यावर खिलारी दिसते. सर्जा आणि तिची भेट होते का, ते कसे जगतात हे कथेतच वाचलेलं चांगलं. या कादंबरीचा जीव लहान असला, तरी तिचा आवाका मोठा आहे. केवळ कृषीसंस्कृतीच नव्हे तर शहरी जीवन, त्याचं खेड्यांत होणारं अंधानुकरण, श्रद्धा-अंधश्रद्धा, दृष्टावा आणि माणुसकी, परिस्थितीशरणता आणि आल्या संकटांना बेधडक सामोरं जायची वृत्ती हा सगळ्या मानवी मनातल्या-जीवनातल्या बाबींचं रोपण सर्जाच्या कथेत झालेलं दिसतं. त्याच्या सुखाच्या गाठोड्याच्या शोधाची गोष्ट वाचण्याजोगी आहे. – राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2018

    रामचंद्र खाटमोडे या तरुण लेखकानं सर्जा या एका बैलाची कहाणी अतिशय सुंदर रितीनं मांडली आहे. एक बैल कसायाच्या तावडीतून सुटतो आणि स्वत:ची कहाणी सांगतो अशा प्रकारची ही कादंबरी. बैलाचं मन अतिशय भावनात्मक रितीनं आणि सुखखुशीतपणे लेखकानं उलगडलंय आणि मध्येमध्य तिरकस टिप्पणी करत मजा आणली आहे. एक वेगळ्या प्रकारची आणि वेगळी दृष्टी देणारी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more