* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789999
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARJA, AN OX, TELLING HIS STORY. A VERY SAD INCIDENCE MARKS THE BEGINNING OF THIS STORY. SARJA AND HIS MATE RAJA HAVE A FRIEND, KHILARI. SARJA IS MORE ATTACHED TO HER. THEY ARE SEPARATED FROM EACH OTHER AS THEIR OWNER HAS SOLD THEM DUE TO THEIR AGEING. THE CONTINUOUS DROUGHT CONDITIONS HAVE ADDED TO THE MISERY OF THE FARMER, WHO IS UNABLE TO FEED HIS LIVESTOCK. PACKED IN A TEMPO, THE TRIO SETS OUT ON THEIR JOURNEY TO THE UNKNOWN LAND AND UNKNOWN DESTINY. ON WAY, KHILARI IS MADE TO DISEMBARK AT SOME UNKNOWN PLACE. SARJA AND RAJA ARE FURTHER TAKEN TO THE SLAUGHTER HOUSE. UPON REACHING THERE, SARJA SENSES THE STRONG EVIL VIBES OF DEATH AND MANAGES TO RUN AWAY. SARJA, WAS CALLED AS SHAMBHOO BY HIS ORIGINAL OWNER. THE OWNER SELLS HIM TO ANOTHER PERSON WHO NAMES HIM SARJA. THERE, SARJA MEETS RAJA AND KHILARI. A SPECIAL BOND DEVELOPS BETWEEN SARJA AND KHILARI. AFTER A WHILE, THE OWNER SOLDS SARJA, RAJA AND KHILARI. THIS IS HOW THE TRIO GETS SEPARATED. SARJA SUCCEEDS IN RUNNING AWAY FROM THE SLAUGHTER HOUSE. HE MEETS UPASHYA, A POOR FELLOW. UPASHYA, IN TURN COLOURS SARJA AS A `NANDI BAIL` AND STARTS EARNING MONEY. A FEW DAYS AFTER BEING WITH UPASHYA, SARJA MEETS KHILARO. UPASHYA UNDERSTANDS THE BONDING BETWEEN THESE TWO. HE THEN TAKES THEM BOTH TO AN INSTITUTION WHICH LOOKS AFTER AGED LIVESTOCK. SARJA, TOUCHES THE SOUL OF READERS WITH HIS FEELINGS AND EXPRESSIONS. A MUST READ.
‘सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARJA #SARJA #सर्जा #BIOGRAPHY #MARATHI #KHATMODERAMCHANDRA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 03-01-2020

    जीवनकहाणी सर्जाची... ‘एका बैलाची हृद्य जीवनकहाणी-सर्जा’ या रामचंद्र खाटमोडे लिखित पुस्तकातील कथेचा प्रारंभ होतो तेव्हा कथानायकाला टेम्पोतून कुठंतरी नेलं जात असतं. सोबत असतात त्याचे जिवलग साथी - राजा आणि खिलारी. एके ठिकाणी खिलारीला उतरवून सर्जा आणि रजाला कत्तलखान्यात नेलं जातं. कत्तलखान्यातून सर्जा बाहेर पडतो. त्या धडपडीत जीवावरचं शेपटीवर निभावतं आणि तो बिनशेपटीचा बैल होतो. आता त्याला ओढ लागते ती खिलारीला भेटण्याची. त्या नादात केलेल्या वाटचालीत त्याला आठवतो तो भूतकाळ. त्याची आई, त्याचं बालपण. त्याच्या मालकाचं कुटुंब आणि त्याचा मैतर कृष्णा. आपल्यासारखं सर्जालाही आहे त्याच्या पहिल्यावहिल्या गोष्टीचं कौतुक. मग ते बत्ताशासोबत गाडीला जोडणं असो, नांगराला जुंपणं असो, औत फिरवणं असो. गणेशोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांबद्दलची चर्चा असो किंवा कीर्तन सप्ताह असो ते पाहणं, ऐकणं आणि त्याचा विचार करणं ही सर्जाची प्रवृत्ती होती. बैलांसाठीच्या महत्त्वाच्या सणाचं अर्थात बैलपोळ्याचं वर्णन त्याच ओघात येतं. बैलांच्या गप्पांतल्या विषयांत नंदीबैल हा त्यांच देव आणि बैल हे सगळ्यांचं आडनाव ठरतं. एका टप्प्यावर सर्जाला विकलं जातं. मालक त्याच्या हातातलं दावं समोरच्या माणसाच्या हातात देतो, सर्जाची त्यावर टिप्पणी अशी की, सरकारी अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या होतात, तशी माझी जणू बदलीच झाली होती- कामासाठी. इकडून तिकडे. भूतकाळातून बाहेर येताना सर्जा शहरातल्या जीवनाला सामोरा जातो. तिथं एका सहा जन्म उपाशी असावा असा माणूस गाठतो. सर्जा त्या माणसाचं नाव उपाशा ठेवतो. उपाशा रातोरात सर्जाला नंदीबैल करतो आणि मनातून कितीही नाकारलं तरी जगण्यासाठीचा व्यवसाय म्हणून तो नंदीबैल होणं स्वीकारतो. स्वत:च्या नावात होणारे बदल पाहून त्याचा अहं दुखावला जातो. नंतर ते अनेक शहरांत फिरतात. तिथली वैशिष्ट्य तो सांगतो. दरम्यान त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवायला लागतो. नव्या मालकाचं घरदार, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खिलारी. राजाशी झालेली ओळख आणि पुढं पक्की दोस्तीदेखील. मग खिलारीशी जुळलेले भावबंध, सर्जा-राजाचं शर्यतीत पळणं आणि सततचं जिंकणं. चित्रपटात दाखवतात तशी कॅलेंडरची पानं झरझर सरतात. शरीर थकतं. ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचं आक्रमण होतं. त्यातच दुष्काळाचा तेरावा महिना उगवतो. तिथून सर्जाची कत्तलखान्यातली रवानगी होते. त्यातून वाचल्यावर खिलारी दिसते. सर्जा आणि तिची भेट होते का, ते कसे जगतात हे कथेतच वाचलेलं चांगलं. या कादंबरीचा जीव लहान असला, तरी तिचा आवाका मोठा आहे. केवळ कृषीसंस्कृतीच नव्हे तर शहरी जीवन, त्याचं खेड्यांत होणारं अंधानुकरण, श्रद्धा-अंधश्रद्धा, दृष्टावा आणि माणुसकी, परिस्थितीशरणता आणि आल्या संकटांना बेधडक सामोरं जायची वृत्ती हा सगळ्या मानवी मनातल्या-जीवनातल्या बाबींचं रोपण सर्जाच्या कथेत झालेलं दिसतं. त्याच्या सुखाच्या गाठोड्याच्या शोधाची गोष्ट वाचण्याजोगी आहे. – राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2018

    रामचंद्र खाटमोडे या तरुण लेखकानं सर्जा या एका बैलाची कहाणी अतिशय सुंदर रितीनं मांडली आहे. एक बैल कसायाच्या तावडीतून सुटतो आणि स्वत:ची कहाणी सांगतो अशा प्रकारची ही कादंबरी. बैलाचं मन अतिशय भावनात्मक रितीनं आणि सुखखुशीतपणे लेखकानं उलगडलंय आणि मध्येमध्य तिरकस टिप्पणी करत मजा आणली आहे. एक वेगळ्या प्रकारची आणि वेगळी दृष्टी देणारी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more