* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789999
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARJA, AN OX, TELLING HIS STORY. A VERY SAD INCIDENCE MARKS THE BEGINNING OF THIS STORY. SARJA AND HIS MATE RAJA HAVE A FRIEND, KHILARI. SARJA IS MORE ATTACHED TO HER. THEY ARE SEPARATED FROM EACH OTHER AS THEIR OWNER HAS SOLD THEM DUE TO THEIR AGEING. THE CONTINUOUS DROUGHT CONDITIONS HAVE ADDED TO THE MISERY OF THE FARMER, WHO IS UNABLE TO FEED HIS LIVESTOCK. PACKED IN A TEMPO, THE TRIO SETS OUT ON THEIR JOURNEY TO THE UNKNOWN LAND AND UNKNOWN DESTINY. ON WAY, KHILARI IS MADE TO DISEMBARK AT SOME UNKNOWN PLACE. SARJA AND RAJA ARE FURTHER TAKEN TO THE SLAUGHTER HOUSE. UPON REACHING THERE, SARJA SENSES THE STRONG EVIL VIBES OF DEATH AND MANAGES TO RUN AWAY. SARJA, WAS CALLED AS SHAMBHOO BY HIS ORIGINAL OWNER. THE OWNER SELLS HIM TO ANOTHER PERSON WHO NAMES HIM SARJA. THERE, SARJA MEETS RAJA AND KHILARI. A SPECIAL BOND DEVELOPS BETWEEN SARJA AND KHILARI. AFTER A WHILE, THE OWNER SOLDS SARJA, RAJA AND KHILARI. THIS IS HOW THE TRIO GETS SEPARATED. SARJA SUCCEEDS IN RUNNING AWAY FROM THE SLAUGHTER HOUSE. HE MEETS UPASHYA, A POOR FELLOW. UPASHYA, IN TURN COLOURS SARJA AS A `NANDI BAIL` AND STARTS EARNING MONEY. A FEW DAYS AFTER BEING WITH UPASHYA, SARJA MEETS KHILARO. UPASHYA UNDERSTANDS THE BONDING BETWEEN THESE TWO. HE THEN TAKES THEM BOTH TO AN INSTITUTION WHICH LOOKS AFTER AGED LIVESTOCK. SARJA, TOUCHES THE SOUL OF READERS WITH HIS FEELINGS AND EXPRESSIONS. A MUST READ.
‘सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARJA #SARJA #सर्जा #BIOGRAPHY #MARATHI #KHATMODERAMCHANDRA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 03-01-2020

    जीवनकहाणी सर्जाची... ‘एका बैलाची हृद्य जीवनकहाणी-सर्जा’ या रामचंद्र खाटमोडे लिखित पुस्तकातील कथेचा प्रारंभ होतो तेव्हा कथानायकाला टेम्पोतून कुठंतरी नेलं जात असतं. सोबत असतात त्याचे जिवलग साथी - राजा आणि खिलारी. एके ठिकाणी खिलारीला उतरवून सर्जा आणि रजाला कत्तलखान्यात नेलं जातं. कत्तलखान्यातून सर्जा बाहेर पडतो. त्या धडपडीत जीवावरचं शेपटीवर निभावतं आणि तो बिनशेपटीचा बैल होतो. आता त्याला ओढ लागते ती खिलारीला भेटण्याची. त्या नादात केलेल्या वाटचालीत त्याला आठवतो तो भूतकाळ. त्याची आई, त्याचं बालपण. त्याच्या मालकाचं कुटुंब आणि त्याचा मैतर कृष्णा. आपल्यासारखं सर्जालाही आहे त्याच्या पहिल्यावहिल्या गोष्टीचं कौतुक. मग ते बत्ताशासोबत गाडीला जोडणं असो, नांगराला जुंपणं असो, औत फिरवणं असो. गणेशोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांबद्दलची चर्चा असो किंवा कीर्तन सप्ताह असो ते पाहणं, ऐकणं आणि त्याचा विचार करणं ही सर्जाची प्रवृत्ती होती. बैलांसाठीच्या महत्त्वाच्या सणाचं अर्थात बैलपोळ्याचं वर्णन त्याच ओघात येतं. बैलांच्या गप्पांतल्या विषयांत नंदीबैल हा त्यांच देव आणि बैल हे सगळ्यांचं आडनाव ठरतं. एका टप्प्यावर सर्जाला विकलं जातं. मालक त्याच्या हातातलं दावं समोरच्या माणसाच्या हातात देतो, सर्जाची त्यावर टिप्पणी अशी की, सरकारी अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या होतात, तशी माझी जणू बदलीच झाली होती- कामासाठी. इकडून तिकडे. भूतकाळातून बाहेर येताना सर्जा शहरातल्या जीवनाला सामोरा जातो. तिथं एका सहा जन्म उपाशी असावा असा माणूस गाठतो. सर्जा त्या माणसाचं नाव उपाशा ठेवतो. उपाशा रातोरात सर्जाला नंदीबैल करतो आणि मनातून कितीही नाकारलं तरी जगण्यासाठीचा व्यवसाय म्हणून तो नंदीबैल होणं स्वीकारतो. स्वत:च्या नावात होणारे बदल पाहून त्याचा अहं दुखावला जातो. नंतर ते अनेक शहरांत फिरतात. तिथली वैशिष्ट्य तो सांगतो. दरम्यान त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवायला लागतो. नव्या मालकाचं घरदार, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खिलारी. राजाशी झालेली ओळख आणि पुढं पक्की दोस्तीदेखील. मग खिलारीशी जुळलेले भावबंध, सर्जा-राजाचं शर्यतीत पळणं आणि सततचं जिंकणं. चित्रपटात दाखवतात तशी कॅलेंडरची पानं झरझर सरतात. शरीर थकतं. ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचं आक्रमण होतं. त्यातच दुष्काळाचा तेरावा महिना उगवतो. तिथून सर्जाची कत्तलखान्यातली रवानगी होते. त्यातून वाचल्यावर खिलारी दिसते. सर्जा आणि तिची भेट होते का, ते कसे जगतात हे कथेतच वाचलेलं चांगलं. या कादंबरीचा जीव लहान असला, तरी तिचा आवाका मोठा आहे. केवळ कृषीसंस्कृतीच नव्हे तर शहरी जीवन, त्याचं खेड्यांत होणारं अंधानुकरण, श्रद्धा-अंधश्रद्धा, दृष्टावा आणि माणुसकी, परिस्थितीशरणता आणि आल्या संकटांना बेधडक सामोरं जायची वृत्ती हा सगळ्या मानवी मनातल्या-जीवनातल्या बाबींचं रोपण सर्जाच्या कथेत झालेलं दिसतं. त्याच्या सुखाच्या गाठोड्याच्या शोधाची गोष्ट वाचण्याजोगी आहे. – राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2018

    रामचंद्र खाटमोडे या तरुण लेखकानं सर्जा या एका बैलाची कहाणी अतिशय सुंदर रितीनं मांडली आहे. एक बैल कसायाच्या तावडीतून सुटतो आणि स्वत:ची कहाणी सांगतो अशा प्रकारची ही कादंबरी. बैलाचं मन अतिशय भावनात्मक रितीनं आणि सुखखुशीतपणे लेखकानं उलगडलंय आणि मध्येमध्य तिरकस टिप्पणी करत मजा आणली आहे. एक वेगळ्या प्रकारची आणि वेगळी दृष्टी देणारी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more