* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NOMAD
  • Availability : Notify Me
     
  • Translators : PRAJAKTA CHITRE
  • ISBN : 9788184984460
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 276
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NOMAD IS A PHILOSOPHICAL MEMOIR, TELLING HOW AYAAN HIRSI ALI CAME TO AMERICA IN SEARCH OF A NEW LIFE, AND THE DIFFICULTIES SHE FACED IN RECONCILING HER TWO WORLDS. WITH VIVID ANECDOTES AND OBSERVATIONS OF PEOPLE, CULTURES, AND POLITICAL DEBACLES, THIS NARRATIVE WEAVES TOGETHER HIRSI ALI`S PERSONAL STORY X INCLUDING HER RECONCILIATION WITH HER DEVOUT FATHER WHO HAD DISOWNED HER WHEN SHE DENOUNCED ISLAM X WITH THE STORIES OF OTHER WOMEN AND MEN, HIGH-PROFILE AND NOT, WHOM SHE ENCOUNTERS. WITH A DEEP UNDERSTANDING AND INTIMATE PERSPECTIVE OF THE SITUATION OF MUSLIM WOMEN AND MODERATES IN THE WORLD TODAY AND HER SINGULAR, UNWAVERING INTELLECTUAL COURAGE, HIRSI ALI OFFERS HER ALWAYS NOTABLE, OFTEN CONTROVERSIAL ANALYSIS OF ISLAM VIS A VIS THE SUPERIORITY OF WESTERN DEMOCRATIC VALUE
‘इन्फिडेल’ हे आयान हिरसी अलीचे पहिले पुस्तक. या वादळी आत्मकथनामुळे आयान अलीने साऱ्या जगात खळबळ माजवली. ‘नोमॅड’मध्ये तिने अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्याला कशी सुरुवात केली त्याबद्दल लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांपासून दूर, तिच्या आजूबाजूच्या जगातील संघर्ष आणि तिच्यामधील अंतर्गत संघर्ष, या साऱ्यापासून दूर जाऊन तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ही कथा शारीरिक आणि भावनिक स्तरावरील स्वातंत्र्याच्या प्रवासाची आहे. स्त्रीच्या आचारविचारावर बंधने घालणाऱ्या मागास जमातीतल्या स्त्रीचे रूपांतर एका खुल्या समाजातील स्वतंत्र आणि समानतेची भावना मनात असणाऱ्या नीडर स्त्रीमध्ये कसे झाले, त्याबद्दलचे हे अनुभवकथन आहे. तिने सांगितलेल्या वास्तववादी गोष्टींमधून तिला किती आव्हानांचा सामना करायला लागला, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत इस्लाममधील विरोधाभास दाखवणाऱ्या जीवनपद्धती आणि पाश्चिमात्यांची जगण्याची मूल्ये यांचा कुठेच मेळ बसत नाही, हे तिने दाखवून दिले. कुटुंबापासून दूर झाल्यावर आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांच्या गोष्टी आयान अलीने सांगितल्या आहेत. पाश्चिमात्य समाजात एकरूप होताना तिला पूर्वायुष्यातील गैरसमजुती, अंधश्रद्धा यांपासून स्वत:ला वेगळे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचेही यात चित्रण आहे. वडील मृत्यूशय्येवर असताना झालेल्या भेटीचे हृद्य वर्णन यात आहे. ९/११च्या घटनेनंतर तिने इस्लामचा त्याग केल्यावर तिच्या वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. त्या पाश्र्वभूमीवर त्यांची अखेरची भेट मन हेलावून सोडते. त्यांच्याप्रमाणेच तिची आई, सोमालियातील आणि युरोपमधील इतर नातेवाईक या सर्वांपासूनच आयान दुरावली. ‘नोमॅड’ हे सांस्कृतिक संघर्षात वाताहात झालेल्या कुटुंबाचं चित्रण तर आहेच, पण त्याचबरोबर एका स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे तेथील हृद्य, काही वेळा मजेशीर अनुभवाचे, तिथल्या संस्कृतीचे, तिने केलेल्या विश्लेषणाचे चित्रण आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #INFIDEL #NOMAD #नोमॅड #INFIDELMYLIFE #PRAJAKTACHITRE #इन्फिडेल #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEELACHANDORKAR #नीलाचांदोरकर #AYAANHIRSIALI"
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 08-05-2015

    स्त्रीच्या रूपांतराचं अनुभवकथन… आयान हिरली अली यांचं ‘नोमॅड’ हे पुस्तक विविध मानसिकतेचा शोध घेणारं आहे. अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्य जगण्याबद्दल आयानने या पुस्तकात लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जिवे मारण्याच्या धमक्या, जगाशी संघरष, तिचा अंतर्गत संघर्ष अशा सगळ्यांपासून दूर जात तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. स्त्रीवर बंधनं घालणाऱ्या मागास जमातीतील एका स्त्रीचे खुल्या समाजातील स्वतंत्र आणि नीडर स्त्रीमध्ये झालेल्या रूपांतराचे ‘नोमॅड’ हे अनुभवकथन आहे. कुटुंबापासून ते समाजापर्यंत अनेकांचा सामना करत तिला वेळोवेळी आव्हानं स्वीकारावी लागली, तरी जिद्दीने सगळ्यांशी लढा देत स्वत:च्या विचारांना तिने वाट मोकळी करून दिली. तिच्या वडिलांसोबतची अखेरची भेट, ९/११ च्या घटनेनंतर तिने इस्लामचा केलेला त्याग, आई आणि युरोपमधील काही नातेवाइकांपासून दुरावणं अशा कौटुंबिक दु:खांनाही ती सामोरी गेली. ‘नोमॅड’ हे पुस्तक स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे, तेथील हृद्य, मजेशीर अनुभवांचे, संस्कृतीचे, तिथल्या लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, मानसिकतेचे विश्लेषणात्मक चित्रण आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more