* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHRI DINKAR JOSHI IS NOW A FAMILIAR AND WELL-KNOWN NAME FOR READERS OF MARATHI LITERATURE. DINKAR JOSHI PIONEERED THE INTRODUCTION AND ESTABLISHMENT OF THE GENRE OF BIOGRAPHICAL FICTION INTO THE WORLD OF GUJARATI LITERATURE. HE HAS FICTIONALIZED THE LIVES OF VARIOUS MEN OVER DIFFERENT TIME PERIODS, EACH WITH THEIR DISTINCTIVE STYLES AND PERSONALITIES, SUCH AS ACHARYADRONA, TATHAGATHA BUDDHA, GURUDEV RABINDRANATH TAGORE, KAVI NARMAD, MOHAMMED ALI JINNAH AND MAHATMA GANDHI’S SON ,HARILAL GANDHI . IN “MAHAMANAV”, THE READER GETS A DETAILED GLIMPSE INTO THE LIFE WORK OF SARDAR VALLABHBHAI PATEL. A SUCCESSFUL BARRISTER, SARDAR PATEL WAS ONLY DISTANTLY AWARE OF THE INDIAN POLITICAL SCENE TILL THE AGE OF 42. SPELLBOUND BY MAHATMA GANDHI’S TOWERING PERSONALITY, HE ENTERED POLITICS. AFTER DOING SO, HE DEVOTED HIS LIFE TO THE INDIAN FREEDOM STRUGGLE AND INDIAN POLITICS. THE WRITER HAS WELL CHARACTERIZED HIM AS A LOVING FATHER, RESPONSIBLE BROTHER, UPRIGHT FEARLESS POLITICIAN AND PRINCIPLED LEADER THROUGH VARIOUS INCIDENTS IN THE NARRATIVE. DINKAR JOSHI HAS SUCCINCTLY CAPTURED THE VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY AND RENDERED TO THE READER A NARRATIVE WHICH DEFINES A MULTI-TALENTED MAN, A MAN WHO HAD A KEEN INSIGHT INTO THE NATIONAL AND GLOBAL SOCIO-POLITICAL CLIMATES, AND A PASSIONATE ZEAL FOR THE BETTERMENT OF HIS NATION AND FELLOW INDIANS. JOSHI GIVES US A CLEAR PICTURE OF THE MAN WHO VERY WELL DESERVED THE TITLE “ MAN OF IRON” – A TITLE THAT WAS SEEMINGLY AT ODDS WITH HIS VERY SENSITIVE NATURE BELYING HIS FORMIDABLE ‘IRON CLAD’ EXTERIOR. SARDAR PATEL WAS COMPLETELY AWARE AND CONVINCED THAT UNLESS ALL THE 562 PRINCELY STATES IN POST PARTITION INDIA ACCEDED INTO THE UNION, THERE COULD BE NO ONE AND FREE INDIAN NATION. THE SUCCESSFUL ACCESSION OF ALL THE PRINCIPALITIES INTO FREE AND UNITED INDIA WAS THE BRIGHTEST FEATHER IN THE SARDAR’S CAP. DINKAR JOSHI HAS SUPERBLY CAPTURED THIS NARRATIVE OF THE VARIOUS MEANS PATEL EMPLOYED IN ORDER TO CAJOLE, COAX AND AT TIMES SHOW GREAT DIPLOMACY , TACT AND PRINCIPLED RIGOUR WHILE BRINGING ABOUT THE ACCESSION OF ALL PRINCELY STATES INTO THE UNION. ON MANY OCCASIONS IN THE NARRATIVE, DINKAR JOSHI HAS CREATIVELY DEPICTED SARDAR PATEL’S DIFFERENCE OF OPINIONS WITH BOTH JAWAHARLAL NEHRU AND MAHATMA GANDHI, AND HOW THOSE DIFFERING IDEOLOGICAL POSITIONS NEVER IMPACTED HIS TRUE AND GENUINE PERSONAL RELATIONS WITH EITHER OF THE TWO MEN. THE EASE WITH WHICH HE RELINQUISHED A SURE AND CERTAIN PRIME-MINISTERSHIP AT MAHATMA GANDHI’S BEHEST IS PROOF OF HIS DEPTH OF CHARACTER. DINKAR JOSHI HAS HITHERTO PORTRAYED HISTORICAL-BIOGRAPHICAL FICTIONALIZED NARRATIVES OF MOHAMMED ALI JINNAH IN “ PRATINAYAK” AND HARILAL GANDHI IN “PRAKASHACHISAWLI”. “MAHAMANAV” IS JUST SUCH A WORK OF BIOGRAPHICAL FICTION.
श्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि रूढ केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आचार्य द्रोण, तथागत बुद्ध, गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, कवी नर्मद, महंमद अली जीना, महात्मा गांधीपुत्र हरिलाल गांधी अशा वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या स्वभावप्रकृतीच्या व्यक्तींचे कादंबरीच्या आकृतिबंधातून केलेले चरित्रचित्रण मराठी वाचकांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. महामानव कादंबरीतून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे. यशस्वी बॅरिस्टर असलेल्या वल्लभभाई झवेरभाई पटेलांचा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत भारतातील राजकारणाशी दुरून परिचय होता; परंतु थेट संबंध आला नव्हता. गांधीजींच्या प्रभावी व्याQक्तमत्त्वाने भारावून जाऊन ते काहीशा अनपेक्षितपणे राजकारणात उतरले. त्यानंतर मात्र त्यांनी तनमनधनाने भारतासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातला प्रेमळ पिता, कर्तव्यदक्ष बंधू, कणखर, निर्भीड राजकारणी, तत्त्वनिष्ठ नेता लेखकाने विविध प्रसंगांतून रंगवला आहे. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक परिाQस्थतीची त्यांची विलक्षण जाण, देशबांधवांसाठीची आणि देशाच्या कल्याणासाठीची आंतरिक तळमळ, गांधीजींच्या ठायी असलेली त्यांची निष्ठा आणि त्यातून आलेला, त्यांच्या ‘लोहपुरुष’ प्रतिमेशी वरकरणी सुसंगत न वाटणारा अति हळवेपणा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे. फाळणी स्वीकारून मिळालेल्या विभाजित भूभागातून सार्वभौम भारत राष्ट्राची निर्मिती होणे शक्य नाही; देशभर विखुरलेली ५६२ संस्थाने जोपर्यंत स्वतंत्र भारतात विलीन होत नाहीत, तोपर्यंत भारत हा एकसंध देश, एक राष्ट्र म्हणून कधीच आQस्तत्वात येऊ शकणार नाही, या गोष्टीचे त्यांना सर्वांगीण भान होते. संस्थानांचे विलीनीकरण हा त्यांच्या कार्यातील मानाचा तुरा ठरला. या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अमलात आणलेले डावपेच, दाखवलेला मुत्सद्दीपणा, धोरणी दीर्घदृष्टी, प्रसंगी कारवाई करण्याचे त्यांचे धाडस इत्यादी पैलू लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांतून सविस्तरपणे वर्णिले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांच्याशी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरदारांचे तात्विक मतभेद झाले असले, तरी या दोघांविषयीचा त्यांचा आंतरिक जिव्हाळा किती सच्चा होता, हे लेखकाने अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. हातातोंडाशी आलेला पंतप्रधानकीचा प्याला गांधीजींच्या इच्छेखातर त्यांनी अत्यंत सहजपणे सोडून दिला, हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला साजेसेच होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MAHAMANAVSARDARPATEL#DINKARJOSHI#BRITISHINDIA#ROYALINDIAN NAVY#POLITICALDEPARTMENT#BIRLA HOUSE# CENTRALLEGISLATIVEASSEMBLY#CABINETMISSIONPLAN#BENNWEDGWOOD#CONRADCORFIELD#
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 30-11-2018

    ‘सरदारत्वा’ची साकल्याने मांडणी... सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत वास्तववादी, व्यवहारवादी आणि स्पष्टव्यक्ते होते. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतांचे गुण नव्हते, असा त्याचा अर्थ नाही. पण त्यांचे निष्ठावंत अनुयायी त्यांना सरदार म्हणत. महात्मा वा मामानव असे म्हणत नसत. याचा अर्थ कोमल असूनही कठोर, तत्त्वनिष्ठ, उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही पाय सदैव जमिनीवरच ठेवणारे, दीर्घदृष्टीचे नेते म्हणून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होते. एखाद्या सर्वोच्च नेत्याला स्तुतिपाठक भरपूर मिळतील. लोकमान्यता मिळेल, पण सरदारांना त्यांच्या माघारी त्यांचे राजकारण आणि संघटना बांधणीमागचे सूत्र समजून सांगणारे आणि त्याचे समर्थन करणारे अनुयायी मिळाले. काँग्रेस संघटनेवरील त्यांची विलक्षण पकड, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्या कारणांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान नेत्यांच्या तुलनेत सरदार यांना अधिक निष्ठावंत अनुयायी मिळाले. पण या अनुयायांच्या मनात सरदार यांच्याविषयी काही ठाम समज आहेत. ते असे की सरदार यांच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात अन्याय झाला. म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाचा मान चालून आला असताना, तो स्वीकारण्याची पूर्ण तयारी झाली असताना सरदारांना त्या पदापासून दूर जावे लागले. अध्यक्षपदाचा प्याला सरदार यांच्या ओठांपासून दूर करण्यात आला. पण ‘असे झाले असते तर वा तसे झाले असते तर’ अशा वाक्यांना तथ्यावर आधारलेल्या इतिहासलेखनात किंमत नसते वा जागा नसते. नेमका हाच मोह आवरून ज्येष्ठ गुजराती साहित्यिक दिनकर जोशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर ‘महामानव सरदार पटेल’ ही कादंबरी लिहिली आहे. म्हणजे ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेली ही कादंबरी आहे. म्हणजे जोशी यांनी सरदार यांच्यातील ‘सरदारत्व’ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या मते १९२८ च्या बारडोली लढ्याने वल्लभभाई पटेल यांना सरदार बनवले आणि त्यानंतर सरदारांचे काँग्रेस संघटनेतील महत्त्व असाधारण राहिले. परंतु लेखकाने या पुस्तकात सरदारांविषयी लिहिण्याऐवजी सरदारात्वाविषयी लिहिले आहे. या कादंबरीत १९४५ ते १९५० च्या दरम्यानच्या सरदारांच्या आयुष्यातील घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कादंबरीला सुरुवात होण्याआधी लेखकाने सरदार आणि नेहरू यांच्यातील सुप्त संघर्षाची उदाहरणे दिली आहेत. तरीही सरदारांचे व्यक्तिचित्र कुठेही एककल्ली होणार नाही किंवा ते कोणाचे विरोधक होते, असा वाचकांचा समज होईल, असा कोणताही संदर्भ त्यांनी आत येऊ दिलेला नाही. पहिल्या भागात कादंबरीची सुरुवात महात्मा गांधींनी फाळणीला मान्यता दिल्याच्या घटनेने होते. फाळणीच्या वार्तेने सरहद्द गांधी एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. त्यांना समजावण्यासाठी गांधी तिथे जातात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. तेव्हा सरहद्द गांधी असे उद्गारतात की, बापू आम्हाला लांडग्यांच्या तावडीत दिलंत! केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर दिल्लीतील उद्योगपती बनवारीलाल सरदारांना भेटतात आणि मंत्री असूनही अद्याप कारभारासाठी सरकारी निवासस्थान न मिळालेल्या सरदारांना ते स्वत:चा औरंगजेब रोडवरील बंगला कार्यालयासाठी देतात. उद्योगपती बनवारीलाल यांना भारतीय राजकारणात रस निर्माण झाला होता आणि मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. या एका घटनेतून असे प्रतीत होते की, उद्योगपतींनी राजकारणात रस घेतला होता तो देशाच्या हितासाठी. समाजकारणासाठी. त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. या कादंबरीतील सर्वच घटनांमधून लेखकाने हेच दाखवून दिले आहे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीपासूनच लोकांच्या मनात ‘पंतप्रधान’ असलेले जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. अगदी तीव्र मतभेद होते. परंतु त्याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर कोणताही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. प्रश्नाकडे क्षमाशील औदार्याने पाहिले पाहिजे आणि नवे वातावरण निर्माण होईल अशी भाषा वापरली पाहिजे, यावर साऱ्याच नेत्यांचे एकमत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात जवाहरलाल यांच्याबद्दल किती आदर होता, हा प्रसंग या कादंबरीत आहे. फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले हाय कमिशनर म्हणून नियुक्त झालेले श्रीप्रकाश सरदारांच्या भेटीला येतात. फाळणीनंतर पाकिस्तानच्या दोन्ही भागांतून चिंताजनक बातम्या येत होत्या. हजारो निर्दोष आणि बिगरमुसलमानांच्या अगदी ठरवून कत्तली केल्या जात होत्या. काश्मीर गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं युद्ध आरंभलं होतं. श्रीप्रकाशांना याबद्दल काय माहीत आहे हे सरदारांना जाणून घ्यायचं होतं, ठरल्यानुसार श्रीप्रकाश अगदी वेळेवर आले. सरदारांनी विचारलं, ‘श्रीप्रकाश, लियाकत सरकार दंगे रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय असं वाटतंय का तुम्हाला?’ ‘अजिबात नाही, श्रीप्रकाश म्हणाले.’ ‘असं असेल तर मग काश्मीर प्रश्नावर जीनांनी जे युद्ध पुकारलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ ‘काय वाटेल ते झालं तरी स्वत:चा अंकुश टिकवून ठेवण्यासाठी जीना प्रसंगी कोणताही धोका पत्कारायला मागेपुढे पाहणार नाहीत. काश्मीर मिळविण्यापेक्षासुद्धा हिंदुस्थानला जास्तीत जास्त अडचणीत आणण्यात जीनांना अडचणीत आणण्यात जीनांना अधिक स्वारस्य आहे.’ ‘ते तुम्हाला कसं कळलं श्रीप्रकाश? मी भेटलो होतो जीनांना, लियाकत आणि त्यांचे साथीदार, त्या सगळ्यांबद्दल जीनांच्या मनात तीव्र असंतोष दाटलाय. मुंबईतल्या मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्याची काळजी घ्यायला त्यांनी मला खास सांगितलं आहे.’ ‘हे! हे सगळं तुम्ही पंतप्रधान जवाहरलालांना सांगितलंत?’ ‘हो,’ श्रीप्रकाश उत्तरले, ‘पण जवाहरलाल हे मुळीच मान्य करायला तयार नाहीत. काश्मीर प्रकरणात सगळं काही आपल्या नियंत्रणाखाली आहे आणि पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांचं रक्षण करायला लियाकत सक्षम आहेत, असं त्यांना वाटतं. माफ करा सरदार. पण मला वाटतं जवाहरलाल खोटारडे आहेत. खोटं बोलतात ते!’ तसं नाहीय श्रीप्रकाश जवाहरलाल खोटारडे (liar) नाहीत, तर चुकीचं (untrue) बोलणारे आहेत. त्यांना याविषयीची माहिती पुरविणारे चुकीची माहिती पुरवत आहेत. म्हणून नेहरू चुकीचे बोलत आहेत. ते खोटारडे नाहीत... असे अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. सरदार पटेलांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील केवळ पाच वर्षांच्या कालावधीतील प्रसंग केंद्रस्थानी ठेवून त्यातून प्रकटणाऱ्या सरदार या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. हे करताना लेखक दिनेश जोशी यांनी स्वत:मधील कादंबरीकाराला इतिहासावर स्वार होऊ दिलेले नाही. या पुस्तकात जोशी यांची कथनशैली वाचकाला इतिहासात नेते. काळाच्या ओघात काही उजेडात न आलेल्या गोष्टी या पुस्तकातून उलगडत जातात. हे पुस्तक एकाच वेळी गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. –गोविंद डेगवेकर ...Read more

  • Rating Starदिव्य मराठी १५ जून १८

    वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर `महामानव सरदार पटेल` ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. सुरुवातीला महात्मा गांधींच्या राजकीय नीतीला नावं ठेवणारे सरदार नंतर गांधीजींच्याच प्रभावाने राजकारणात आले. बारडोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाईंना `सरदार` अशी ओळख मिळवून दिली. गांधी आणि सरदार यांच्यातील नातं गुरू-शिष्याचं होतं. काही वेळेला सहमत नसतानाही वल्लभभाईंनी गांधींचे निर्णय शिरोधार्य मानले. `खिलाफत` चळवळीला वल्लभभाईंचा विरोध असतानाही त्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या बाजूने ते उभे राहिले. १९४६मध्ये दोन महत्त्वाच्या घटना वल्लभभाईंच्या जीवनात घडल्या. याच वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसच्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांनी अध्यक्ष म्हणून पटेलांचं नाव सुचवलं होतं; तोच अध्यक्ष पंतप्रधान होणार, हे नक्की होतं; पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंचं नाव सुचवल्यामुळे वल्लभभाईंनी पंतप्रधानपद नाकारलं. केवळ पटेलांच्या राजकीय जीवनालाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही कलाटणी देणारी ही घटना होती. याच वर्षी घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय नौदलातील हिंदी सैनिकांनी, ब्रिटिशांनी चालवलेल्या वर्णद्वेषामुळे बंडाचे निशाण उभारले. हातात बंदुका घेतल्या आणि तोफांची तोंडं फिरवली; पण वल्लभभाईंनी त्यांची समजूत घालून ते बंड शमवलं. वल्लभभाईंचं हे कामही फार महत्त्वाचं आहे; कारण हे बंड जर शमवलं गेलं नसतं तर हातातोंडाशी आलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीत अडसर निर्माण झाला असता. मुस्लिम लीगने गृहमंत्रिपद मागितलं होतं; पण पंतप्रधानपदावर पाणी सोडलेल्या वल्लभभाईंनी गृहमंत्रिपद सोडण्यास मात्र ठाम नकार दिला. त्यांचा हाही निर्णय नंतर झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय विधायक ठरला. वल्लभभाईंची आणखी एक कामगिरी देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, ती म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण. हे कार्य जर वल्लभभाईंंनी केलं नसतं तर भारताचं शेकडो विभागांमध्ये विभाजन झालं असतं. वल्लभभाईंंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांची नेताजी सुभाषचंद्रांशी वैचारिक जवळीक होती. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी सुभाषबाबूंसाठी सव्वा लाख रुपयांची तरतूद केली होती; पण विठ्ठलभाईंच्या निधनानंतर वल्लभभाईंनी यासंदर्भात कोर्टात केस दाखल केली आणि विठ्ठलभाईंच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून ते पैसे काँग्रेस समितीला देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. वल्लभभाई ही केस जिंकले; पण त्यांच्यात आणि सुभाषबाबूंमध्ये त्यामुळे वितुष्ट आलं. काँग्रेस समितीचे इतर सदस्यही सुभाषबाबूंच्या विरोधात होते. त्यामुळे सुभाषबाबू काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर वल्लभभाईंंसह सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९३९मध्ये ब्रिटनने भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील करून घेतलं. काँग्रेसला हे अमान्य असल्यामुळे एकूण काँग्रेसी मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. अर्थात वल्लभभाईंंना राजीनामा द्यावा लागला तरी राजीनाम्याच्या आदेशपत्राशी ते सहमत नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असताना चीनविषयी धोक्याचा इशारा त्यांनी जवाहरलाल नेहरूंना दिला होता; पण नेहरूंनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. थोडक्यात, समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दुराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले आणि भविष्याच्या दृष्टीनेही लाभकारक ठरले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर ४१ वर्षांनी त्यांना `भारतरत्न` देऊन घेतली. सरदारांच्या जीवनातील महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्याने चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चरित्राला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यांनाही पटेलांच्या चरित्राच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भ माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला अनुवाद उत्तम. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 07-01-2018

    कर्मयोगी संन्यासी... गुजराथी भाषेतील ख्यातनाम लेखक दिनकर जोषी यांनी नवभारताचे शिल्पकार आणि निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर लिहिलेली ‘महामानव सरदार’ ही कादंबरी गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषात एकाचवेळी प्रसिद्ध झाली. सरदार पटेल यांच्या तयागी जीवनाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी सुलभपणे केला आहे. सरदार पटेल यांच्या जीवनातील अंतिम पाच वर्षांच्या कालावधीचे चित्रण असलेल्या याच महत्त्वपूर्ण कालखंडाने जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. ब्रिटिशांनी भारत सोडून जायचा निर्णय घेतल्यावर, स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आलेल्या अनेक समस्या सोडवत ब्रिटिशांनी घातलेले राजकीय कोलदांडे तेव्हा उपपंतप्रधान आणि गृहमंत्री असलेल्या वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कठोरपणे मोडून काढत फाळणीनंतरचा भारत निर्धाराने अखंड केला. देशातल्या संस्थानांचे विलीनीकरण घडवताना राजकोटचा दिवाण वीर बाळा, जुनागडचे नबाब आणि हैद्राबादचा कासिम रझवी यांच्या फुटीरतावादी कारवायाही मोडून काढल्या. ही कादंबरी वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राला समर्पित केलेल्या जीवनाचा वेध घेणारी असल्यामुळेच ती पटेल यांच्या जीवनाबाबत फारशा माहिती नसलेल्या घटनांवरही प्रकाशझोत टाकते. वाचकांना अज्ञात असलेल्या अनेक घटना जोषी यांच्या या कादंबरीमुळेच देशवासीयांसमोर आल्या आहेत. सरदार पटेल यांच्या जीवनावरची ही कादंबरी असली, तरी या कलाकृतीचे लेखन करताना जोषी यांनी इतिहासाची मोडतोड तर केलेली नाहीच उलट खरा इतिहास अनेक घटनांद्वारे अत्यंत ओघवत्या शब्दात लिहिला आहे. पटेल यांच्या ऐतिहासिक आणि युगप्रवर्तक, राष्ट्रसंजीवक कार्याचा सन्मान काँग्रेसच्या केंद्र सरकारने केला नाही. उलट त्यांच्या स्मृती संपवायचाच प्रयत्न केला. नेहरूंनी जिवंतपणीच १९५४ मध्ये आपल्यालाच भारतरत्न किताब अर्पण करून घेतला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे तैलचित्र संसदेत लावले गेले. पण पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावावे, असे नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले नाही. ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावण्याची व्यवस्था केली. आपल्या खर्चाने हे चित्र तयार करून घेतले आणि तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावले. त्या कार्यक्रमात पटेल यांना श्रद्धांजली वाहताना शिंदे यांनी म्हटले होते. "Here is the man whom I once hated. Here is the man of whom I was afraid. Here is the man whom I admire and love." स्वातंत्र्योदयाच्या प्रारंभकाळी सरदारांवर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपलं अस्तित्व संपुष्टात आणलं आणि ज्यांना सरदारांनी दिलेलं तनख्याचे पवित्र वचन केवळ दोनच दशकात ते निरर्थक करून टाकले. प्रजा म्हणून आपल्या त्या सामूहिक पापाच्या प्रायश्चितार्थ हे पुस्तक देशी संस्थानिकांच्या इतिहासाला अर्पण करीत आहे, अशा शब्दात जोषी यांनी अर्पण पत्रिका लिहिली आहे आणि ते वास्तवही आहे. संस्थानिकांचे तनखे विलीन करीत आपण गरिबांचे तारणहार आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या, केंद्रातल्या- राज्यातल्या सत्तेवर एक काळ मिरासदारी-जहागीरदारी निर्माण करणाऱ्या काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून शेकडो-हजारो कोटी रुपयांची साम्राज्ये निर्माण केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोषी यांची खंत वास्तवच ठरते. –वासुदेव कुलकर्णी ...Read more

  • Rating Starरसिक साहित्य जानेवारी, २०१८

    सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण गुजराथी भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चारित्र्यांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवद केला आहे. बेचाळीसाव्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला १९४५-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. कादंबरीत या संघर्षमय कालखंडाचं चित्रण प्राधान्याने करण्यात आलं आहे. समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दूराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळेच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे आणि भविष्याच्या दृष्टीने लाभकारक ठरले. उदाहरणार्थ, नौदलांच्या सैनिकांचं शमवलेलं बंड, संस्थानांचं विलीनीकरण, गृहमंत्री पदावरून न हटण्याचा निश्चय अशा त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल भारत सरकारनं त्यांच्या मृत्यू नंतर ४१ वर्षांनी त्यांना भारत रत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. उशिरा का होईना त्यांच्या कार्याचं स्मरण भारत सरकारला झालं म्हणून आनंद मानायचा का त्यांच्या कार्याचं महत्त्व इतक्या उशिरा आपल्या राज्यकत्र्यांच्या लक्षात आल्याबद्दल खेद वाटून घ्यायचा हा प्रश्चन आहे. तर सरदारांच्या जीवनाला रूढार्थानं न भिडता त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चारित्र्याला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं; तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्व सामान्यांनाही वल्लभभाई पटेलांच्या चारित्र्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भात्मक माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला उत्तम अनुवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more