* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHRI DINKAR JOSHI IS NOW A FAMILIAR AND WELL-KNOWN NAME FOR READERS OF MARATHI LITERATURE. DINKAR JOSHI PIONEERED THE INTRODUCTION AND ESTABLISHMENT OF THE GENRE OF BIOGRAPHICAL FICTION INTO THE WORLD OF GUJARATI LITERATURE. HE HAS FICTIONALIZED THE LIVES OF VARIOUS MEN OVER DIFFERENT TIME PERIODS, EACH WITH THEIR DISTINCTIVE STYLES AND PERSONALITIES, SUCH AS ACHARYADRONA, TATHAGATHA BUDDHA, GURUDEV RABINDRANATH TAGORE, KAVI NARMAD, MOHAMMED ALI JINNAH AND MAHATMA GANDHI’S SON ,HARILAL GANDHI . IN “MAHAMANAV”, THE READER GETS A DETAILED GLIMPSE INTO THE LIFE WORK OF SARDAR VALLABHBHAI PATEL. A SUCCESSFUL BARRISTER, SARDAR PATEL WAS ONLY DISTANTLY AWARE OF THE INDIAN POLITICAL SCENE TILL THE AGE OF 42. SPELLBOUND BY MAHATMA GANDHI’S TOWERING PERSONALITY, HE ENTERED POLITICS. AFTER DOING SO, HE DEVOTED HIS LIFE TO THE INDIAN FREEDOM STRUGGLE AND INDIAN POLITICS. THE WRITER HAS WELL CHARACTERIZED HIM AS A LOVING FATHER, RESPONSIBLE BROTHER, UPRIGHT FEARLESS POLITICIAN AND PRINCIPLED LEADER THROUGH VARIOUS INCIDENTS IN THE NARRATIVE. DINKAR JOSHI HAS SUCCINCTLY CAPTURED THE VARIOUS FACETS OF HIS PERSONALITY AND RENDERED TO THE READER A NARRATIVE WHICH DEFINES A MULTI-TALENTED MAN, A MAN WHO HAD A KEEN INSIGHT INTO THE NATIONAL AND GLOBAL SOCIO-POLITICAL CLIMATES, AND A PASSIONATE ZEAL FOR THE BETTERMENT OF HIS NATION AND FELLOW INDIANS. JOSHI GIVES US A CLEAR PICTURE OF THE MAN WHO VERY WELL DESERVED THE TITLE “ MAN OF IRON” – A TITLE THAT WAS SEEMINGLY AT ODDS WITH HIS VERY SENSITIVE NATURE BELYING HIS FORMIDABLE ‘IRON CLAD’ EXTERIOR. SARDAR PATEL WAS COMPLETELY AWARE AND CONVINCED THAT UNLESS ALL THE 562 PRINCELY STATES IN POST PARTITION INDIA ACCEDED INTO THE UNION, THERE COULD BE NO ONE AND FREE INDIAN NATION. THE SUCCESSFUL ACCESSION OF ALL THE PRINCIPALITIES INTO FREE AND UNITED INDIA WAS THE BRIGHTEST FEATHER IN THE SARDAR’S CAP. DINKAR JOSHI HAS SUPERBLY CAPTURED THIS NARRATIVE OF THE VARIOUS MEANS PATEL EMPLOYED IN ORDER TO CAJOLE, COAX AND AT TIMES SHOW GREAT DIPLOMACY , TACT AND PRINCIPLED RIGOUR WHILE BRINGING ABOUT THE ACCESSION OF ALL PRINCELY STATES INTO THE UNION. ON MANY OCCASIONS IN THE NARRATIVE, DINKAR JOSHI HAS CREATIVELY DEPICTED SARDAR PATEL’S DIFFERENCE OF OPINIONS WITH BOTH JAWAHARLAL NEHRU AND MAHATMA GANDHI, AND HOW THOSE DIFFERING IDEOLOGICAL POSITIONS NEVER IMPACTED HIS TRUE AND GENUINE PERSONAL RELATIONS WITH EITHER OF THE TWO MEN. THE EASE WITH WHICH HE RELINQUISHED A SURE AND CERTAIN PRIME-MINISTERSHIP AT MAHATMA GANDHI’S BEHEST IS PROOF OF HIS DEPTH OF CHARACTER. DINKAR JOSHI HAS HITHERTO PORTRAYED HISTORICAL-BIOGRAPHICAL FICTIONALIZED NARRATIVES OF MOHAMMED ALI JINNAH IN “ PRATINAYAK” AND HARILAL GANDHI IN “PRAKASHACHISAWLI”. “MAHAMANAV” IS JUST SUCH A WORK OF BIOGRAPHICAL FICTION.
श्री. दिनकर जोषी यांचे नाव मराठी वाचकांच्या परिचयाचे झाले आहे. ‘चरित्रात्मक कादंबरी’ हा साहित्यप्रकार गुजराती साहित्यविश्वात त्यांनी प्रथमच आणला आणि रूढ केला असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. आचार्य द्रोण, तथागत बुद्ध, गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूर, कवी नर्मद, महंमद अली जीना, महात्मा गांधीपुत्र हरिलाल गांधी अशा वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या स्वभावप्रकृतीच्या व्यक्तींचे कादंबरीच्या आकृतिबंधातून केलेले चरित्रचित्रण मराठी वाचकांनी यापूर्वी अनुभवलेले आहे. महामानव कादंबरीतून त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचे जीवितकार्य वाचकांपुढे ठेवले आहे. यशस्वी बॅरिस्टर असलेल्या वल्लभभाई झवेरभाई पटेलांचा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षापर्यंत भारतातील राजकारणाशी दुरून परिचय होता; परंतु थेट संबंध आला नव्हता. गांधीजींच्या प्रभावी व्याQक्तमत्त्वाने भारावून जाऊन ते काहीशा अनपेक्षितपणे राजकारणात उतरले. त्यानंतर मात्र त्यांनी तनमनधनाने भारतासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्यातला प्रेमळ पिता, कर्तव्यदक्ष बंधू, कणखर, निर्भीड राजकारणी, तत्त्वनिष्ठ नेता लेखकाने विविध प्रसंगांतून रंगवला आहे. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक परिाQस्थतीची त्यांची विलक्षण जाण, देशबांधवांसाठीची आणि देशाच्या कल्याणासाठीची आंतरिक तळमळ, गांधीजींच्या ठायी असलेली त्यांची निष्ठा आणि त्यातून आलेला, त्यांच्या ‘लोहपुरुष’ प्रतिमेशी वरकरणी सुसंगत न वाटणारा अति हळवेपणा यांचे अत्यंत प्रभावी चित्रण लेखकाने केले आहे. फाळणी स्वीकारून मिळालेल्या विभाजित भूभागातून सार्वभौम भारत राष्ट्राची निर्मिती होणे शक्य नाही; देशभर विखुरलेली ५६२ संस्थाने जोपर्यंत स्वतंत्र भारतात विलीन होत नाहीत, तोपर्यंत भारत हा एकसंध देश, एक राष्ट्र म्हणून कधीच आQस्तत्वात येऊ शकणार नाही, या गोष्टीचे त्यांना सर्वांगीण भान होते. संस्थानांचे विलीनीकरण हा त्यांच्या कार्यातील मानाचा तुरा ठरला. या विलीनीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, अमलात आणलेले डावपेच, दाखवलेला मुत्सद्दीपणा, धोरणी दीर्घदृष्टी, प्रसंगी कारवाई करण्याचे त्यांचे धाडस इत्यादी पैलू लेखकाने निरनिराळ्या प्रसंगांतून सविस्तरपणे वर्णिले आहेत. जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांच्याशी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरदारांचे तात्विक मतभेद झाले असले, तरी या दोघांविषयीचा त्यांचा आंतरिक जिव्हाळा किती सच्चा होता, हे लेखकाने अनेक प्रसंगांतून चित्रित केले आहे. हातातोंडाशी आलेला पंतप्रधानकीचा प्याला गांधीजींच्या इच्छेखातर त्यांनी अत्यंत सहजपणे सोडून दिला, हे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याला साजेसेच होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#MAHAMANAVSARDARPATEL#DINKARJOSHI#BRITISHINDIA#ROYALINDIAN NAVY#POLITICALDEPARTMENT#BIRLA HOUSE# CENTRALLEGISLATIVEASSEMBLY#CABINETMISSIONPLAN#BENNWEDGWOOD#CONRADCORFIELD#
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 30-11-2018

    ‘सरदारत्वा’ची साकल्याने मांडणी... सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत वास्तववादी, व्यवहारवादी आणि स्पष्टव्यक्ते होते. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतांचे गुण नव्हते, असा त्याचा अर्थ नाही. पण त्यांचे निष्ठावंत अनुयायी त्यांना सरदार म्हणत. महात्मा वा मामानव असे म्हणत नसत. याचा अर्थ कोमल असूनही कठोर, तत्त्वनिष्ठ, उत्तुंग व्यक्तिमत्त्व असूनही पाय सदैव जमिनीवरच ठेवणारे, दीर्घदृष्टीचे नेते म्हणून ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होते. एखाद्या सर्वोच्च नेत्याला स्तुतिपाठक भरपूर मिळतील. लोकमान्यता मिळेल, पण सरदारांना त्यांच्या माघारी त्यांचे राजकारण आणि संघटना बांधणीमागचे सूत्र समजून सांगणारे आणि त्याचे समर्थन करणारे अनुयायी मिळाले. काँग्रेस संघटनेवरील त्यांची विलक्षण पकड, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्या कारणांमुळेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान नेत्यांच्या तुलनेत सरदार यांना अधिक निष्ठावंत अनुयायी मिळाले. पण या अनुयायांच्या मनात सरदार यांच्याविषयी काही ठाम समज आहेत. ते असे की सरदार यांच्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात अन्याय झाला. म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाचा मान चालून आला असताना, तो स्वीकारण्याची पूर्ण तयारी झाली असताना सरदारांना त्या पदापासून दूर जावे लागले. अध्यक्षपदाचा प्याला सरदार यांच्या ओठांपासून दूर करण्यात आला. पण ‘असे झाले असते तर वा तसे झाले असते तर’ अशा वाक्यांना तथ्यावर आधारलेल्या इतिहासलेखनात किंमत नसते वा जागा नसते. नेमका हाच मोह आवरून ज्येष्ठ गुजराती साहित्यिक दिनकर जोशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर ‘महामानव सरदार पटेल’ ही कादंबरी लिहिली आहे. म्हणजे ऐतिहासिक तथ्यांवर आधारलेली ही कादंबरी आहे. म्हणजे जोशी यांनी सरदार यांच्यातील ‘सरदारत्व’ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाच्या मते १९२८ च्या बारडोली लढ्याने वल्लभभाई पटेल यांना सरदार बनवले आणि त्यानंतर सरदारांचे काँग्रेस संघटनेतील महत्त्व असाधारण राहिले. परंतु लेखकाने या पुस्तकात सरदारांविषयी लिहिण्याऐवजी सरदारात्वाविषयी लिहिले आहे. या कादंबरीत १९४५ ते १९५० च्या दरम्यानच्या सरदारांच्या आयुष्यातील घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कादंबरीला सुरुवात होण्याआधी लेखकाने सरदार आणि नेहरू यांच्यातील सुप्त संघर्षाची उदाहरणे दिली आहेत. तरीही सरदारांचे व्यक्तिचित्र कुठेही एककल्ली होणार नाही किंवा ते कोणाचे विरोधक होते, असा वाचकांचा समज होईल, असा कोणताही संदर्भ त्यांनी आत येऊ दिलेला नाही. पहिल्या भागात कादंबरीची सुरुवात महात्मा गांधींनी फाळणीला मान्यता दिल्याच्या घटनेने होते. फाळणीच्या वार्तेने सरहद्द गांधी एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. त्यांना समजावण्यासाठी गांधी तिथे जातात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात. तेव्हा सरहद्द गांधी असे उद्गारतात की, बापू आम्हाला लांडग्यांच्या तावडीत दिलंत! केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर दिल्लीतील उद्योगपती बनवारीलाल सरदारांना भेटतात आणि मंत्री असूनही अद्याप कारभारासाठी सरकारी निवासस्थान न मिळालेल्या सरदारांना ते स्वत:चा औरंगजेब रोडवरील बंगला कार्यालयासाठी देतात. उद्योगपती बनवारीलाल यांना भारतीय राजकारणात रस निर्माण झाला होता आणि मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. या एका घटनेतून असे प्रतीत होते की, उद्योगपतींनी राजकारणात रस घेतला होता तो देशाच्या हितासाठी. समाजकारणासाठी. त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. या कादंबरीतील सर्वच घटनांमधून लेखकाने हेच दाखवून दिले आहे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीपासूनच लोकांच्या मनात ‘पंतप्रधान’ असलेले जवाहरलाल नेहरू यांच्यात आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात मतभेद होते. अगदी तीव्र मतभेद होते. परंतु त्याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीवर कोणताही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. प्रश्नाकडे क्षमाशील औदार्याने पाहिले पाहिजे आणि नवे वातावरण निर्माण होईल अशी भाषा वापरली पाहिजे, यावर साऱ्याच नेत्यांचे एकमत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात जवाहरलाल यांच्याबद्दल किती आदर होता, हा प्रसंग या कादंबरीत आहे. फाळणीनंतर पाकिस्तानचे पहिले हाय कमिशनर म्हणून नियुक्त झालेले श्रीप्रकाश सरदारांच्या भेटीला येतात. फाळणीनंतर पाकिस्तानच्या दोन्ही भागांतून चिंताजनक बातम्या येत होत्या. हजारो निर्दोष आणि बिगरमुसलमानांच्या अगदी ठरवून कत्तली केल्या जात होत्या. काश्मीर गिळंकृत करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं युद्ध आरंभलं होतं. श्रीप्रकाशांना याबद्दल काय माहीत आहे हे सरदारांना जाणून घ्यायचं होतं, ठरल्यानुसार श्रीप्रकाश अगदी वेळेवर आले. सरदारांनी विचारलं, ‘श्रीप्रकाश, लियाकत सरकार दंगे रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतंय असं वाटतंय का तुम्हाला?’ ‘अजिबात नाही, श्रीप्रकाश म्हणाले.’ ‘असं असेल तर मग काश्मीर प्रश्नावर जीनांनी जे युद्ध पुकारलंय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ ‘काय वाटेल ते झालं तरी स्वत:चा अंकुश टिकवून ठेवण्यासाठी जीना प्रसंगी कोणताही धोका पत्कारायला मागेपुढे पाहणार नाहीत. काश्मीर मिळविण्यापेक्षासुद्धा हिंदुस्थानला जास्तीत जास्त अडचणीत आणण्यात जीनांना अडचणीत आणण्यात जीनांना अधिक स्वारस्य आहे.’ ‘ते तुम्हाला कसं कळलं श्रीप्रकाश? मी भेटलो होतो जीनांना, लियाकत आणि त्यांचे साथीदार, त्या सगळ्यांबद्दल जीनांच्या मनात तीव्र असंतोष दाटलाय. मुंबईतल्या मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्याची काळजी घ्यायला त्यांनी मला खास सांगितलं आहे.’ ‘हे! हे सगळं तुम्ही पंतप्रधान जवाहरलालांना सांगितलंत?’ ‘हो,’ श्रीप्रकाश उत्तरले, ‘पण जवाहरलाल हे मुळीच मान्य करायला तयार नाहीत. काश्मीर प्रकरणात सगळं काही आपल्या नियंत्रणाखाली आहे आणि पाकिस्तानच्या अल्पसंख्याकांचं रक्षण करायला लियाकत सक्षम आहेत, असं त्यांना वाटतं. माफ करा सरदार. पण मला वाटतं जवाहरलाल खोटारडे आहेत. खोटं बोलतात ते!’ तसं नाहीय श्रीप्रकाश जवाहरलाल खोटारडे (liar) नाहीत, तर चुकीचं (untrue) बोलणारे आहेत. त्यांना याविषयीची माहिती पुरविणारे चुकीची माहिती पुरवत आहेत. म्हणून नेहरू चुकीचे बोलत आहेत. ते खोटारडे नाहीत... असे अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. सरदार पटेलांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील केवळ पाच वर्षांच्या कालावधीतील प्रसंग केंद्रस्थानी ठेवून त्यातून प्रकटणाऱ्या सरदार या कादंबरीतील हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले आहे. हे करताना लेखक दिनेश जोशी यांनी स्वत:मधील कादंबरीकाराला इतिहासावर स्वार होऊ दिलेले नाही. या पुस्तकात जोशी यांची कथनशैली वाचकाला इतिहासात नेते. काळाच्या ओघात काही उजेडात न आलेल्या गोष्टी या पुस्तकातून उलगडत जातात. हे पुस्तक एकाच वेळी गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. –गोविंद डेगवेकर ...Read more

  • Rating Starदिव्य मराठी १५ जून १८

    वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर `महामानव सरदार पटेल` ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चरित्रांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. ४२व्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील १९४-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. सुरुवातीला महात्मा गांधींच्या राजकीय नीतीला नावं ठेवणारे सरदार नंतर गांधीजींच्याच प्रभावाने राजकारणात आले. बारडोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाईंना `सरदार` अशी ओळख मिळवून दिली. गांधी आणि सरदार यांच्यातील नातं गुरू-शिष्याचं होतं. काही वेळेला सहमत नसतानाही वल्लभभाईंनी गांधींचे निर्णय शिरोधार्य मानले. `खिलाफत` चळवळीला वल्लभभाईंचा विरोध असतानाही त्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या बाजूने ते उभे राहिले. १९४६मध्ये दोन महत्त्वाच्या घटना वल्लभभाईंच्या जीवनात घडल्या. याच वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी काँग्रेसच्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांनी अध्यक्ष म्हणून पटेलांचं नाव सुचवलं होतं; तोच अध्यक्ष पंतप्रधान होणार, हे नक्की होतं; पण गांधींनी जवाहरलाल नेहरूंचं नाव सुचवल्यामुळे वल्लभभाईंनी पंतप्रधानपद नाकारलं. केवळ पटेलांच्या राजकीय जीवनालाच नव्हे तर भारताच्या इतिहासालाही कलाटणी देणारी ही घटना होती. याच वर्षी घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारतीय नौदलातील हिंदी सैनिकांनी, ब्रिटिशांनी चालवलेल्या वर्णद्वेषामुळे बंडाचे निशाण उभारले. हातात बंदुका घेतल्या आणि तोफांची तोंडं फिरवली; पण वल्लभभाईंनी त्यांची समजूत घालून ते बंड शमवलं. वल्लभभाईंचं हे कामही फार महत्त्वाचं आहे; कारण हे बंड जर शमवलं गेलं नसतं तर हातातोंडाशी आलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीत अडसर निर्माण झाला असता. मुस्लिम लीगने गृहमंत्रिपद मागितलं होतं; पण पंतप्रधानपदावर पाणी सोडलेल्या वल्लभभाईंनी गृहमंत्रिपद सोडण्यास मात्र ठाम नकार दिला. त्यांचा हाही निर्णय नंतर झालेल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय विधायक ठरला. वल्लभभाईंची आणखी एक कामगिरी देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली, ती म्हणजे संस्थानांचं विलीनीकरण. हे कार्य जर वल्लभभाईंंनी केलं नसतं तर भारताचं शेकडो विभागांमध्ये विभाजन झालं असतं. वल्लभभाईंंचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल यांची नेताजी सुभाषचंद्रांशी वैचारिक जवळीक होती. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्यांनी सुभाषबाबूंसाठी सव्वा लाख रुपयांची तरतूद केली होती; पण विठ्ठलभाईंच्या निधनानंतर वल्लभभाईंनी यासंदर्भात कोर्टात केस दाखल केली आणि विठ्ठलभाईंच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून ते पैसे काँग्रेस समितीला देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. वल्लभभाई ही केस जिंकले; पण त्यांच्यात आणि सुभाषबाबूंमध्ये त्यामुळे वितुष्ट आलं. काँग्रेस समितीचे इतर सदस्यही सुभाषबाबूंच्या विरोधात होते. त्यामुळे सुभाषबाबू काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर वल्लभभाईंंसह सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला. त्यामुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९३९मध्ये ब्रिटनने भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील करून घेतलं. काँग्रेसला हे अमान्य असल्यामुळे एकूण काँग्रेसी मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. अर्थात वल्लभभाईंंना राजीनामा द्यावा लागला तरी राजीनाम्याच्या आदेशपत्राशी ते सहमत नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गृह खात्याची जबाबदारी सांभाळत असताना चीनविषयी धोक्याचा इशारा त्यांनी जवाहरलाल नेहरूंना दिला होता; पण नेहरूंनी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. थोडक्यात, समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दुराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे ठरले आणि भविष्याच्या दृष्टीनेही लाभकारक ठरले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची दखल भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर ४१ वर्षांनी त्यांना `भारतरत्न` देऊन घेतली. सरदारांच्या जीवनातील महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्याने चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चरित्राला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्वसामान्यांनाही पटेलांच्या चरित्राच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भ माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला अनुवाद उत्तम. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 07-01-2018

    कर्मयोगी संन्यासी... गुजराथी भाषेतील ख्यातनाम लेखक दिनकर जोषी यांनी नवभारताचे शिल्पकार आणि निर्माते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर लिहिलेली ‘महामानव सरदार’ ही कादंबरी गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषात एकाचवेळी प्रसिद्ध झाली. सरदार पटेल यांच्या तयागी जीवनाचा वेध घेणाऱ्या या कादंबरीचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी सुलभपणे केला आहे. सरदार पटेल यांच्या जीवनातील अंतिम पाच वर्षांच्या कालावधीचे चित्रण असलेल्या याच महत्त्वपूर्ण कालखंडाने जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. ब्रिटिशांनी भारत सोडून जायचा निर्णय घेतल्यावर, स्वतंत्र भारताच्या निर्मितीत आलेल्या अनेक समस्या सोडवत ब्रिटिशांनी घातलेले राजकीय कोलदांडे तेव्हा उपपंतप्रधान आणि गृहमंत्री असलेल्या वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत कठोरपणे मोडून काढत फाळणीनंतरचा भारत निर्धाराने अखंड केला. देशातल्या संस्थानांचे विलीनीकरण घडवताना राजकोटचा दिवाण वीर बाळा, जुनागडचे नबाब आणि हैद्राबादचा कासिम रझवी यांच्या फुटीरतावादी कारवायाही मोडून काढल्या. ही कादंबरी वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्राला समर्पित केलेल्या जीवनाचा वेध घेणारी असल्यामुळेच ती पटेल यांच्या जीवनाबाबत फारशा माहिती नसलेल्या घटनांवरही प्रकाशझोत टाकते. वाचकांना अज्ञात असलेल्या अनेक घटना जोषी यांच्या या कादंबरीमुळेच देशवासीयांसमोर आल्या आहेत. सरदार पटेल यांच्या जीवनावरची ही कादंबरी असली, तरी या कलाकृतीचे लेखन करताना जोषी यांनी इतिहासाची मोडतोड तर केलेली नाहीच उलट खरा इतिहास अनेक घटनांद्वारे अत्यंत ओघवत्या शब्दात लिहिला आहे. पटेल यांच्या ऐतिहासिक आणि युगप्रवर्तक, राष्ट्रसंजीवक कार्याचा सन्मान काँग्रेसच्या केंद्र सरकारने केला नाही. उलट त्यांच्या स्मृती संपवायचाच प्रयत्न केला. नेहरूंनी जिवंतपणीच १९५४ मध्ये आपल्यालाच भारतरत्न किताब अर्पण करून घेतला. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे तैलचित्र संसदेत लावले गेले. पण पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावावे, असे नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटले नाही. ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन पटेल यांचे तैलचित्र संसदेत लावण्याची व्यवस्था केली. आपल्या खर्चाने हे चित्र तयार करून घेतले आणि तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावले. त्या कार्यक्रमात पटेल यांना श्रद्धांजली वाहताना शिंदे यांनी म्हटले होते. "Here is the man whom I once hated. Here is the man of whom I was afraid. Here is the man whom I admire and love." स्वातंत्र्योदयाच्या प्रारंभकाळी सरदारांवर श्रद्धा ठेवून ज्यांनी आपलं अस्तित्व संपुष्टात आणलं आणि ज्यांना सरदारांनी दिलेलं तनख्याचे पवित्र वचन केवळ दोनच दशकात ते निरर्थक करून टाकले. प्रजा म्हणून आपल्या त्या सामूहिक पापाच्या प्रायश्चितार्थ हे पुस्तक देशी संस्थानिकांच्या इतिहासाला अर्पण करीत आहे, अशा शब्दात जोषी यांनी अर्पण पत्रिका लिहिली आहे आणि ते वास्तवही आहे. संस्थानिकांचे तनखे विलीन करीत आपण गरिबांचे तारणहार आहोत असा डांगोरा पिटणाऱ्या, केंद्रातल्या- राज्यातल्या सत्तेवर एक काळ मिरासदारी-जहागीरदारी निर्माण करणाऱ्या काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून शेकडो-हजारो कोटी रुपयांची साम्राज्ये निर्माण केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोषी यांची खंत वास्तवच ठरते. –वासुदेव कुलकर्णी ...Read more

  • Rating Starरसिक साहित्य जानेवारी, २०१८

    सरदार पटेलांचं अभ्यासपूर्ण स्मरण गुजराथी भाषेत चरित्रांची संख्या कमी आहे. वल्लभभाई पटेलांच्या जीवनावर ‘महामानव सरदार पटेल’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहून दिनकर जोषींनी चारित्र्यांच्या दालनात भर घातली आहे. सुषमा शाळिग्राम यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवद केला आहे. बेचाळीसाव्या वर्षी राजकारणात आलेल्या वल्लभभाई पटेलांच्या जीवनातला १९४५-१९५० हा कालखंड संघर्षमय होता. कादंबरीत या संघर्षमय कालखंडाचं चित्रण प्राधान्याने करण्यात आलं आहे. समतोलपणे विचार करण्याची शक्ती असूनही अन्य महत्त्वाच्या लोकांच्या दूराग्रहामुळे, एककल्लीपणामुळे सरदारांना इच्छा असूनही स्वतंत्र भारताचं सुनिश्चित आणि चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित राहावं लागलं. एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही सरदारांनी घेतलेले काही निर्णय त्या त्या वेळेच्या परिस्थितीला सकारात्मक कलाटणी देणारे आणि भविष्याच्या दृष्टीने लाभकारक ठरले. उदाहरणार्थ, नौदलांच्या सैनिकांचं शमवलेलं बंड, संस्थानांचं विलीनीकरण, गृहमंत्री पदावरून न हटण्याचा निश्चय अशा त्यांच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल भारत सरकारनं त्यांच्या मृत्यू नंतर ४१ वर्षांनी त्यांना भारत रत्न देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. उशिरा का होईना त्यांच्या कार्याचं स्मरण भारत सरकारला झालं म्हणून आनंद मानायचा का त्यांच्या कार्याचं महत्त्व इतक्या उशिरा आपल्या राज्यकत्र्यांच्या लक्षात आल्याबद्दल खेद वाटून घ्यायचा हा प्रश्चन आहे. तर सरदारांच्या जीवनाला रूढार्थानं न भिडता त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या कालखंडाचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही चरित्रात्मक कादंबरी वाचनीय आणि अभ्यासनीय आहे. या चारित्र्याला कादंबरीचं स्वरूप जरी दिलं असलं; तरी इतिहासाशी प्रामाणिक राहूनच दिनकर जोषींनी लेखन केलं आहे. अभ्यासकांबरोबर सर्व सामान्यांनाही वल्लभभाई पटेलांच्या चारित्र्याच्या निमित्ताने भारतीय इतिहासातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी संदर्भात्मक माहिती मिळते. या पुस्तकाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी. सुषमा शाळिग्राम यांनी केलेला उत्तम अनुवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more