* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342201
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :MRUNALINI GADKARI BIRTHDAY OFFER-14 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK DONE BY BHAGINI NIVEDITA IN THE FIELD OF EDUCATION, LITERATURE, ARTS AND SPIRITUALITY IS ASTOUNDING. YET, MUCH OF IT IS STILL UNVEILED. HER SUPPORT TO THE ARMED REVOLUTION IS NOW COMING TO SURFACE. SWAMI VIVEKANANDA HAD HIMSELF HAD HER TESTED BEFORE ALLOWING HER TO SHOULDER THE RESPONSIBILITY OF WORK RELATED TO FREEDOM OF COUNTRY RATHER THAN BEING STUCK AT FREEDOM OF SELF. SHE DID NOT HESITATE TO EMBRACE THE WAY OF ARMED REVOLUTION. HER LOGISTIC SUPPORT HELPED INDIANS PROFUSELY IN THE FREEDOM FIGHT.
जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच ‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MARGARET ELIZABETH NOBEL# IRELAND# BANGAL# KOLKATA# SWAMIJI# BHAGINI# BRAMHO SAMAJ# SWAMI VIVEKANAND# NIVEDITA# RELIGION# EDUCATION# SHARDAMATA# HIMALAYA# AAMARNATH# LADY OF LAMP# VAJRA# KALI THE MOTHER# JAGADISHCHANDRA BASU# BODHGAYA
Customer Reviews
  • Rating StarKausthubh Nimbarte

    जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 31-08-2018

    क्रांतियोगिनी!... साहित्य, शिक्षण, कला, अध्यात्म या क्षेत्रातील एक अग्रणी आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या म्हणून भगिनी निवेदिता यांची ओळख आहे. त्या जन्माने आयरिश, नागरिकत्व ब्रिटिश, पण मनाने पूर्णत: भारतीय होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस््र क्रांतीला त्यांचे असलेले पाठबळ आजवर दुर्लक्षित राहिले किंवा फारसे समोर आले नाही. मात्र त्यांच्या अन्य कार्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील हे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असून भारतीय क्रांतिकारकांना नेहमीच त्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. अशा या अलौकिक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आणि कार्य मृणालिनी गडकरी यांनी ‘क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता’ या चरित्र ग्रंथातून उलगडले आहे. निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल. भारतात येण्यापूर्वी त्यांचा आयर्लण्डच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंद यांची भेट होण्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लेखक म्हणून नाव मिळवले होते. पण त्या समाधानी नव्हत्या. १८९५मध्ये स्वामी विवेकानंद यांचे लंडन येथे लेडी मार्गेसन यांच्या निवासस्थानी व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी मार्गेसन यांनी भगिनी निवेदिता यांनाही बोलावले होते. हे व्याख्यान ऐकून त्या प्रभावित झाल्या. पुढे स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने अमेरिका, न्यू यॉर्क, इंग्लड या ठिकाणी झाली. त्यांच्या प्रत्येक व्याख्यानाला भगिनी निवेदिता उपस्थित राहत होत्या. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हा उदार, कर्मकांडात गुंतून न पडणारा, जातिभेदापासून दूर असलेला, अन्य कोणत्याही धर्माचा अनादर न कराणारा, प्रगतिशील आणि राष्ट्रीयतेला प्राधान्य देणारा, नवीन जरूर शिकावे, पण जुन्याला तिलांजली देऊ नये असे सांगणारा होता. फक्त तरुणांनीच नव्हे तर स्त्रियांनीही या चळवळीत सहभागी होणे त्यांना अपेक्षित होते. स्वामी विवेकानंद यांची झालेली भेट, त्यांची ऐकलेली व्याख्याने यातून निवेदिता यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला वाहून घेण्याचा, त्याच्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. शंकरीप्रसाद बसू यांनी ‘निवेदिता लोकमाता’ या पाच खंडात्मक चरित्र ग्रंथात निवेदिता यांच्या क्रांतिकार्याबाबतचे ठोस पुरावे दिले आहेत. निवेदिता यांनी लिहिलेली पत्रे दोन खंडांत बसू यांनी प्रकाशित केली. या पत्रांशिवाय बसू यांना सुमारे १०० पत्रे मिळाली होती. यातील अर्धवट जळालेली किंवा फाडलेली पत्रे त्यांनी प्रकाशित केली नाहीत. मात्र त्याचा योग्य तो उपयोग बसू यांनी या चरित्रलेखनात केला ही पत्रे निवेदिता यांच्या बहिणीकडून निवेदिता यांचे फ्रेंच चरित्रकार लिझेल रेमँ यांना आणि नंतर रेमँ यांच्याकडून स्वामी अनिर्वाण यांच्यामार्फत बसू यांना मिळाली. या पत्रांच्या आधारे आणि अन्य लिखित पुराव्यावरून निवेदिता यांचे क्रांतिकारत्व सिद्ध केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायलाच हवे, तो भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे, हे पटवून देण्यासाठी निवेदिता यांना कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. त्यांनी नेमस्तांना आणि जहालांना दोघांनाही जवळ केले. गोपळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, खापर्डे यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. लोकजागृतीसाठी लेखन, व्याख्याने याचाही त्यांनी उपयोग करून घेतला. अनेक तरुणांचे त्या प्रेरणास्थान होत्या. भारताचे आत्मिक बळ वाढवून भारताला स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वदेशीची चळवळ जशी आवश्यक वाटली तसेच क्रांतिकार्यासाठी लागणारे शिक्षणही त्यांना गरजेचे वाटत होते. अशा या क्रांतियोगिनीने दार्जिलिंग येथे अखेरचा श्वास घेतला. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी माणसाची ‘माणूस’ म्हणून ओळख करून दिली तर स्वामी विवेकानंद यांनी यातून ‘माणूस’ घडवला आणि निवेदिता यांनी ‘राष्ट्र घडवायचा’ प्रयत्न यशस्वी केला. निवेदिता यांचा भारतातील कार्यकाळ खूप कमी होता. त्या १८९८ मध्ये भारतात आल्या आणि १९९१ मध्ये त्यांचे निधन झाले. भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि अन्य मान्यवर मंडळीकडून निवेदिता यांना भारतीय संस्कृती, परंपरा, साहित्य, कला, राष्ट्रप्रेम अशा विषयांवर मार्गदर्शन मिळाले. पुढे एका विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे नामकरण निवेदिता असे केले. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या त्या काळात त्यांनी कोलकाता येथील बागबाजारसारख्या कर्मठ लोकांच्या वस्तीत भारतीय परंपरेशी आधुनिक शिक्षणाची सांगड घालून शाळा सुरू केली. त्यांची ही शाळा बंगालमधील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते. स्वदेशीची चळवळ सुरू होण्याआधी कितीतरी वर्षे ही शाळा स्थापन केली होती. भागिनी निवेदिता अर्थात मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, १९व्या शतकातील बंगालमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती, निवेदिता यांनी तयार केलेला आणि १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात फडकविण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज तसेच निवेदिता यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ग्रंथातील वेगवेगळ्या प्रकरणांमधून करून देण्यात आली आहे. ग्रंथाच्या अखेरीस निवेदिता यांचा संपूर्ण जीवनपट, ठळक घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्तींची नामनिर्देश सूची ही परिशिष्ट स्वरूपात देण्यात आली आहे. भगिनी निवेदिता यांच्या एकूण जीवनाचा समग्र मागोवा मृणालिनी गडकरी यांनी घेतला असून विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDivya Marathi 5-5-17

    भगिनी निवेदिताचे शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारक अाहे, मात्र कार्य बरेचसे ज्ञात अाहे. इतके दिवस अज्ञात हाेते ते तिचे सशस्त्र क्रांतीला असलेले सहकार्य. स्वामी विवेकानंदांनी पारखून निवडलेल्या या `सिंहिणी`ला स्वत:च्या अातमिक मुक्तीपेक्षा भारताची पारतंत्र्यातून मुक्ती महत्त्वाची वाटत हाेती अाणि त्यासाठी सनदशीर वा सशस्त्र क्रांती असा कुठलाच मार्ग तिला वर्ज्य नव्हता. तिचा `लाॅजिस्टिक सपाेर्ट` भारतीय क्रांतिकारकांना मिळाला म्हणूनच भारतीय क्रांतिकार्य प्रभावी झाल्याचे मत लेखिका मृणालिनी गडकरी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडले अाहे. २०११ साल हे भगिनी निवेदिितेचे स्मृतिशताब्दी वर्ष हाेते. या निमित्ताने त्यांचे समग्र चरित्र मराठीत लिहिले जावे असा अाग्रह ज्ञानप्रबाेधिनीच्या संस्थापक-संचालक मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य यशवंतराव लेले यांनी केल्याने हे पुस्तक पुढे अाकारास अाले. भगिनी निवेदितेला महाराष्ट्राबद्दल, विशेषत: पुण्याबद्दल अाणि त्या काळातील लाेकमान्य टिळक, नामदार गाेखले, दादासाहेब खापर्डे अशांसारख्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल अत्यंत अादर हाेता. महाराष्ट्राला तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. तिची हातांच्या बाेटावर माेजता येतील एवढीच चरित्रे पूर्वी लिहिली गेलेली दिसतात. बंगाली अाणि इंग्रजी भाषेत तिच्यावर लिहिले अाहे. पण मराठीत नव्हते. निवेदिता लाेकमाता हे शंकरीप्रसाद बसूंनी चार खंडात लिहिलेले बंगाली भाषेतील चरित्र वाचल्यानंतर निवेदिताचे जीवन कळत गेले अाणि हे पुस्तक अाकार घेत गेल्याचे गडकरी सांगतात. निवेदिताचे भारतप्रेम, निष्ठा, गुरुभक्ती, त्याग अशा बाबींसह तिच्यातील शिक्षणतज्ज्ञ, क्रांतीकार्य, तीची साैदर्यदृष्टी, तिच्यातील अाई हे सगळं या पुस्तकातून सापडतं. निवेदितेचे व्यक्तिमत्व अनेकावधानी अाहे. त्यामुळेच की, काय प्रा. बसूंनी तिचे चार खंडात विस्तृत चरित्र लिहिताना, चरित्राचा नेहमीचा रूपबंध अजिबात पाळलेला नाही. असेही गडकरी म्हणतात. ...Read more

  • Rating StarDaily Sakal-Saptrang 16-4-17

    इतिहास एखाद्या विशिष्ट कालखंडात असं काही वळण घेतो, की अभ्यासकांना पुन: पुन्हा तो काळ खुणावत राहतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसल्याची जाणीव होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा संधिकाल हे त्याचं एक उदाहरण. वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांची घुसळण सुरू ाली ती याच काळात. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं राष्ट्रीय-सांस्कृतिक-धार्मिक पुनर्जागरण हाही त्यातला एक ठळक प्रवाह होता. त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या एक पाश्चात्त्य विदुषीची ओघवत्या शैलीत कथन केलेली ही जीवनकहाणी. या विदुषीचं नाव मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता. उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेटला घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं होतं. आयरिश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं हे घराणं होतं. मार्गारेटच्या बालपणीची विस्तृत माहिती देऊन पुढं ती भारतीय राष्ट्रीय जाणिवांशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी समरस होण्याची बीजं या वातावरणात कशी होती, याचं सूचन लेखिका करते. मार्गारेटला अध्यात्माचं आकर्षण होतं; परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर तावून-सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारत नसे. स्वामी विवेकानंदांचं अनुयायित्व स्वीकारतानादेखील अनेक विषयांवर त्यांच्याशी तिच्या चर्चा झडल्या. शंकांचं निराकरण होईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे आणि एखादी गोष्ट पटली, की मात्र त्यात सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. हे चरित्र वाचताना तिच्या या वैशिष्ट्याचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. विवेकानंदांनीदेखील आपली मतं लादण्याचा प्रयत्न न करता मार्गारेटच्या वैचारिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका कशी निभावली, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. गुरू-शिष्यातल्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू पुस्तकातून समोर येतात. विज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं होतं, त्याचा परिचय भारतात ब्रिटिश राजवटीमुळं झाला. आधुनिक शिक्षण मिळालेल्या पहिल्या पिढीचे लोक त्यानं प्रभावित झाले नसते तरच नवल. त्यांचे डोळे दिपून गेले; पण याचा एक परिणाम असाही झाला की, भारतातल्या हजारो वर्षांच्या परंपरेविषयी काहींच्या मनात सरसकट तिटकारा निर्माण झाला. तिच्याकडं पाठ फिरवल्याशिवाय आधुनिकतेच्या प्रकाशाला सामोरं जाता येणार नाही, असं त्यांना वाटू लागलं. स्वामी विवेकानंदांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना या समाजाचा आत्मविश्वास पुन:स्थापित करायचा होता. भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या नितळ-निखळ रूपाला उजाळा देत या समाजाची पुनर्रचना व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न होता. तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतील अंधश्रद्धांचा बुजबुजाट, मुरलेल्या हितसंबंधांचं शेवाळ हटवायला हवं, हे तर उघडच होतं. भारतीयांचं मनोबल खच्ची करू पाहणार्या साम्राज्यवाद्यांशीही त्यांचा झगडा होता. एका पाश्चात्त्य विदुषीनं या कार्याचं, त्यामागच्या भूमिकेचं मर्म ओळखणं, एवढंच नव्हे तर या कार्याला आजन्म वाहून घेणं, ही घटना एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. ते सारं अनोखेपण या चरित्राच्या रूपानं प्रभावीपणे मांडलं गेलं असल्यानं हे केवळ चरित्र न राहता त्या मंतरलेल्या काळाची एक झलकही त्यातून प्रतीत होते. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निवेदितांनी खूप परिश्रम घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या बाजूला वैचारिक आघाडीवरही त्यांना संघर्ष करावा लागला. त्याचं तपशीलवार वर्णन मृणालिनी गडकरी यांनी केलं आहे. त्यासाठी बंगालीसह विविध भाषांतील संदर्भस्रोत त्यांनी मिळवले. आठवणी, तत्कालीन कागदपत्रं, पत्रव्यवहार अशा अनेक साधनांचा वापर करून त्यांनी ही चरितकहाणी सिद्ध केल्यानं तिचं मोल वाढलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more