* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KRANTIYOGINI BHAGINI NIVEDITA
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342201
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 408
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK DONE BY BHAGINI NIVEDITA IN THE FIELD OF EDUCATION, LITERATURE, ARTS AND SPIRITUALITY IS ASTOUNDING. YET, MUCH OF IT IS STILL UNVEILED. HER SUPPORT TO THE ARMED REVOLUTION IS NOW COMING TO SURFACE. SWAMI VIVEKANANDA HAD HIMSELF HAD HER TESTED BEFORE ALLOWING HER TO SHOULDER THE RESPONSIBILITY OF WORK RELATED TO FREEDOM OF COUNTRY RATHER THAN BEING STUCK AT FREEDOM OF SELF. SHE DID NOT HESITATE TO EMBRACE THE WAY OF ARMED REVOLUTION. HER LOGISTIC SUPPORT HELPED INDIANS PROFUSELY IN THE FREEDOM FIGHT.
जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच ‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
MARGARET ELIZABETH NOBEL# IRELAND# BANGAL# KOLKATA# SWAMIJI# BHAGINI# BRAMHO SAMAJ# SWAMI VIVEKANAND# NIVEDITA# RELIGION# EDUCATION# SHARDAMATA# HIMALAYA# AAMARNATH# LADY OF LAMP# VAJRA# KALI THE MOTHER# JAGADISHCHANDRA BASU# BODHGAYA
Customer Reviews
  • Rating StarKausthubh Nimbarte

    जन्माने आयरिश असणा-या भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे होते. २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंडमधील टायरन प्रांतातील डनगॅनन या लहानशा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर देशभक्ती, परोपकार यांचेच संस्कार झाले होे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मार्गारेट आपले कुटुंब, घर सोडून देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने भारतात आली आणि इथल्या मातीशी, समाजाशी, समाजाच्या सुखदुःखांशी एकरूप झाली. हिंदू धर्मातील आचार-विचारांचा तिच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. हिंदू धर्माचे उगमस्थान असणाNया भारतावर तिचे नितांत प्रेम होते. या राष्ट्रप्रमेमाची ओळख हे पुस्तक घडवते. स्वत: इंग्रज असूनही ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारक राज्यपद्धतीविषयी ती नाराज होती. त्यामुळेच‘भगिनी निवेदिता’ झालेली मार्गारेट स्वातंत्र्यलढ्याकडे ओढली गेली. भगिनी निवेदितांच्या कार्याने प्रभावित होऊन जगदीशचंद्र बसू यांनी त्यांना लेडी ऑफ लॅम्प म्हणून गौरविले. भगिनी निवेदितांनी सातत्याने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार केला.भारतासाठी त्यांनी जे महान कार्य केले त्याचं यथोचित दर्शन या पुस्तकात घडतं. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 31-08-2018

    क्रांतियोगिनी!... साहित्य, शिक्षण, कला, अध्यात्म या क्षेत्रातील एक अग्रणी आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या म्हणून भगिनी निवेदिता यांची ओळख आहे. त्या जन्माने आयरिश, नागरिकत्व ब्रिटिश, पण मनाने पूर्णत: भारतीय होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस््र क्रांतीला त्यांचे असलेले पाठबळ आजवर दुर्लक्षित राहिले किंवा फारसे समोर आले नाही. मात्र त्यांच्या अन्य कार्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यातील हे योगदानही तेवढेच महत्त्वाचे असून भारतीय क्रांतिकारकांना नेहमीच त्यांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले. अशा या अलौकिक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आणि कार्य मृणालिनी गडकरी यांनी ‘क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता’ या चरित्र ग्रंथातून उलगडले आहे. निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल. भारतात येण्यापूर्वी त्यांचा आयर्लण्डच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंद यांची भेट होण्यापूर्वी भगिनी निवेदिता यांनी शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, लेखक म्हणून नाव मिळवले होते. पण त्या समाधानी नव्हत्या. १८९५मध्ये स्वामी विवेकानंद यांचे लंडन येथे लेडी मार्गेसन यांच्या निवासस्थानी व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी मार्गेसन यांनी भगिनी निवेदिता यांनाही बोलावले होते. हे व्याख्यान ऐकून त्या प्रभावित झाल्या. पुढे स्वामी विवेकानंद यांची व्याख्याने अमेरिका, न्यू यॉर्क, इंग्लड या ठिकाणी झाली. त्यांच्या प्रत्येक व्याख्यानाला भगिनी निवेदिता उपस्थित राहत होत्या. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हा उदार, कर्मकांडात गुंतून न पडणारा, जातिभेदापासून दूर असलेला, अन्य कोणत्याही धर्माचा अनादर न कराणारा, प्रगतिशील आणि राष्ट्रीयतेला प्राधान्य देणारा, नवीन जरूर शिकावे, पण जुन्याला तिलांजली देऊ नये असे सांगणारा होता. फक्त तरुणांनीच नव्हे तर स्त्रियांनीही या चळवळीत सहभागी होणे त्यांना अपेक्षित होते. स्वामी विवेकानंद यांची झालेली भेट, त्यांची ऐकलेली व्याख्याने यातून निवेदिता यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला वाहून घेण्याचा, त्याच्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. शंकरीप्रसाद बसू यांनी ‘निवेदिता लोकमाता’ या पाच खंडात्मक चरित्र ग्रंथात निवेदिता यांच्या क्रांतिकार्याबाबतचे ठोस पुरावे दिले आहेत. निवेदिता यांनी लिहिलेली पत्रे दोन खंडांत बसू यांनी प्रकाशित केली. या पत्रांशिवाय बसू यांना सुमारे १०० पत्रे मिळाली होती. यातील अर्धवट जळालेली किंवा फाडलेली पत्रे त्यांनी प्रकाशित केली नाहीत. मात्र त्याचा योग्य तो उपयोग बसू यांनी या चरित्रलेखनात केला ही पत्रे निवेदिता यांच्या बहिणीकडून निवेदिता यांचे फ्रेंच चरित्रकार लिझेल रेमँ यांना आणि नंतर रेमँ यांच्याकडून स्वामी अनिर्वाण यांच्यामार्फत बसू यांना मिळाली. या पत्रांच्या आधारे आणि अन्य लिखित पुराव्यावरून निवेदिता यांचे क्रांतिकारत्व सिद्ध केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळायलाच हवे, तो भारतीयांचा मूलभूत अधिकार आहे, हे पटवून देण्यासाठी निवेदिता यांना कोणताही मार्ग वर्ज्य नव्हता. त्यांनी नेमस्तांना आणि जहालांना दोघांनाही जवळ केले. गोपळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, खापर्डे यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. लोकजागृतीसाठी लेखन, व्याख्याने याचाही त्यांनी उपयोग करून घेतला. अनेक तरुणांचे त्या प्रेरणास्थान होत्या. भारताचे आत्मिक बळ वाढवून भारताला स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वदेशीची चळवळ जशी आवश्यक वाटली तसेच क्रांतिकार्यासाठी लागणारे शिक्षणही त्यांना गरजेचे वाटत होते. अशा या क्रांतियोगिनीने दार्जिलिंग येथे अखेरचा श्वास घेतला. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी माणसाची ‘माणूस’ म्हणून ओळख करून दिली तर स्वामी विवेकानंद यांनी यातून ‘माणूस’ घडवला आणि निवेदिता यांनी ‘राष्ट्र घडवायचा’ प्रयत्न यशस्वी केला. निवेदिता यांचा भारतातील कार्यकाळ खूप कमी होता. त्या १८९८ मध्ये भारतात आल्या आणि १९९१ मध्ये त्यांचे निधन झाले. भारतात आल्यानंतर स्वामी विवेकानंद आणि अन्य मान्यवर मंडळीकडून निवेदिता यांना भारतीय संस्कृती, परंपरा, साहित्य, कला, राष्ट्रप्रेम अशा विषयांवर मार्गदर्शन मिळाले. पुढे एका विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे नामकरण निवेदिता असे केले. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या त्या काळात त्यांनी कोलकाता येथील बागबाजारसारख्या कर्मठ लोकांच्या वस्तीत भारतीय परंपरेशी आधुनिक शिक्षणाची सांगड घालून शाळा सुरू केली. त्यांची ही शाळा बंगालमधील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून ओळखली जाते. स्वदेशीची चळवळ सुरू होण्याआधी कितीतरी वर्षे ही शाळा स्थापन केली होती. भागिनी निवेदिता अर्थात मार्गारेट एलिझाबेथ नोबल यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी, १९व्या शतकातील बंगालमधील सामाजिक, राजकीय परिस्थिती, निवेदिता यांनी तयार केलेला आणि १९०६ मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात फडकविण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज तसेच निवेदिता यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ग्रंथातील वेगवेगळ्या प्रकरणांमधून करून देण्यात आली आहे. ग्रंथाच्या अखेरीस निवेदिता यांचा संपूर्ण जीवनपट, ठळक घडामोडी, महत्त्वाच्या व्यक्तींची नामनिर्देश सूची ही परिशिष्ट स्वरूपात देण्यात आली आहे. भगिनी निवेदिता यांच्या एकूण जीवनाचा समग्र मागोवा मृणालिनी गडकरी यांनी घेतला असून विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासाठी तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDivya Marathi 5-5-17

    भगिनी निवेदिताचे शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म या क्षेत्रातील कार्य क्रांतिकारक अाहे, मात्र कार्य बरेचसे ज्ञात अाहे. इतके दिवस अज्ञात हाेते ते तिचे सशस्त्र क्रांतीला असलेले सहकार्य. स्वामी विवेकानंदांनी पारखून निवडलेल्या या `सिंहिणी`ला स्वत:च्या अातमिक मुक्तीपेक्षा भारताची पारतंत्र्यातून मुक्ती महत्त्वाची वाटत हाेती अाणि त्यासाठी सनदशीर वा सशस्त्र क्रांती असा कुठलाच मार्ग तिला वर्ज्य नव्हता. तिचा `लाॅजिस्टिक सपाेर्ट` भारतीय क्रांतिकारकांना मिळाला म्हणूनच भारतीय क्रांतिकार्य प्रभावी झाल्याचे मत लेखिका मृणालिनी गडकरी यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडले अाहे. २०११ साल हे भगिनी निवेदिितेचे स्मृतिशताब्दी वर्ष हाेते. या निमित्ताने त्यांचे समग्र चरित्र मराठीत लिहिले जावे असा अाग्रह ज्ञानप्रबाेधिनीच्या संस्थापक-संचालक मंडळातील एक ज्येष्ठ सदस्य यशवंतराव लेले यांनी केल्याने हे पुस्तक पुढे अाकारास अाले. भगिनी निवेदितेला महाराष्ट्राबद्दल, विशेषत: पुण्याबद्दल अाणि त्या काळातील लाेकमान्य टिळक, नामदार गाेखले, दादासाहेब खापर्डे अशांसारख्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल अत्यंत अादर हाेता. महाराष्ट्राला तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. तिची हातांच्या बाेटावर माेजता येतील एवढीच चरित्रे पूर्वी लिहिली गेलेली दिसतात. बंगाली अाणि इंग्रजी भाषेत तिच्यावर लिहिले अाहे. पण मराठीत नव्हते. निवेदिता लाेकमाता हे शंकरीप्रसाद बसूंनी चार खंडात लिहिलेले बंगाली भाषेतील चरित्र वाचल्यानंतर निवेदिताचे जीवन कळत गेले अाणि हे पुस्तक अाकार घेत गेल्याचे गडकरी सांगतात. निवेदिताचे भारतप्रेम, निष्ठा, गुरुभक्ती, त्याग अशा बाबींसह तिच्यातील शिक्षणतज्ज्ञ, क्रांतीकार्य, तीची साैदर्यदृष्टी, तिच्यातील अाई हे सगळं या पुस्तकातून सापडतं. निवेदितेचे व्यक्तिमत्व अनेकावधानी अाहे. त्यामुळेच की, काय प्रा. बसूंनी तिचे चार खंडात विस्तृत चरित्र लिहिताना, चरित्राचा नेहमीचा रूपबंध अजिबात पाळलेला नाही. असेही गडकरी म्हणतात. ...Read more

  • Rating StarDaily Sakal-Saptrang 16-4-17

    इतिहास एखाद्या विशिष्ट कालखंडात असं काही वळण घेतो, की अभ्यासकांना पुन: पुन्हा तो काळ खुणावत राहतो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसल्याची जाणीव होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा संधिकाल हे त्याचं एक उदाहरण. वेगवेगळ्या वैचारिक प्रवाहांची घुसळण सुरू ाली ती याच काळात. स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेलं राष्ट्रीय-सांस्कृतिक-धार्मिक पुनर्जागरण हाही त्यातला एक ठळक प्रवाह होता. त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या एक पाश्चात्त्य विदुषीची ओघवत्या शैलीत कथन केलेली ही जीवनकहाणी. या विदुषीचं नाव मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता. उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेल्या मार्गारेटला घरातूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं होतं. आयरिश स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेलं हे घराणं होतं. मार्गारेटच्या बालपणीची विस्तृत माहिती देऊन पुढं ती भारतीय राष्ट्रीय जाणिवांशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी समरस होण्याची बीजं या वातावरणात कशी होती, याचं सूचन लेखिका करते. मार्गारेटला अध्यात्माचं आकर्षण होतं; परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर तावून-सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारत नसे. स्वामी विवेकानंदांचं अनुयायित्व स्वीकारतानादेखील अनेक विषयांवर त्यांच्याशी तिच्या चर्चा झडल्या. शंकांचं निराकरण होईपर्यंत ती स्वस्थ बसत नसे आणि एखादी गोष्ट पटली, की मात्र त्यात सर्वस्व झोकून देऊन काम करत असे. हे चरित्र वाचताना तिच्या या वैशिष्ट्याचा ठसा वाचकाच्या मनावर उमटतो. विवेकानंदांनीदेखील आपली मतं लादण्याचा प्रयत्न न करता मार्गारेटच्या वैचारिक प्रवासात मार्गदर्शकाची भूमिका कशी निभावली, हे लेखिकेनं दाखवून दिलं आहे. गुरू-शिष्यातल्या नात्याचे हे वेगवेगळे पैलू पुस्तकातून समोर येतात. विज्ञानानं माणसाच्या आयुष्यात जे क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणलं होतं, त्याचा परिचय भारतात ब्रिटिश राजवटीमुळं झाला. आधुनिक शिक्षण मिळालेल्या पहिल्या पिढीचे लोक त्यानं प्रभावित झाले नसते तरच नवल. त्यांचे डोळे दिपून गेले; पण याचा एक परिणाम असाही झाला की, भारतातल्या हजारो वर्षांच्या परंपरेविषयी काहींच्या मनात सरसकट तिटकारा निर्माण झाला. तिच्याकडं पाठ फिरवल्याशिवाय आधुनिकतेच्या प्रकाशाला सामोरं जाता येणार नाही, असं त्यांना वाटू लागलं. स्वामी विवेकानंदांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना या समाजाचा आत्मविश्वास पुन:स्थापित करायचा होता. भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या नितळ-निखळ रूपाला उजाळा देत या समाजाची पुनर्रचना व्हायला हवी, असा त्यांचा प्रयत्न होता. तिथपर्यंत पोचण्यासाठी वाटेतील अंधश्रद्धांचा बुजबुजाट, मुरलेल्या हितसंबंधांचं शेवाळ हटवायला हवं, हे तर उघडच होतं. भारतीयांचं मनोबल खच्ची करू पाहणार्या साम्राज्यवाद्यांशीही त्यांचा झगडा होता. एका पाश्चात्त्य विदुषीनं या कार्याचं, त्यामागच्या भूमिकेचं मर्म ओळखणं, एवढंच नव्हे तर या कार्याला आजन्म वाहून घेणं, ही घटना एकमेवाद्वितीय म्हणावी लागेल. ते सारं अनोखेपण या चरित्राच्या रूपानं प्रभावीपणे मांडलं गेलं असल्यानं हे केवळ चरित्र न राहता त्या मंतरलेल्या काळाची एक झलकही त्यातून प्रतीत होते. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी निवेदितांनी खूप परिश्रम घेतले. हे करताना त्यांना अनेक आव्हानांना आणि संकटांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या बाजूला वैचारिक आघाडीवरही त्यांना संघर्ष करावा लागला. त्याचं तपशीलवार वर्णन मृणालिनी गडकरी यांनी केलं आहे. त्यासाठी बंगालीसह विविध भाषांतील संदर्भस्रोत त्यांनी मिळवले. आठवणी, तत्कालीन कागदपत्रं, पत्रव्यवहार अशा अनेक साधनांचा वापर करून त्यांनी ही चरितकहाणी सिद्ध केल्यानं तिचं मोल वाढलं आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more