* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DHRUV BHATT` IS ONE OF THE FINEST, ESTABLISHED CONTEMPORARY GUJARATI WRITERS TODAY, WHO IS ENGAGED IN FICTIONALIZING THE BASIC ENVIRONMENT ISSUES, SINCE LAST THREE DECADES, OF ECOLOGY AND TRADITIONAL WISDOM OF THE PEOPLE DWELLING IN AND AROUND WILDERNESS THAT PRESENT THE ENVIRONMENT ISSUES DISCUSSED LOCALLY AS WELL AS GLOBALLY. HIS FICTIONAL WORKS INCLUDE AGNI-KANYA, A NOVEL BASED ON DRAUPADI. SAMUDRANTIKE, A NOVEL BASED ON THE STRONG BOND BETWEEN MAN AND NATURE AND TATTVAMASI SET IN THE BACKGROUND OF NARMADA RIVER WHICH WON THE SAHITYA AKADEMI AWARD.
तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका... ति-हाईत... एक अतरापी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATARAPI #ATARAPI #अतरापी #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMASHALIGRAM DHRUV BHATT ध्रुव भट्ट "
Customer Reviews
  • Rating StarPrashant Patil

    तशी ही दोन भावांची - कुत्र्यांची - कथा. आपल्या सहज प्रवृत्तींशी प्रामाणिक राहून स्वतःच्या ज्ञान व क्षमतांना विकसित करणारा एक भाऊ `सारमेय`, तर त्याच बरोबर एका ठराविक साच्यात व निती नियमांच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून स्वतःची उन्नती साधू इच्छिणाा दुसरा भाऊ `कौलकेय`. दोघांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास ही `अतरापी` ची कहाणी. साधारण दीडशे पानांच्या मूळ गुजराती कादंबरीचे लेखक ध्रुव भट असून त्याचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. साध्या पण प्रवाही प्रसंगांनी गुंफलेल्या या कथानकामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही, पण तात्कालिक प्रसंगांना दोन्ही भावांनी आपापल्या स्वभावानुरूप दिलेल्या प्रतिसादातून लेखक त्याचा संदेश वाचकांसमोर प्रभावीपणे मांडतो. प्रवाहाविरुद्ध किंवा प्रवाहासोबत या दोन्हीशी सोयरेसुतक नसणारा जीव प्रवाहाच्या अस्तित्वावर अवलंबून असणाऱ्यांसाठी मात्र ठरतो एक परका...तिर्हाईत...एक "अतरापी". ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more