* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DHRUV BHATT` IS ONE OF THE FINEST, ESTABLISHED CONTEMPORARY GUJARATI WRITERS TODAY, WHO IS ENGAGED IN FICTIONALIZING THE BASIC ENVIRONMENT ISSUES, SINCE LAST THREE DECADES, OF ECOLOGY AND TRADITIONAL WISDOM OF THE PEOPLE DWELLING IN AND AROUND WILDERNESS THAT PRESENT THE ENVIRONMENT ISSUES DISCUSSED LOCALLY AS WELL AS GLOBALLY. HIS FICTIONAL WORKS INCLUDE AGNI-KANYA, A NOVEL BASED ON DRAUPADI. SAMUDRANTIKE, A NOVEL BASED ON THE STRONG BOND BETWEEN MAN AND NATURE AND TATTVAMASI SET IN THE BACKGROUND OF NARMADA RIVER WHICH WON THE SAHITYA AKADEMI AWARD.
तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका... ति-हाईत... एक अतरापी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ATARAPI #ATARAPI #अतरापी #FICTION #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMASHALIGRAM DHRUV BHATT ध्रुव भट्ट "
Customer Reviews
  • Rating StarPrashant Patil

    तशी ही दोन भावांची - कुत्र्यांची - कथा. आपल्या सहज प्रवृत्तींशी प्रामाणिक राहून स्वतःच्या ज्ञान व क्षमतांना विकसित करणारा एक भाऊ `सारमेय`, तर त्याच बरोबर एका ठराविक साच्यात व निती नियमांच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून स्वतःची उन्नती साधू इच्छिणाा दुसरा भाऊ `कौलकेय`. दोघांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास ही `अतरापी` ची कहाणी. साधारण दीडशे पानांच्या मूळ गुजराती कादंबरीचे लेखक ध्रुव भट असून त्याचा मराठी अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. साध्या पण प्रवाही प्रसंगांनी गुंफलेल्या या कथानकामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही, पण तात्कालिक प्रसंगांना दोन्ही भावांनी आपापल्या स्वभावानुरूप दिलेल्या प्रतिसादातून लेखक त्याचा संदेश वाचकांसमोर प्रभावीपणे मांडतो. प्रवाहाविरुद्ध किंवा प्रवाहासोबत या दोन्हीशी सोयरेसुतक नसणारा जीव प्रवाहाच्या अस्तित्वावर अवलंबून असणाऱ्यांसाठी मात्र ठरतो एक परका...तिर्हाईत...एक "अतरापी". ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.