* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LAJJA
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177660050
  • Edition : 12
  • Publishing Year : 1994
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL WRITTEN BY TASLIMA NASREEN, A CITIZEN OF BANGLADESH REVEALS THE STAUNCH RELIGION AND THE INHUMAN TREATMENT BY ONE MAN TO ANOTHER. DUTT FAMILY IS THE CITIZEN OF BANGLADESH. IT INCLUDES SUDHAMAY BABU, KIRANMAYEE, AND THEIR TWO CHILDREN SURANJAN AND MAYA. IN BANGLADESH ALL THE HINDUS UNDERGO SEVERE TORTURE FROM THE MAJORITY, BUT THIS HINDU FAMILY STANDS FIRMLY AGAINST IT AND PREFERS NOT TO LEAVE THEIR MOTHERLAND. SUDHAMAY BABU IS AN ATHEIST, BUT A PERSONALITY FULL OF PATRIOTISM, HOPES AND IDEALS. HE RELIES ON THE FEELING THAT HIS MOTHERLAND WILL NEVER DITCH HIM. ON 6TH DECEMBER 1992, SOME RELIGIOUS PEOPLE BURNT BABARI MASJID IN INDIA. THE WORLD PROTESTED AGAINST IT. BUT, THE EFFECTS IN THE NEIGHBOURING COUNTRY BANGLADESH WERE DEVASTATING. THEY FOUND A REAL REASON FOR THE TORTURE OF HINDUS. DUTT FAMILY FALLS PREY TO THIS TORTURE. THEIR FAMILY IS SHATTERED; THEIR SMALL UNIVERSE IS TURNED UPSIDE DOWN AFTER THIS. THIS NOVEL IS BASED ON THE HARSH TRUTH OF THE BLOODY MENTALITIES OF THE SO CALLED FUNDAMENTALISTS. IT REVEALS THE TRUE STORY OF TERRORISM IN THIS MODERN AGE. IT MAKES US INTROSPECT OURSELVES.
तसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते. दत्त कुटुंबीय– सुधामयबाबू, किरणमयी आणि त्यांची दोन मुलं, सुरंजन आणि माया– हे बांग्लादेशचे रहिवासी आहेत. बांग्लादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीचा समाजातील बहुसंख्याकांकडून अनन्वित छळ केला जात असतो, पण हे हिंदू कुटुंब मात्र या छळाला तोंड देत आपल्या मातृभूमीवरच राहणं पसंत करतं. आपल्या इतर आप्तस्वकीयांप्रमाणे ते आपला देश सोडून जायला तयार नसतात. सुधामयबाबू हे एक नास्तिक.. देशप्रेमानं, आशावादानं, आदर्शवादानं भरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. आपली मातृभूमी आपल्याकडे पाठ फिरवणार नाही, आपल्याशी प्रतारणा करणार नाही, या भोळ्याभाबड्या आशेवर ते विसंबून राहिले आहेत. आणि मग... ६ डिसेंबर, १९९२ रोजी भारतात काही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विनाश केला. साNया जगानं या घटनेचा निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. हिंदूंच्या छळासाठी आणखी एक निमित्त मिळालं... दत्त कुटुंबीयांवरही संकटाची कुहाड कोसळते. ते भरडले जाऊ लागतात. त्यांचं जीवन, त्यांचं छोटंसं विश्व उद्ध्वस्त होतं. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी मूलतत्त्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते आणि वाचकाला अंतर्मुख करते.
राज्य पुरस्कार १९१३-९४
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TASLIMANASRIN #PHERA #NIRBACHITKALAM #NIRBACHI #LEENASOHONI #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOKS #MARATHIBOOKS#
Customer Reviews
  • Rating StarSiddharth More

    या पुस्तका बद्दल जास्त काही बोलू शकत नाही एवढच म्हणू शकतो कि नाटकी सेंक्यूलर माणसांच्या तोंडावर सणसणीत चपराक.

  • Rating StarHrushikesh Honrav

    दोन दिवसांपूर्वीच "लज्जा" कादंबरी वाचून पूर्ण केली. तस्लिमा नासरीन यांची लेखनशैली ही अत्यंत ज्वलंत आहे हे मला "फेरा" वाचल्यावर कळालच होत, पण त्या धार्मिक कट्टरवाद तसेच मुलतत्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती या विषयावर पण एवढ्या प्रखरपणे कोरड ओढतील हे लज्जा" वाचल्यासच कळत. कादंबरीचे मुख्य पात्र आहे. -दत्त कुटुंबीय. मूळचे बांग्लादेशचे रहिवासी असणारे हे कुटुंब. सुधामयबाबू, किरणमयी यांची दोन मुलं सुरंजन आणि माया. बांगलादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीवर समाजातील बहुसंख्याक जमातीकडून छळ केला जातो असतो. पण दत्त कुटुंबीय ह्या सर्व संकटांना, छळाना तोंड देत आपल्या मातृभूमीतच राहणं पसंद करतात. सुधामयबाबू हे नास्तिक... देशप्रेम व आदर्शवादान भारलेलं व्यक्तिमत्त्व. परंतु... ६ डिसेंबर १९९२ रोजी भारतात बाबरी मशिदीचा विनाश केला, आणि पडसाद साऱ्या जगभर पसरले. पण या कृत्याची दखल शेजारी राष्ट्र बांगलादेशाने मात्र फार तीव्रतेने घेतली. हिंदूंचा छळ करायला अजून एक निमित्त भेटलं. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी ९०च्या दशकातील अमानुष छळ आणि आधुनिक काळातील हिंसाचाराच प्रत्ययकारी चित्रण करते. कादंबरीतील काही आवडते वाक्य...👇 सुरंजनच्या मनात एक मूक प्रश्न घर करून राहिला होता. पहाट व्हायला आली होती. खिडकीच्या फटीतून सूर्याचे किरण आत येत होते. सुधामयबाबू म्हणाले, "चल, आपण इथून निघून जाऊ या." सुरंजनला आश्चर्य लपवता येईना. तो म्हणाला, " आपण कुठं जायचं, बाबा ? " सुधामयबाबू म्हणाले, " भारतात. " -आणि लज्जेने त्यांचा आवाज चिरकला होता. पण त्यांनी अखेर ते शब्द उच्चारले होते, जिवाच्या कराराने ते बाहेर पडले होते. आपण इथून निघून जाऊ, अस म्हणायला त्यांनी स्वतःला भाग पाडल होत आणि त्याशिवाय दुसरा ईलाज नाही, हेही त्यांना कळून चुकलं होत, कारण त्यांनी आपल्या मनात उभा केलेला प्रचंड पर्वत दिवसेंदिवस खचत चालला होता. #लज्जा 😐 ...Read more

  • Rating StarGanesh Dhure

    हृदय पिळवटून टाकणारी आहे.

  • Rating StarKanchan Kathe

    डोकं आणि मन दोन्ही सुन्न करणारी कादंबरी..... २० वर्षां पूर्वी वाचली

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more