* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619269
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ZOMBADA #ZOMBADA #झोंबडं #FICTION #MARATHI #MAHADEOMORE #महादेवमोरे "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्री महादेव मोरे यांची ‘झोंबड’ ही कादंबरी एकाच विषयाला धरून लिहिलेली नाही. त्यांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीतील रूढसंकेत व ठोकताळ्यांना बगल देऊन कादंबरीच्या फॉर्ममध्ये काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे वेगळं देताना अनेक विष एकत्र आल्याने सुसूत्रतेचा अभाव या कादंबरीत जाणवल्यावाचून राहत नाही. मुळात कादंबरीचा विषय विडी कामगारांचा. विडी कामगारांचे प्रश्न हाताळून एक युनियन पुढारी जन्माला येतो हे खरं. तो जन्माला येणं हेच जर दर्शवायचं होतं तर विडी कामगारांचा प्रश्नांना कादंबरीची पन्नास एक पृष्ठ खर्ची घालायचं कारण नव्हतं, त्यानंतर जोगतिणीचे प्रश्न. शेवटी तंबाखूचे भाव वाढवून मिळावेत म्हणून होणारं आंदोलन. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची रेलचेल भरपूर. ती पात्रं वास्तविक जगातील कुणावरून बेतलेली आहेत हे सहज ओळखता येतील, इतकं त्यांच्या नावाशी असलेले साधम्य जाणवतं. आता उदाहरणंच द्यायची झालीत तर कादंबरी न वाचताही ओळखता येतील. अशी काही नावे डॉ. आबा आडारकर, समाजवादी कार्यकर्ते. एक गाव एक मसणवटाचे प्रणेते ग. बा. हेगडे. संपादक, पत्रकार त्यांचे चार चार दिवाळी अंक उमेश कुलकर्णी - बटाटा आंदोलन कुलकर्णी आणि जोशी उदंड असल्याने नाव लगेच समजून येणार नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे एखादे दुसरेच जोशी असतात, तर अशी अनंत पात्र कादंबरीत आहेत. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. निगवणी गावातील विडी कामगारांचे, यात स्त्रियांचा भरणा जास्त. प्रश्न हाताळण्यासाठी एका कॉलेजातील प्रा. सतीश कुलकर्णी हे पुढाकार घेतात, त्यात यशस्वी होतात. त्यांचं नाव होतं. ते युनियन पुढारी म्हणून उदयास येतात, त्यामुळे ज्यावेळी जागतिणी भगिनीचं अधिवेशन घेतलं जातं, त्यावेळीही सतीश कुलकर्णीला आपोआपच मान मिळतो. त्यानंतर तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना करावी आणि त्यांना तंबाखूचा रास्त भाव मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू होतात. धरणं मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको अशा वाटेने जात कादंबरी शेवटी अशा निष्कर्षाप्रत येते. कशा ते लेखकाच्याच शब्दातून वाचा. ‘‘खरं सत्य आहे तरी काय मग ?’’ ‘‘ते सारं अशा ओझरत्या भेटीत सांगून संपणार नव्हे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचाच विषय आहे म्हणा ! थोडक्यात म्हणजे दोन तालेवारांमधील झोंबडं. हेच केवळ त्यात सत्य आहे ! भारतातील कुठल्याही भागात जा, तिथं बुडाखाली बक्कळ पैसा असलेले निदान दोन तालेवार तरी असतातच व पैशाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करण्याचं निमित्त करून त्यांचं कायम झोंबडं चालू असतं. एकमेकांवर मात करावयाची बंधनं म्हणून हे लोक माणसं वापरत असतात. काही इकडे असतात काही तिकडे असतात. हे ‘छू’ घालतात. त्याच्या त्याच्यात आणि झोंबड लावून रिकामे होतात. एखाद्याकडील हरला की, दुसरा विजयोन्मादाने थय-थय नाचायला लागता, तोवर पराजित मनात काही डावपेच ठेवून परत त्याला भिडतो ! सुटलं-सुटलं. संपलं-संपलं, असं वाटतंय तोवर परत झोंबडं सुरु होतं ! त्यात वेगळं काय नाही गायकवाड ! लोकशाही भारतात किंवा भारतातील तथाकथित निरोगी लोकशाहीत आढळणारी रोजाना स्टोरी आहे ही ! इथं एका भिडूचं नाव आहे जयपुरीया, तर दुसऱ्याचं जीवजी भाय ! आणि ह्यांचं हे झोंबडं दोघातील कुणी एक ‘संपेल’ तेव्हाच खऱ्या अर्थानं संपायचं !!’’ इतं कादंबरी संपली आहे. खरं तर दोन-तीन विषय एकत्र घेऊनही कादंबरी छानचं रंगली असती. कादंबरीचा आवाका मोठा, परंतु वास्तव जगातील पात्रांना कादंबरीत घुसडण्याचा अट्टाहास केल्यानं विषयाची कुतरओढ झाली आहे. वास्तविक जगातील पात्रं त्यांच्या त्यांच्या परीनं कार्य करीत आहेत. त्यांच्यातही गुणदोष आहेत. पण त्या सगळ्या पात्रांना कादंबरीत आणल्यानं विषयांतर होत राहून वाचकाची मुख्य विषयापासून ताटातूट होत राहिल्यानं रसभंग होतो. डॉ. सुनील अचलापूरकर याला बोकड छापदाढी कशासाठी ? तर केवळ वास्तव पात्राची ओळख पटावी म्हणून. एकंदरीत ‘झोंबडं’ ही कादंबरी वेगळ्या विषयावरील असूनही घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. अर्थात ग्रामीण वाचकांना ही कादंबरी आवडायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो