* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619269
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ZOMBADA #ZOMBADA #झोंबडं #FICTION #MARATHI #MAHADEOMORE #महादेवमोरे "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्री महादेव मोरे यांची ‘झोंबड’ ही कादंबरी एकाच विषयाला धरून लिहिलेली नाही. त्यांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीतील रूढसंकेत व ठोकताळ्यांना बगल देऊन कादंबरीच्या फॉर्ममध्ये काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे वेगळं देताना अनेक विष एकत्र आल्याने सुसूत्रतेचा अभाव या कादंबरीत जाणवल्यावाचून राहत नाही. मुळात कादंबरीचा विषय विडी कामगारांचा. विडी कामगारांचे प्रश्न हाताळून एक युनियन पुढारी जन्माला येतो हे खरं. तो जन्माला येणं हेच जर दर्शवायचं होतं तर विडी कामगारांचा प्रश्नांना कादंबरीची पन्नास एक पृष्ठ खर्ची घालायचं कारण नव्हतं, त्यानंतर जोगतिणीचे प्रश्न. शेवटी तंबाखूचे भाव वाढवून मिळावेत म्हणून होणारं आंदोलन. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची रेलचेल भरपूर. ती पात्रं वास्तविक जगातील कुणावरून बेतलेली आहेत हे सहज ओळखता येतील, इतकं त्यांच्या नावाशी असलेले साधम्य जाणवतं. आता उदाहरणंच द्यायची झालीत तर कादंबरी न वाचताही ओळखता येतील. अशी काही नावे डॉ. आबा आडारकर, समाजवादी कार्यकर्ते. एक गाव एक मसणवटाचे प्रणेते ग. बा. हेगडे. संपादक, पत्रकार त्यांचे चार चार दिवाळी अंक उमेश कुलकर्णी - बटाटा आंदोलन कुलकर्णी आणि जोशी उदंड असल्याने नाव लगेच समजून येणार नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे एखादे दुसरेच जोशी असतात, तर अशी अनंत पात्र कादंबरीत आहेत. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. निगवणी गावातील विडी कामगारांचे, यात स्त्रियांचा भरणा जास्त. प्रश्न हाताळण्यासाठी एका कॉलेजातील प्रा. सतीश कुलकर्णी हे पुढाकार घेतात, त्यात यशस्वी होतात. त्यांचं नाव होतं. ते युनियन पुढारी म्हणून उदयास येतात, त्यामुळे ज्यावेळी जागतिणी भगिनीचं अधिवेशन घेतलं जातं, त्यावेळीही सतीश कुलकर्णीला आपोआपच मान मिळतो. त्यानंतर तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना करावी आणि त्यांना तंबाखूचा रास्त भाव मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू होतात. धरणं मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको अशा वाटेने जात कादंबरी शेवटी अशा निष्कर्षाप्रत येते. कशा ते लेखकाच्याच शब्दातून वाचा. ‘‘खरं सत्य आहे तरी काय मग ?’’ ‘‘ते सारं अशा ओझरत्या भेटीत सांगून संपणार नव्हे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचाच विषय आहे म्हणा ! थोडक्यात म्हणजे दोन तालेवारांमधील झोंबडं. हेच केवळ त्यात सत्य आहे ! भारतातील कुठल्याही भागात जा, तिथं बुडाखाली बक्कळ पैसा असलेले निदान दोन तालेवार तरी असतातच व पैशाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करण्याचं निमित्त करून त्यांचं कायम झोंबडं चालू असतं. एकमेकांवर मात करावयाची बंधनं म्हणून हे लोक माणसं वापरत असतात. काही इकडे असतात काही तिकडे असतात. हे ‘छू’ घालतात. त्याच्या त्याच्यात आणि झोंबड लावून रिकामे होतात. एखाद्याकडील हरला की, दुसरा विजयोन्मादाने थय-थय नाचायला लागता, तोवर पराजित मनात काही डावपेच ठेवून परत त्याला भिडतो ! सुटलं-सुटलं. संपलं-संपलं, असं वाटतंय तोवर परत झोंबडं सुरु होतं ! त्यात वेगळं काय नाही गायकवाड ! लोकशाही भारतात किंवा भारतातील तथाकथित निरोगी लोकशाहीत आढळणारी रोजाना स्टोरी आहे ही ! इथं एका भिडूचं नाव आहे जयपुरीया, तर दुसऱ्याचं जीवजी भाय ! आणि ह्यांचं हे झोंबडं दोघातील कुणी एक ‘संपेल’ तेव्हाच खऱ्या अर्थानं संपायचं !!’’ इतं कादंबरी संपली आहे. खरं तर दोन-तीन विषय एकत्र घेऊनही कादंबरी छानचं रंगली असती. कादंबरीचा आवाका मोठा, परंतु वास्तव जगातील पात्रांना कादंबरीत घुसडण्याचा अट्टाहास केल्यानं विषयाची कुतरओढ झाली आहे. वास्तविक जगातील पात्रं त्यांच्या त्यांच्या परीनं कार्य करीत आहेत. त्यांच्यातही गुणदोष आहेत. पण त्या सगळ्या पात्रांना कादंबरीत आणल्यानं विषयांतर होत राहून वाचकाची मुख्य विषयापासून ताटातूट होत राहिल्यानं रसभंग होतो. डॉ. सुनील अचलापूरकर याला बोकड छापदाढी कशासाठी ? तर केवळ वास्तव पात्राची ओळख पटावी म्हणून. एकंदरीत ‘झोंबडं’ ही कादंबरी वेगळ्या विषयावरील असूनही घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. अर्थात ग्रामीण वाचकांना ही कादंबरी आवडायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more