* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ZOMBADA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171619269
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1990
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MAHADEO MORE COMBO SET - 15 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PEOPLE WERE GATHERING IN GROUPS WHILE TALKING AT THE HIGHEST PITCH. WITHIN AN HOUR THE NUMBER CROSSED A THOUSAND THOUGH NO ONE HAD PARTICULARLY GIVEN A CALL. IT TURNED INTO A HUGE MARCH. “STOP THIS ‘ROAD-BLOCK’!” “SAVE NIGAVANI!” “SHAME ON AGITATION!” PEOPLE WERE FED UP AND HENCE WERE JOINING IN TO SHOW THEIR SUPPORT. THIS CONTINUOUSLY SWELLED UP THE SIZE OF THE MARCH. NOW, IF THE FARMERS FROM SANGRAM NAGAR AND THESE PEOPLE COME FACE TO FACE THEN SURELY THERE WOULD BE A GREATER TROUBLE. PEOPLE ON BOTH THE SIDES ARE EXTREMELY DISSATISFIED AND ANGRY. NO ONE CAN TELL THE END RESULT.
लोक घुपळ्या घुपळ्याने जमत होते... सभेत भाषण दिल्यागत तावातावाने बोलत होते..तासाभरातच तेथे तीन-चार हजारांचा जमाव जमला! कुणी हाकारे-कुकारे न घालता एक प्रकारच्या चिडीने लोक जमले होते... जमत होते...आणि मग हा मोर्चा निघाला... ‘रास्ता रोको’ हटाओ...‘निगवणी बचाओ!’‘आंदोलनाचा...’‘धिक्कार असो!’वैतागलेले नागरिकही या मोर्चात अधे-मधे रस्त्यात सामील होत होते व मोर्चाची लांबी आणखीन फुगीर करीत होते. हे मोर्चातील नागरिक व संग्रामनगरातील शेतकरी आमनेसामने आले तर कदाचित अनावस्था प्रसंग ओढवेलही! कारण दोन्हीकडील लोक चिडलेत, खवळलेत! काय होईल सांगता येत नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ZOMBADA #ZOMBADA #झोंबडं #FICTION #MARATHI #MAHADEOMORE #महादेवमोरे "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    श्री महादेव मोरे यांची ‘झोंबड’ ही कादंबरी एकाच विषयाला धरून लिहिलेली नाही. त्यांनीच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीतील रूढसंकेत व ठोकताळ्यांना बगल देऊन कादंबरीच्या फॉर्ममध्ये काही वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे वेगळं देताना अनेक विष एकत्र आल्याने सुसूत्रतेचा अभाव या कादंबरीत जाणवल्यावाचून राहत नाही. मुळात कादंबरीचा विषय विडी कामगारांचा. विडी कामगारांचे प्रश्न हाताळून एक युनियन पुढारी जन्माला येतो हे खरं. तो जन्माला येणं हेच जर दर्शवायचं होतं तर विडी कामगारांचा प्रश्नांना कादंबरीची पन्नास एक पृष्ठ खर्ची घालायचं कारण नव्हतं, त्यानंतर जोगतिणीचे प्रश्न. शेवटी तंबाखूचे भाव वाढवून मिळावेत म्हणून होणारं आंदोलन. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची ओळख करून देणं अवघडच. या कादंबरीत पात्रांची रेलचेल भरपूर. ती पात्रं वास्तविक जगातील कुणावरून बेतलेली आहेत हे सहज ओळखता येतील, इतकं त्यांच्या नावाशी असलेले साधम्य जाणवतं. आता उदाहरणंच द्यायची झालीत तर कादंबरी न वाचताही ओळखता येतील. अशी काही नावे डॉ. आबा आडारकर, समाजवादी कार्यकर्ते. एक गाव एक मसणवटाचे प्रणेते ग. बा. हेगडे. संपादक, पत्रकार त्यांचे चार चार दिवाळी अंक उमेश कुलकर्णी - बटाटा आंदोलन कुलकर्णी आणि जोशी उदंड असल्याने नाव लगेच समजून येणार नाही, पण शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणारे एखादे दुसरेच जोशी असतात, तर अशी अनंत पात्र कादंबरीत आहेत. कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. निगवणी गावातील विडी कामगारांचे, यात स्त्रियांचा भरणा जास्त. प्रश्न हाताळण्यासाठी एका कॉलेजातील प्रा. सतीश कुलकर्णी हे पुढाकार घेतात, त्यात यशस्वी होतात. त्यांचं नाव होतं. ते युनियन पुढारी म्हणून उदयास येतात, त्यामुळे ज्यावेळी जागतिणी भगिनीचं अधिवेशन घेतलं जातं, त्यावेळीही सतीश कुलकर्णीला आपोआपच मान मिळतो. त्यानंतर तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना करावी आणि त्यांना तंबाखूचा रास्त भाव मिळावा. यासाठी प्रयत्न सुरू होतात. धरणं मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको अशा वाटेने जात कादंबरी शेवटी अशा निष्कर्षाप्रत येते. कशा ते लेखकाच्याच शब्दातून वाचा. ‘‘खरं सत्य आहे तरी काय मग ?’’ ‘‘ते सारं अशा ओझरत्या भेटीत सांगून संपणार नव्हे, तो एक स्वतंत्र व्याख्यानाचाच विषय आहे म्हणा ! थोडक्यात म्हणजे दोन तालेवारांमधील झोंबडं. हेच केवळ त्यात सत्य आहे ! भारतातील कुठल्याही भागात जा, तिथं बुडाखाली बक्कळ पैसा असलेले निदान दोन तालेवार तरी असतातच व पैशाच्या जोरावर समाजकारण, राजकारण करण्याचं निमित्त करून त्यांचं कायम झोंबडं चालू असतं. एकमेकांवर मात करावयाची बंधनं म्हणून हे लोक माणसं वापरत असतात. काही इकडे असतात काही तिकडे असतात. हे ‘छू’ घालतात. त्याच्या त्याच्यात आणि झोंबड लावून रिकामे होतात. एखाद्याकडील हरला की, दुसरा विजयोन्मादाने थय-थय नाचायला लागता, तोवर पराजित मनात काही डावपेच ठेवून परत त्याला भिडतो ! सुटलं-सुटलं. संपलं-संपलं, असं वाटतंय तोवर परत झोंबडं सुरु होतं ! त्यात वेगळं काय नाही गायकवाड ! लोकशाही भारतात किंवा भारतातील तथाकथित निरोगी लोकशाहीत आढळणारी रोजाना स्टोरी आहे ही ! इथं एका भिडूचं नाव आहे जयपुरीया, तर दुसऱ्याचं जीवजी भाय ! आणि ह्यांचं हे झोंबडं दोघातील कुणी एक ‘संपेल’ तेव्हाच खऱ्या अर्थानं संपायचं !!’’ इतं कादंबरी संपली आहे. खरं तर दोन-तीन विषय एकत्र घेऊनही कादंबरी छानचं रंगली असती. कादंबरीचा आवाका मोठा, परंतु वास्तव जगातील पात्रांना कादंबरीत घुसडण्याचा अट्टाहास केल्यानं विषयाची कुतरओढ झाली आहे. वास्तविक जगातील पात्रं त्यांच्या त्यांच्या परीनं कार्य करीत आहेत. त्यांच्यातही गुणदोष आहेत. पण त्या सगळ्या पात्रांना कादंबरीत आणल्यानं विषयांतर होत राहून वाचकाची मुख्य विषयापासून ताटातूट होत राहिल्यानं रसभंग होतो. डॉ. सुनील अचलापूरकर याला बोकड छापदाढी कशासाठी ? तर केवळ वास्तव पात्राची ओळख पटावी म्हणून. एकंदरीत ‘झोंबडं’ ही कादंबरी वेगळ्या विषयावरील असूनही घाईघाईत लिहिल्यासारखी वाटते. अर्थात ग्रामीण वाचकांना ही कादंबरी आवडायला हरकत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more