ELIE WIESEL

About Author

Birth Date : 30/09/1928
Death Date : 02/07/2016


ELIE WIESEL WAS BORN IN ROMANIA IN 1928. HE AND HIS FAMILY WERE DEPORTED TO AUSCHWITZ WHEN HE WAS VERY YOUNG. LATER IN THE PRISON OF BUSHENWALD. HIS PARENTS AND YOUNGER SISTER DIED IN THE PERSECUTION THERE. ELIE WIESEL MOVED TO PARIS AFTER WORLD WAR II. THERE HE WROTE THE BOOK KNIGHT. THIS BOOK CONTAINS HIS SHOCKING MEMORIES.

एली वायझेल यांचा जन्म १९२८ मध्ये रुमानियात झाला. अगदी लहान असतानाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ऑशवित्झ इथे हद्दपार करण्यात आले. नंतर बुशेनवाल्डच्या तुरुंगात. तिथल्या छळामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान बहीण यांचा मृत्यू ओढवला. महायुद्ध संपल्यावर एली वायझेल पॅरिसला गेले. तिथे त्यांनी नाइट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या आठवणी आहेत. एली वायझेल हे बोस्टन विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि यू. एस. होलोकॉस्ट मेमोरियल कौन्सलचे अध्यक्ष आहेत. अ बेगर इन जेरुसलेम आणि सोल्स ऑन फायर या दोन पुस्तकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. प्रत्येक सहृदय, संवेदनशील माणसाने अवश्य वाचावीत, अशी ही पुस्तके आहेत. कला आणि प्रतिभा यांचा उत्कृष्ट मिलाफ या पुस्तकांमध्ये आढळतो. डॉन, द अक्सिडेंट, द टाउन बियाँड द वॉल, लीजन्डस ऑफ अवर टाइम, द ओथ, द मॅडनेस ऑफ गॉड, अ ज्यू टुडे ही तसेच इतर आणखी काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. १९८६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. नोबेल पारितोषिक समितीने एली वायझेल यांच्याबद्दल म्हटलं आहे : ज्या वेळी वंशवाद, हिंसाचार, दडपशाही यांनी जगाचा ताबा घेतला होता, त्या वेळी मानवतेला आध्यााQत्मक शक्तीच्या बळावर मार्गदर्शन करणाNया नेत्यांपैकी ते एक आहेत. अमर्याद मानवताप्रेम हेच न्याय आणि शांततेसाठी चिरकाल टिकणारे मूल्य आहे याचा त्यांनी जगापुढे वारंवार उच्चार केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NIGHT Rating Star
Add To Cart INR 170

Shop by

Latest Reviews

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more