ELIE WIESEL

About Author

Birth Date : 30/09/1928
Death Date : 02/07/2016


ELIE WIESEL WAS BORN IN ROMANIA IN 1928. HE AND HIS FAMILY WERE DEPORTED TO AUSCHWITZ WHEN HE WAS VERY YOUNG. LATER IN THE PRISON OF BUSHENWALD. HIS PARENTS AND YOUNGER SISTER DIED IN THE PERSECUTION THERE. ELIE WIESEL MOVED TO PARIS AFTER WORLD WAR II. THERE HE WROTE THE BOOK KNIGHT. THIS BOOK CONTAINS HIS SHOCKING MEMORIES.

एली वायझेल यांचा जन्म १९२८ मध्ये रुमानियात झाला. अगदी लहान असतानाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ऑशवित्झ इथे हद्दपार करण्यात आले. नंतर बुशेनवाल्डच्या तुरुंगात. तिथल्या छळामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान बहीण यांचा मृत्यू ओढवला. महायुद्ध संपल्यावर एली वायझेल पॅरिसला गेले. तिथे त्यांनी नाइट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या आठवणी आहेत. एली वायझेल हे बोस्टन विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि यू. एस. होलोकॉस्ट मेमोरियल कौन्सलचे अध्यक्ष आहेत. अ बेगर इन जेरुसलेम आणि सोल्स ऑन फायर या दोन पुस्तकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. प्रत्येक सहृदय, संवेदनशील माणसाने अवश्य वाचावीत, अशी ही पुस्तके आहेत. कला आणि प्रतिभा यांचा उत्कृष्ट मिलाफ या पुस्तकांमध्ये आढळतो. डॉन, द अक्सिडेंट, द टाउन बियाँड द वॉल, लीजन्डस ऑफ अवर टाइम, द ओथ, द मॅडनेस ऑफ गॉड, अ ज्यू टुडे ही तसेच इतर आणखी काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. १९८६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. नोबेल पारितोषिक समितीने एली वायझेल यांच्याबद्दल म्हटलं आहे : ज्या वेळी वंशवाद, हिंसाचार, दडपशाही यांनी जगाचा ताबा घेतला होता, त्या वेळी मानवतेला आध्यााQत्मक शक्तीच्या बळावर मार्गदर्शन करणाNया नेत्यांपैकी ते एक आहेत. अमर्याद मानवताप्रेम हेच न्याय आणि शांततेसाठी चिरकाल टिकणारे मूल्य आहे याचा त्यांनी जगापुढे वारंवार उच्चार केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
NIGHT Rating Star
Add To Cart INR 170

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more