AJIT RAJARAM JADHAV

About Author

Birth Date : 10/02/1974


AJIT RAJARAM JADHAV WAS BORN IN KOLHAPUR. IN 1994, HE OBTAINED THE DEGREE OF CIVIL ENGINEER. EDUCATION OF TEMPLE ARCHITECTURE AND MAYAN ARCHITECTURE BY SHILPGURU PADMA BHUSHAN KAI. V. COMPLETED AT GANAPATI, TAMIL NADU.

अजित राजाराम जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. १९९४ मध्ये यांनी सिव्हील इंजिनिअरची पदवी संपादन केली. टेंपल आर्किटेक्चर व मयॉनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण शिल्पगुरू पद्मभूषण कै. व्ही. गणपती, तामिळनाडू यांच्याकडे पूर्ण केले. कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र, आधुनिक आर्किटेक्चरल ड्राँर्इंग्ज, वास्तुविषयक शास्त्रविधी - वास्तुविधी , ऐश्वर्य संपन्न होण्याचा राजमार्ग - श्रीयंत्र , प्रश्न तुमचे उत्तर शास्त्राचे - असेच का? इ. पुस्तकं प्रकाशित. शास्त्रोक्त स्वर्णपॉलीशयुक्त यंत्रे असा प्राचीन व अर्वाचीनतेचा अभूतपूर्ण संगम असलेला वास्तूशास्त्रावरील एकमेवाद्वितीय - वास्तुअजित ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १) अथर्ववेदातील वास्तुशास्त्र, अद्भूत मयसभा, सोन्याची लंका, इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथसंपदेवर दैनिक पुढारी या वर्तमान पत्रात अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित. २) शेतकऱ्यांसाठी वास्तुशास्त्रानुसार गाई-म्हशींचा गोठा, शेळीचा गोठा यावर संशोधनात्मक विषयांवर लेखन. ३) वास्तुशास्त्र व अंकशास्त्र : एक शास्त्रीय मिमांसा, जगातील सर्वांत श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, प्राचीन मंदिरातील तळघरांचा भुलभुलय्या, सर्वोच्च देवी शक्तीपीठ कामाख्या मंदिर असे मंदिर निर्माण शास्त्रावर लेखन. याशिवाय विविध दिवाळी अंक, विविध सामाजिक संस्था व न्यूज चॅनेलवर मुलाखती. • अध्यापक : प्राचीन वास्तुशास्त्र, टेंपल आर्किटेक्चर, जोतिषशास्त्र व मंत्रविज्ञान इत्यादी विषयांचा समन्वयावर इंजिनिअरींग व आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये अतिथी अध्यापक. • वास्तुशास्त्र अ‍ॅन्ड मंत्रविज्ञान रिसर्च फॉउंडेशन तर्फे वास्तुविषयक कार्यशाळेचे आयोजन. • स्टेज शो : वास्तुशास्त्राबद्दलचे समज / गैरसमज यावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम (प्रश्न तुमचे उत्तर वास्तुशास्त्रज्ञांचे; अर्थात वास्तु ते सुखवास्तू.) • बांधकाम क्षेत्रात अनेक प्रकल्पांचा प्रदीर्घ व समृध्द बांधकाम व्यवसायाचा अनुभव. भारत तसेच परदेशात ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार भवन निर्मितीसाठी अनेकांना सल्ला व अचूक मार्गदर्शन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VASTU AJIT Rating Star
Add To Cart INR 540
33 %
OFF
VASTUSHASTRA COMBO SET-2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 760 INR 509

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more