AJIT RAJARAM JADHAV

About Author

Birth Date : 10/02/1974


AJIT RAJARAM JADHAV WAS BORN IN KOLHAPUR. IN 1994, HE OBTAINED THE DEGREE OF CIVIL ENGINEER. EDUCATION OF TEMPLE ARCHITECTURE AND MAYAN ARCHITECTURE BY SHILPGURU PADMA BHUSHAN KAI. V. COMPLETED AT GANAPATI, TAMIL NADU.

अजित राजाराम जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. १९९४ मध्ये यांनी सिव्हील इंजिनिअरची पदवी संपादन केली. टेंपल आर्किटेक्चर व मयॉनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण शिल्पगुरू पद्मभूषण कै. व्ही. गणपती, तामिळनाडू यांच्याकडे पूर्ण केले. कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र, आधुनिक आर्किटेक्चरल ड्राँर्इंग्ज, वास्तुविषयक शास्त्रविधी - वास्तुविधी , ऐश्वर्य संपन्न होण्याचा राजमार्ग - श्रीयंत्र , प्रश्न तुमचे उत्तर शास्त्राचे - असेच का? इ. पुस्तकं प्रकाशित. शास्त्रोक्त स्वर्णपॉलीशयुक्त यंत्रे असा प्राचीन व अर्वाचीनतेचा अभूतपूर्ण संगम असलेला वास्तूशास्त्रावरील एकमेवाद्वितीय - वास्तुअजित ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १) अथर्ववेदातील वास्तुशास्त्र, अद्भूत मयसभा, सोन्याची लंका, इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथसंपदेवर दैनिक पुढारी या वर्तमान पत्रात अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित. २) शेतकऱ्यांसाठी वास्तुशास्त्रानुसार गाई-म्हशींचा गोठा, शेळीचा गोठा यावर संशोधनात्मक विषयांवर लेखन. ३) वास्तुशास्त्र व अंकशास्त्र : एक शास्त्रीय मिमांसा, जगातील सर्वांत श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, प्राचीन मंदिरातील तळघरांचा भुलभुलय्या, सर्वोच्च देवी शक्तीपीठ कामाख्या मंदिर असे मंदिर निर्माण शास्त्रावर लेखन. याशिवाय विविध दिवाळी अंक, विविध सामाजिक संस्था व न्यूज चॅनेलवर मुलाखती. • अध्यापक : प्राचीन वास्तुशास्त्र, टेंपल आर्किटेक्चर, जोतिषशास्त्र व मंत्रविज्ञान इत्यादी विषयांचा समन्वयावर इंजिनिअरींग व आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये अतिथी अध्यापक. • वास्तुशास्त्र अ‍ॅन्ड मंत्रविज्ञान रिसर्च फॉउंडेशन तर्फे वास्तुविषयक कार्यशाळेचे आयोजन. • स्टेज शो : वास्तुशास्त्राबद्दलचे समज / गैरसमज यावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम (प्रश्न तुमचे उत्तर वास्तुशास्त्रज्ञांचे; अर्थात वास्तु ते सुखवास्तू.) • बांधकाम क्षेत्रात अनेक प्रकल्पांचा प्रदीर्घ व समृध्द बांधकाम व्यवसायाचा अनुभव. भारत तसेच परदेशात ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार भवन निर्मितीसाठी अनेकांना सल्ला व अचूक मार्गदर्शन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VASTU AJIT Rating Star
Add To Cart INR 540
VASTUSHASTRA COMBO SET-2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 760

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more