AJIT RAJARAM JADHAV

About Author

Birth Date : 10/02/1974


AJIT RAJARAM JADHAV WAS BORN IN KOLHAPUR. IN 1994, HE OBTAINED THE DEGREE OF CIVIL ENGINEER. EDUCATION OF TEMPLE ARCHITECTURE AND MAYAN ARCHITECTURE BY SHILPGURU PADMA BHUSHAN KAI. V. COMPLETED AT GANAPATI, TAMIL NADU.

अजित राजाराम जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. १९९४ मध्ये यांनी सिव्हील इंजिनिअरची पदवी संपादन केली. टेंपल आर्किटेक्चर व मयॉनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण शिल्पगुरू पद्मभूषण कै. व्ही. गणपती, तामिळनाडू यांच्याकडे पूर्ण केले. कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र, आधुनिक आर्किटेक्चरल ड्राँर्इंग्ज, वास्तुविषयक शास्त्रविधी - वास्तुविधी , ऐश्वर्य संपन्न होण्याचा राजमार्ग - श्रीयंत्र , प्रश्न तुमचे उत्तर शास्त्राचे - असेच का? इ. पुस्तकं प्रकाशित. शास्त्रोक्त स्वर्णपॉलीशयुक्त यंत्रे असा प्राचीन व अर्वाचीनतेचा अभूतपूर्ण संगम असलेला वास्तूशास्त्रावरील एकमेवाद्वितीय - वास्तुअजित ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १) अथर्ववेदातील वास्तुशास्त्र, अद्भूत मयसभा, सोन्याची लंका, इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथसंपदेवर दैनिक पुढारी या वर्तमान पत्रात अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित. २) शेतकऱ्यांसाठी वास्तुशास्त्रानुसार गाई-म्हशींचा गोठा, शेळीचा गोठा यावर संशोधनात्मक विषयांवर लेखन. ३) वास्तुशास्त्र व अंकशास्त्र : एक शास्त्रीय मिमांसा, जगातील सर्वांत श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, प्राचीन मंदिरातील तळघरांचा भुलभुलय्या, सर्वोच्च देवी शक्तीपीठ कामाख्या मंदिर असे मंदिर निर्माण शास्त्रावर लेखन. याशिवाय विविध दिवाळी अंक, विविध सामाजिक संस्था व न्यूज चॅनेलवर मुलाखती. • अध्यापक : प्राचीन वास्तुशास्त्र, टेंपल आर्किटेक्चर, जोतिषशास्त्र व मंत्रविज्ञान इत्यादी विषयांचा समन्वयावर इंजिनिअरींग व आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये अतिथी अध्यापक. • वास्तुशास्त्र अ‍ॅन्ड मंत्रविज्ञान रिसर्च फॉउंडेशन तर्फे वास्तुविषयक कार्यशाळेचे आयोजन. • स्टेज शो : वास्तुशास्त्राबद्दलचे समज / गैरसमज यावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम (प्रश्न तुमचे उत्तर वास्तुशास्त्रज्ञांचे; अर्थात वास्तु ते सुखवास्तू.) • बांधकाम क्षेत्रात अनेक प्रकल्पांचा प्रदीर्घ व समृध्द बांधकाम व्यवसायाचा अनुभव. भारत तसेच परदेशात ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार भवन निर्मितीसाठी अनेकांना सल्ला व अचूक मार्गदर्शन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VASTU AJIT Rating Star
Add To Cart INR 540
33 %
OFF
VASTUSHASTRA COMBO SET-3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 820 INR 549

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more