AJIT RAJARAM JADHAV

About Author

Birth Date : 10/02/1974


AJIT RAJARAM JADHAV WAS BORN IN KOLHAPUR. IN 1994, HE OBTAINED THE DEGREE OF CIVIL ENGINEER. EDUCATION OF TEMPLE ARCHITECTURE AND MAYAN ARCHITECTURE BY SHILPGURU PADMA BHUSHAN KAI. V. COMPLETED AT GANAPATI, TAMIL NADU.

अजित राजाराम जाधव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. १९९४ मध्ये यांनी सिव्हील इंजिनिअरची पदवी संपादन केली. टेंपल आर्किटेक्चर व मयॉनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण शिल्पगुरू पद्मभूषण कै. व्ही. गणपती, तामिळनाडू यांच्याकडे पूर्ण केले. कृष्णमूर्ती ज्योतिषशास्त्र, आधुनिक आर्किटेक्चरल ड्राँर्इंग्ज, वास्तुविषयक शास्त्रविधी - वास्तुविधी , ऐश्वर्य संपन्न होण्याचा राजमार्ग - श्रीयंत्र , प्रश्न तुमचे उत्तर शास्त्राचे - असेच का? इ. पुस्तकं प्रकाशित. शास्त्रोक्त स्वर्णपॉलीशयुक्त यंत्रे असा प्राचीन व अर्वाचीनतेचा अभूतपूर्ण संगम असलेला वास्तूशास्त्रावरील एकमेवाद्वितीय - वास्तुअजित ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १) अथर्ववेदातील वास्तुशास्त्र, अद्भूत मयसभा, सोन्याची लंका, इत्यादी प्राचीन संस्कृत ग्रंथसंपदेवर दैनिक पुढारी या वर्तमान पत्रात अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित. २) शेतकऱ्यांसाठी वास्तुशास्त्रानुसार गाई-म्हशींचा गोठा, शेळीचा गोठा यावर संशोधनात्मक विषयांवर लेखन. ३) वास्तुशास्त्र व अंकशास्त्र : एक शास्त्रीय मिमांसा, जगातील सर्वांत श्रीमंत श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, प्राचीन मंदिरातील तळघरांचा भुलभुलय्या, सर्वोच्च देवी शक्तीपीठ कामाख्या मंदिर असे मंदिर निर्माण शास्त्रावर लेखन. याशिवाय विविध दिवाळी अंक, विविध सामाजिक संस्था व न्यूज चॅनेलवर मुलाखती. • अध्यापक : प्राचीन वास्तुशास्त्र, टेंपल आर्किटेक्चर, जोतिषशास्त्र व मंत्रविज्ञान इत्यादी विषयांचा समन्वयावर इंजिनिअरींग व आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये अतिथी अध्यापक. • वास्तुशास्त्र अ‍ॅन्ड मंत्रविज्ञान रिसर्च फॉउंडेशन तर्फे वास्तुविषयक कार्यशाळेचे आयोजन. • स्टेज शो : वास्तुशास्त्राबद्दलचे समज / गैरसमज यावर प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम (प्रश्न तुमचे उत्तर वास्तुशास्त्रज्ञांचे; अर्थात वास्तु ते सुखवास्तू.) • बांधकाम क्षेत्रात अनेक प्रकल्पांचा प्रदीर्घ व समृध्द बांधकाम व्यवसायाचा अनुभव. भारत तसेच परदेशात ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रानुसार भवन निर्मितीसाठी अनेकांना सल्ला व अचूक मार्गदर्शन.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
VASTU AJIT Rating Star
Add To Cart INR 540
33 %
OFF
VASTUSHASTRA COMBO SET-3 BOOKS Rating Star
Add To Cart INR 820 INR 549

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more