* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BELONGING
  • Availability : Available
  • Translators : SINDHU JOSHI
  • ISBN : 9788184982039
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2011
  • Weight : 239.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ABANDONED BY HER PARENTS, SAMEEM ALI SPENT SIX AND A HALF YEARS GROWING UP IN A CHILDREN`S HOME. WHEN SHE WAS TOLD THAT HER FAMILY WANTED TO TAKE HER BACK SHE COULDN`T WAIT TO START HER NEW LIFE WITH THEM. INSTEAD, SHE RETURNED TO A DIRTY HOUSE WHERE SHE WAS SUBJECTED TO ENDLESS CHORES. HER MOTHER BEGAN TO BEAT HER AND HER UNHAPPINESS DROVE HER TO SELF-HARM. SO SAMEEM WAS EXCITED WHEN SHE BOARDED A PLANE WITH HER MOTHER TO VISIT PAKISTAN FOR THE FIRST TIME. IT WAS ONLY AFTER THEY ARRIVED IN HER FAMILY`S VILLAGE THAT SHE REALISED SHE WASN`T THERE ON HOLIDAY. AGED JUST THIRTEEN, SAMEEM WAS FORCED TO MARRY A COMPLETE STRANGER. WHEN PREGNANT, TWO MONTHS LATER, SHE WAS MADE TO RETURN TO GLASGOW WHERE SHE SUFFERED FURTHER ABUSE FROM HER FAMILY. AFTER FINDING TRUE LOVE, SAMEEM FLED THE VIOLENCE AT HOME AND ESCAPED TO MANCHESTER WITH HER YOUNG SON. SHE BELIEVED SHE HAD PUT HER HORRIFIC EXPERIENCES BEHIND HER, BUT WAS UNPREPARED FOR THE CONSEQUENCES OF VIOLATING HER FAMILY`S HONOUR ...BELONGING IS THE SHOCKING TRUE STORY OF SAMEEM`S STRUGGLE TO BREAK FREE FROM HER PAST AND FIGHT BACK AGAINST HER UPBRINGING.
बालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा तिला कधी एकदा स्वत:च्या घरात जाईन असं झालं. ती आली मात्र एका अत्यंत घाणेरड्या घरात; जिथं तिला तिच्या लहान वयाला न झेपणारी कामे सतत करावी लागत. तिच्या जन्मदात्रीनेच तिचा अनन्वीत छळ आरंभला. या सर्वाला आपण स्वत:च जबाबदार आहोत असे लहानगी समीम समजू लागली. स्वत:च स्वत:ला शारीरिक इजा करून घेऊ लागली. आईबरोबर पाकिस्तानात जायला मिळणार हे समजल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. तेथे पोहोचल्यावर मात्र तिला कळून चुकले की तिच्या आईने तिला सुट्टीवर नेलं नव्हते. तेरा वर्षाच्या समीमचे एका अनोळखी पुरुषाबरोबर बळजबरीने लग्न लावण्यात आले. दिवस गेल्यावर तिला परत ग्लासगोत आणण्यात आले; ते केवळ कुटुंबाकडून होणारा छळ सोसण्यासाठी. खरं प्रेम म्हणजे काय याची जाणिव झाल्यावर स्वत:च्या लहान मुलाला घेऊन तिने घरच्या हिंसाचारापासून स्वत:ची सुटका करून घेतली. स्वत:च्या घरचा भयानक अनुभव ती मागे ठेऊन आली असा तिला विश्वास होता. परंतु तिच्या पळून जाण्याने तिच्या कुटुंबाच्या झालेल्या बेइज्जतीच्या परिणामांना तिला तोंड द्यावे लागेल याची कल्पना तिला कशी असणार? बिलाँगिंग म्हणजे एक धक्कादायक सत्य घटना आहे. ही कथा आहे एका छोट्या मुलीची, स्वत:च्या भूतकाळापासून करून घेतलेल्या सुटकेची, मोठी होत असतांना स्वत:च्या कुटुंबाकडूनच होणा-या छळा विरूद्ध दिलेल्या लढ्याची. सध्या नवरा आणि स्वत:च्या दोन मुलांबरोबर समीम अली मँचेस्टरला राहते. स्थानिक राजकारणात तिचा सक्रीय सहभाग आहे. मॉस साईड या संस्थेत ती समुपदेशनाचे काम करते. बळजबरीने लावल्या गेलेल्या लग्नांविरूद्ध ती सतत आवाज उठवत आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #BELONGING #SINDHUJOSHI #SAMEEMALI #HUMPHREYPRICE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more